Welcome to misalpav.com
लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत. १. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.) २. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले. ३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं. ४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग. धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती. आफळे बुवा: गांधी भाग-१ Charudatta Aphale: Gandhi Part 1 आफळे बुवा: गांधी भाग-२ Charudatta Aphale: Gandhi part 2 आफळे बुवा: गांधी भाग-३ Charudatta Aphale: Gandhi Part 3 गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
प्रचंड ! गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच ! आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ... हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी . अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ... हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल ! आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो. रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत
>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ... जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !! बाकी ... तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ? ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

हाडुकराव
एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?
वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)
आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी
म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;) मग चालू द्यात. गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! (बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !! धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से ! बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !! सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ? अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?
हा तो प्रश्न .. आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) ) तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये
हाच तर कळीचा मुद्दा आहे ! असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,
गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !
आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)
हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !
'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो. तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!! आता असोच.. बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच
गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते ! प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना
अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .
>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे ! असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

लॉगिक
हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी. पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.
तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)
माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.
बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol* अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;) ---- "It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits " ----

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'
हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.
>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) .... बाकी ह्यावरुन एक घटना आठवली : आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin* इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..
या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे. सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे - पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते. गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही ! ह्या कृतीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही; आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही. सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!! असेल, असे पण असू शकेल. बाद्वे, "गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण या धाग्याचे शतक काही होत नाही. मी याबद्दल मिपाच्या अनुभवी सदस्यांचा जाहीर धिक्कार करतो.

आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

तू नळीवर आहे. जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0CCwQtwIwAg&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DWA4AZWM75QA&ei=NM8WVMFGkvForfCB6Ak&usg=AFQjCNFh6xT8nMCNV7WzVfoHZXL4yt1hjQ&sig2=YM6hRDnppI2NP5btzJJBMw