Welcome to misalpav.com
लेखक: धर्मराजमुटके | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम +१

दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!! मात्र अनिसवाल्यांचे विचार मला कधिच मानवले नाही. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. मी कॉलेजात असताना कॉलेजमध्येच श्याम मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते. ३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही आणि मिळण्याची शक्यता नाही. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो. असो. विचार पटो ना पटो, कुणाचाही अशा तर्‍हेने अंत व्हावा, हे दु:खदायकच. पुन्हा एकदा दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

सर, ३० वर्षापुर्वी आपण वीचारलेला प्रश्न काय होता? ज्याचे आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते.

मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. >> साफ असहमत. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते.>> आपण श्याम मानव किंवा दाभोळकरांना निरुत्तर केले असा दावा करणारे तुम्ही पहिलेच नाही हे नोंदवून ठेवतो. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.>> हा तर चक्क ठोकून देतो ऐसा जी प्रकार आहे. असल्या भोंगळ विधानाला सिद्ध करता येत नाही तसेच असिद्धही. तेव्हा 'मी निरुत्तर केले' हा दावा करता येतोच. तुमच्या सर्वच मुद्द्यांना विस्तृत उत्तरे द्यायची तयारी आहे पण 'आज' ते औचित्याला धरून होणार नाही म्हणून थांबतो. कधीतरी भेटून बोलू या.

ता.क. माझा नि अंनिस वा दाभोळकरांचा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही किंवा त्यांचे सारेच मुद्दे मला पटत होते असे नाही. तेव्हा माझा प्रतिसाद केवळ तुमच्या प्रतिसादाचा प्रतिवाद समजावा.

अरेच्या उद्धृते कुठे गेली??? संदर्भच हरवले की. मुटे यांचे हे तीन मुद्दे उद्धृत केले होते. जे गायबले. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.
लेखक: Nile वेळ: Wed, 08/21/2013 - 02:38 Permalink

"मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते" म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेले उत्तर तुम्हाला कळले नाही का पटले नाही? "३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही" ३० वर्षात अजून किती लोकांना विचारलात प्रश्न? बाकी ३० वर्षांनंतर तुम्ही स्वतःच प्रश्न विसरलेला दिसता, नाहीतर लिहला असतात. असो.

इ-सकाळमधे दाभोळकरांवरील वृत्ताच्या खाली लिहीलेले पण कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहीलेला उदासबोध... दुवा. आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास । अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे । त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥ या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ? लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥ भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश । दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥ नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा । सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥ देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती । भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥ कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती । तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥ येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती । त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥ कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी । प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥ दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे । काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥ सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी । भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥ ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद । काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं ’हा आपला अपमान आहे’ असं बोलतं..तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे. त्याच धर्तीवर इथे सांगावेसे वाटतेय की हिंदुंवर कोणी आरोप करत नाहीये, काही स्वयंघोषित ठेकेदार आहेत हिंदु धर्माचे जे रोज उठसुठ दाभोळकरांवर टिका करायचे त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले आहेत हे नक्की. पण म्हणुन समस्त हिंदुंवर आरोप होतोय असं भासवुन कोणी उर बडवायची गरज नाहीये. जसे रोज दाभोळकरांवर आरोप व्हायचेत की ते मिशनरींचे हस्तक आहेत, फ़क्त हिंदुंधर्मींयांविरुद्धच बोलतात वगैरे वगैरे..तसेच हेही फ़क्त आरोप आहेत कि काही मंडळींनी दाभोळकरांविरुद्ध इतका अपप्रचार केला की त्यातुन हा hate crime घडला असावा. शेवटी १०-१५ वर्षांनी चौकशीतुन काहीतरी बाहेर येईल, पण तोवर आरोप-प्रत्यारोप चालणारच. हिंदुंचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

हा अर्थ प्रथमच ऐकला आणि आवडला. दाभोळकरांच्या बाबतीत तो खर्‍या अर्थाने योग्य आहे.

जे झाले ते फारच दु:खदायक आहे. एका महान विचारांची हत्या झाली. निषेध करावा तितका थोडाच. डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली.

अशा माणसाची हत्या करेपर्यंत मजल का जाते? आर्थिक राजकारण असलं तरी इतके वर्ष अंनिसचं कार्य असूनही या बुवाबाजीवाल्यांची दुकानं जोरात सुरूच होती ना!! कदाचित कोणीतरी त्यांचा विरोध वैयक्तिक घेउन हत्या केली असावी. हि घटना महाराष्ट्रात घडली हे अविश्वसनीय आहे. मारेकरी पकडला जाणार नहिच ! श्रद्धांजली !

एका विशिष्ट विचारांसाठी झोकून देऊन काम करणारा तळमळीचा 'माणूस' आज संपवला गेला. पण ह्या हत्येला ज्या पध्दतीनं रंग दिला जातो आहे ते पाहून आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. 'अमुक एका विचारांनी ही हत्या केली' असं बेजबाबदारपणाचं विधान केलं की परिस्थितीचा रंग काय नी कसा बदलतो हे न उमजण्याइतपत आपले पुढारी निरागस नक्की नसावेत. जेव्हा विचारांनी ही हत्या केली असं म्हणलं जातं तेव्हा 'नक्की विचारच असावेत का?' हा प्रश्न पडल्यावाचून रहावत नाही. आजवर महाराष्ट्रात केवळ विचारांना विरोध म्हणून खून पडले नाहीत (नसावेत) . हां, आर्थिक भानगडींच्या मूळावर एखादा सेवाभावी कार्यकर्ता येत असेल तर त्याची विल्हेवाट लावणं तसं आपल्याकडं नवं नाही. आपण भाबड्या जनतेला दिसतो तो केवळ अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचा पदर. पण ह्या चळवळीच्या माध्यमातून कुणाच्या आर्थिक गणितांच्या शेपटावर कसा पाय पडला असेल हे कुठं आपल्याला ठाऊक असतं? अन अश्यांचे लागेबांधे कुठे कसे जुळलेले असू शकतात हे तर तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या गावीही नसतं. बरं, त्यातून आणि, निवडणूका जवळ येताहेत. वातावरण तापवण्यासाठीची दिशाही काहीशी दिसते आहे काही प्रभृतींच्या विधानांमधून... त्यावरुन तर मनातला संशय अधिकच गडद होतो. आज इतकी वर्षं झाली डॉ.दाभोळकरांच्या चळवळीला; जादूटोणा विरोधी कायद्याचं घोंगडंही भिजत घालून आता बराच काळ लोटला. कोणत्याही चळवळीचा नेता हा त्या चळवळीच्या सुरुवातीच्या अन तरुणपणाच्या काळात अधिक प्रखर आणि सक्रिय असतो. दाभोळकरांना संपवायचं असतं तर तोच काळ जास्त योग्य नव्हता काय? निदान गेलाबाजार जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल चर्चा सुरु झाली तो तरी. पण नाही...ही हत्या तेव्हा नाही झाली! म्हणजे ही हत्या विचारांच्या विरोधातून झाली नाही असाही निष्कर्श काढता येऊ शकतो का?

एकमात्र "(डोके) शाबूत" प्रतिसाद (बाकी मिपावर पण राजकारण्यांसारखी या मुद्द्यावरून चिखलफेक करू नये अशी वाचन मात्र मिपाकरची प्रार्थना) साळ्गावकर्-दाभोळकर यांचे विचारांवर चर्चा/माहिति लेख हिच मिपाकरांकडून ऊचित श्रद्धांजली ठरेल.

डॉ. नरेंद्र दाभोळकर व जयंत साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! दाभोळकरांना गोळ्या घालून मारणे हा नालायकपणाचा व क्रूरतेचा कळस आहे. खुन्यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. काल बर्‍याच मराठी वाहिन्यांवरच्या प्रतिक्रिया ऐकल्या व चर्चा पाहिल्या. एकंदरीत सर्वांनी संशयाची सुई सनातन प्रभातकडे वळविली आहे. ज्या खुन्यांनी गोळ्या झाडल्या ते सराईत व्यावसायिक सुपारी किलर असावेत. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी, पोलिस चौकीपासून १०० मीटरच्या आत चालत येऊन अचूक गोळ्या घालणे हे व्यावसायिक भाडोत्री मारेकर्‍यांचेच काम असणार. असे मारेकरी हे राजकीय पुढारी, माफिया, बांधकाम व्यावसायिक, गुन्हे करणार्‍या टोळ्या यांच्याशी संबंधित असतात. सनातन प्रभात सारखी फक्त पनवेल परिसरात थोडेसे अस्तित्व असलेली संघटना असे कृत्य करेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. अशी शक्यता पूर्णपणे फेटाळता आली नाही तरी शक्यता कमी वाटते. जादूटोणा विरोधी विधेयकामुळे सुद्धा ही हत्या होईल असे वाटत नाही, कारण हे विधेयक गेली १७ वर्षे प्रलंबित आहे व ते विधिमंडळात कधीही मंजूर होणार नाही ही सर्वांनाच खात्री आहे. अंधश्रद्धा निर्मूलन किंवा हे विधेयक या विषयांबाबतीत गेल्या काही दिवसात असे काहीही नवीन घडले नव्हते की ज्यामुळे त्यांचा खून करण्यास कोणीतरी प्रवृत्त व्हावे. त्यांनी गेल्या २ महिन्यांपासून जातपंचायतीविरूद्ध आवाज उठविला होता. एखादी जात पंचायत यामागे असावी का? खुनाचे नेमके कारण व हेतू लक्षात येत नाही. सनातन प्रभात किंवा एखादी जातपंचायत यामागे असण्याची थोडीशी शक्यता असली तरी त्यांचा मुख्य हेतू लक्षात येत नाही. त्यांचा एखादा जागेचा वाद होता का हे माहिती नाही. पण पुण्यात "साधना"ची कार्यालये ही सदाशिव पेठ, शनिवार पेठ अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि पुण्यात लँड माफिया देखील आहेत. एकंदरीत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी व वाईट आहे.

साधनेची कार्यालये दाभोलकरांची वैयक्तिक मालमत्ता होती काय? स्पेक्युलेशन्स आर ऑलराईट, पण हे लँड माफिया प्रकर्ण पटत नाही. कुणी केले असावे याबद्दल मला स्वतःला मत नाही. पण पोलिसतपास होऊन सत्यच काय ते बाहेर येईल अशी अंधश्रद्धा यानिमित्ताने बाळगायला काय हरकत आहे?

आज २० ऑगस्टला नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष झाले. त्यांच्या खुनाचे कसलेच धागे-दोरे अद्याप पोलिस-सरकारच्या हाती लागलेले नाहीत. त्याच्या निषेधाचा आवाज सर्व समाजाच्या हृदयापर्यंत आणि आजूबाजूला लपून बसलेल्या खुन्यांच्या निदान कानापर्यंत पोचावा म्हणून त्याच दिवशी पुण्यात होणाऱ्या रिंगणनाट्यामागची भूमिका. अधिक माहिती या दुव्यावर .. Dabholkar

:) सहमत- मंदार.. & बाळ... उगीचच एखाद्याला ग्लोरिफाय करणे चुकीचेच वाटते. २० ऑगस्ट'ला ज्यांचा ज्यांचा खून झालाये.. किंवा ज्यांना ज्यांना मृत्यू आलाये.. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!.. गेल्यावर्षी महामृत्यू पावलेले प्रसिद्ध ज्योतिषी 'ज्योतिर्भास्कर'- "श्री जयन्त साळगांवकर" यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! .. तसेच आजच निधन पावलेले प्रसिद्ध योगाचार्य- "अय्यांगार गुरुजी" यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली !!!! त्याचप्रमाणे स्व. पंतप्रधान- श्री. राजीव'जी गांधी यांच्या जयन्तीनिमित्त त्यांच्या स्मृतीस "विनम्र अभिवादन"!!!!! :) .... :)

महामृत्यू
ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?

ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?
अं.. हो.. नॅचरली - म्ह्णजे .. जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो... :) . कारण यांच्या कोणत्याच इच्छा मागे उरलेल्या नसतात. :) .. :) दाभोळकरांना आलेला मृत्यू- हा अचानक होता. ध्यानी मनी नसताना, जगण्याची किंवा समाजासाठी अजून कार्ये करण्याची इच्छा मनात असताना मनाविरूद्ध आलेला मृत्यू हा व्यक्तीला सहसा पुढे "गती" प्राप्त करून देत नाही. ते स्वत: जरी आत्मा मानत नसले, तरी "पुराणा"नुसार "अश्या" पद्धतीने मृत्यूमुखी पडलेल्या शरीरातील आत्म्यांना "पिशाच-योनी" प्राप्त होते. ..... ( आणि प्लँचेट करून कुणीही त्यांना सहज बोलावू शकते !!! ;) .. ;) हं हं.. ) अश्या आत्म्यांना मुक्ती मिळणे अवघड असते.... :) शेवटी आयुष्यात केलेल्या आपापल्या ""कर्मा""नुसारच प्रत्येकाला मृत्यू आणि मुक्ती मिळत असते.

महानिर्वाण म्हणून स्वतःला मोठं करण्याचा क्षीण प्रयत्न.
हे तुम्ही कशावरुन ठरवलंत? आणि शब्द नेमके वापरत चला. "ग्लोरीफाय करण्याचा क्षीण प्रयत्न" म्हणा. *lol*

मलाही. महानिर्वाण प्राप्त होवून दुसर्‍या बिगब्यांगमध्ये तयार झालेल्या आकाशगंगेत दुसरा जन्मही मिळाला, आहात कुठे!

पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?
म्हणजे काय? फॉक्कन शिवला म्हणतानाच दुसरा जन्म मिळाला, नैतर तरंगत राहिलो असतो कयामतीपरेंत.

वर मृगनयनी यांनी म्हटल्याप्रमाणे,
जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो...
तुमच्याही बाबतीत हेच झाले असणार.

असेल बॉ. आमचा पिंड त्या भाताच्या मुदीत कैद होता आणि कावळ्याने त्याला चोच मारताक्षणी आम्ही दुस्रीकडे जन्मास आलो, इतकेच आठवते आहे. बाकी अगोदरच्या जन्मातलं आता काय आठवत नाही.

माणसाच्या मृत्यूसमयी त्याचे सारे संस्कार त्याच्या चित्तात साठवले जातात. मानसाचा पुढचा जन्म जेव्हा होतो तेव्हा एखादया बॅकप हार्ड डिस्कवरुन नविन संगणकात ज्याप्रमाणे जुन्या संगणकातील फाईल्स कॉपी कराव्यात त्याप्रमाणे हे जुन्या संस्कार नव्या जन्मात उचलले जातात. असं म्हणतात हा. खरे खोटे ते धर्मशास्त्र पंडीत जाणोत. :)

दाभोलकर हे मंदार जोशी ( व तुमच्या) विचारांच्या अगदी विरुद्ध विचारांचे असल्याने आलेल्या तिरस्कारात्मक प्रतिक्रियेला उपहासाने उत्तर द्यायचा प्रयत्न निष्फळ म्हणायचा.. खून झाल्यामुळे ग्लोरीफिकेशन होत नसते. त्यांच्या कार्याने ते आधीच झालेय. तुमचा प्रतिसादात देखिल मेलेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून नंतर तिघांचा खास उल्लेख आहेच.. ..

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

अंदाज व्यक्त केलेला आहे. हत्या झाल्यावर ज्यांनी गांधींची हत्या केली त्यांनीच दाभोलकरांनी केली असे तारे आपल्या एका मंत्र्यांनी तोडले होते त्याला पारावरच्या गप्पाही म्हणवत नाही

श्री. मंदार आणि बाळ. आपल्या भावना पोहोचल्या. यात दाभोळकरांना ग्लोरीफाय केलेय म्हणजे नक्की काय केले आहे ते कळाले नाही. तुम्ही या धाग्यावरच्या सगळया प्रतिक्रिया वाचल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय की फक्त धाग्याचे शीर्षक वाचून प्रतिसाद दिला आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं. त्यांना ग्लोरीफाय करायला त्यांच्याएवढ्याच ताकदीचा माणूस पाहिजे. इथे आपण बहुतेक सगळे बोलघेवडे आहोत. (कुणी खरंच कृतीशील कार्यकर्ता असेल तर क्षमस्व).