नमस्कार !!,
आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली .
मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये.
हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?
कारण टोल चा झोल आपल्याला काही माहित नव्हताच (आता हि कळणार नाही), मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा सध्या तरी महाराष्ट्रातील एक उत्तम मार्ग म्हणता येईल जिथे आपण टोल देतो काही प्रमाणात का होईना ठीक आहे.
पण हीच गोष्ट पुणे ते कोल्हापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाला लागू होत नाही , सरासरी ५० ते ६० किमी ला टोल आणि रस्ते तर काय केवळ एक बाजू सिमेंट चे आणि दुसरी बाजू डांबर. काय हे ??????
आणि टोल कशासाठी तर म्हणे रस्ते व्यवस्थित ठेवणे आणि त्यांची निगा राखणे.
अरे कशाला बनवताय, आहे तोच रस्ता केवळ वरून डांबर मारले जाते. Just Patching जसे काही ठिगळ लावले आहे.
एक साधा हिशेब , मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर समजा एका चारचाकी ला ५० रुपये टोल घेतला तर एका दिवसाला तिथून ५०० चारचाकी गेल्या (५०x ५००=२५००० रुपये रोज ) तर महिन्याला सरासरी २५०००x ३०=७५०००० रुपये मिळतात. वर्षाला ९०००००० रुपये.
हे केवळ एक उदाहरण आहे, रस्ता बांधून आता जवळपास १५ वर्ष झालीत. तरी पण वसुली चालूच आहे.
आणि अजून किती दिवस टोळ भैरव पाळायचे ?????
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
आंदोलन करा कोल्हापुर
टोल बंद करणे फार पुढची गोष्ट
आकडेमोड