अनेक फसलेले फलादेश आहेत अगदी उद्या हा माणूस मारणार तुम्ही नातेवैकाना बोलून घ्या असे डॉक्टरानी सांगितले आणि नाही हा माणूस काही लवकर किंवा उद्या मरत नाही असे ज्योतिषाने सांगितले तेव्हा कधी डॉक्टर तर कधी ज्योतिषी बरोबर आले आहेत
असे वाचावे
ज्ञानव तसेच पेठकर काकांचे प्रतिसाद वाचनियच आणि मननियही.
उत्सुकता शमनार्थ जोतिषाकडे जाणार्यांचे प्रमाणही बरेच आहे, पण ज्योतिषाच्या आहारी जाऊ नये ही खरंच.
कुणाचाही जन्म आणि मृत्युची वेळ आपल्या हातात नाही हे अनुभवलय. अगदी इंडक्षन/ सिझेरियनच्या तारीख ठरवून केलेल्या केसेस सुद्धा ऐनवेळी पुढे/ मागे होत असलेल्या पाहिल्यात. तस्मात, जे आहे ते स्विकारुन आनंदाने पुढे नाण्यात शहाणपणा :)
"पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ?"-->
ज्ञानवजी,
माझ्यामते मृत्यू स्थान वेळेवरून पुनर्जन्माची वेळ नाही सांगता येत. ज्योतिषशास्त्र हे कर्माधिष्टीत आहे. माणसाचा पृथ्वीवरील जन्म हा पूर्वजन्मात केलेली काही फळे ह्या जन्मात भोगण्यासाठी होतो. तसे ते भोगण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण करून देण्याचे कार्य हे ग्रह करत असतात. कुंडली म्हणजे ग्रहांची केलेली मांडणी ज्यावरून फलादेशाचा अंदाज बांधता येतो. हि मांडणी करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे जन्मस्थळ आणि जन्मवेळ. त्यामुळे फलादेशाचा अंदाज बांधण्यास मदत करणारे हे ज्योतिषशास्त्र पृथ्वीवरील जन्मानंतर मदतीस येते.
हिंदू संस्कृतीतील वेद, शास्त्रे, पुराणे यातील मताप्रमाणे मानवी आत्म्याला ३ देहांची उपाधी लाभली आहे. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, आणि कारणदेह. स्थूलदेह पडल्यानंतर सूक्ष्मदेहसहित आत्मा का सुक्ष्मलोकात जन्म घेतो म्हणजेच माणसाचा जसा स्थूलदेहसहित पृथ्वीवर जन्म होतो तसाच मृत्यूनंतर तो सुक्ष्मलोकात होतो. सुक्ष्मलोकात किती वर्ष राहायचे हे माणसाच्या सर्व जन्मातील केलेल्या कर्मावर अवलंबून असते. साधारणपणे जास्तीत जास्त हे आयुर्मान पृथ्वीवरील १००० वर्षाइतके असू शकते. (संदर्भ: Book Autobiography of a Yogi by Paramhansa Yogananda: Chapter 43: The Resurrection of Shri Yukteshvar).
कोणत्या कर्माचे फळ भोगायचे हे निश्चित झाले कि त्याप्रमाणे पृथ्वीवरील एखाद्या स्थानावर ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर माणसाचा जन्म होतो. सध्याचे पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्र हे कर्मविपाकाचे गणित करण्यास असमर्थ असल्याने पूर्वजन्म केंव्हा आणि कुठे होईल हे नाही सांगता येत. यदाकदाचित सुक्ष्मलोकात पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्रप्रमाणे काही असल्यास सुक्ष्मलोकात मृत्यू कधी होईल असे सांगता येईल व त्यावरून साधारण ८-९ महिन्यांनी पृथ्वीवर जन्म असेल असे भाकीत करता येऊ शकेल :D
परंतु योगशास्त्रात अश्या काही क्रिया आहेत जेणेकरून आपण शोधात असलेल्या एखाद्या माणसाचा पुनर्जन्म झाला आहे किंवा नाही हे सांगता येऊ शकते.
अर्थात तश्या क्रिया केवळ अतिउच्च योग्यांनाच करता येतात व आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही हे सांगणे आलेच. Autobiography of a Yogi मध्ये योगानंदांनी थोडक्यात त्याचा संदर्भ दिला आहे (chapter २३). तो जरूर वाचावा.
बाकी मला पत्रिका पाहण्याचा अनुभव नाही. तुमच्या त्या प्रश्नावर जाणकार लोक प्रकाश टाकतीलच.
प्रतिक्रिया
सुधारणा
धागा आवडला..
शेवटी खरी माहिती काय आहे?
"पण जर मृत्यू समय, मृत्यू
एक बदलः वर नोन्दवलेला
हे पुस्तक संग्रही आहे
Pagination