Skip to main content

कविता माझी

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

सत्वर

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 26/04/2018 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा हे अंतर आता पाश म्हणू कि नाश जीवाचा करिल ऐसा तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा जन्मजान्हवी, श्वास मिटावा नकोच आता वियोग असा कि दो तीरांचे वा हिमालयाचे बंध तोडूनी पाश टाकूनी माझे उरले संचित आता तुझ्या रुपाशी मिळून जावे जिथून आले हासत खेळत तिथेच माझे असणे नसणे... इतकेच होवो पुण्यसलीले, तुझ्या तटाशी भंजन व्हावे भस्मचिता अन् बंधमोक्षही उरू नये ते काही काही.... सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा.... शिवकन्या

असं वाटतं !

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 25/04/2018 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं............... निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................
काव्यरस

हो मी अर्जुन आहे..

लेखक निओ यांनी मंगळवार, 24/04/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हो मी अर्जुन आहे.. तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा गुणवत्तेने भरलेला नव्या चक्रव्यूहात अडकलेला न लढताच पराभूत झालेला हो मी अर्जुन आहे.. या महाभारतात कृष्ण शोधतो आहे जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा जरी सापडला तरी माझ्या वाटणीला किती यायचा ईथे अवती भवती सारेच अर्जुन दिशा हरवलेले... तो कृष्ण.. सखा गुरू ज्ञाता परिस्थितीची जाणीव करून देणारा ध्येयाची जाणीव करून देणारा मला कृष्ण हवाय मार्ग दाखवणारा माझ्या रथाचं सारथ्य करणारा माझं मनोधैर्य ऊंचावणारा नारायणा....

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 20/04/2018 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला आधीच फिल्डिंग लागली होती पण कॅच मी केला कित्येकांनी हाय खाल्ली बऱ्याच जणांनी माघार घेतली सर्वांदेखत चाटून पार फस्त केला गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥ दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो मैत्रिणींच्या कळपात आलो दोन फारच जिवलग होत्या, तिच्या नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो बघता बघता सेमीला गेलो ॥ सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी एकुलती एक बहीण होती त्यांची शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा अन अंतिम फेरीत

सगळीकडे सारखेच

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 17/04/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गड

असेहि एकदा व्हावे

लेखक खिलजि यांनी सोमवार, 09/04/2018 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
नष्ट केलेल्या डोंगराचेही स्मारक व्हावे तत्कालीन पक्षाचे नाव त्यावर असावे उदघाटन सोहळ्याची गाथा लिहावे डोंगर दर्या खोरे फक्त पुस्तकातच उरावे असेही एकदा व्हावे नदीजोड प्रकल्पात मस्त हात धुवून घ्यावे नवीन काहीतरी समोर आणून जुन्यावाणीच हादडावे स्वतःच्या कर्तृत्वाचेच फक्त ढोल बडवावे लोकांना परत नव्याने चुना लावावे असेही एकदा व्हावे रस्ते पुन्हा नव्याने उखडावे त्याच जोमाने परत बांधावे काळ्या कंत्राटदारांना दुसऱ्या नगरात वसवावे त्या नगरातही जोमाने हादडावे होतच होते आधीही ,, असेही पुन्हा एकदा व्हावे कधी हात व्हावे , कधी कमळ व्हावे कुठे शिवधनुष्य तर कुठे आप व्हावे एक
काव्यरस

ती जशी जशी जुनी होत गेली

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 06/04/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ती जशी जशी जुनी होत गेली हळूहळू माझी सोनी बनत गेली वाईनवानी कडुशार होती नंतर मधाचे पाणी बनत गेली रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो खटके उडायचे अधूनमधून पुढे नवीन कहाणी घडत गेली या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो मग हवी होती कशाला बायको ? डोळे सताड उघडे असायचे, राव या डोळ्यांचीच जणू पापणी बनत गेली कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही आत सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली बायको आधी नकोशी वाटत होती यार आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी बनत गेलीय ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

हाॅकिंगे जे प्रेडिक्टले

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 05/04/2018 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले ते म्यां चक्षुर्वै पाहिले कृष्णविवरासी भेदिले आरपार म्यां आजची कृष्णविवराचा चव्हाटा तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा चारी मितींचा उफराटा कोलाहल माजला कार्यकारणाची तर्कटे उलटी पालटी पडती येथे आधी कळस मग पायथे हाची लोच्या येथला कवाडे विभिन्न विश्वांची ठोठाविता उघडती साची अनवट रूपे तयांची जाणे केवळ हाॅकिंग
काव्यरस