बालपण
रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे
रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे
नवी भरारी नव आकाश
अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश
सावरावे किती अन कसे जीवाला,
लागते ओढ ही किती मनाला.
वास्तवाची झळ नसे पुसटशी.
इवलाश्या त्या बालमनाला
अखंड असावे हे दिवस निरंतर,
प्रत्येकाच्या नशिबाला
काव्यरस
मिसळपाव