Skip to main content

शांतरस

कचरा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 06/04/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.
काव्यरस

प्रीतीची पारंबी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 02/04/2014 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा

मी परदेशी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 20/03/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
कुणास मी का केले अवघड ? प्रेमच अनगड काय करू ? येता जाता दिसते माया रुधिर उसळते जाग जराशी हृदयापाशी काजळ राशी वादळ उठते हलते तारू कोण कुणाचा नसते काही झुरते काया रचने पायी बचनागी हे मंथन अवघे दैव दानवी घुसळे मेरू मीच भुकेला एकांताचा स्वप्न पहातो रात्र जाळतो हसतो रडतो चितारतो ते शब्दांमधुनी सापडलेले तुटके फुटके शब्दच वेडे एकल कोडे सुटते वाटे पण सुटते ना कविता होते गूढ वेदना खरी न खोटी वाट खुंटते दरी वाढते शिल्लक उरते शून्य पोकळी अर्थ निरर्थक मी परदेशी …………. अज्ञात
काव्यरस

पौरुषी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 08/03/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे.
काव्यरस

आदिशक्ती....

लेखक स्मिता श्रीपाद यांनी शुक्रवार, 07/03/2014 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता... आज अचानक हाती आली.... माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला.... उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक..... नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार, संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!! आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर, माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!! आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती, उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!! कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा, किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!! बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची, कधी भांडणे कधी प्रेमाने जपून
काव्यरस

चालत राहणार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 02/03/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
चालणे प्रवाह जीवनाचा थांबणे मरण यातना पर्याय नाही दुसरा शिवाय चालण्याचा. चालता चालता भेटले वाटेत जे सगे-सोयरे अनोखळी वाटसरू निघाले. क्षणभराची साथ तयांची देऊन गेली अनेक जखमा कवटाळूनी त्या जखमांना एकटाच मी चालत राहणार. दमलेल्या शरीरानी थकलेल्या मनांनी निरुदेश्य मी भटकत राहणार. चालत राहणार, चालत राहणार.
काव्यरस

स्विकार...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 22/02/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे मुलायम मउ दोन्ही हात आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी.. कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण! माहित असतं नंतर .. पुन्हा तोच एकाकीपणा मला छळायला येणार आहे... आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर! कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं? मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं...
काव्यरस

बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/02/2014 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो. कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला.
काव्यरस

नवीन चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 11/02/2014 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
राख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला.
काव्यरस

मन रे

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 11/02/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात
काव्यरस