Skip to main content

शांतरस

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

घे बाबाच्या कुशीत सोन्या..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 22/12/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी कविता समुहाच्या 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी मझा सहभाग... बाबाची अंगाई पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवां
काव्यरस

मागे वळून पाहताना

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 21/12/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा क्षणभर, मी थबकले याच ठिकाणी पूर्वी, मी तुला भेटलेले हलकेच झाली पानांची सळसळ हृदयात माझ्या पुन्हा ती खळबळ इतक्या दिसांनी मी परत जुनेच हसले हरवलेले ते प्रेम, कधीच नव्हते मिळाले तू नि मी, इथूनच, येण्यासाठी निघालो वचने देऊनही, पुन्हा कधीच नाही भेटलो वाट तुझी पाहून मी होते थकले ना कळे तू प्रेम आपले, कुठे हरवले ? किती दिवस न रात्री, मी एकटीनेच पाहिल्या तुझ्याविनाच सर्व आठवणी पुनःपुन्हा आठवल्या दूरवर कुठेच तुझी चाहूल नव्हती सगळे आप्तेष्ट मात्र मला सतावत होती काय त्यांना सांगावे कळेना कुठे तुला शोधावे, उमजेना मी पण मग माझ्यावर चिडले पुन्हा एकदा मनाविरुद्ध लढले जुन्या आठवणींना कोंडून
काव्यरस

(सावली)

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 17/12/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: सावली आता ठरवलय की कवी व्हायचं नाही, पण तरीही येतो एक झटका जस जशा इतरांचा कविता दिसत जातात, कागदांच्या ढिगार्‍यात बसलेला वेचत असतो उमटलेले शब्द अन् शब्द, सोबतीला असतात ताव,कलमे, करत असतात सोबत जुळवणार्‍या यमकांशी, 'ट' ला 'ट' जोडून मुक्तछंदाच्या साक्षीने, आणि लिहीत असतो त्या कागदाच्या तुकड्यांवर उगाच काहिही, सोबतीला असते माझी आकांक्षा मी प्रसिद्ध कवी होण्याची वाट पाहात..... --- न्याहाळे कविछंद
काव्यरस

रानातल्या फुलांचा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त
काव्यरस

ऐल-पैल

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 15/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐल मळा पैल तळे जायचे कुठे ना कळे टाकता पाऊल वळे पुन्हा माघारी ऐल दिवा पैल वात भेट नाही आयुष्यात मिट्ट काळोख घरात अवस दारी ऐल गंध पैल जाई मधे गूढ खोल खाई आक्रोश घुमत जाई कडेकपारी ऐल चंद्र पैल निशा घेरतात सुन्न दिशा घुमतात वेड्यापिशा स्वप्नांच्या घारी ऐल प्राण पैल सखा जीव भेटीला पारखा खुपतो काट्यासारखा सल जिव्हारी ऐलपैलाच्याही पार तुझ्या महालाचे दार त्याच्या पायरीशी थार दे रे मुरारी
काव्यरस

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस

वसा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 08/12/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणा माहिती काल होतो कसा? मला मीच ना आठवे फारसा ! प्रवाहातल्या ओंडक्यासारखा, किती दूर वाहून आलो असा दगा देतसे सावलीही मला, भरोसा करावा कुणाचा कसा? खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना इथे कोरडा मी जसाच्या तसा ! खरा चेहरा दाखवू पाहता, चरे पाडले, फेकला आरसा नकोसा जरी वाटला जन्म हा, पुसावा कसा मीच माझा ठसा? उतूही नये जीव, मातू नये फुलावा, फळावा असा दे वसा !
काव्यरस

गरीब बिचार्‍या, दम खा

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/12/2011 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
गरीब बिचार्‍या, दम खा
गरीब बिचारा शोधतोय तो सायबिणीचे पडके घर - मी म्हणतो, "विचार, जवळ चांगला बार असला तर..." . बुरसट चिरे न्हाते-धूते अश्रू भले सुकवू नको कुळाचारांस आसूसले भाव भले आटवू नको . म्हटले कोणी : "रिबेलो मूळचे अहो, त्या वाडीचे" पात्रांव, छ्या!
काव्यरस

मीही कवि होणार!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 30/11/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्‍याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्‍या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला! होणार, मीही कवि होणार, छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार! यमक तेवढे ठाऊक मजला तितके पुरते कवी व्हायला अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा कचरा मी भरणार.. मीही कवि होणार कविता म्हणजे हवीच प्रीती द्विपुएव सर्वनाम चित्ती विशेषणांच्या खिरापतीने तुझे पोट भरणार..