Skip to main content

लेख

दहशत (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 27/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत ====================================== मुंबईत राहणाऱ्या.. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाजवळ अशा प्रकारचे भरपूर अनुभव असतील.. मी लिहिलेल्या प्रसंगांपेक्षा जास्त मजेशीर.. खिळवून ठेवणारे.. विचार करायला लावणारे.. हेलावून सोडणारे.. किंवा सुन्न करून टाकणाऱ्या या अशाच अनुभवांनी मुंबईकरांना, एका सूत्रात गुंफले आहे. लोकल प्रवास मुंबई करांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आणि तितकाच जिव्हाळ्याचाही. मुंबईतली गर्दी, धावपळ, गतिमानता.. लोकल्सच्या वेळा, ऑफिस, घर ऑफिसातल कामकाज.. त्यातूनच शोधून उपभोगलेले.. धरून ठेवलेले उत्सवी क्षण या सगळ्याची नशा मुंबईकरांच्या नसानसांतून वाहताना दिसते.

बाय

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख - आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे. अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा.

मैत्री एक्सप्रेस (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 26/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री एक्सप्रेस ====================================== एखाद्या दिवशी लोकलने जाता जाता.. शाळा कॉलेजमधली एखादी मैत्रीण भेटते आणि मग जुळलेल्या सुरांच्या मैफिलीला पुन्हा एकदा रंगत चढते. आनंदाच्या चित्कार पाठोपाठ उत्सुकतेपोटी लांबलेली प्रश्नावली.. गहिवरून टाकते.. तुझी माझी ख्यालीखुशाली विचारत विचारत शब्दांची पाखरं चिवचिवत पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हलकेच घेऊन जातात.. आणि मग तू, मी भोवती फिरणारे संवाद त्या त्या दिवसांच्या उजळणीत विरतात. तेव्हाच्या आठवतील तितक्या नावांच्या हजेरीने दोघी वा तिघीच समोर असताना अनुबंधांच रजिस्टर पूर्ण भरलं जात. कोण कुठे आहे.. काय करतंय.. कोण किती कुठे शिकतंय..

"मी मुंबईकर" (लोकल गोष्टी-७)

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 25/07/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
"मी मुंबईकर" ============================================= आजपासून बरोबर अठरा वर्षांपूर्वी.. मी, व माझ्या भावंडांनी पहिल्यांदा मुंबई पाहिली. वडिलांचं बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईत त्या आधी येणं-जाणं होत असे.. आताही अगदी या आठवड्यापर्यंत मुंबईची बदली रद्द करण्यासाठी म्हणून ते मुंबईला जाऊन आले होते. बावीस वर्ष एकाच भागात राहिल्या नंतर आताची ही मुंबईची बदली त्यांना नको होती. बदली रद्द करण्याचे ती एखाद्या दुसऱ्या ठिकाणी करून घेण्याचे सगळे प्रयत्न थकल्यावर अगदी ऐनवेळी आमचं मुंबईला जायचं निश्चित झालं. त्यामुळे मुंबई प्रवासाची अशी काहीच तयारी झाली नव्हती.

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो

लेखक राजे साहेब यांनी शनिवार, 24/07/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
*नमस्कार ..** ** * * * * .....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........* * * लक्ष द्या हिंदूंनो, *( **हिंदू** - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद नाहीच नाही". ) * गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी. पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती.

गर्दीतला चेहरा (लोकल गोष्टी-६)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 24/07/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीतला चेहरा ============================================ ट्रेन मधून प्रवास करताना, आतापर्यंत कित्येक चेहरे दिसले.. त्यातले लक्षात राहिलेले किती..? अगदी काही, बोटांवर मोजता येण्या इतकेच. आपल्याला दिसतो.. लक्षात राहतो तो एकच गर्दीचा चेहरा. मग त्यात काही शाळकरी मुला-मुलींचे घोळके असतात.. कॉलेजला जाणाऱ्या जोड्या दिसतात.. ट्रेनच्या इतक्याच सातत्याने कामावरून जाणारे - येणारे जीवनसारथी.. अखंडपणे कार्यरत असलेल्या मुंग्यांसारख्या तुरुतुरु चालणाऱ्या बायका.. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर चेहरा असा कोणालाच नाही. ( मलाही नाहीच ) आपल्या व्यतिरिक्त प्रत्येक जण म्हणजे गर्दी आणि आपण गर्दीतले एक.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 23/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच !

आईचा मुलगा हरवला.. (लोकल गोष्टी-५ )

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा मुलगा हरवला.. =========================================== ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता, हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले..