Skip to main content

माध्यमवेध

स्टार माझावर पाहा ’ब्लॉग माझा’चा पारितोषिक वितरण समारंभ !

लेखक देवदत्त यांनी रविवार, 31/01/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा: आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. पहायला विसरू नका. :)

पिक्चरच्या xxx घो

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/01/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वन बॉल टू गो अ‍ॅन्ड फोर रन्स टू विन !! इति हंपायर उवाच सामना जिंकायला ४ धावा मात्र सिनेमातल्या हिरोचे शतक पुर्ण व्हायला पाहिजेत ६ धावा. उत्सूकता आहे ती आपला तेंडल्या शतक करतो का नाही याची ! संघाचा विजय झाला काय आणि नाही झाला काय ? प्रत्येक जण आता काय होणार या उत्सूकतेने नख खात आहेत. पण शिनिमाचा हिरो तेंडूलकर ( मियांदाद म्हणायला पाहिजे काय त्याला ?) मात्र अपेक्षेप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुढे सरसावत सिक्सर मारतो ती ही एवढ्या जोरात की सांताक्रुज विमानतळावरुन नुकतंच उड्डान केलेले जेट विमान थोडक्यात बचावते.

या निर्दय मंत्र्यांचा धिक्कार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/01/2010 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माणुसकीला काळिमा लावणार्‍या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त

पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला..आज श्रीनगरमध्ये

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 06/01/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे. जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.

नाताळच्या सुट्टीत मुलांना (आणि त्याबरोबर पालकांना) बघायला आवडतील अशी संस्थळे

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 25/12/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्यातील एक-दोन संस्थळे आज पाहिली तेव्हा उघडत नव्हती..पण नंतर उघडून पहावीत.]

`स्टोरी'चं `नवं पान'...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 18/12/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं अस्तित्व `आपल्या जगा'पासून केव्हाच वेगळं झालंय...36 वर्षांपूर्वी जिवंतपणाच्या सगळ्या संवेदना हरवलेली अरुणा शानभाग सध्या पुन्हा चर्चेत आली असली, तरी त्या चर्चेचे वारे तिच्या आसपासदेखील पोचलेले नाही... `ती जिवंत आहे', एवढंच `केईएम'चे वैद्यकीय अधिकारी सांगतात. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तिचं एकटेपण आणखी `कडेकोट' झालं आहे... `केईएम'च्या एका निर्जन कोपऱ्यातल्या `बेड'वर एकाकीपणे तिची देखभाल करणारे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी वगळता, अन्य अनेकांना ती कुठे आहे हे माहीतदेखील नाही...

क्रिकेट आणि बिझनेस - हर्षा भोगले

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 15/12/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे ! http://www.ceolessonsfromcricket.com/index.asp ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !

जन्मोजन्मी

लेखक हेरंब यांनी रविवार, 13/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,' बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?" त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला.

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.