Skip to main content

कविता

काजळरेषा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 29/09/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काजळरेषा का भिरभिरते नजर तुझी? ओलांडू नको रेषा काजळाची वाटत नाही का भीती कोणा रावणाची ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची नको देऊस कष्ट वनवासी रामाला नको देऊस प्रश्न या समाजाला अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे राजेंद्र देवी

शब्द

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 29/09/2016 03:54 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द

लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी… संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची, कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
काव्यरस

खरा खुरा रंगमंच ..... !

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
खरा खुरा रंगमंच ..... ! हुरहूर मनात घेऊन वेशभूषेत मग्न कधी तर कधी चेहऱ्यावर रंग उमटवलेला ! संगीताच्या तालात दंग कधी तर कधी रंगीत छटांचा प्रकाशात रमलेला ! अभिनयास सज्ज कधी तर कधी नुसताच प्रेक्षक बनलेला ! हा रंगमंच !

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... " 'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे राधा फक्त पाहत राहायची ..... रिकामं केलेलं मन पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ? ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे मनामनांवर राज्य करणारा तो जगाचा रक्षण करणारा तो , प्रत्येक जीवात वास करणारा तो, विश्वविधाता तो , त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ? केवळ अढळ विश्वास , जीवाला घोर लावणारी हुरहूर, डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस , फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ? बस्स!!

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

मी एक ढग - एकटाच ...... !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/09/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक ढग - एकटाच ...... !!! सखे सोबती जरी कितीक गर्दी गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी कधी चिंब ओल्या पावसात कधी लख्ख कोरड्या उन्हात तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! मनात माझ्या जुनेच सवंगडी नव्या देशातले जरी वारे सभोवती कधी हर्षुन जाई तर कधी उदास ना कसली खंत ना कसली आस तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! नकळत देतो जीवा दिलासा स्वतःच गिळून घेतो उसासा वाऱ्याविना ही फिरतो उगाच ना जाणतो वाट जुनी कि नवी आज तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!

साम दाम दंड भेद

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 26/09/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी

अनाठाई

लेखक सुमित_सौन्देकर यांनी रविवार, 25/09/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

स्वप्न मनाचे

लेखक माहीराज यांनी रविवार, 25/09/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य स्वप्ने मनी उद्याची पंख जरी हे इवले इवले, ध्येय गाठण्या आतुरलेले हृदयाचे पाऊल कोवळे.. तरूणपणाची चढता झालर मुक्त मनाला बसे ना आवर, स्वप्न कुठे अन मार्ग कुठे उगाच अंगी नसती पावर.. तिशी उलटता भरते अंगण गळ्यात पडते नसते बंधन, सांभाळताना नाती गोती करी स्वप्नांना दुरून वंदन.. वर्षा मागुन वर्षही सरते, स्वप्नांची ती यादच उरते, मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे पुन्हा नव्याने मनात भरते.. कसले स्वप्न नी कसली आस उगाच मनाचे सारे भास जीवन सुंदर जगण्याचा हा मात्र एक स्वच्छंद प्रवास...           -  महेश नायकुडे
काव्यरस