सरकारने नवीन नियम काढला हाय,
आत उघड्यावर बसायचे नाय,
सगळ्यानी शौचालय बांधायचे ,
आण गाव हागणदारीमुक्त करायचे.
उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय,
कधी कधी तर एका दगडातच काम भागतय,
मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय,
तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय
आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण गावातली हागणदारी मुक्त नाय,
तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय.
गावातली माणसं पण लय हुशार असत्यात,
पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात,
पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात,
आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात.
आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली,
हा