Skip to main content

मांडणी

एक विषय- तीन लेख

लेखक रन्गराव यांनी शनिवार, 13/11/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता चौथी- विषय-" एक प्रवास" दोन आठवड्यांपूर्वी आईबरोबर मामाच्या गावी जाऊन आलो. प्रवासाला जायच म्हणून कधी नव्हे ते भल्यापहाटे उठलो. नाष्टा आवरून घरातून बाहेर पडलो. रिक्षातून जावूया असा हट्ट धरला तरीही बर स्थानक फार लांब नाही अशी समजूत घालून आईने एक मैलभर चालवल. एवढ चालून स्थानकावर पोहोचलो परत भूक लागली. पायही दुखायला लागले होते. पण सगळी नुसता धुरळा होता किंवा लोकांनी पान खावून थुंकल्यामुळे काही जागा रंगल्या होत्या. बसायला धड जागा मिळाली नाही. ताटकळत उभा रहाव लागलं. नेहमीप्रमाणे बस उशीरा येणार होती. तोपर्यंत एक मुलगा चॉकलेट विकायला आला.

'आलेख'

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 10/11/2010 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी हा 'आलेख' आहे तुमच्या माझ्या मोठ्ठे होण्याचा! बाल पावलांनी धावता धावता उंबरा ओलांडण्याचा ! एका छोटुल्याला मोठ होताना पहाण्याचा. प्रत्येक आलेखाला एक परिमाण असते. इथ ते परिमाण आहे कागद. आजच्या जगात मोठ होण्याचं मोज माप मला कागदानच मोजावस वाटल.
काव्यरस

सहज सुचलं म्हणून.......

लेखक अनिल आपटे यांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.

बुरा ना मानो दिवाली है!!

लेखक यकु यांनी शनिवार, 06/11/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले! सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

उद ग अम्बे उद ! उद !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 14/10/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.