एका गारुड्याची गोष्ट १४: बिनविषारी साप ! (समाप्त !)
अनेक वर्ष मध्ये निघून गेली, डिग्री झालीं, स्थलांतर झाले, नोकरी लागली आणि मग लिहिण्यासाठी हात सळसळू लागले. इ.स.पू. मध्ये मी बिनविषारी सापांच्या लेखाची सुरवात धामणी वरील लेखाने केली होती, आता या लेखात इतर बिनविषारी सापांबद्दल बोलतो.
साधारणतः लोकासाठी कुठला पण साप "विषारीच" असतो आणि तो मारलाच पाहिजे असे विचार असतात. खरे म्हणजे जवळपास ८०% साप बिनविषारी आहेत. अगदी आपल्या आख्या (पुणे) शहरी आयुष्यात सारसबाग गणपतीच्या आरती मध्ये इखादी मुलगी वळून आपल्या कडे बघेल किंवा कुलकर्णी पंपावर पेट्रोलच्या रांगेत पेठीय मुलगी वळून हसेल पण आख्या आयुष्यात एक विषारी साप दिसणार नाही.
मिसळपाव
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.'
ह्या लेखावरून मी परत गेलो ना...
.
.
(प्रासंगिक)
सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.
एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.