राजकारण
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.)
मित्रांनो,
मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.
पांढरपेशी कविता
पांढरपेशी कविता
क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या
फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या
मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास
गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या
गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली
चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी
फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी
शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा
जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!
दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व
अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.
एक तत्व नाम
आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-)
---------
सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा
[ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm]
रांची
मटा ऑनलाइन वृत्त
सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.
बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण
![]() |
पॉलीटीकली इनकरेक्ट
खालील बातमीचा मथळा वाचून त्यात काही गैर वाटले का?
Corruption has no place in armed forces: Antony
याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही".
नक्की कुठला नैतीक आधार आपण सैन्यदलास देत आहोत आणि नक्की कुठला आदर्श (निदान बोलण्यात तरी) जनतेसमोर मांडत आहोत?
गांधी जी
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?
निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे)
आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.
मिसळपाव
