Skip to main content

संस्कृती

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

लेखक आशु जोग यांनी रविवार, 31/03/2013 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते. मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते. भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे. तर असे सांगितले जाते की या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला. हे कितपत सत्य आहे ? विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले. तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ? पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ? विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत.

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

आणखी एक टायटॅनिक-३

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 26/03/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गावाकडचा मराठी भाषा गौरव दिन २०१३.

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 25/03/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार दि. २२-०२-२०१३ रोजी संध्याकाळी पांचसाडेपांच वाजतां माझा भ्रमणध्वनी वाजला. मालवण नगरवाचनालयातून ग्रंथपाल शिंदेसाहेब. “नमस्कार! शिंदे बोलतोय, नगरवाचन मंदिरातून.” “नमस्कार! बोला साहेब, कशी काय आठवण केलीत?” पुढल्या आठवड्यात मराठी भाषा गौरव दिन आहे. २७ तारखेला. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे जरूर या. फोटो काढा, अहवाल बनवा.” “हो, नक्की! किती वाजता आहे? “सकाळी दहा वाजता.” “हरकत नाही, येईन. आणि काय विशेष?” “हेच विशेष. बाकी काही नाही, नंतर बोलूच, नमस्कार!” “नमस्कार.” आमचे कांदळगांवचे स्नेही श्री. शरद कदम यांना कळवले. ठरल्याप्रमाणे मी आणि श्री. शरद कदम गेलो.

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

लेखक मन यांनी शुक्रवार, 22/03/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि फटाके उडावताना काळजी घ्या. . धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे. आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा. . दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :) . बोला कॉकटेलच्या बैलालाsssss (एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.) --मनोबा

आणखी एक टायटॅनिक-2

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी सोमवार, 18/03/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला सफर सुरु होऊन तीन तास होण्याच्या आतच अचानक जहाजाला भूकंप झाल्यासारखा जोरदार धक्का बसला.. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इटलीमधीलच जिलिओ बेट समूहांजवळून जात असताना हार्ड ग्रानाईटच्या एका दगडाने जहाजाचा तळ खरवडून काढला . दगडाने आपले काम चोख केले.जहाजाच्या तळाला एकशे साठ फुट लांबीचे भगदाड पडले .पर्यटकांना आपल्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी असला काही अनुभव येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नसणार.

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 12/03/2013 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

प्रेम - भक्ती

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 10/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत. संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं.