Skip to main content

संस्कृती

खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 23/12/2012 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती.

प्रेमाची मंद मधुर आच

लेखक रविंद्र रुपन् यांनी बुधवार, 19/12/2012 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा उन्माद नाही, नशा नाही. कसलेही अलंकरण नाही- शब्दात,स्वरात, चित्रीकरणात. कोठेही कसला देखावा नाही. काळजाला डंख करणारे दुःख नाही की तारुण्याची खूण पटविणारा उत्साह व जल्लोषही नाही. नायक, नायिकाही तसे पाहिले तर सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे वाटत नाहीत. आपल्यातलेच एक असावेत, थोडे जास्त लोभस, पण आपल्यासारखेच. चालण्या-बोलण्यात, भावना व्यक्त करण्यात.एवढेच आहे की त्यांना जीवनात प्रेम लाभले आहे, म्हणून ते सुंदर दिसताहेत. ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे. मंद- मधुर हलकी हलकी आच त्यांच्या शरीर-मनाला उजाळा देते आहे.भडकणारे 'शोले'नाहीत हे.

संक्षीप्तानुभव

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 17/12/2012 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 06/12/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्‍या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अ‍ॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या.

गजरा - एक प्रवास

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/12/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित) लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.

आस्थेचे बंध

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 05/12/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल. हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?

स्वप्नघरांच्या भिंती

लेखक रविंद्र रुपन् यांनी सोमवार, 03/12/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामचंद्र गुहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय इतिहासकार आहेत. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. भारत म्हणजे प्रचंड अंतर्विरोध व कमालीची बहुविधता. असे असूनही हा देश एकत्र कसा राहू शकला, हा त्या पुस्तकाचा विषय. गुहा याचे श्रेय येथील सामान्य माणसाची जिद्द, लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, एकसंघ बाजारपेठ अशा अनेक घटकांना देतात. सरतेशेवटी ते म्हणतात,
“जोपर्यंत हिंदी सिनेमे पाहिले जातात व त्यांची गाणी गायली जातात, तोपर्यंत भारत टिकून राहील.”
हिंदी सिनेमा व त्यातील गाणी यांना आपल्या आयुष्यातून वेगळे करताच येणार नाही.

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही