Skip to main content

संस्कृती

कोणे एके काळी...

लेखक अवलिया यांनी रविवार, 06/06/2010 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी... कोणे एके काळीच म्हणावे लागेल. कधी घडले यावर जर एकमत नसेल, असे काही घडलेच नसेल असे तथाकथित विचारवंत ठासुन सांगत असतील, पण सत्य कुठे अग्नी वा कुठे धुराच्या रुपात लोककथांमधुन, बोलीतुन पुढे सरकत असेल, त्याला इतिहास म्हणुन मान्यता द्यायची की नाही यावर काथ्याकुट चालत असेल तर माझ्यासारखा सामान्य माणुस कोणे एके काळी असे घडले असे म्हणुनच सुरवात करणार. तर कोणे एके काळी. काशी नगरीतल्या एका वृद्ध ब्राह्मणाची कथा. पहाटे उठावे. गंगेवर स्नान करावे. काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. घरी येवुन नित्य नैमित्तिक पूजा अर्चा करावी, वाचन मनन चिंतन लेखन करावे.

महिन्याचे वाढदिवस

लेखक आर्य यांनी गुरुवार, 03/06/2010 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे. दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात. उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर) असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !

भस्म्या !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 03/06/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी पयल्यांदा हातात नांगर धरला; तवा माझा बां मला म्हणला व्हता, "तुज्या आयला जर तू वरबाडलास; तर ती गप बसलं का?" "आर ही बी धरणी माय हाय. धर ह्यो गुळाचा खडा, अन आम्बलिची धार; वाहा तिला. म्हन , आधीच उन्हान तरपासलेल्या तुला; मी नांगरटीन उलथवतोया ! धरणी माते , माझ्या हाताला यश दे! माग! माग!

ग. प्र. प्रधान यांना श्रद्धांजली

लेखक कालिन्दि मुधोळ्कर यांनी सोमवार, 31/05/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रधान मास्तरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 'मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये, माझ्या बद्दल पेम वाटणाऱ्यांनी एक झाड लावावे आणि किमान पाच वषेर् तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत.." लिंक ईथे उघडेल.

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

जौहरी की गत जौहरी जाणे *....

लेखक रामदास यांनी शनिवार, 29/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक बाजाराची स्वत:ची अशी खास भाषा असते.सांकेतीक असते.रानडे रोडवर जसा *बापट भाव आहे तसा हा प्रकार.जव्हेरी लोक फार पूर्वी एक सांकेतीक भाषा वापरायचे. भाव करण्यासाठी हथ्था वापरायचे. हाताच्या खूणांनी एकमेकांना भाव सांगायचे .काही जव्हेरी बोली भाषा वापरायचे जी फक्त त्यांनाच समजायची. हे सगळं करण्याचा उद्देश असा की खरा भाव ग्राहकाला कळू नये. रत्नपारख्यांच्या राज्यात या सांकेतीक भाषेला फरच महत्व आहे.ग्राहकाची हौस आणि नड यावरच रत्नांचा भाव ठरतो. (व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

आजच backward रुपवेडं जग...

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 26/05/2010 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस

महानगरीय संस्कृती

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/05/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपला देश सोडून दूर, अनोळखी देशात रहायला आल्यावर तिथला एकूण रागरंग, आचार विचार, राहणीमान ह्या सगळ्यांचा तक्ता समजाऊन घेताघेता, आपल्या नकळत आपण कधी त्या तक्त्यामधला एक रकाना बनून गेलो ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही! बाहेर आल्यावर आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित स्वत:ला आणि इतरांना सांगत असतील कि शेवटी आपला देशच बरा. दोन चार वर्षात आपण तर माघारी जाणार भैया! हा राग आलापता आलापता वर्षांमागून वर्षे उलटून जातात.

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!