Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुसलमानांसाठी राखीव

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 04:57
🗣 207 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
55140 वाचन

💬 प्रतिसाद (207)
प
प्रशान्त पुरकर Fri, 09/17/2010 - 05:17 नवीन
बरयाच गुजराति / मारवाडि सोसायट्या सुद्धा मासाहार करनारया मराठि लोकाना घर दएत नाहि असे ऐकुन आहे...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 07:40 नवीन
बरयाच गुजराति / मारवाडि सोसायट्या सुद्धा मासाहार करनारया मराठि लोकाना घर दएत नाहि असे ऐकुन आहे... सरसकट गुजराथी मारवाडी असे म्हणू नका. केवळ जैन सदस्य असलेल्या सोसायट्या असे करीत असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशान्त पुरकर
ग
गणपा Fri, 09/17/2010 - 09:49 नवीन
आवांतरच आहे : आमच्या शेजारी काही गुजराथी कुटूंब रहायची (हो गुजरथीच जैन नाही.) रैवारी काही बाजर केला की यांचे सारखे टोमणे मारण चालु व्हायच. तरी बर दारात २-४ उदबत्या लावुन ठेवायचो आम्ही. ज्या काय गफ्फा टोमणे मारायच्या त्या आपापसात मारले असते तर ठिक येता जाता बोलत बसायचे. मग मी हट्टाला पेटुन दुसर्‍या दिवशी आईला सुकं (सुके मासे) करायला लावायचो. आणि सगळ्या उदबत्या पण मुद्दाम विझवायचो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 10:12 नवीन
ही हा हा.... मी असतो तर आणखी सरळ केलं असतं रे! आता कसं ते सांगितलं इथं तर हळुवार कोमल मनांच्या आयड्यांना प्रचंड मानसिक धक्का बसेल आणि उगा 'नर्व्हस ब्रेकडाऊन' की कायसं होईल. :D त्यामुळं ते इथे नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
य
योगी९०० Fri, 09/17/2010 - 10:57 नवीन
माझ्या माहीतीतले काही गुजराती (आणि जैन सुद्धा) इतके नॉनवेज खातात(ते पण घराबाहेर)..की मराठा लोकं सुद्धा तितके खात नाहीत. मी तर एका गुजराती मुलीला ओळखतो आणि ती कायम हपापल्यासारखी चिकन खाते. कधीही कंपनीची पार्टी असेल तर काही वेळेला तिच्यासाठी फक्त नॉनवेज मागावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गांधीवादी Fri, 09/17/2010 - 05:26 नवीन
>>८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. उरलेल्या २० टक्क्यापैकी २ टक्के राजकारणी लोकांचे असतील, त्यांना भेटायला सांगा. मुसलमान लोक त्यांना भेटतील, आपले राजकारणी एक गठ्ठा मतासाठी त्यांना भरपूर घरेदारे देतील, मुबलक अन्न देतील, आपल्या तोंडाचा घास त्यांना देतील, त्यातून ते चार-पाच बायका करतील, १०/१२ पोर काढतील, (काय तर म्हणे समान नागरी कायदा.) >>नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? हा अख्खा देशच घाला म्हणावं. >>धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?. असली फडतूस तत्वे फक्त हिंदूंसाठी आहेत, (विशेष करून हि तत्वे पांढर्या अतिरेक्यांनी, हिरव्या अतिरेक्यांच्या भल्यासाठी, भगव्या अतिरेक्यांना संपविण्यासाठी बनवलेली आहेत.) हिरव्याचं भलं होत असेल तर सर्व काही चांगलेच. कसाब तिकडे बिर्याणी झाडतोय, आणि सरकार साध्वीचे कंबरडे मोडत आहे, हाल हाल चाललेले आहेत त्यांचे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/17/2010 - 06:46 नवीन
छान वास्तववादी प्रतिसाद. गांधीवादी आयडी तुमच्या सत्यप्रियतेला शोभून दिसतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Fri, 09/17/2010 - 06:58 नवीन
अहो पेशवे, कसले सत्य आणि कसले काय, सगळा चुथडा झालाय ह्या देशाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
शिल्पा ब Sat, 09/18/2010 - 23:00 नवीन
+१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
प
पैसा Fri, 09/17/2010 - 05:38 नवीन
प्रश्न फक्त धर्माचा नाही. बर्‍याच लोकांचा अनुभव आहे की मुसलमान शेजार्‍याकडे प्रचंड प्रमाणात पाहुणे येतात. जिन्याजवळच्या जागेत थुकतात, घाण करतात. बरेचदा त्याना सार्वजनिक स्वच्छतेबद्दल काही माहित नसतं. या सगळ्याला वैतागून माझ्या चुलतबहिणीने चांगल्या जागचा फ्लॅट स्वस्तात विकलेला मला माहित आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/17/2010 - 07:01 नवीन
सहमत आहे. एखाद दुसरा सन्माननीय अपवाद वगळला तर हा अनुभव सर्रास येतो. मी स्वतः एकदा माझे घर बदलले आहे याच कारणास्तव. बाकी धर्मनिरपेक्ष तत्वाला बाधा वगैरे सर्व फालतुपणा आहे. गांधीवादी यांनी म्हंटल्याप्रमाणे ही तत्वे वगैरे फक्त हिंदुंसाठी असतात. बाकीच्यांना ती पाळणे बंधनकारक नाहीये आपल्या देशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मस्त कलंदर Fri, 09/17/2010 - 06:50 नवीन
माझ्या डोक्यावरच्या घरात एक मुस्लिम कुटुंब राहाते. वन बीएचकेच्या घरात तीन जोडपी आणि चार मुले एवढे सगळेजण राहतात. बर्‍याचदा कचरा बाथरूमच्या, घराच्या खिडकीतून खाली टाकतात. अगदी भरीस भर म्हणून बकरी ईदच्या वेळेस त्यांनी दोन भलेदांडगे बकरे आणून त्यांनी दोन दिवस सोसायटीच्या आवारात बांधून ठेवले होते. आणि त्यांना वरती नेताना ते माझ्या दरवाजाला जोरजोरात ढुशा देत गेले. आहे असे, की ही बिल्डिंग म्हाडाची जुनी चार मजली सोसायटी पाडून बांधली आहे. आणि हे कुटुंब आधीच्या सोसायटीतले जुने कूळ आहे. आणि अजूनही बर्‍याचशा ठिकाणी अजून नवीन कार्यकारिणी बनली नाही. जुने लोक आपलेच दात आपलेच ओठ म्हणून काही बोलत नाहीत आणि नव्यांना असा घाणेरडेपणा आवडत नाही. पण सध्या तरी याविरूद्ध कुणाची काही चालत नाही. काही महिन्यांपूर्वी माझा एक मित्र त्याच्या इथे बदलून आलेल्या बॉससाठी माझ्याच परिसरात घर शोधत होता. त्त्याचा बॉस मुस्लिम आहे हे कळाल्याबरोबर या पूर्ण भागात मुस्लिमांना घर विकले जात नाही असे सांगून एजंटांनी काढता पाय घेतला.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 09/17/2010 - 06:59 नवीन
मला राखीव जागांचा प्रश्न कळला नाही. भारतात मुस्लिम कुठे राहातात? भारतात जन्मलेले सगळे हिंदूच असं कोणीतरी लिहिल्याचं आठवत होतं. मग राखीव जागांचा संबंधच कुठे येतो?
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 09/17/2010 - 07:04 नवीन
>>भारतात मुस्लिम कुठे राहातात? ब्वॉर मला पण अजून भारतात, भारतीय कुठे राहतात ते सुद्धा माहित नाही. संपादित कृपया प्रतिक्रिया लिहताना संयमित भाषा वापरावी ही विनंती - संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आमोद शिंदे Fri, 09/17/2010 - 13:42 नवीन
हो सावरकरांची व्याख्या मानणार्‍यांच्या मते ते सगळे हिंदूच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/17/2010 - 14:33 नवीन
मग त्यांच्यासाठी ही वेगळी आरक्षणे कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Sun, 09/19/2010 - 17:17 नवीन
मग त्यांच्यासाठी ही वेगळी आरक्षणे कशाला?
आरक्षणाचा इथे काय संबंध? सध्याची आरक्षणे कुणाला आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
अ
अर्धवट Sun, 09/19/2010 - 07:26 नवीन
तुम्ही हे उपहासानं लिहिलं नाही असं गृहीत धरून विचारतो.. तुम्हाला ती व्याख्या माहीत आहे का.. त्यात तीन अटी आहेत हे विसरताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Sun, 09/19/2010 - 17:12 नवीन
नाही मी अजिबात उपहासाने लिहिलेले नाही. ती व्याख्या मध्यंतरी विकास ह्यांनी इथे दिली होती. त्यातल्या कोणत्या अटी मुसलमान समाजाचे लोक पूर्ण करत नाही ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
व
वेताळ Fri, 09/17/2010 - 07:06 नवीन
होणार्‍या त्रासाबद्दल डोळ्यावर गेंड्याचे कातडे ओढुण बसतात. ह्याना खरतर *** घातल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 07:19 नवीन
हिंदू लोकांमध्ये खालील गोष्टी घडत नाहीत ही नवीन माहिती या धाग्यावरील प्रतिसादांतून कळली. त्या दृष्टीने अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत. वन बीएचकेच्या घरात तीन जोडपी आणि चार मुले एवढे सगळेजण राहतात. बर्‍याचदा कचरा बाथरूमच्या, घराच्या खिडकीतून खाली टाकतात. बर्‍याच लोकांचा अनुभव आहे की मुसलमान शेजार्‍याकडे प्रचंड प्रमाणात पाहुणे येतात. जिन्याजवळच्या जागेत थुकतात, घाण करतात. बरेचदा त्याना सार्वजनिक स्वच्छतेबद्दल काही माहित नसतं.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 09/17/2010 - 07:26 नवीन
संपादित. आपल्याला वारंवार सांगुन आपल्याकडुन पुन्हा-पुन्हा आक्षेपार्ह्य भाषेचा वापर होतो आहे ह्याची गांधीवादींनी त्वरित नोंद घ्यावी. हे प्रकार न थांबल्यास आपल्यावर कारवाई करावे लागेल अशी अंतिम सुचना आपल्याला करण्यात येत आहे. - संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 07:29 नवीन
हिंदू लोक दोन-चार लग्ने करत नाहीत व भर रस्त्यात दिवसा, शिवीगाळ करत फिरत नाहीत ही देखील नवीन माहिती प्रतिसादातून कळली. वरुणगांधीवादी यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गणपा Fri, 09/17/2010 - 09:44 नवीन
कित्ती पिना मारताय हो थत्ते काका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ध
धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 10:04 नवीन
घेतला वसा सोडायचा नाही ह्या श्रध्देनं इमानेइतबारे काम चालु आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गांधीवादी Sat, 09/18/2010 - 04:25 नवीन
ह्म्म्म. आत्ता डाव लक्षात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/17/2010 - 14:40 नवीन
हिंदू लोक दोन-चार लग्ने करत नाहीत व भर रस्त्यात दिवसा, शिवीगाळ करत फिरत नाहीत ही देखील नवीन माहिती प्रतिसादातून कळली.>>>> अशा हिंदुंची संख्या आणि मुसलमानांची संख्या यांचे गुणोत्तर काय आहे याचा पण थोडासा विचार व्हायला हवा ना? ते गुणोत्तर जर १:५० असे असेल तर दोघांना सरसकट एकच निकष कसा लावता येइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Sat, 09/18/2010 - 03:36 नवीन
>>गुणोत्तर जर १:५० असे असेल तर कसले १:५० घेऊन बसले आहेत , मी जिथे राहतो, तिथे ४-५ हजार कुटुंबे असतील, तिथे एकही हिंदूने दोन लग्ने केलेली नाहीत. पण जवळच विशिष्ट जमातीतल्या लोकांनी दोन-दोन तीन-तीन लग्ने केलेली आढळून आलेली आहेत. हे गुणोत्तर कसे मोजू. ( हि विशिष्ट जमात व त्यांचे भले मोठ्ठे कुटुंब बघण्यास कोणाला जर खूपच रस असेल तर मी पत्ता देईन, स्वतः जाऊन बघणे, पण एक तरी हिंदू कळवा, ज्याने दोन लग्ने केलेली आहेत, पत्ता द्या, लगेच पोलिसाला कळवितो, त्यांच्या हातात बेड्या. मी नाय, कायदाच बोलतोय असं )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
न
नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 04:52 नवीन
-धर्मेंद्रचे उदाहरण तर प्रसिद्धच आहे. -मला अजून आमच्या सीओईपीतले एक प्राध्यापक आणि शिक्षण/अध्यात्मसम्राटांबाबत अशीच माहिती आहे. -एका प्रसिद्ध नाटककारांनीही दुसरा विवाह केल्याचे माहिती आहे (अर्थातच जाहीरपणे केलेला नाही) -गेल्याच वर्षी चांद-फिजा प्रकरण झाले होते. त्यांनी लग्नापूर्वी इस्लाम स्वीकारल्याचे म्हटले जाते. [दुसरे लग्न करण्याची इच्छा झाली तेव्हा ते हिंदूच होते. धर्मेंद्रबाबतपण हल्ली असे म्हटले जाते]. ही प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे आहेत. चारातली दोन गाजली आहेत. दोनांचा काहीच गाजावाजा नाही. १९७१ च्या जनगणनेत या विषयी माहिती घेण्यात आली होती. त्यात बहुपत्नित्वाचे प्रमाण हिंदूंमध्ये ५.८% आणि मुसलमानांमध्ये ५.७% आढळले होते. इन फॅ़क्ट हे प्रमाण आदिवासींमध्ये सर्वाधिक, त्याखालोखाल बौद्धांच्यात होते. आणि हे एकपत्नित्वाचा कायदा येऊन १५ वर्षे झाल्यानंतर. नंतरच्या कोणत्या जनगणनेचा असा डेटा गुगलून मिळाला नाही. ५५ वर्षांपूर्वी एकपत्नित्वाचा कायदा झाला त्यामुळे आज बहुपत्नित्वाचे प्रमाण १:५० सुद्धा असता कामा नये. ०:५०००० असायला हवे. ते शून्यास शून्य असावे ही इच्छा ठीकच आहे. तशी जागृती मुस्लिमांच्यात व्हायला हवीच. पण सरसकटपणे मुसलमान बहुपत्निक असतात असे म्हणू नये. १०००:९०० असे जेव्हा पुरुष स्त्री प्रमाण असते तेव्हा बहुपत्नित्व सिग्निफिकंट प्रमाणात असूच शकत नाही. (अर्थात ठराविक क्लिशे वापरणार्‍यांना हे साधे गणित कळण्याची शक्यता नाहीच).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
अ
अप्पा जोगळेकर Sat, 09/18/2010 - 07:06 नवीन
१९७१ च्या जनगणनेत या विषयी माहिती घेण्यात आली होती. त्यात बहुपत्नित्वाचे प्रमाण हिंदूंमध्ये ५.८% आणि मुसलमानांमध्ये ५.७% आढळले होते. खोटे बोला पण रेटून बोला त्यातलाच हा प्रकार वाटतो आहे. आणि जर का बहुपत्नित्वाला विरोध नाही तर मग समान नागरी कायद्याला मुस्लिम विरोध का करतात ? आजही हिंदू कोड बिल आणि मुस्लिम कोड बिल वेगवेगळं का आहे ? मुसलमान पुरुषाने दुसरे लग्न केले तर मुस्लिम बाई कोर्टात दाद मागू शकत नाही. हिंदू बाई मात्र ही दाद मागू शकते. हिंदू कोड बिलानुसार बहुपत्नीत्व कायदेशीर आहे पण त्यासाठी त्या सगळ्या बायकांची या गोष्टीला मान्यता असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 08:29 नवीन
>>खोटे बोला पण रेटून बोला त्यातलाच हा प्रकार वाटतो आहे. हे घ्या >>बहुपत्नित्वाला विरोध नाही तर मग समान नागरी कायद्याला मुस्लिम विरोध का करतात मी २५ वर्षाचा होतो तेव्हा मलाही समान नागरी कायदा म्हणजे ४ बायका एवढेच कळायचे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मृत्युन्जय Sat, 09/18/2010 - 09:08 नवीन
थत्तेकाका मला वाटते इथे मुद्दा १९६१ किंवा १९७१ मध्ये किती हिंदु बहुपत्नीत्वाची पद्धत बाळगुन होते यापेक्षा २०१० मध्ये किती जण बाळगुन आहेत हे बघणे महत्वाचे ठरेल. १९७१ चे निकषच वेगळे होते. अजुन थोडे म्हणजे ३० वर्षे मागे जाल तर समाज अश्या अवस्थेत होता की अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट काळाची गरज होती. आज तशी अवस्था आहे का? हिंदुंमध्ये बहुपत्नीत्वाची चाल शतकानुशतके चालत आलेली होती. हिंदु देवतांनी अनेक स्त्रियांशी विवाह केले होते. लोकोत्तर पुरुषांनी देखील केल्याचे दाखले होते. पण अचानक एक दिवस मग कायदा आला की बहुपत्नीकत्वाची हिंदुंना परवानगी नाही. मग अश्याच प्रकारचा कायदा मुसलमानांसाठी का नाही आला? परंपरेनुसार चालत आलेली गोष्ट हिंदुंसाठी बेकायदा होउ शकते तशी ती मुस्लिमांसाठी का नाही होउ शकली. २ लग्ने केल्यास एखाद्या हिंदुला कायद्याने शिक्षा होउ शकते तशी ती मुस्लिमांना का नाही होत? पहिली बायको असताना दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न करण्यार्‍याविरुद्ध पहिल्या बायकोने तक्रार केली म्हणुन पोलिसांनी अटक केली हे वृत्त आपण अधुनमधुन वाचत नाही का? अशी बातमी शारियत प्रमाणे लग्न करणार्‍या एखाद्या मुसलमानाबद्दल येउ शकते काय? तुम्हीच २-३ उदाहरणे दिलीत धर्मेंद्र, चांद फिझा वगैरे. त्यांनी पण शेवटी इस्लामचा सहारा घेतलाच ना? यातुन काय स्पष्ट होते? की हिंदुंना ही "फॅसिलिटी" उपलब्ध नाही. धर्मांतर करा. फायदे आहेत. आज परिस्थिती अशी आहे की एक लग्न करणे पण लोकांना जड जाते. दोन बायका फजिती ऐका अशी परिस्थिती कोण ओढवुन घेणार. पण तरीही एकाहुन आधिक कायदेशीर लग्ने केलेली मुस्लिम व्यक्तिमत्वे दिसतील तुम्हाला. कायदेशीररीत्या तरी किमान हिंदु असे करु शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 14:06 नवीन
समान नागरी कायद्याविषयी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हिंदूंना असे वाटते की सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदू विवाह कायदा हिंदूंवर लादला आणि मुसलमानांवर लादला नाही. किंवा हिंदू विवाह कायदा हा भारत देशाचा म्हणून एक कायदा आहे आणि त्यातून मुसलमानांना (व इतरांना) सूट दिलेली आहे. खरी स्थिती तशी नाही. सर्वांना समानच कायदा लागू आहे त्या समान कायद्यानुसार त्यानुसार सर्वांना त्यांच्या रूढीपरंपरांनुसार वैयक्तिक कायदा लागू आहे. हिंदूंच्या हिंदू खासदारांनी हिंदूंमधील तत्कालीन मानसिकतेनुसार त्यांच्या समाजासाठी एक कायदा लागू करावा अशी मागणी केली. त्यानुसार हिंदू विवाह कायदा व हिंदू वारसा कायदा हे अस्तित्वात आले. तो कायदा त्यावेळची हिंदू समाजाची परंपरा आणि न्यायाकडे वाटचाल करण्याची हिंदूंची इच्छा यामुळे झाला. तरीही हे दोन्ही कायदे सर्व हिंदूंना समान नियमांत बांधत नाहीत. तर बहुतेक जातीजमातींना त्यांच्या रूढीप्रमाणे विवाह करण्याची वारस ठरवण्याची मुभा आहे. आसाम व बंगाल येथील हिंदूंमध्ये जीमूतवाहनाच्या दायभाग पद्धतीप्रमाणे वारस ठरतात तर उर्वरित भारतातील हिंदूंमध्ये विज्ञानेश्वराच्या मिताक्षरा पद्धतीनुसार वारस ठरतात. विवाह झाला की नाही हे ठरवण्याचे निकषही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे आहेत. मी आधी म्हतल्याप्रमाणे समान नागरी कायदा म्हणजे एकपत्नित्व आणि बहुपत्नित्व एवढेच मी ही समजत असे. पण त्याचे बरेच पैलू आहेत. म्हणणे असे आहे की हिंदूंमध्ये बहुपत्नित्वाची पद्धत हिंदूसमाजाच्या आतून होत असलेल्या मागणीमुळे बंद झाली. [ही मागणी आगरकरांच्या काळापासून चालू झाली होती] आणि ती १९५५ मध्ये प्रत्यक्षात आली. त्यावेळीही परंपरावादी हिंदूंकडून याला विरोध होतच होता. आणि त्या विरोधामुळे नेहरू हिंदू कोडबिल संसदेत मांडायची टाळाटाळ करीत होते. तेव्हा आंबेडकर रागावले होते. आंबेडकरांनी मांडलेल्या मूळ बिलापेक्षा बरेच डायल्यूट केलेले कायदे शेवटी पास झाले. त्या पास होण्यात Advocates largely sought to convince the public that the Bills did not stray far from classical Hindu personal law याचा मोठा भाग होता. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातून जेव्हा मागणी होईल तेव्हा त्यांच्यासाठी प्रागतिक कायदा बनवता येईल. समान नागरी कायदा असावा हे तत्त्व म्हणून मला मान्यच आहे. परंतु तपशीलाबाबत मला माहिती नाही. कारन हिंदूंना समान कायदा लागू करायचा असे म्हटले तरी तो कायदा कोणता हे ठरवणे तितकेसे सोपे नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Sat, 09/18/2010 - 14:11 नवीन
गोव्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच समान नागरी कायदा लागू आहे. कोणीही त्याविरुद्ध बोंब मारत नाही. लोकांना एवढी सवय झाली आहे, की प्रत्येक लग्न आधी रजिस्टर्ड होतं आणि मग त्या त्या धर्मानुसार होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर Sun, 09/19/2010 - 16:17 नवीन
[ही मागणी आगरकरांच्या काळापासून चालू झाली होती] आणि ती १९५५ मध्ये प्रत्यक्षात आली. +१. याचाच अर्थ असा की कोणताही धर्म चोंबाळून सुधारणा होत नसते तर कठोर धर्मचिकित्सेमुळे सुधारणा होत असते. स्वधर्माची तशी चिकित्सा करणारे हिंदू जन्माला आले आणि मुस्लिम जन्माला आले नाहीत हा हिंदूंचा दोष नाही. इंग्रज सरकार कायम मुस्लिमांचे लांगूलचालन करत राहिले आणि हिंदूंना मार देत राहिले. हा मार देताना हिंदू धर्मावरही प्रहार झाले ज्याचा बर्‍याच अंशी इष्ट परिणाम झाला. शिवाय आपल्याला मार खावा लागतोय याची कारणे काय हेदेखील हिंदूंना शोधून काढणे भाग पडले. ही प्रक्रिया मुस्लिम समाजात घडू शकली नाही. कारण प्रत्येक खेपेला त्यांचे हितरक्षण करणारे इंग्रज त्यांच्या पाठीशी होतेच. अस्तित्वात असलेल्या श्रद्धांचा जेंव्हा पराभव होतो तेंव्हाच नविन विचार जन्माला येतात. १०० वर्षांपूर्वीचा हिंदू आणि आजचा हिंदू यांच्यात आमूलाग्र फरक दिसतो तो यामुळेच. स्वातंत्र्यानंतर सरसकट सगळ्या धर्मियांना एकच काय तो नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा सर्वाधिक विरोध झाला तो मुस्लिमांचा तो याच कारणासाठी. ( म्हणून मग समान नागरी कायदा लागू होण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जावेत असे मार्गदर्शक तत्व इन्क्ल्यूड केले गेले. हे मार्गदर्शक तत्व हिरव्यांना वारंवार बोचते आणि म्हणून हे मार्गदर्शक तत्वच काढून टाका असाही हट्ट नंतर धरला गेला. आता या मार्गदर्शक तत्वाचं काय झालंय ते ठाउक नाही.) त्याच वेळेला जो कोणी अशा कायद्याआड येईल त्याला ठोकण्याचे, तोडण्याचे, फोडण्याचे, कापण्याचे, झोडण्याचे कायदेशीर प्रयत्न झाले नाहीत आणि आजही होत नाहीत हीच खरी गडबड आहे. हा प्रश्न हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणतेही धर्मीय यांच्यापुरता मर्यादित नाही. आपण धर्माचे अतित्व इहलोकाशी निगडीत समस्यांसंदर्भात नष्ट करु शकतो का हा खरा प्रश्न आहे. आणि इहलौकिक बाबीमध्ये सगळ्यात जास्त ढवळाढवळ करणारा भिकार धर्म म्हणाजे म्हणजे मुस्लिम धर्म होय. म्हणून त्यामध्ये सुधारणा होणे प्रामुख्याने आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 09/19/2010 - 18:09 नवीन
>>स्वधर्माची तशी चिकित्सा करणारे हिंदू जन्माला आले आणि मुस्लिम जन्माला आले नाहीत हा हिंदूंचा दोष नाही. तो हिंदूंचा दोष आहे असे कुणी म्हटले? सांगण्याचा हेतू हा होता की 'सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला' असे नाही. >>स्वातंत्र्यानंतर सरसकट सगळ्या धर्मियांना एकच काय तो नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा सर्वाधिक विरोध झाला तो मुस्लिमांचा तो याच कारणासाठी नाही. सर्वांना समान कायदा लागू करायला विरोध हिंदूंमधूनही झाला. म्हणूनच हिंदू कायद्यात सुद्धा परंपरांनुसार वागण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. 'धर्मात् रूढिर्बलीयसि' हे तत्त्व आजही अबाधित आहे. सर्व हिंदुंना समान कायदा (तपशील माहिती नसताना) लागू करायलासुद्धा माझा विरोध आहे. बंगालमधली वारसाची दायभाग पद्धत मला लागू केली तर मला नाही चालणार. आणि ख्रिश्चन आणि मुसलमानांसारखे वारसा/दत्तक कायदे हिंदूंना समान नागरी कायदा म्हणून लागू केले तर मला नाही चालणार. बहुधा तुमचा समज असा आहे ही हिंदूंना जो कायदा लागू आहे तो निर्दोष, प्रागतिक आणि न्याय्य आहे आणि तोच समान कायदा म्हणून सर्वांना लागू करावा. अतिअवांतर : मुसलमानांना एकपत्नित्वाची सक्ती झाली आणि ट्रिपल तलाक चालणार नाही असा कायदा केला तर समान नागरी कायदा झाला बुवा असे तुम्हाला वाटणार आहे का? (मी २५ वर्षांचा होतो तेव्हा मला तसे वाटत असे). >>आणि इहलौकिक बाबीमध्ये सगळ्यात जास्त ढवळाढवळ करणारा भिकार धर्म म्हणाजे म्हणजे मुस्लिम धर्म होय. हे म्हणणे मान्य नाही. हिंदू धर्मसुद्धा (अध्यात्माची बकवास करीत) ऐहिक बाबीतच ढवळाढवळ करतो. पारलौकिक बाबतीत धर्म काय करतो याच्याशी कोणाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अमुक माणसांनी मांसाहार करू नये, अमुक काळात विवाह करू नये, तमुक महिन्यात खरेदी करू नये ही ऐहिकच बाबतीतली ढवळाढवळ आहे. मुस्लिम धर्मात घडली नाही ती गोष्ट म्हणजे कायद्याचे कोडिफिकेशन. म्हणजे जसा हिंदू विवाह कायदा कोडिफाय झाला तसा मुस्लिम विवाह कायदा कोडिफाय झाला नाही. ही नक्कीच त्रुटी राहून गेली आहे. त्यामुळे खटल्यात काय निर्णय द्यावा हे संदिग्ध राहते ही गोष्ट खरी आहे. सर्वांना समान कायदा असावा ही इच्छा मला तत्त्वत: मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 06:38 नवीन
'धर्मात् रूढिर्बलीयसि' हे तत्त्व आजही अबाधित आहे. +१. पण हे तत्व दुबळे करणे हेच खर्‍या लोकशाहीचे कार्य आहे. आणि हे तत्व शंभर वर्षांपूर्वीचे हिंदू आणि आताचे हिंदू या तुलनेच्ञा संदर्भात तपासा. तसेच शंभर वर्षांपूर्वीचे मुसलमान आणि आताचे मुसलमान यांच्या संदर्भात तपासा. या दोन्ही तौलनिक निष्कर्षांची पुन्हा एकदा तुलना करा. म्हणजे सत्य काय हे आपोआपच कळून येईल. पण निष्पक्षपातीपणाने सत्य शोधण्याची तयारी असली पाहिजे. काकदॄष्टीने आणि परधार्जिण्या वॄत्तीने विचार केला तर निखळ सत्य कधीच सापडणार नाही. आमच्या हिंदू धर्मात आजही अनेक सुधारणांना वाव आहे आणि हे आम्हांला मान्य आहे. म्हणूनच अंनिस सारख्या चांगले कार्य करणार्‍या संस्थांविरुद्ध फारतर आमच्यातल्या काही हिंदूंच्या मनात फारतर असंतोष असू शकेल. पण आम्ही लगेच तुमच्या मुसलमान धर्मात निघतात तसे जहरी फतवे काढणार नाही. सर्व हिंदुंना समान कायदा (तपशील माहिती नसताना) लागू करायलासुद्धा माझा विरोध आहे. बंगालमधली वारसाची दायभाग पद्धत मला लागू केली तर मला नाही चालणार. आणि ख्रिश्चन आणि मुसलमानांसारखे वारसा/दत्तक कायदे हिंदूंना समान नागरी कायदा म्हणून लागू केले तर मला नाही चालणार. मला काय मान्य आहे, तुम्हाला काय मान्य आहे या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुमच्या माझ्या मान्यतेवर भारताचे संविधान अवलंबून नाही. काही शहाण्या लोकांनी एकत्र येउन हे संविधान बनवले आहे आणि ते पाळले गेले पाहिजे. सगळ्या नागरिकांना एकच एक कायदा लागू करणे हे कोणत्याही लोकशाही राष्ट्रातल्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. उद्या सगळ्या नागरिकांनी सतीची प्रथा लागू करा अशी मागणी केली तरी आपले संविधान अशा आत्मघाताची परवानगी देणार नाही. सगळ्या नागरिकांनी मिळून एक सरकार निवडले आहे आणि त्या सरकारला संविधानाच्या चौकटीमध्येच काम केले पाहिजे. अशा चौकटीत राहून सरकार काम करत नाही. अन्यथा समान नागरी कायदा लागू करावा हे संविधानातले मार्गदर्शक तत्व पाळून तो कायदा साठ वर्षांमध्ये लागू झाला असता. अमुक माणसांनी मांसाहार करू नये, अमुक काळात विवाह करू नये, तमुक महिन्यात खरेदी करू नये ही ऐहिकच बाबतीतली ढवळाढवळ आहे. अर्थातच. पण ही ढवळाढवळ आजच्या काळात तरी नक्कीच ऐच्छिक आहे. आमच्या हिंदू धर्मात गेल्या शंभर वर्षांत ज्या सुधारणा झाल्या त्याचा हा परिपाक आहे. (आणि अजूनही आमच्या धर्मात सुधारणेला वाव आहे असे मानणार्‍या आमच्या हिंदू धर्मीयांची संख्या हळूहळू का होईना वाढते आहे. ) पण तुमच्या मुस्लिम धर्मात अजूनसुद्धा वंदे मातरम म्हटले की सगळ्या मुल्लांचा पोटशूळ उठतो. आणि मतदानाच्या वेळी फतवा निघाला की ही सगळीच्या सगळी झुरळे जाउन फतव्यातल्या आदेशाप्रमाणे मतदान करतात. मुसलमान माणूस राष्ट्रीय वॄत्तीचा नसतोच, देशप्रेमी नसतोच, सुधारणावादी नसतोच, परधर्मसहिष्णू नसतोच असा याचा अर्थ नाही. अब्दुल कलाम, हुसेन दलवाई, इरफान पठाण, सलीम खान अशा कितीतरी मुसलमानांची नावे या सहिष्णू आणि राष्ट्रीय वॄत्तीच्या व्यक्तींच्या यादीत घालता येतील. पण जेंव्हा टक्केवारीचा विचार होतो त्यावेळेला अशा चांगल्या माणसांचे पारडे हलके होते आणि झुरळांचे पारडे जड होते. आणि या झुरळांना पोसणारे, मस्तवाल होउ देणारे बहुसंख्य लोक मात्र हिंदू असा हा विचित्र तिढा आहे. समान नागरी कायद्याला सर्वाधिक विरोध मुसलमानांचा झाला हे धडधडीत सत्य आहे. समान नागरी कायद्या संदर्भातली माहिती येथे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Uniform_civil_code_of_India श्री पेन, चोंबाळणे म्हणजे लांगूलचालन करणे याच अर्थाने तो शब्द वापरला आहे. किंवा ग्राम्य भाषेत ** तोंडात घेणे, चोखणे असाही अर्थ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 07:13 नवीन
समान नागरी कायदा कसा असावा यावर काही विचार केला आहे का? की हिंदूंचा कायदा सर्वांना लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा असे आहे? हिंदू कायद्यानुसार चुलत भावंडांचे विवाह अमान्य आहेत. पारशी लोकांनी हा नियम समान नागरी कायदा म्हणून का मान्य करावा? समान नागरी कायदा असावा हे मला, तुम्हाला, घटनेला सर्वांना मान्यच आहे. पण तपशील ठरवायचा प्रयत्नही न करता ६० वर्षांत तो लागू झाला नाही म्हणून गळा काढणे योग्य नाही. मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न आधीच्या प्रतिसादात विचारला होता. त्याचे उत्तर द्यावे. >>सगळ्या नागरिकांना एकच एक कायदा लागू करणे हे कोणत्याही लोकशाही राष्ट्रातल्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे भारतीय घटनेने तरी हे प्रथम कर्तव्य म्हणून मानलेले नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 07:22 नवीन
मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न आधीच्या प्रतिसादात विचारला होता. त्याचे उत्तर द्यावे. थत्ते काका मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या फक्त की बहुपत्नीत्वाची चाल दोन्ही धर्मात रुढ होती. पण मग ती एका धर्माला चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली पण दुसर्‍या धर्माला नाही. असे का? "customs" या सदराखाली बहुपत्नीत्वाची पळवाट हिंदुना मिळत नाही हे आपण दोघेही जाणतोच. त्यामुळे समान नागरी कायदा हिंदुना पण बहुपत्नीत्वाची प्रथा बाळगण्याची अनुमती देतो हे निखालस खोटे विधान आहे. त्यामुळे कायदा २ धर्मांसाठी वेगळा ठेवला गेला असे का? मूठभर हिंदुंनी होकार दिला म्हणुन हिंदु धर्मावर ही गोष्ट लादली गेली तर मूठभर मुस्लिम पण मिळालेच असते मुसलमानांमधील बहुपत्नीत्वाची चाल बंद करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 08:24 नवीन
>>थत्ते काका मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या फक्त की बहुपत्नीत्वाची चाल दोन्ही धर्मात रुढ होती. पण मग ती एका धर्माला चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली पण दुसर्‍या धर्माला नाही. असे का? हे इंटरप्रिटेशनच मुळात चूक आहे. "सरकार नावाची एक बाह्य शक्ती होती तिने (परस्पर) ठरवले की एका धर्माला बहुपत्नित्वाची परवानगी द्यायची आणि एका धर्माला नाही" हे इंटरप्रिटेशनच मुळात चूक आहे. आम्ही हिंदूंनी आमच्याच संसदेचा पाठपुरावा करून आमच्यासाठी कायदा करून घेतला त्यात आमच्या समाजात बहुपत्नित्व नको असे आम्हीच ठरवले. सरकार नावाच्या बाह्य शक्तीने नाही. हे योग्य इंटरप्रिटेशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 08:41 नवीन
थत्त्ते काका मी तुमचा आधीचा प्रतिसाद वाचला होत म्हणुनच म्हटले होते की मूठभर हिंदुंनी होकार दिला म्हणुन हिंदु धर्मावर ही गोष्ट लादली गेली तर मूठभर मुस्लिम पण मिळालेच असते मुसलमानांमधील बहुपत्नीत्वाची चाल बंद करण्यासाठी. मूठभर लोकांनी मान्य केलेल्या गोष्टीला "आम्ही हिंदुंनी ही गोष्ट मान्य केली"" असे विधान दिशाभूल करणारे ठरेल असे नाही वाटत तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 13:48 नवीन
आम्ही हिंदूंनी आमच्याच संसदेचा पाठपुरावा करून आमच्यासाठी कायदा करून घेतला त्यात आमच्या समाजात बहुपत्नित्व नको असे आम्हीच ठरवले. संसदेतले खासदार हिंदूंचे, मुसलमानांचे किंवा विशिष्ट धर्मांचे प्रतिनिधी नसतात. ते त्या त्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रतिनिधी असतात. एखाद्या मतदारसंघातला खासदार हिंदू असेल तर तो त्या मतदारसंघातल्या मुस्लि,ख्रिस्ती जनतेचाही प्रतिनिधी असतो. या खासदारांनी हिंदू धर्मात ही प्रथा बंद व्हावी अशी मागणी केली ती धार्मिक परवानगी झिडकारुन मान्य झाली. याच खासदारांनी मुस्लिम धर्मातली ही प्रथा बंद व्हावी अशीही मागणी केली. ही मागणी मात्र धार्मिक भावना दुखावतील म्हणून अमान्य झाली. हे योग्य इंटरप्रिटेशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 13:36 नवीन
समान नागरी कायदा कसा असावा यावर काही विचार केला आहे का? मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? बहुपत्नित्व बंद होणे हा समान नागरी कायद्यातल्या तत्वाचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त या कायद्यामध्ये आणखीन कोणकोणत्या बाबींचा अंतर्भाव होउ शकेल त्यासाठी मी आधीच्या प्रतिसादात दिलेल्या दुव्याचाच आधार घेतो. हा दुवा बर्‍यापैकी क्रेडिबल आहे असे माझे मत आहे. तेथे असा उल्लेख आहे की The common areas covered by a civil code include laws related to acquisition and administration of property, marriage, divorce and adoption. म्हणजेच बहुपत्नित्व अर्थात polygamy वरील निर्बंध ( ज्याचा वरील डेफिनेशनमध्ये उल्लेख नाही ) तसेच वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता आणि तिचे मालकी अधिकार, विवाह, घटस्फोट, अपत्यास दत्तक घेणे या बाबींसंदर्भात समान नागरी कायद्याने भाष्य करणे अपेक्षित आहे. मी भारतीय कायद्याचा तपशीलवार अभ्यास केलेला नाही. ज्यांनी तो केला आहे ते यासंदर्भात अधिकारवाणीने भाष्य करु शकतील. अर्थातच हे भाष्यकार पक्षपाती नाहीत याची खात्री पटल्यावर मगच त्यांच्या मताला किंमत देण्यात अर्थ आहे. पण तपशील ठरवायचा प्रयत्नही न करता ६० वर्षांत तो लागू झाला नाही म्हणून गळा काढणे योग्य नाही. माझ्या कुवतीप्रमाणे समान नागरी कायद्याचा विचार मी वरील दॄष्टीने केला. ज्यांना सरकार म्हणून जनतेने निवडून दिले त्यांनी नि:पक्षपाती तज्ञांची मदत घेउन या बाबीचा याहून कितीतरी अधिक गांभीर्याने आणि तपशीलवार विचार करणे आणि त्यानंतर ती इम्प्लिमेंट करणे अपेक्षित होते. हे त्यांना साठ वर्षांमध्ये करुन दाखवता आले नाही. जनतेच्या हिताचा विचार करुन झटपट निर्णय घेणे आणि ते राबवणे हेच सरकारला नेमून दिलेले काम आहे. ते काम त्यांनी केले नाही याबाबत त्यांची पाठराखण करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. भारतीय घटनेने तरी हे प्रथम कर्तव्य म्हणून मानलेले नाही. सर्व नागरिकांना एकच एक समान नागरी कायदा लागू करणे हे भारतीय घटनेने एक मार्गदर्शक तत्व अथवा ध्येय म्हणून स्वीकारलेले आहे. हिंदू कायद्यानुसार चुलत भावंडांचे विवाह अमान्य आहेत. पारशी लोकांनी हा नियम समान नागरी कायदा म्हणून का मान्य करावा? अमुक एक कायदा मी का मान्य करावा या म्हणण्याला काही अर्थ नाही. मला चोरी करणे मान्य आहे म्हणून कायद्यानेही ते मान्य करावे असेही कोणी म्हणेल. ते तुम्हाला मान्य आहे काय? हिंदू माणसाने चोरी केली की त्याला सहा महिने शिक्षा होते. मुसलमानाने केली की त्यालाही सहा महिने शिक्षा होते. धर्माधिष्ठित कायद्यानुसार जायचे झाले तर मुसलमान चोराचे हात तोडले पाहिजे कारण शरियत तसे सांगते. पण तसे प्रत्यक्षात होत नाही. शरियतचा ८०% भाग कायद्याने आधीच रद्द केला आहे. असे असताना २०% सोयीस्कर भाग तेवढा रिटेन करणे यात कोणता प्रामाणिकपणा आहे? हिंदूंना काय मान्य आहे, पार्शी लोकांना, हिरव्यांना, ख्रिस्ती लोकांना काय मान्य आहे अशा मान्यता घेत घेत फौजदारी कायदे बनवले गेले असते तर सगळीकडे अराजक माजले असते. फौजदारी कायदा सगळ्यांना समान पण नागरी कायदा मात्र वेगवेगळा याचे कारण काय ? हिंदूंचा कायदा सर्वांना लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा असे मी म्हटलेले नाही. ही समजूत तुम्ही स्वतःच करुन घेतली आहे. समान नागरी कायद्याअन्वये हिंदू कायद्यातीलसुद्धा काही किंवा अनेक बाबी नष्ट होतील आणि अनेक नव्या बाबी ज्या हिंदू धर्माला मान्य नाहीत त्या लागूसुद्धा होउ शकतील. धर्माचे अस्तित्व पारलौकिक बाबींपुरते मर्यादित करणे आणि अधिकॄत, सरकारमान्य, कायदेशीर इहलौकिक बाबींसंदर्भात धर्माचे अस्तित्व समाप्त करणे याचा अर्थ सेक्युलॅरिझम हा आहे. असा सेक्युलॅरिझम जोवर कायद्याने कठोरपणे लागू होत नाही तोपर्यंत वेळोवेळी दंगली करुन मस्तवाल लोकांची नांगी मोडून टाकणे हेच आपले कर्तव्य होय असे बहुसंख्यांकांमधील काहींना वाटले तर ती बाब समर्थनीय नसली तरी निदान समजून घेण्याजोगी वाटली पाहिजे. नांगी मोडून टाकली की हे मस्तवाल खेकडे कसे सुतासारखे सरळ येतात याची अनेक उदाहरणे भूतकाळात आणि वर्तमानात पाहायला सापडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 14:17 नवीन
>>समान नागरी कायद्याअन्वये हिंदू कायद्यातीलसुद्धा काही किंवा अनेक बाबी नष्ट होतील आणि अनेक नव्या बाबी ज्या हिंदू धर्माला मान्य नाहीत त्या लागूसुद्धा होउ शकतील. या नव्या बाबी न्याय्य आहेत की अन्याय्य आहेत हे कसे ठरवणार? एकपत्नीत्व ही अशीच हिंदूकायद्यातील नवीन बाब होती. ती हिंदूंनी मागितली म्हणून झाली. तिसर्‍याच कोणी माऊंटबॅटन किंवा शेख अब्दुल्लाला वाटले म्हणून नाही झाली. मूळ हिंदू सिव्हिल कायद्याच्या मसुद्यात आणखीही काही गोष्टी होत्या त्या इम्प्लिमेंट झाल्या नाहीत कारण त्या नको अशी हिंदूंनी मागणी केली. अजूनही तुम्ही सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला असेच समजून विधाने करीत आहात. समान नागरी कायदा हवा अशी मागणी सातत्याने करणार्‍यांनी आक्रस्ताळेपणा करून सारखे सारखे बहुपत्नित्वाचे तुणतुणे वाजवले नसते तर समान नागरी कायद्यावर व्यवहार्य चर्चा होऊही शकली असती. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे समान नागरी कायद्याला अनेक पैलू आहेत. त्याबाबत आजतागायत कोणताही संवाद करण्याचा (माझ्या माहितीनुसार) प्रयत्नही झालेला नाही. प्रयत्न झाला नाही याचे कारण समान नागरी कायद्याची भाषा करणार्‍यांनी त्यापलिकडे विचारच केलेला नसतो. (समांतर उदाहरण द्यायचे झाले तर भारत पाकिस्तान दरम्यान काश्मीर खेरीज अनेक मुद्दे आहेत. पण पाकिस्तान काश्मीर सोडून काही बोलतच नाही म्हणून गाडं अडूनच राहते). [बहुसंख्य मुसलमान खरोखरच चार बायका करतात असा मूर्ख विचार मिपावर कोणी करीत असतील असे वाटत नाही]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 18:31 नवीन
या नव्या बाबी न्याय्य आहेत की अन्याय्य आहेत हे कसे ठरवणार? एकपत्नीत्व ही अशीच हिंदूकायद्यातील नवीन बाब होती. ती हिंदूंनी मागितली म्हणून झाली. तिसर्‍याच कोणी माऊंटबॅटन किंवा शेख अब्दुल्लाला वाटले म्हणून नाही झाली. मूळ हिंदू सिव्हिल कायद्याच्या मसुद्यात आणखीही काही गोष्टी होत्या त्या इम्प्लिमेंट झाल्या नाहीत कारण त्या नको अशी हिंदूंनी मागणी केली. एक भारतीय नागरिक या नात्याने भारतातील विघातक धार्मिक प्रथा कायदेशीररीत्या बंद करण्याचा(मग ती कोणत्याही धर्मातली असूदे) कोणत्याही धर्माच्या नागरिकाला अधिकार आहे. हिंदूंच्या बहुपत्नीत्वाबद्दल बोलण्याचा किंवा त्याची मान्यता वैधानिक पद्धतीने रद्द करण्याचा अधिकार फक्त हिंदूंनाच होता असे नाही. तो अन्यधर्मीयांनाही होता. त्यांनी तो बजावला की नाही हा वेगळा मुद्दा आहे. हिंदूंच्या धर्मातील कायदेशीर बाबी हिंदूंनीच ठरवाव्यात, मुसलमानांच्या धर्मातील कायदेशीर बाबी मुसलमानांनीच ठरवाव्यात असा कुठलाही कायदा नाही. तुमच्याच मुळातल्या गॄहीतकात काहीतरी गल्लत झालेली दिसते. भारतामध्ये सगळ्या धर्मांना स्वातंत्र्य दिलेले नाही तर प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे. ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. अजूनही तुम्ही सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला असेच समजून विधाने करीत आहात. समान नागरी कायदा हवा अशी मागणी सातत्याने करणार्‍यांनी आक्रस्ताळेपणा करून सारखे सारखे बहुपत्नित्वाचे तुणतुणे वाजवले नसते तर समान नागरी कायद्यावर व्यवहार्य चर्चा होऊही शकली असती. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे समान नागरी कायद्याला अनेक पैलू आहेत. त्याबाबत आजतागायत कोणताही संवाद करण्याचा (माझ्या माहितीनुसार) प्रयत्नही झालेला नाही. प्रयत्न झाला नाही याचे कारण समान नागरी कायद्याची भाषा करणार्‍यांनी त्यापलिकडे विचारच केलेला नसतो. सरकार ही कोणतीही बाह्य शक्ती नाही. ती सर्वधर्मीय भारतीय नागरिकांची अंतर्गत शक्ती आहे. जनजीवन चालवण्याचे सर्वाधिकार संविधानानेच या शक्तीला दिलेले आहेत. समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍यांनी बहुपत्नीत्व हे एकच तुणतुणे वाजवले आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली नाही हे तुमचे म्हणणे मी वादापुरते गॄहीत धरतो(मी हे म्हणणे मान्य करत नाहीये वादापुरते गॄहीत धरतोय. ते मान्य करायचे की नाही याचा विचार तपशीलवार माहिती असेल तरच करता येईल.). असे जरी असले तरी या निमित्ताने का होईना त्यांनी या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न तरी केला. पण मग निरोगी आणि चांगली चर्चा व्हावी या उद्देशाने सरकारने या पैलूंना वाचा का फोडली नाही. त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्ही करत आहात तसा आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांच्याजवळ राहिला असता. पहिल्यापासून आत्तापर्यंत सरकारने हा विषय भिजत ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. बहुसंख्य मुसलमान खरोखरच चार बायका करतात असा मूर्ख विचार मिपावर कोणी करीत असतील असे वाटत नाही याबाबतची आकडेवार मला ठाउक नाही. पण अपार्ट फ्रॉम आकडेवारी, मला हे विचारायचं आहे की बहुसंख्य नागरिक खून करत नाहीत म्हणून खून करणे कायद्याने मान्य करावे काय? हा सगळा वाद जरी बाजूला ठेवला तरी समान नागरी कायद्याच्या निमित्ताने का होईना बहुपत्नीत्व रद्द करण्याची मागणी हे तुम्हाला तुणतुणे वाटते म्हणजे कमाल झाली. तुम्हाआम्हाला चर्चा करणे खूप सोपे आहे पण आज अनेक भारतीय मुसलमान स्त्रियांना स्वतःचा पती आपापसांत वाटून घ्यावा लागतो ही बाबच माणुसकीला, भारतीय सरकारला, भारतीयत्वाला काळिमा फासणारी गोष्ट आहे. मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून त्यांच्यावर कायदा लादणे तुम्हाला मान्य नाही. पण धार्मिक रुढीच्या आधारे हजारो,लाखो स्त्रियांचे आयुष्य निराशेच्या,गुलामीच्या अंधारात ढकलून देणे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही मुस्लिम मूलतत्ववादी आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 19:09 नवीन
बहुपत्नित्व बंद व्हावे असे मला पण वाटते. मुसलमानांचं माहिती नाही पण समान नागरी कायदा म्हणून मला काय नियम लागू होणार याबाबत मी सुद्धा चिंतित आहे. कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. >>मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून त्यांच्यावर कायदा लादणे तुम्हाला मान्य नाही धार्मिक भावना दुखावतील म्हणुन नव्हे. तुमचे नियम त्यांना लावू पहात आहात म्हणून. हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. >>तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही मुस्लिम मूलतत्ववादी आहात कम्युनिस्ट लोकांमध्ये विरोध करणार्‍याला अशी 'भांडवलशहांचा हस्तक' वगैरे विशेषणे लावण्याची पद्धत असते. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
P
Pain Wed, 09/22/2010 - 20:06 नवीन
बहुपत्नित्व बंद व्हावे असे मला पण वाटते. मग तसे करणे म्हणजे मुस्लिम धर्मात हस्तक्षेप असा बागुलबुवा का दाखवत आहात ? धार्मिक भावना दुखावतील म्हणुन नव्हे. तुमचे नियम त्यांना लावू पहात आहात म्हणून. माणूसकी जपण्यासाठी केलेल्या नियमांना "तुमचे (हिंदूंचे)" असे सांगून मुस्लिमांना ते लावणे अन्यायकारक असल्याचा टाहो तुम्ही फोडत आहात. यावरून तुम्ही मुस्लिमधार्जिणे असल्याचे सिद्ध होते. मुसलमानांचं माहिती नाही पण समान नागरी कायदा म्हणून मला काय नियम लागू होणार याबाबत मी सुद्धा चिंतित आहे. कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. बहुपत्नीत्वासारख्या गोष्टी अयोग्य आहेत आणि सर्वांनी बंद केल्या पाहिजेत हे सभ्यपणे सांगून समजत नसेल तर दुसरे काय करणार ? कोण सांगते, कसे सांगते याला नाही तर काय सांगते याला महत्त्व असते. हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. आत्ता ज्या दोन धर्मांविषयी बोलणे चालू आहे, त्यात हिंदू धर्मच अग्रेसर आहे; मोठ्या फरकाने. तुम्हाला १<१० मान्य नसेल तर वाद घालू नका. कम्युनिस्ट लोकांमध्ये विरोध करणार्‍याला अशी 'भांडवलशहांचा हस्तक' वगैरे विशेषणे लावण्याची पद्धत असते. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे. तुम्ही मांडलेला मुद्दा आणि तुमचे आक्षेप, त्यांना अप्पा जोगळेकरांनी उत्तर दिले आहे. तुम्ही ते खोडून न काढता किंवा त्यावर काही न बोलता जे तुमच्या पहिल्या प्रतिसादात होते, तेच पुन्हा पुन्हा लिहित आहात. पुरे केलेत हे चांगलेच. या चर्चेवरून असे दिसते की तुम्ही उगाचच्या उगाच लोकांचा बुद्धीभेद करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर Fri, 09/24/2010 - 05:24 नवीन
कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. ज्याला तुम्ही कोणीतरी म्हणताहात त्याला मी भारतीय संविधान असे म्हणतो आहे. भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटना मान्य असणे अपेक्षित आहे आणि ही गोष्ट ऑप्शनल नाही, मँडेटरी आहे. संविधान कोणाच्याही मान्यतेसाठी अडून बसलेले नाही. ते सार्वभौम असून त्याने स्वतःच्या आणि नागरिकांच्या मर्यादा आखून ठेवल्या आहेत. या मर्यादा संविधानाने दरडावून सांगितलेल्या आहेत आणि हे दरडावणे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तुम्हाला समजावून सांगितले . ( संविधानाच्या दरडावण्याला कोणी विचारत नाही ह्च दु:खाची गोष्ट आहे.) हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. हिंदू धर्माच्या मर्यादा मला ठाउक आहेत. माझ्या 'हिंदू धर्म्,वर्णव्यवस्था वगैरे वगैरे' या लेखात या मर्यादा स्पष्ट करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. त्यावर तुम्ही 'उपक्रम' वर काहीशी अनुकूल प्रतिक्रिया दिलीत कारण त्यामध्ये हिंदू परंपरांवर टीका केली होती. बहुधा 'हिंदू' या शब्दाने तुमचा पोटशूळ उठतो. जर या लेखात मी हिरव्या धर्मावर टीका केली असती तर तुम्ही आत्तासारखेच इर्ष्येने भांडला असतात. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे. तुम्ही पांढरे निशाण फडकवलेच आहे तर मीदेखील युद्धविराम घोषित करतो. या प्रतिसादाला उत्तर देउन तुम्ही 'जितं मया' चे समाधान मिळवू शकता. कारण हा माझा या संदर्भातील शेवटचा प्रतिसाद आहे. स्वतःकडे कमीपणा घेउन दुसर्‍याचे मन न दुखावणे ही आमची हिंदू परंपराच आहे. अवांतर - १. एका बेसलेस मुद्द्याचे तुम्ही ज्या जोरकसपणाने समर्थन केलेत त्यावरुन तुमचे वादपटुत्व आणि हुशारी जबरदस्त असणार याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका उरलेली नाही. ही काँम्प्लिमेंट उपहासात्मक नाही हे नमूद करणे मी आवश्यक समजतो. २.स्वतःचा एखादे मत चुकीचे असेल हे नंतर लक्षात आले तर ते बदलून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. फार मोठमोठ्या माणसांना आपल्या विचारांची पूर्ण दिशाच आयुष्याच्या उत्तरार्धात बदलावी लागली आहे. जसे - महात्मा गांधी. आपण सगळे तर खूपच छोटी माणसे आहोत. त्यामुळे मनाचा प्रांजळपणा दाखवण्यात कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. असे नरहर कुरुंदकर म्हणंत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/29/2010 - 18:07 नवीन
प्रतिसाद वाचनीय......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
च
चिंतामणी Wed, 09/22/2010 - 13:57 नवीन
अब्दुल कलाम, हुसेन दलवाई, इरफान पठाण, सलीम खान अशा कितीतरी मुसलमानांची नावे या सहिष्णू आणि राष्ट्रीय वॄत्तीच्या व्यक्तींच्या यादीत घालता येतील. या यादीत मी छोटिशी पण महत्वाची भर घालू इच्छितो. १९६५च्या युध्दात अतुलनीय प्रराक्रम करून शहीद झालेला शूर विर अब्दुल हमीद. त्याल मरणोत्तर "परमविर" चक्र देउन गौरविण्यात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा