कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत
💬 प्रतिसाद
(163)
N
Nile
Wed, 09/29/2010 - 10:05
नवीन
तुम्ही ऋग्वेदी वाटतं? ;-)
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Wed, 09/29/2010 - 10:07
नवीन
आम्च्यात वेगळ्याच सुंदर सुंदर ऋचा असतात.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 09/29/2010 - 10:11
नवीन
करा एकदा रसग्रहण! अश्या वैदिक ऋचांबाबतीत आम्ही एकपाठी आहोत. ;)
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Wed, 09/29/2010 - 10:13
नवीन
म्हणे, रसग्रहण ! एवढा पितृपक्ष संपू द्या.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/29/2010 - 11:55
नवीन
अहो तुलना बालिश आहेच की नाही?
मग त्या ऑक्सफर्डशिवाय कोणाचं खेटर अडलंय? किंवा अडलं होतं?
राहीला प्रश्न गाडी अडून राहण्याची ती जगात कोणाचीच कोणावाचून अडत नाही. जिथला तिथला मानव स्वतःसाठी सोयी निर्माण करत पुढे जातच असतो.
बाकी शुन्य नक्की कोणी शोधला? फक्त भारतीयांनाच त्याचा शोध लागला का? ज्यांच्याकडे शुन्य नव्हता त्यांची गाडी अडली का? वगैरे शोध घेतलात तर "शुन्य आम्हीच जगाला दिला" ह्यातील पोकळ अहंकार गळुन पडायला जरा मदत होईल.
अहो आमच्या लोकांमधे फुकाचा न्यूनगंड हे लोक पसरवत आहेत. सुरु केलेनि ऑक्सफर्ड म्हणून काय दिवे लावले? मारतच होते बायांना चौकात उभे करून दगडांनी ठेचून? चेटकिणी म्हणून. मग ऑक्सफर्ड चालू केली त्यात काय चेटूक कसे करायचे याचे शिक्षण द्यायचे का? का बायकांना चेटकीणी आहेत हे सिद्ध करून द्यायचे शिक्षण द्यायचे? त्यामुळे असल्या फुकाच्या तुलना व्यर्थ आहेत असेच आम्ही म्हणतो.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 12:13
नवीन
बरोबर आहे तुमचे.कोणाचे कोणावाचून अडत नाही.भारतीयांचे तरी काय न्यूटनशिवाय अडले होते?आम्हाला कधी caclulus मधली गणिते सोडवून नव्या गोष्टी तयार करायच्या होत्या?आम्ही आपले मंत्र म्हणणे, ब्राम्हण म्हणून जन्माला आल्यास आम्ही कसे श्रेष्ठ असा अभिमान बाळगणे आणि इतर सगळ्यांना तुच्छ लेखणे, आमच्या रामाकडे पुष्पक विमान होते यासारख्या गोष्टींचा अभिमान बाळगणे यात मश्गुल. भारतातल्या जीवनपध्दतीत अगदी गौतम बुध्दाच्या काळापासून इंग्रज येईपर्यंत म्हणजे दोन-अडिच हजार वर्षात काहीही फरक पडला नव्हता आणि आम्हाला तो करावासा वाटतही नव्हता. Fourier चा Fourier Series वरचा रिसर्च पेपर १८०७ आला होता. तेव्हा आम्हाला Fourier series, ती आधारीत असलेली Sine, Cosine ही functions, differentiation यासारख्या गोष्टींचा पत्ताही नव्हता. बरोबर आहे हवाय कशाला डोक्याला ताप?आम्ही विचार करणार ब्राम्हणांसाठी वेदातील मंत्र म्हणावेत आणि इतरांसाठी पुराणातील मंत्र म्हणावेत, पळी उजव्या हातात धरावी की डाव्या आणि तत्सम गोष्टींवर. इतक्या महत्वाच्या गोष्टींपुढे कोणाला पडली आहे ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि कॉर्नेल विद्यापीठांची! बरोबर आहे कोणाचे कोणावाचून अडत नाही.
क्लिंटन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/29/2010 - 17:57
नवीन
>>>>आम्ही विचार करणार ब्राम्हणांसाठी वेदातील मंत्र म्हणावेत आणि इतरांसाठी पुराणातील मंत्र म्हणावेत, पळी उजव्या हातात धरावी की डाव्या आणि तत्सम गोष्टींवर. इतक्या महत्वाच्या गोष्टींपुढे कोणाला पडली आहे ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि कॉर्नेल विद्यापीठांची! बरोबर आहे कोणाचे कोणावाचून अडत नाही.
हा हा मस्त....!
खरं तर काठावर बसून वाचत होतो. पण दाद दिल्याशिवाय राहवले गेले नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 10/02/2010 - 17:20
नवीन
भारतीयांचे तरी काय न्यूटनशिवाय अडले होते?आम्हाला कधी caclulus मधली गणिते सोडवून नव्या गोष्टी तयार करायच्या होत्या?
सहमत आहे. कदचित गणनाच्या पद्धतीमुळे काही गोष्टी वेगाने आल्या असे म्हणता येईल पण त्यावाचून अडल्या असत्या असे मला वाटत नाही. मूळात माणूस ही जमातच इतकी हुषार आहे की जी कोणत्याही गोष्टी साठी थांबत नाही आणि जेजे उपयोगी असतं ते उचललं जातं.
भारतातल्या जीवनपध्दतीत अगदी गौतम बुध्दाच्या काळापासून इंग्रज येईपर्यंत म्हणजे दोन-अडिच हजार वर्षात काहीही फरक पडला नव्हता आणि आम्हाला तो करावासा वाटतही नव्हता.
वा हि चुकीची माहीती कोणी पुरवली? का भारतीय तेव्हा शर्टपँट घालून फिरत नव्हते म्हणून?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 09/29/2010 - 19:12
नवीन
नाही संदर्भ चुकला. सचिन हा एक असामान्य खेळाडू आहे यात शंका नाही पण माझा बोलण्याचा विषय हा खेळ नाही तर intellect हा आहे. तेव्हा खेळातले संदर्भ इथे आणू नका ही विनंती.
मी संदर्भ नाही दिला तर उदाहरण दिले आणि ते चपखल बसते, तुम्ही ब्राह्मणी कर्मकांडाचा आणि कृष्णाचा संदर्भ एकाच प्रतिसादात वापरलाच की. केवळ आपण गीतेचे आचरण करु शकत नाही म्हणुन त्याची स्तुती न करणे हे E=MC Square कळत नाही म्हणुन आइन्स्टाइनचे कौतुक न करण्यासारखे आहे. आपण एक मुद्दा चर्चितो आहे त्यामुळे सर्व क्षेत्रातील उदाहरणे येणार. जी आपल्या सोयीची नाहीत ती देउ नका म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेऊन उपयोग काय आहे?म्हणजे न्यूटन आमच्या देशात जन्माला आला म्हणून इंग्लंडमधल्या किंवा एडिसन आमच्या देशात जन्माला आला म्हणून अमेरिकेतल्या लोकांनी कॉलर ताठ केल्यासारखे झाले.
दादा ते लोक न्युटनचे गोडवे गातातच की. या लोकांच्या स्मृती अजुन जतन करण्यात आलेल्या आहेतच. अमेरिकेला अभिमान असेलच (आहेच) की एडिसन त्यांच्या देशाचा. आणि ते रास्त पण आहे. इतिहास अभिमान बाळागण्यासारखा असेल तर त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे. इतिहासाकडुन शिकले हे पाहिजेच.
अनेकदा शास्त्रीय आधार संदर्भांनुसार बदलत असतात. उदाहरणार्थ न्यूटनचे नियम हे पृथ्वीवर (किंवा अन्य कुठल्याही ग्रहावर) frame of reference असल्यामुळे लागू असतात. पण आईनस्टाईनने नंतर दाखवून दिले की हे नियम अवकाशात लागू राहणार नाहीत. अर्थात त्यामुळे न्यूटनचे महत्व अजिबात कमी होत नाही पण आईनस्टाईन किंवा न्यूटनची व्यक्तिपूजा करावी असे त्यात काय आहे? किंबहुना शास्त्रीय तत्वांच्या जगतात व्यक्तिपुजेला अजिबात स्थान नाही.
शास्त्रीय जगतात व्यक्तिपुजेला स्थान नसेल. मग? संबंध काय इथे? आम्ही करतो व्यक्तिपुजा. कृष्णाची करतो, शिवाजी महाराजांची करतो, आंबेडकरांची पण करतो. मला वाटते त्यात काहीच गैर नाही. गैर काही असेल तर ते फक्त एवढेच की आपण त्यांची शिकवण आचरणात आणत नाही. पण म्हणुन त्यांचा आदर करणे (आपल्या प्रकारे) चुकीचे आहे हे निखालस एकांगी मत झाले.
आपले पूर्वज, आपली महान भारतीय संस्कृती अशा गोष्टी ऐकल्या की आपल्यातलेच अभिमानी लोक दोनचार हजार वर्षांपूर्वीच्या भारतात जातात आणि ’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेतात हे आपल्या आजुबाजूला मी अनेकदा बघितले आहे. माझा मुद्दा त्यांच्याबद्दल आहे.
मला वाटते ते बरोबरच आहे. आमचे पुर्वज महान होते म्हणुन आम्ही मान ताठ करतो. आमचे पुर्वज चोर, दरवडेखोर असले असते तर कसला आलाय अभिमान. म्हणजे इतरांना त्यांच्या पुर्वजांचा अभिमान नाही म्हणून आम्ही बाळगु नये की काय? अजबच शास्त्र आहे.
तेव्हा थोडक्यात: आपल्याला पटत असलेल्या गोष्टींसाठी आपल्या पूर्वजांना क्रेडिट द्यायचे असेल तर जरूर द्यावे (जसे गतीविषयक नियमांना न्यूटनचे नियम म्हणतात) पण डॉ.आंबेडकरांची चालते तशी व्यक्तिपूजा नको तर न्यूटन एक महान scientist होता हे मान्य करून त्याच्या नियमांचा इतर अनंत चांगल्या गोष्टींसाठी जसा उपयोग नंतरच्या scientists नी केला तसाच पूर्वजांनी निर्माण केलेल्या knowledgebase मध्ये भर टाकायचा प्रयत्न करावा.
मान्य.
तेव्हा तत्वांना महत्व दिले पाहिजे तत्व सांगणाऱ्याची व्यक्तिपूजा करायला नाही.
व्यक्तिपुजेला महत्व नाही आहे. पणा त्यात काही गैरही नाही आहे जर ती पुजा डोळस असेल तर.
पण आपली मंडळी वेदकालीन जंगलांमध्येच भटकत असतात आणि २०१० च्या जगात येऊन पूर्वीच्या चांगल्या गोष्टींचा वापर करून अजून काही चांगले घडवून आणावे असे मात्र कोणालाच वाटत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
मान्य.
आता या प्रकाराला करंटेपणा म्हणायचे असेल तर मला त्यावर काहीही म्हणायचे नाही.
ते तुमचे कार्य आम्ही असले प्रकार करत नाही. चांगले ते चांगलेच., तुम्ही काही चांगले विचार मांडले तर त्याचाही आदरच करु.
तसे अजिबात नाही. भारतीय संस्कृतीच्या अभिमानी मंडळींना ’आपले ते चांगले’ असे वाटत असते. आणि मला ’चांगले ते आपले व्हावे’ असे वाटते.हा फरक आहे. याचा अर्थ आपले सगळे घाण, खराब, अवडंबर, टाकाऊ, दिखाऊ असे मला म्हणायचे आहे असा कशावरून काढला?
तुमच्या लिखाणावरुन तर तसेच प्रतीत होते आहे. तसे नसेल तर उत्तमच.
बऱ्यावाईट गोष्टी सगळीकडेच असतात. आपल्याकडे राम आहे तसा रावण आहेच. कृष्ण आहे तसा कंसही आहे. सतीची चाल कायद्याने बंद करायला आपल्याला इंग्रजी भाषेचा आणि विचारांचा प्रभाव पडलेले राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड बेंटिक हा इंग्रज benevolent गव्हर्नर जनरल का लागला?
इंग्रज काही देवमाणसे नव्हती. तसे भारतीय पण नाहीत, नव्हते. मग? इथे सतीची प्रथा बंद केली तेव्हा अमेरिकेत गुलामगिरी होतीच ना? म्हणजे परदेशात पण अनिष्ट प्रथा होत्याच.
जेव्हा राईट बंधुंचे विमानाचे उड्डाण चालू होते आणि आईन्स्टाईन सापेक्षतावादाचे सिध्दांत मांडत होता तेव्हा आपल्याकडे शाहू महाराजांसाठी वेदातले मंत्र म्हणावेत की पुराणातले या क्षुल्लक गोष्टींवर खल चालू होता.आणि तो खल थोडेथोडके नाही तर ८-१० वर्षे चालू होता आणि अगदी व्हॉईसरॉय आणि ब्रिटिश पार्लामेन्टचे प्रिव्ही काऊंसिल पर्यंत ते प्रकरण गेले होते.
आपले चरक सुश्रुत जेव्हा शल्यचिकित्सेचा शोध लावत होते तेव्हा गोरे चेटकिणींना जाळत होते हे का विसरता? संस्कृती विकसनाची चक्रे असतात. २००० वर्षापुर्वी आपण प्रगत होतो, आज ते आहेत. चालणारच. तुम्हाला फक्त आपल्यात काय वाइट आहे ते दिसते आणी त्यांच्याकडचे काहीच वाईट दिसत नाही. आपल्याकडे काहीच चांगले दिसत नाही आणि त्यांच्याकडे सगळे चांगलेच दिसते. आणी वर मला विचारता की "याचा अर्थ आपले सगळे घाण, खराब, अवडंबर, टाकाऊ, दिखाऊ असे मला म्हणायचे आहे असा कशावरून काढल""?
पाश्चिमात्य जगतात केंब्रिज आणि ऑक्स्फर्डची स्थापना झाली त्यानंतर ६०-७० वर्षांनी सुध्दा आपला समाज संन्याशांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही या क्षुल्लक चर्चेत मग्न होता. या फालतू गोष्टींमध्ये आपण इतका वेळ का व्यर्थ दवडला? याचे कारण तीच कर्मकांडे, त्याच रूढीपरंपरा!
आपल्याकडे नालंदा, तक्षशिला होत्या त्यावेळेस ऑक्सफर्ड होते काय?
आता असे म्हणणे म्हणजे आपले सगळे वाईट असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढायचा असेल तर त्याविषयी मला काहीही म्हणायचे नाही.
भले शाब्बास, जे चांगले आहे त्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांच्याकडे जे खराब आहे त्याबद्दलही काही बोलत नाही. मग यातुन अजुन वेगळा अर्थ का काढावा?
हो मला भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ हे वचन नक्कीच पटते आणि त्यात लॉजिक आहे असे वाटते. आणि त्याबद्दल मला इतर कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही-- तुमच्या तर नाहीच नाही.
तुमचा प्रचंड गैरसमज होतो आहे. मी तुम्हाला कुठलेच सर्टिफि़केट दिलेले नाही. उगाच नसत्या भ्रमात राहु नका.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 20:24
नवीन
मी इतर मुद्द्यांचा याच चर्चेत कुठेनाकुठे उल्लेख केला आहे म्हणून मला महत्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांविषयीच परत लिहितो.
१. आपल्याकडे नालंदा-तक्षशीला होते तेव्हा केंब्रिज-ऑक्सफर्ड नव्हते ही सत्य परिस्थितीच आहे. आणि आज ’त्यांच्याकडे’ MIT, स्टॅन्फोर्ड, कॉर्नेल, प्रिन्स्टन अशी अनेक विद्यापीठे आहेत आणि आपल्याकडे त्या तोडीचे एकही नाही ही पण सत्य परिस्थिती आहे.आमच्याकडे नालंदा होते तेव्हा तुमच्याकडे काय होते असे विचारून २०१० च्या जगात काही फरक पडणार आहे का?सध्याचे काय?पूर्वी नालंदा होते हे चांगलेच आहे.पण आपल्याला तसेच विद्यापीठ (नुसते विद्यापीठच नव्हे तर उच्च दर्जाचे संशोधन, नवे knowledge निर्माण करणारे रिसर्च पेपर इत्यादी इत्यादी) व्हावे असे वाटायचे सोडून पूर्वीच्या ग्लोरीत मश्गूल व्हायला आवडते त्यावर माझा आक्षेप आहे.आपल्या नालंदा विद्यापीठाचा परकिय आक्रमकांनी विध्वंस केला हे वाईट झाले यात शंकाच नाही.पण तसेच दुसरे नालंदा आम्ही आमच्या देशात उभे करू ही जिद्द आपल्याला असते का?नालंदा या शब्दाची फोड आहे ’न अलम दा’ म्हणजे आता एखाद्या क्षेत्रातील जे काही known knowledge आहे ते सर्व काही विद्यार्थ्याला दिले आणि अजून देण्यासारखे काहीही राहिले नाही! तशी परिस्थिती आपल्याकडे नक्कीच नाही पण ती यावी असे न वाटता आपण अभिमान धरतो दोन-अडिच हजार वर्षांपूर्वीच्या नालंदा विद्यापीठाचा. माझा भारतीय संस्कृतीच्या अभिमान्यांवर एक आक्षेप असतो की ते कायम backward looking असतात. आपले पूर्वज महान होते आणि त्यांनी अमुक केले तमुक केले याविषयी अजिबात शंका नाही पण त्यापासून स्फूर्ती घेऊन आपण त्यात भर टाकावी असे न वाटता आपण समाधान मानतो दोन-चार हजार वर्षांपूर्वीच्या ग्लोरीमध्ये. यालाच मी ’वेदकालीन जंगलात भटकणे’ असे म्हटले.तेव्हा Let's be forward looking. भविष्यकाळ उज्वल कसा होईल याचा विचार करून त्या दृष्टीने काम करणे अधिक श्रेयस्कर आहे पण भारतीय संस्कृतीचे अभिमानी नेमके त्याच्या उलट करतात यावर माझा आक्षेप आहे.
२. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ’आपले ते चांगले’ असा भारतीय संस्कृतीच्या अभिमान्यांचा दृष्टीकोन असतो आणि माझा ’चांगले ते आपले व्हावे’ असा असतो. हा फरक आहे. आणि चांगले ते आपले व्हायचे असेल तर त्यात आत्मपरिक्षण हा एक महत्वाचा भाग असतो कारण प्रामाणिक आत्मपरिक्षण केले तरच आपल्याला काय कमी आहे ते समजते.वैयक्तिक जीवनात जो माणूस आत्मपरिक्षण करताना स्वत:चा सर्वात कडवट टिकाकार असेल त्यालाच सर्व त्रुटी जाणवतील.आता आत्मपरिक्षण करताना मला जर का जाणवले की माझ्यात काही कमी आहे तर मी काय करावे? ती त्रुटी भरून काढायचा प्रयत्न करावा की ’अरे तो शेजारचा बाब्या आहे ना त्याच्यात पण पूर्वी ती त्रुटी होती’ असे म्हणून गप्प बसावे? इतरांच्या character मधील त्रुटींचा संबंध काय? मला इंटरेस्ट माझ्यामध्ये आणि म्हणून मी स्वत:चाच analysis करणार इतरांचा नाही! पण ’आपले ते चांगले’ असे म्हटले की ही analytical process बंद होते या गोष्टीला माझा आक्षेप आहे. तेव्हा गोरे चेटकिणींना जाळत जरी असले तरी ती गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखी नाही म्हणून ती घेणार नाही पण त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन हा घेण्यासारखा आहे म्हणून तो घेणार!
३. अमेरिकेत गुलामगिरी होती, सगळीकडे काहीनाकाही अनिष्ट प्रथा होत्या.पण अमेरिकेतली गुलामगिरी नाहिशी करावी असे मत सातत्याने मांडले खासदार विल्यम विल्बरफोर्सने आणि लिंकन अध्यक्ष असताना ते प्रत्यक्षात आले. पण या सर्व गोष्टी करणारे लोक अमेरिकनच होते ना?की तिथे बाहेरून येऊन कोणीतरी सांगितले की गुलामगिरी वाईट म्हणून ती बंद करा? आपल्याकडे ते करायला बेंटिक हा इंग्रज आणि इंग्रज विचारांनी प्रभावित झालेले राजा राममोहन रॉय लागले. स्वत: राजा राममोहन रॉय यांच्यावर पाश्चिमात्य विचारांचा पगडा होता आणि ते त्यांनी स्वत:च म्हटले आहे. तेव्हा आपल्या भारतीय विचारांतून भारतीयांना ते करावेसे वाटले नाही का? तसे असेल तर काहीतरी चुकते आहे/होते असा त्याचा अर्थ नाही का?
४. मी जाहिरपणे म्हटले आहे की भगवद्गीता चांगली आहे तसेच भारतात develop झालेल्या प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टी चांगल्याच आहेत हे जाहिरपणे म्हणतो. तर तितक्याच मोकळेपणाने आणि कडवटपणाने मी आपल्या समाजातील त्रुटींवर टिकापण करतो. इतरांच्या त्रुटींवर टिका का करत नाही याचे उत्तर वर दिले आहे. तुम्ही ’आपले ते चांगले’ म्हणतच आहात. फक्त पुढील गोष्टी वाईट आहेत का हे सांगितलेत तर बरे होईल:
पंचक, मूळ नक्षत्रावर मुलगी जन्मल्यास शांत करून घेणे यासारख्या रूढी आणि तत्सम कर्मकांडे, सतीची प्रथा, जातीव्यवस्था आणि त्यातून होणारा अन्याय, मंदिरांमध्ये पशुबळी देणे, शास्त्रीय दृष्टीकोन सोडून वेदातील मंत्र म्हणावेत की पुराणातील किंवा अशा स्वरूपाच्या चर्चा इत्यादी इत्यादी. तसेच ’असे प्रकार इतर समाजांमध्येही होते/होतात’ असे म्हणून इतरांकडे बोट दाखवू नका कारण परत एकदा सांगतो मला इंटरेस्ट आपल्या समाजात आहे इतरांमध्ये नाही. आणि हे प्रकार वाईट आहेत असे आपले मत असेल तर त्यातून सुटायला पाहिजे का? आणि तसे सुटायचे असेल तर भले इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याइतका मोठेपणा तुम्ही दाखवाल का?
आणि या सगळ्यांची उत्तरे ’हो’ अशी असतील तर तो माझ्या लेखाचा तो एक मोठाच विजय समजेन. अन्य एका मिपाकराला मी म्हटले ’एका तरी भारतीय संस्कृतीच्या अभिमान्याने निदान असा विचार करायला सुरवात केली तरी तो माझा विजयच असेल’ (मूळ शब्द वेगळे असतील पण अर्थ हाच आहे).
(धर्मबुडव्या आणि संस्कृतीविरोधी) क्लिंटन
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 09/29/2010 - 20:44
नवीन
>> (धर्मबुडव्या आणि संस्कृतीविरोधी)
नुसते पुरोगामी लिहले असते तरी चालले असते ;)
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Wed, 09/29/2010 - 21:58
नवीन
मी "उरोगामी" वाचले.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 09/30/2010 - 16:46
नवीन
मृत्यूंजय, तुमच्या उत्तराची वाट बघत आहे.
क्लिंटन
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 09/30/2010 - 20:43
नवीन
तुमचे नवीन प्रतिसादातील सगळॅ मुद्दे मला मान्य आहेत. आपण बहुधा उगाचच वाद घालत आहोत. मी तुमच्या नवीन प्रतिसादातील विचारांना अनुमोदन देतो
माझा आक्षेप फक्त इतिहासाचा अभिमान न बाळगण्याला किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे योगदान नाकारण्याला आहे. इतिहासातुन शिकुन भविष्य उज्ज्वल करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मला वाटते.
शिवाय आज जग आपल्या पुढे आहे हे नक्कीच नाकारण्याजोगे नाही. आपणही प्रयत्न करुन आपली पुर्वप्रतिष्ठा परत मिळवु शकतो असे मला वाटते.
बाकी आपले विचार सारखेच आहेत.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 09/30/2010 - 22:04
नवीन
झाले तर मग.
आणि माझा आक्षेप इतिहासाचा डोळे उघडे ठेऊन अभ्यास न करणे आणि नुसता ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा उदोउदो करण्याला आहे. कारण अशा व्यक्तिमत्वांचा खरा संदेश काय होता हे लक्षात न घेता नुसता उदोउदो केला तर त्यांच्या तत्वालाच हरताळ फासला जातो. डॉ.आंबेडकरांच्या बाबतीत हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. बाकी आपण सामान्य लोक. आपण आंबेडकर, सावरकर, छत्रपती यांच्यापुढे कोणीच नाही.पण त्यातही आंबेडकरांचा ’शिका, स्वावलंबी व्हा’, सावरकरांचा ’शास्त्रीय दृष्टीकोन ठेवा’ असे संदेश आचरणात आणू शकतोच की नाही? निदान प्रामाणिक प्रयत्न तरी करू शकतो की नाही? त्यातही लोकमान्य टिळकांचा ’कित्ता’ घेण्याऐवजी ’अडकित्ता’ घेतला तरी सगळाच विपर्यास व्हायचा! तसेही व्हायला नको.
That's the point. पण इतिहासातून शिकून मनाने इतिहासात राहून नाही (वेदकालीन जंगले).
मागच्या वर्षी मिपावरील एका चर्चेत मी म्हटले होते तेच इथे कॉपी-पेस्ट करतो कारण ते इथेही तितकेच लागू आहे:
"नव्या विचारांचे स्वागत न करता आम्ही तेवढे शहाणे असे म्हणत आपण आपल्या खोलीचे दरवाजे बंद करून घेतले तर दरम्यानच्या काळात जग पुढे निघून जातेच पण आपल्या खोलीतही वातावरण कधी कुजायला लागते हे समजत नाही.पाणी साचून त्याचे डबके झाले की त्यात मलेरियाचे डास होणारच." आणि आपल्या बाबतीत नेमके हेच झाले आहे आणि तसे यापुढे व्हायला नको म्हणून आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत.
वाचून आनंद वाटला.
क्लिंटन
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 17:16
नवीन
सॉरी मी नास्तिक नाही.मी फक्त कर्मकांडांच्या विरोधात आहे.मी एकही कर्मकांड केले नाही तर याचा अर्थ मी नास्तिक आहे असा का घेतला जातो हे समजत नाही. म्हणजे असे म्हणण्यात एक गोष्ट गृहित धरली आहे आणि ती म्हणजे कर्मकांडे आणि देवाचे काहीतरी Correlation आहे.आणि मला वाटते की असे कोणतेही Correlation नाही.
क्लिंटन
- Log in or register to post comments
प
प्रशु
Mon, 10/18/2010 - 21:32
नवीन
षंढ क्षत्रिय
ह्यातुन छुपा जातियवाद डोकावतोय, मुघल्/ईंग्रजांची चाकरी करणारे फक्त क्षत्रियच होते हा जावईशोध कुठन लावलात आपण?
छुप्या जातियवादाने व्यथीत
आपला जिवश्च कंठश्च क्षत्रिय मित्र.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/28/2010 - 11:17
नवीन
कर्मकांडे जोतो ज्याच्या त्याच्या पैशाने करतो आहे तोवर आपल्याला काहीची प्रॉब्लेम नाही. साला कसले आलेत सुशिक्षित अन् अशिक्षीत?
- Log in or register to post comments
ट
टग्या टवाळ
Tue, 09/28/2010 - 11:29
नवीन
माणसा गावाला वाडी असेलच झाडा वरचे नारळ मोजत बसा उगाच नको त्या गोष्टी वर चर्चा नको.
- Log in or register to post comments
म
मन१
Tue, 09/28/2010 - 11:58
नवीन
प्रतिसाद.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 09/28/2010 - 12:01
नवीन
कशाला उगाच तरास घेतला मालक..
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 09/28/2010 - 12:07
नवीन
प्रतिसाद
गायछाप + चुनापुडी आणि पार...चालुद्या...
- Log in or register to post comments
ग
गोरिला
Tue, 09/28/2010 - 12:18
नवीन
फारच लांब लचक आहे .
आम्ही धन्द्याची गुपिते अशी चावडीवर फोड़त नाही.
हे काम फ़क्त मराठी माणसाला उत्तम जमते
शिनच्या (एक कोकणी शब्द )
- Log in or register to post comments
र
रमताराम
Tue, 09/28/2010 - 12:42
नवीन
नरोटीची उपासना क्लिंटनसाहेब. जरा इथे पहा.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 07:32
नवीन
अरे वा. माझ्यासारखाच विचार करणारे लोक भेटले की आनंदच होतो.आपला लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको.
मला एक गोष्ट समजत नाही की अशा सगळ्या ’खोबऱ्याच्या गोष्टी’ वरकरणी न समजणाऱ्या प्रकारात का असतात?म्हणजे दुष्काळाच्या वेळी गरजूंना मदत करावी ही भावना चांगलीच आहे.पण म्हणून श्रावण महिन्यात सवाष्ण बोलवा हा ’शास्त्रातील’ (किंवा परंपरेतील) रिवाज का?श्रावण महिन्यात दुष्काळ असतो ही माहिती नवीनच समजली. श्रावण महिन्यातील तथाकथित उनपावसाच्या खेळावर अनेक कविता शाळेत असताना अभ्यासल्या आहेत असे आठवते. समजा श्रावण महिन्यात दुष्काळ असला असे गृहित धरले तरी केवळ सवाष्णांना का बोलवा? विधवांनी काय पाप केले आहे? का सगळ्या विधवा बिचाऱ्या सती गेल्यामुळे समाजात केवळ दोनच प्रकारच्या स्त्रिया होत्या?--- लग्न न झालेल्या लहान मुली (कुमारिका) आणि सवाष्ण? तेव्हा गरजूंना मदत केली जावी या चांगल्या भावनेचे वाटोळे व्हायला सुरवात होते त्या भावनेच्या नावावर काहीतरी रूढीपरंपरा सुरू केल्यामुळे! आणि अशाच गोष्टींमधून आजूबाजूला ’ही सगळी प्रतिके आहेत आणि त्यामागचे गूढ अर्थ वेगळेच आहेत’ असे म्हणणारी मंडळी अनेकदा भेटतात. आणि आजच्या काळात या सगळ्या गोष्टींना हिणकस स्वरूप प्राप्त झाले आहे त्यावर काही बोलले की परत ही मंडळी ’तुम्हाला प्रतिके आणि गूढ अर्थ समजलेलेच नाहीत त्यामुळे दोष धर्मशास्त्रांचा नाही तर तुमचा आहे’ असे म्हणायला मोकळी! मला वाटते की दोष जर कोणाचा असेल तर साधेसरळ संदेश प्रतिकांमध्ये आणि त्यामागच्या गूढ अर्थांमध्ये club करणाऱ्यांचा आहे.कारण ’गरजूंना मदत करा’ असे साध्या भाषेत सांगितले असते (कोणतेही प्रतिक/गूढ अर्थ न ठेवता) तर अशा गोष्टींना आजचे हिणकस स्वरूप यायची शक्यता नक्कीच कमी होती. असो. या अशा प्रवृत्तीविरूध्द मी युध्दच पुकारले आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मिपा किंवा अन्य माध्यमांमधून याविषयावर मी लिहिणार हे नक्की.
क्लिंटन
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 09/28/2010 - 12:49
नवीन
>>>>>>>>>म्हणजेच भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ आचरायचा प्रयत्न न करता केवळ कृष्णाने गीता सांगितली म्हणून त्याचा उदोउदो करणे योग्य नाही असे मला वाटते.
हॅहॅहॅहॅहॅ. हे म्हणजे स्वतःला हातात बॅट सुद्धा धरता येत नाही म्हणुन सचिन तेंडुलकरचे कौतुक करायचे नाही त्यातला प्रकार झाला. आपण आचरणात आणु शकत नसु तर तो आपला कर्मदरिद्रीपणा आहे ना. पण शिकवण असामान्य आहे हे मान्य न करण्याचा करंटेपणा का करायचा?>>>>>>>>>>>>>
अगदी १००% अनुमोदन.......
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 12:49
नवीन
हम तय किया हूं कि हम इस बारेमें कछु नाही लिखूंगा |
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 13:19
नवीन
मैने भी तय कियेला है, मै परतिकिर्या नयी दुन्गा.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 09/28/2010 - 13:09
नवीन
एकदाची शांती करुन टाकू. एकदाची पूजा घालून टाकू या प्रकारातील लोकांना डोक्यातील शंकेचा वळवळणारा किडा घालवायचा असतो. भरल्या गाडीला सुपाच काय ओझ? म्हणुन ही कर्मकांड करुन टाकत असतात. भय, उत्सुकता, चिंता, आशा अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ असतो.
परमेश्वर नाही . पण आपला नमस्कार केलेला बरा समजा असलाच तर ताप नको. असाही विचार करणारे असतात.
"राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? याचा सुगावा पंचांगाद्वारे घेउन ते राजास सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आता हे संवत्सरफल कोण लिहित असे हे सूज्ञास सांगणे नलगे! आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे
इत्यादि मोबदला देतात. एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना.त्यावर त्याची गुजराण चालते.त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे.संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली."
( पंचाग एक अवलोकन वरुन उधृत )
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 09/28/2010 - 14:22
नवीन
शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली."
पण त्या चलाख स्थानीक धर्मपंडित निश्चलपुरी गोसावी या नी शिवाजी महाराजाना घाबरवलेच राज्याभिषेक दुसर्यांदा करायला लावलाच की.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Tue, 09/28/2010 - 17:49
नवीन
फलादेश बरोबर न येता देखील दर वर्षी ज्योतिष्याचा सत्कार करून वर त्याला बिदागी देण्याइतके सगळे राजे आणि त्यान्ची प्रजा पिढ्यानपिढ्या बुद्दू होते काय?
(आम्ही विन्डोज साइडबार वर हवामान वाले ग्याजेट फुकट आहे म्हणून टाकले आहे, आणि गमतीने कधीमधी बघतो. असो.)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 07:57
नवीन
नेमक्या याच प्रकारावर मी एवढे सगळे रामायण लिहिले आहे. मुळात डोक्यात शंकेचा किडा सोडणारे कोण?पंचक लागले, मुलगी मूळ नक्षत्रावर जन्माला आली म्हणून ती घराण्याच्या मुळावर होईल असे सांगणारे हेच भिक्षुक ना?
मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे असे ५/३/२ लोक मरतील अशी २७ पैकी १५ नक्षत्रे आहेत.म्हणजे on an average ५५.५५% मृत्यू झाल्यानंतर ५/३/२ लोक मरतील! जगात हिंदू सुमारे १५%. उरलेले ८५% लोक (सुमारे ५०० कोटी) अहिंदू. सर्व हिंदू लोक त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेतात असे समजू. ५०० कोटीं अहिंदूंपैकी समजा अजून २०० कोटी लोकही त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेतात असे समजू. उरले ३०० कोटी लोक जे कधीच त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेत नाहीत. माणसाचे सरासरी आयुष्य ६० वर्षे धरले (आफ्रिकेतील काही मागास भागांमध्ये ३० तर जपानमध्ये ८५ असे मोठे variation आहे.तेव्हा सोयीसाठी सरासरी म्हणून ६० वर्षे धरू. याचा अर्थ दरवर्षी अशा शांत न करणाऱ्यांपैकी on an average ५ कोटी लोक मरतात (३०० कोटी भागिले ६० कोटी). म्हणजे दर महिन्याला ४१.६७ लाख (समजा ४० लाख) लोक मरतात. त्यापैकी ५५.५५% म्हणजे २२.२२ लाख (समजा २० लाख) लोक या १५ नक्षत्रांवर मरतात. २,३ आणि ५ चा average ३.३३ . म्हणजेच ५/३/२ हा प्रकार खरा असेल तर दर महिन्याला मरणाऱ्या २० लाखांमागे २० लाख गुणिले ३.३३ बरोबर सुमारे ६६ लाख लोक मरायला हवेत. या ६६ लाखांमध्ये शांत करण्यावर विश्वास असलेलेही लोक असतीलच! म्हणजे जगाची लोकसंख्या पहिल्यांदा झपाट्याने कमी व्हायला हवी आणि एखाद्या खूपच कमी आकड्यावर स्थिर व्हायला हवी. तसे होताना दिसत आहे का? नक्कीच नाही. असेच statistics मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलीविषयी पण करता येईल. तेव्हा ५/३/२ हा प्रकार म्हणजे शुध्द भंपकपणा, लोकांना फसवून खिसे भरायला मारलेली थाप आहे असे म्हटले तर काय चुकले? तेव्हा असे वळवळणारे किडे लोकांच्या डोक्यात सोडणारे हेच आणि ते किडे जावेत म्हणून लोकांना शांत केलेली बरी असे वाटायला लावणारे पण हेच.
आणि असे मत मांडले तर तो संस्कृतीविरोधी/ हिंदूविरोधी ठरतो.नाहीतर ’आपले सगळे वाईट कसे दिसते’ अशा प्रश्नांचा भडिमार केला जातो.यामागे आपले जुने ते सगळे चांगले, perfect, सर्वोत्तम हा dogma आहे.दुसरे काही नाही.
(संस्कृतीविरोधी) क्लिंटन
- Log in or register to post comments
म
महानगरी
Tue, 09/28/2010 - 14:19
नवीन
असे ऐकले व वाचले आहे कि...
ब्राह्मण वर्णांतर्गत भिक्षुकी हा कमी दर्जाचा व्यवसाय मानला जात असे. ब्राह्मण वर्णाचे मुख्य काम हे अध्यापन व अध्ययन, सल्ला-मसलत, समाजाचे दिशादर्शन हे होते. समाजामधील ज्या व्यक्ती हे काम करु शकत त्याच ब्राह्मण असत.
पैशाच्या मोबदल्यात पुण्य मिळवून देण्याचे काम करणे हे ब्राह्मणाचे उद्दिष्ट्य असणे स्मृती काला पर्यन्त अपेक्षित नव्हते.
पुढे वर्ण हा जन्माशी निगडित झाला. तेव्हापासून ब्राह्मण जातीत जन्माला येणारे सगळे ह्या उच्च अपेक्षेस उतरतील हे शक्य नाही. त्यामुळे अर्थातच या नंतर वर्ण पद्धतीच्या मूळ हेतूचा र्हास झालेला दिसतो व ब्रह्मधर्माचे अधःपतन झालेले दिसते.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 14:50
नवीन
असे नव्हते. वेदकालापासूनच यज्ञात पौरोहित्य करणे आणि त्याबदल्यात दक्षिणा घेणे कॉमन होते.
केवळ अध्ययन व अध्यापन हे कधीच अपेक्षित नव्हते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/29/2010 - 08:38
नवीन
चूक... वेदकालापासून ब्राम्हणाने अध्ययन अध्यापनच अपेक्षित होते. पौरोहित्य करून दक्षिणा घेणे हे केवळ चरितार्थ चालवण्यासाठी संचय करण्यासाठी नव्हे. आणि ते तेवढ्यापुरतेच करावे असे मनुस्मृतीही स्पष्ट सांगते. (आयला मनुस्मृतीचं नाव ऐकून अजून फेफ्रं नाही आलं?)
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Wed, 09/29/2010 - 12:20
नवीन
म्हणजे कोणत्या मनुची स्मृती? मनुस्मृतीच्या नावावर एव्हढे काही खपवले जाते (सगळ्याच बाजुंनी) की मनु ही व्यक्ती आहे की संकल्पना, एकुण मनु किती, एकुण स्मृती किती, धर्मात स्मृती/पुराणांचे अन शास्त्रांचे नक्की स्थान काय अश्या मुलभुत प्रश्नांचा सगळ्यांनाच विसर पडतो.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 09/29/2010 - 16:44
नवीन
>>म्हणजे कोणत्या मनुची स्मृती? मनुस्मृतीच्या नावावर एव्हढे काही खपवले ........
मनुस्मृती म्हणजे मनूच्या नावावर समाजात प्रचलित असलेल्या तत्कालीन नियमांचे इसवीसनाच्या मागे पुढे २०० वर्षांत केव्हातरी भृगुंच्या कुलाने केलेले संकलन. तेच आज मनुस्मृती म्हणून उपलब्ध आहे.
मनुस्मृतीतल्या वचनांविषयी विचार करताना मनू कोण, किती मनू होते, मनुस्मृती लिहिणारा मनू कितवा, तो राजा होता का, तो ब्राह्मण होता की क्षत्रिय या सर्व गोष्टी इर्रिलेव्हंट आहेत.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/01/2010 - 07:03
नवीन
मनुस्मृती ही वैवस्वत नामक मनू ने लिहिली.
( हा या धाग्यावरचा १०१ वा प्रतिसाद )
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 10/01/2010 - 07:32
नवीन
>>मनुस्मृती ही वैवस्वत नामक मनू ने लिहिली
असेल. पण मनुस्मृतीत अमुक म्हटले आहे का तमुक म्हटले आहे या चर्चेत irrelevent आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 09/29/2010 - 16:47
नवीन
मनुस्मृती तेवढ्यापुरतेच घ्यावे असे मुळीच सांगत नाही.
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 09/28/2010 - 14:36
नवीन
या भारत नामक देशात प्रत्येकाला आपापला धंदा करण्याचा हक्क आहे.
जसे, भटजींचा धंदा
गणपती व इतर देवतांच्या मूर्ति बनवण्याचा धंदा
लग्नाच्या अनुषंगाने, मांडववाल्यांचा, फुलवाल्यांचा, ब्युटिशियन्सचा, केटरर्सचा, सोनारांचा, बँडवाल्यांचा, इत्यादि.
मग तो धंदा १ नंबरचा असो वा २ नंबरचा. त्याचा समाजाला काही उपयोग असो वा नसो.
सगळ्यांचे पोट हे एकमेकांचा खिसा हलका करण्याच्या अर्थकारणावर अवलंबून आहे.
तेंव्हा हे सगळे असेच चालणार, कारण स्वतंत्र विचार करणारे लोक या देशात अत्यल्पसंख्य आहेत.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 09/28/2010 - 15:50
नवीन
व्हेलेंदाइन डे..मैत्री दिवस..मदर डे..फादर डे.. यांचे व ग्रीट वेल..आरचिज..पिझा हट कंचुकी व इतर यांचे हितसंबंध तपासायला हवे..... मंदीर समीत्या स्थापुन लुट करणारे हे चालतात......अन ब्राह्मणाला एखादा नारळ जादा मिळाला कि झाला गदारोळ......
- Log in or register to post comments
श
शेखर
Tue, 09/28/2010 - 16:07
नवीन
>> पिझा हट कंचुकी
खपलो . =))
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
Tue, 09/28/2010 - 18:37
नवीन
कंचुकी.. आता हे स्टोअर्स कुठे आहे...???
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 09/28/2010 - 18:43
नवीन
”कंचुकी फ्राईड टीकन” म्हणायचे असेल अविनाश काकाला.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Tue, 09/28/2010 - 17:18
नवीन
वकील, न्यायाधीश, वैद्यकीय व्यावसायिक, कोचिन्ग क्लासवाले, शिक्षण सम्राट ते भ्रष्टाचार विरोधी समित्या, सी.बी.आय., इ.इ. सगळ्यान्चे हितसम्बन्ध तपासायला हवेत.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Tue, 09/28/2010 - 19:44
नवीन
माणसाला अन्न,वस्त्र आणि निवारा याच मूलभूत गरजा आहेत. त्यातही अन्न वगळता इतर दोन गरजा गुहेत राहणाऱ्या आदिमानवाला नव्हत्या.तरीही तो राहात होताच ना? टूथपेस्टचा शोध लागण्यापूर्वी लोक दात घासायचे नाहीत का? तर तसे नक्कीच नाही. पूर्वी लिंबाच्या काड्या वापरायचे आज पेस्ट वापरतात.तेव्हा सगळे बिझनेस हे कृत्रिम गरज निर्माण करूनच पैसा कमावतात.
मग भिक्षुकीवरच आक्षेप का?याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे शास्त्रातील, धर्मातील (खऱ्या किंवा घुसडलेल्या) गोष्टींची भिती दाखवून हा व्यवसाय केला जातो. उदाहरणार्थ पंचकशांती केली नाही तर पाच माणसे मरतील! कच्च्या दिलाच्या लोकांची यामुळे घाबरगुंडी उडाली नाही तरच नवल! एका माणसाचा मृत्यू झाला म्हणून इतर पाच जणांचे मृत्यू होतील ही गोष्ट कशी काय पटते हेच समजत नाही. तसेच मूळ नक्षत्रावर मुलगी जन्माला आली तर ती घराण्याच्या मुळावर येईल म्हणून शांत करून घ्या असे म्हणणेच अयोग्य आहे असे मला वाटते.म्हणजे काय की ’उद्या मुलगी खरोखरच घराण्याच्या मुळावर आली तर काय’ या भितीतून अनेक लोक ती शांत करायला तयार होतात. मला तरी हा शुध्द ब्लॅकमेलचा प्रकार वाटतो.
’कंचुकी’ फ्राईड चिकन काय किंवा मॅकडॉनल्ड काय किंवा इतर कोणतेही बिझनेस ’तुम्ही आमच्याकडे आला नाहीत तर तुम्ही/तुमचे आप्तस्वकिय मरतील ’ अशी जाहिरात करत नाहीत. आम्ही तुमच्या चवीला आवडेल अशा गोष्टी विकतो म्हणजेच तुम्हाला यायचे तर या तुमचे स्वागत आहे असेच त्या जाहिरातींचे स्वरूप असते ना? पण म्हणजे नाही आलात तर तुमचे वाईट होईल असा अर्थ होत नाही. मागे सफोला तेलाच्या जाहिरातीतून सफोला घेतले नाही तर कोलेस्टेरॉल वाढेल असे म्हटले होते ते सरकारने ’सफोला तेल कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करते’ असे बदलायला लावले होते असे वाचल्याचे आठवते.
तेव्हा माझा मुख्य आक्षेप भिती दाखविण्यावर आहे. आणि अशी भिती दाखवून कोणत्याही स्वरूपाची जाहिरात केली जात असेल तर त्यावरही माझा तितकाच आक्षेप आहे.
क्लिंटन
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 09/29/2010 - 01:10
नवीन
तुमचं म्हणणं मान्य. हे सगळे पैसे उपटायचे मार्ग आहेत असे काही बाबतीत तरी नक्कीच म्हणू शकतो.
अर्थात असं आजकाल बर्याच ठिकाणी बघायला मिळतं - विमाकंपन्यांची नफेखोरी, वैद्यकीय गुंताळा, वकिली जाळे.. ही सगळी त्यातलीच. भिती दाखवून बरेच जण गल्ला जमवतात. पण म्हणून सगळ्यांना सरसकट धारेवर धरण्यात अर्थ नाही.
माझी आई स्वतः भिक्षुकी करते. तो तिचा छंद आहे, आवड म्हणून करते. त्यात तिला कमीपणा वाटत नाही, न ती कुणाला लुबाडणूक करणारे सल्ले देते. काहीवेळा तर कुणी एखादी पूजा करू का असे विचारायला आला तर गरज नसल्यास स्वच्छपणे तसे सांगते. एखादी पूजा येत नसल्यास तसेही सांगते. लोकांनी स्वत:हून, आधी न विचारता, जी दक्षिणा दिली ते ती कसलेही किल्मिष मनात न बाळगता घेते. जे आधी विचारतात त्यांना सांगते की या पूजेची साधारण एवढी दक्षिणा देतात, तुम्हाला जे वाटेल ते द्या.
सांगायचं एवढंच की पैशाचा बाजार सगळीकडेच आहे, पण त्यातही चांगुलपणा असलेली लोकं आहेतच. त्यामुळे सरसकट त्या पेशातील सगळ्यांना धारेवर धरणे योग्य नाही.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 09/29/2010 - 08:15
नवीन
डॉ.आंबेडकरांनी म्हटले होते की ’मी ब्राम्हणांचा विरोधक नाही तर ब्राम्हण्याचा विरोधक आहे’ म्हणजेच ’ब्राम्हण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ या प्रवृत्तीला ते विरोध करत होते. त्याचप्रमाणे मी लोकांना खोटी भिती दाखवून लुबाडायच्या प्रवृत्तीचा विरोध करतो. आपल्या मातोश्री कोणालाही लुबाडायचे सल्ले देत नाहीत तसेच ज्यांना केवळ पूजा करून मन:शांती मिळवायची आहे अशांच्या घरी पूजा/शांत करतात. तेव्हा अशा भिक्षुकांना माझा विरोध नक्कीच नाही. आणि खोटी भिती दाखवून लुबाडणाऱ्या भिक्षुकांइतकाच विरोध पावसाळ्यात २-४ दिवसात जाणारी सर्दी झाली (आणि याविषयी स्वत:ची पूर्ण खात्री असेल) तरीही मेंदूच्या एम.आर.आय पासून शंभर टेस्ट करायला लावणाऱ्या डॉक्टरांनाही! याचा अर्थ डॉक्टरकीचे काम हे व्रत मानून रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना नक्कीच विरोध नाही. I hope I have made my point.
पैशाचा बाजार सगळीकडे आहे हे मान्य.पण इतर ठिकाणी जाहिरात करताना आपली वस्तू/सेवा कशी चांगली आणि ती वस्तू/सेवा ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण करेल अशीच जाहिरात असते.म्हणजे आमची वस्तू/सेवा घ्या नाहीतर तुमचे वाटोळे होईल/तुम्ही किंवा तुमचे आप्तस्वकिय मरतील/तुमचे पितर नरकात जातील याप्रकारची कोणतीही भिती त्यात नसते.मी काही काळ विमा कंपनीतही काम केले आहे आणि तिथेही ’तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या बायकामुलांचे निदान पैशाच्या बाबतीत हाल होऊ नयेत’ असेच म्हणत product push करतात.आमची पॉलिसी घेतली नाहीत तर तुम्ही मराल असे म्हणत नव्हे. हा मूलभूत फरक आहे.
क्लिंटन
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 09/28/2010 - 16:11
नवीन
माझ्या मते अशी शांत करण्यामागे तुम्ही दिलेल्या कारणांबरोबरच तिसरे कारणही असावे, ते म्हणजे "त्या पाच जणांत" आपणही असलो तर !!! नकोच ती रिस्क. शांत करणे सोपे.!! :)
बाकी भिक्षुकी हा मी "प्रॉफीटेबल बिजनेस"ह्या सदरात पकडतो. त्यावर सरकारने योग्य तो कर लावावा असेही सुचवतो. त्यामुळे, अर्थात हा प्रॉफीटेबल बिजनेस असल्याने प्रॉफिट वाढवण्यासाठी केल्या गेलेल्या क्लृप्त्या ह्याही 'बिजनेस'मधे दिसल्या तर त्याबद्दल त्रागा होत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »