Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

क
क्लिंटन
Tue, 09/28/2010 - 08:21
🗣 163 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
46623 वाचन

💬 प्रतिसाद (163)
क
क्लिंटन Tue, 09/28/2010 - 20:02 नवीन
माझा आक्षेपाचा मुद्दा कसलातरी बागुलबोवा दाखवून लोकांना ’शांत केली तर बरे’ असे वाटायला लावायचे आणि त्यातून स्वत:चे खिसे भरायचे यालाच आहे. मग ते पाच जण आपल्या जवळचे आप्तस्वकिय असतील ही भिती किंवा आपण स्वत: असू ही भिती! क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ग
गणेशा Tue, 09/28/2010 - 16:14 नवीन
क्लिंटन साहेब .. तुम्ही खरेच जबर्या विचार मांडला आहे पहिल्या लेखा मध्ये. अर्थाजनासाठी माणसाने बरेच मार्ग तयार केले आहेत.. त्या बद्दल तुम्ही लिहिलेले आवडले. माणसाने ह्य जगात सगळ्या सोयी .. सगळ्या रुढी -- सगळ्या गोष्टी स्वताच्या/माणसांच्या फायद्या साठीच केल्यात.जात - पात - धर्म सोडुन जर सगळे वाचले तर कळेल .. आंबेडकर , शिवाजी महाराज, गांधीजी , महात्मा फुले .. ह्यांच्या नावाने जे आपण क्रुत्य करतो खरेच त्यांच्या कार्याचे .. कृत्याचे आपण जाणिव पुर्वक विचार तरी कधी करतो का ? हा प्रश्न पडतोच.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 09/28/2010 - 17:45 नवीन
पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे - "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या" कोणी त्या अभांगाचं सार न पहाता - देव कुठे आहे, मग मुक्ती म्हणजे काय वगैरे प्रश्न विचारायला लागला की समोरचा अनुत्तरीतच होतो. लेखातील मुद्दयासंदर्भात - कर्मकांडाचं म्हणाल तर "देण्यात" देखील अतीव आनंद असतो किंबहुना आपण कोणाला काही देऊ शकतो ही भावनाच सुखावणारी असते. दुर्गा सप्तशतीमधील एक श्लोक् आहे - "रोगान्शेषान पहंसि तुष्टा रुष्टा तु कामान सकलानभिष्टान, त्वामाश्रितानाम न विपन्नराणाम त्वामाश्रिता ह्याश्रिता प्रयान्ति||" यातील शेवटच्या ओळीचा अर्थ हा की हे देवी जे तुझ्या आश्रयास आले ते इतरांना आश्रय देण्यास समर्थ होतात. जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/28/2010 - 17:46 नवीन
जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून? असते हे नक्की! याचे मोठ्ठे स्पष्टीकरण मात्र मला देता येणार नाही. आणि श्रीमंतच कश्याला? आपल्या मिळकतीचा थोडा हिस्सा भक्तिभावाने अर्पण करणे ही गरिबांचीही एक गरज असू शकते. हां, आता कोणाचा कुठे विश्वास असेल हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. कोणी देवळात वगैरे जाइल तर कोणी संस्थेला दान करतील. या निमित्ताने एक आठवण आली. माझ्या मावशीचे घर बांधून पूर्ण झाले तरी आजूबाजूची घरे बांधण्याचे काम चालू होते. तिथे काम करणार्‍या दोनचार धिप्पाड मजुरांनी माझ्या १६ १७ वर्षाच्या मावसभावाला जबरदस्तीने पुजा सांगायला बोलावले होते. त्याने आपल्याला पुजा सांगता येत नसल्याचे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. मग त्याला येत असलेले सगळे श्लोक, अध्याय, स्तोत्रे म्हणवून घेउन ११ रू दक्षिणा मोठ्या भक्तीभावाने त्याला दिली होती. नंतर आम्ही भरपूर हसलो होतो, मजुरांना नव्हे तर आपला भाऊ पुजा सांगतानाचे चित्र डोळ्यासमोर येउन.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मिसळभोक्ता Tue, 09/28/2010 - 22:06 नवीन
नंतर आम्ही भरपूर हसलो होतो, मजुरांना नव्हे तर आपला भाऊ पुजा सांगतानाचे चित्र डोळ्यासमोर येउन. हल्ली एक असेच भयाण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते. पण त्यात मजुरांनी साड्या नेसल्या होत्या, आणि भटजी तीन-टक्के, तीन-टक्के असा श्लोक म्हणत होता. शांत करून घ्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शेखर Tue, 09/28/2010 - 17:49 नवीन
>> >> कर्मकांडाचं म्हणाल तर "देण्यात" देखील अतीव आनंद असतो किंबहुना आपण कोणाला काही देऊ शकतो ही भावनाच सुखावणारी असते. सहमत आहे. त्यामुळेच काही लोक तुम्हाला प्रतिसाद रुपी त्रास देत असावेत. त्यांना हा त्रास देण्यात सुखावणारी भावना लाभत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 09/28/2010 - 17:57 नवीन
कित्येकांचा त्रागा समजण्यासारखा आहे. त्यांना राजकारण, प्रवासवर्णन, इतिहास, विनोद असे धागे वर हवे आहेत आणि मी बाष्कळ धागे काढते मला मान्य आहे. आय विल कर्ब इट टोटली हेन्स्फोर्थ. पण पितरांचा धागा काढण्यामागे माझी ही इच्छा होती की काहीतरी चांगलं वर यावं मंथनातून जसं क्लिंटन यांचा हा धागा खूप रोचक आहे, घासकडवींच्या धाग्यावरचे लोकांचे अनुभव अतिशय अद्भुत आहेत. पण मला कुणाचा राग नाही इन फॅक्ट मस्त नमुने पहायला मिळतात तेही आपल्या (मराठी) माणसांचे :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
क
क्लिंटन Tue, 09/28/2010 - 20:07 नवीन
जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून?
वर म्हटले आहे की पाच लोक मरतील, मुलगी घराण्याच्या मुळावर उठेल अशा प्रकारच्या भिती दाखवून लोकांना ’शांत केली तर बरे’ असे वाटायला लावणे आणि त्यातून आपले खिसे भरणे या प्रकारावर माझा आक्षेप आहे. जर कोणी स्वखुषीने काही करायला तयार झाले तर त्याविषयी माझा आक्षेप तितक्या प्रमाणावर नाही. जर भिक्षुक हा सत्पात्री दान द्यायला योग्य आहे असे वाटत असेल तर जरूर तसे करावे. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
भ
भाऊ पाटील Wed, 09/29/2010 - 10:36 नवीन
>>पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. --म्हणजे नेमके काय होत हे स्पष्ट करुन सांगा जरा. सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर कस जातात? टीप- हा प्रश्न खिल्ली उडवण्यासाठी विचारलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
निस्का Wed, 09/29/2010 - 16:46 नवीन
>>पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. मानसोपचारतज्ञांकडे जाऊन पद्धतशीर उपचार करुन घेण्यात नक्की काय चुकीचे आहे? पूजा, दान, धर्म यातून मनाला शांती मिळते असे एकवेळ मानले, तरी जी अडचण आहे त्यातून मार्ग काढ्ण्यासाठी मदत कशी होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
पक्या Tue, 09/28/2010 - 19:22 नवीन
काही ठराविक कर्मकांडे करायला मला तर छान वाटते...जसे की पूजा, सणवार , काही जुन्या चालीरिती.. अगदी ह्या गोष्टींना शास्त्रीय आधार नाहीये हे माहित आणि कळत असूनही. एकतर घरात त्यावेळी छान प्रसन्न वातावरण असते. रोजच्या एकाच रूटीनपेक्षा काहीतरी वेगळी कामे आपण करित असतो..जसे की घर सजावट ,पूजेच्या सामानाचा बाजारहाट , फुलांचे हार करणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य. घरात छानपैकी स्वयंपाक शिजत असतो. काही खास पदार्थ आपण एरवी करू म्हटले तरी केले जात नाहित. पण या निमित्ताने ते केले जातात. आमच्या भावाच्या मुलीची ब्राम्हणाने शांती करायला सांगितली होती. काही गरज आहे , का करायची , नाही केली तर काय होईल वगैरे प्रश्नांनी उचल खाल्ली पण घरातील वडील धार्‍या मंडळींच्या समाधानासाठी ही पूजा घरात केली गेली. काय प्रसन्न वातावरण होते त्यावेळी. सर्व जण सकाळी सकाळी उठून आंघोळया करुन छान छान कपडे घालून तयार झाले. पूजेची सर्व तयारी झाली. मुख्य गुरुजींनी काय सुंदर पूजा मांडली होती. मग अजून गुरूजी आले. बहुतेक ११ असावेत एकूण . त्यांच्या धीरगंभिर आवाजात एका लयित मंत्रपठण सुरू झाले. कानाला ऐकायला ते अतिशय छान वाटत होते. शेजारी डोकावून जात होते. आणी किती छान , प्रसन्न वाटतय आज तुमच्याकडे म्हणून जात होते. किचन मधून नैवेद्याच्या स्वयपाकाचा वास नाकात शिरत होता. पुरणाचा नैवेद्य सुरू होता. मग होम हवन झाले. गुरुजींनी भरपूर दक्षिणा घेतली...त्या पुजेचा जो दर होता त्यावेळी त्याप्रमाणे. पण त्या बदल्यात एक दिवस छान प्रसन्न वातावरणात घालवायला मिळाला. मस्त सकाळच्या अकरा साडे अकरा वाजताच पुरणपोळी , कटाच्या आमटीचे मस्त भरपेट जेवण झाले. दुपारी गप्पा टप्पा करत नंतर सर्वांनी मस्त ताणून दिली, आणि तसेही बाहेर कुठे हॉटेल मध्ये वगैरे जाऊन तेवढे पैसे खर्च झालेच असते. कर्मकांडे केलीत तरी त्याची कसली भिती , दडपण असता कामा नये आणी अतिरेक ही नको. उलट ते करताना मजा यायला हवी. त्यातुन आनंद मिळायला हवा. तेवढ्यापुरते मला तरी काही ठराविक कर्मकांडे करायला आवडतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/29/2010 - 08:18 नवीन
आंघोळ्या हा शब्द मनाला भिडला! क्लिंटन, लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/29/2010 - 11:39 नवीन
त्या एका आंघोळीत अनेक (न केलेल्या) आंघोळ्यांचे समायोजन असते. पुर्वी प्रवासात एखादी नदी दिसली लोक आंघोळ्या करुन घ्यायचे परत करायला भेटन न भेटन या आशंकेनी. (पारोसा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
राजेश घासकडवी Wed, 09/29/2010 - 07:51 नवीन
भरलेल्या गाडीला सुपाचं काय ओझं म्हणत म्हणत बरीच सुपं आपण बाळगतो...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 09/29/2010 - 08:08 नवीन
सुंदर विचार व जबरदस्त लेख...पण काही लोकाना दान करायची ** असेल त्यानी काय दान केले तर काय बिघडते. जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून? पण दान नेमके ब्राम्हणालाच का करावे? एकादा गरीबाला दान केले तर त्याने पुण्य मिळणार नाही का? पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. परत एकदा लोकाना उल्लु बनवायाचा प्रयत्न.म्हणजे हिंदु धर्म संस्कृती मानसोपचारतज्ञांचा धंदा बुडवतात असे ह्याना सांगायचे आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 09/29/2010 - 08:20 नवीन
धन्यवाद वेताळसाहेब. बाकी असे काही लिहिलेत तर तुम्ही सुध्दा संस्कृतीविरोधी ठराल बरं का! (संस्कृतीविरोधी) क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्राजक्ता पवार Wed, 09/29/2010 - 09:14 नवीन
लेख आवडला .
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 09/29/2010 - 10:20 नवीन
'पोटापुरता पसा पाहीजे, हवी पिकाया पोळी' एवढाच उद्देश असावा. आणि फसवणूक कोण करंत नाही ? पावसाळ्यात कपड्यांचे ग्रॅण्ड रिडक्शन सेल अगदी ५०% ते ६०% किमती लावून केले जातात. तरीही त्यातून भरगच्च नफा मिळवला जातोच नां ? म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत काय असेल ? लेबल्स लावून विक्री किंमतीची अगोदरच कल्पना दिलेली असते म्हणून आपण समजूत करून घेतो कि आपण फसवले गेलेलो नाही. आणि इथे फक्त लेबल नसते आणि कर्मकांडाच्या खर्चाबरोबर सल्ला फि देखील असते एवढाच काय तो फरक.
  • Log in or register to post comments
म
मिहिर Wed, 09/29/2010 - 12:22 नवीन
लेख आवडला आणि पटला.
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Wed, 09/29/2010 - 16:25 नवीन
देव अशानं भेटायचा नाही रे... देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. दगडाचा देव त्याला वज्राचं भेव लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचांदीचा देव त्याला चोराच भेव... देव अशानं भेटायचा नाही रे... देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. देवाला भेटायला कुणा मध्यस्थाची गरजच का पडावी?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 18:09 नवीन
सदर भजन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आहे. बाकी, चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
ज
जयंत कुलकर्णी Wed, 09/29/2010 - 18:55 नवीन
जपाची माळ •जानेवारी 10, 2010 • प्रतिक्रिया नोंदवा (संपादन) खय्यामचा विरोध हा पहिल्यापासून कर्मकांडांना होता. सर्व प्रकारच्या कर्मकांडांना ! प्रामाणिक माणसाला याची गरज काय अशी त्याची प्रामाणिक शंका होती. दररोज परमेश्वराच्या प्रार्थनांचे अवडंबर माजवणे त्याला समजू शकत नव्हते. पण तो स्वत:शी प्रामाणिक होता. परमेश्वर असेल अशी त्याची आशा होती. इच्छा नव्हे. पण सर्वसामान्य समजतात किंवा धर्मगुरू सांगतात असे त्याचे स्वरुप असेल असे त्याला मित्रहो, मुळीच वाटत नव्ह्ते. म्हणून तो परमेश्वरालाच म्हणतो – तुझ्या जपाच्या माळेत नसेल ओवला मी एखादा मोती, पण माझ्या चेहर्‍यावरची पापाची खंत मी अजूनही पुसलेली नाही. मी तुझ्या दयेची आशा सोडलेली नाही, कारण हे परमेश्वरा, मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही. पापे कसली तर शास्त्रीय सत्य सांगण्याची ! दयेची भीक कोणासाठी तर ज्या कर्मठ लोकांनी सत्य स्विकारायला नकार दिला, त्यांच्यासाठी ! आणि सत्य काय तर “मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही.“ शास्त्राची (सायन्सची) पाठराखण करत असताना त्याने बरेच शत्रू जोडलेले होतेच ! मित्रहो, काळ लक्षात घ्या. अरबांनी नुकतेच इराण इस्लाममय केले होते तो काळ ! Posted in Uncategorized लेबले (टॅग्ज): Iran, Marathi, Omar Khayyam, Philosophy. Persia, Poems, Rubayaa
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/29/2010 - 21:00 नवीन
अनुभवकथन आवडले.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 09/30/2010 - 22:36 नवीन
क्लिंटन साहेब (क्लिंटन हे नाव एका गो-याचे आहे हे माहित असल्याने आणि गोरा म्हणल्यावर त्याला "साहेब" म्हणलेच पाहीजे.) का फुकाचा त्रागा करून राहीला?
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Fri, 10/01/2010 - 00:32 नवीन
क्लिंटन साहेब, सगळ्यात पयल्यांदा तुमास्नी येक प्रेमाचा सल्ला देतो, की वाचा. अजून लई वाचा. तुमी लय लवकर रागाला येता दादा, आसं प्रतिक्रियांवरुन तरी दिसतंय. त्यामुळे मी काही फार वाद घालणार नाही. केवळ विचारार्थ काही मुद्दे समोर ठेवतो. पाश्चात्यांच्या ज्ञानाचे आणि तंत्रातील प्रगतीचे कौतुक आहेच, पण तेवढ्यासाठी भारतीयांची आणि विशेषतः ब्राह्मणांची अक्कल काढण्याचा प्रमाद आपल्या हातून होऊ नये, असे वाटते. आपण एखाद्या विशिष्ट काळाचे उदाहरण देतो त्यावेळी त्यातील सगळ्या घडामोडी जुक्स्टापोझ करुन मग निष्कर्ष काढायला हवा, की नको? सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचा छळ केला हे सांगताना समकालीन यादवांचा मंत्री असलेल्या हेमाद्रि या ब्राह्मणाने मंदिर स्थापत्याचे एक नवेच तंत्र शोधून काढले होते. दगडांचे चिरे केवळ एकमेकांत बसवून आणि त्याच्या खाचांत कोणतेही बाईंडिंग मटेरियल न भरता देवालये उभारण्याच्या या शैलीला 'हेमाडपंती शैली' म्हणतात. ती देवालये आजही टिकून आहेत आणि पाहायला मिळतात. पेशव्यांच्या काळातील जेवणावळींचा आणि भटशाहीचा संदर्भ आनंदाने दिला जातो, पण शनिवारवाडा आणि पुण्याच्या पेठांना पाणीपुरवठा करण्यासाठीची कल्पक यंत्रणा उभारणारा ब्राह्मण आपल्याला आठवत नाही. इंग्रज डॉक्टरकडून औषधे घेणारे माधवराव पेशवे, मराठ्यांचा तोफांचा कारखाना उभारण्यासाठी जीवाचे रान करणारे नाना फडणीस आणि सरदार पानसे, इंग्रजांकडून चष्मा घेणारे सखारामबापू बोकील आणि इंग्रजांकडून घड्याळे व लांब पल्ल्याच्या दुर्बिणी विकत घेणारा दुसरा बाजीराव आठवत नाही. मराठे आणि निजामाची मदत घेऊन टिपू सुलतानाला मारण्याची घाई इंग्रजांना झाली होती कारण त्याच्या अग्निबाणांचा इंग्रजांनी धसका घेतला होता. भारतातील आणि पहिला स्वदेशी कारखाना नानासाहेब पेशव्यांच्या काळात एका ब्राह्मणाने उभारला होता. (तो आजही पुण्यात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे). पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतातील पहिली कापडगिरणी खरे तर गुजरातेतील एका नागर ब्राह्मणाने उभारली, पण भांडवल उभारणीच्या स्पर्धेत ऐनवेळी पारशी उद्योजकाने बाजी मारल्याने हा ब्राह्मण दुसर्‍या क्रमांकावर राहिला. १८८० च्या सुमारास भारतातील पहिला स्वदेशी साबण निर्मितीचा कारखाना एका ब्राह्मणाने काढला, पण स्पर्धेला घाबरुन इंग्रजांनी त्याला तो बंद करायला लावला. त्याच काळात एका ब्राह्मण संशोधकाने एक अभिनव शोध लावला आणि जनरल इलेक्ट्रिक या प्रख्यात अमेरिकन कंपनीने तो विकत घेतला. भारतातील एका संशोधकाला अमेरिकेने अत्यंत आदराने 'हिंदुस्थानचा एडिसन' ही पदवी दिली. आणखी एका ब्राह्मणाने मेक्सिको देशात जाऊन कृषिक्रांती घडवली. (या सगळ्यांची नावे मला ठाऊक आहेत. आपणास ठाऊक आहेत का?) वेदोक्त आणि पुराणोक्ताचा वाद सुरु होता त्याच काळात ठोमरे नावाच्या एका ब्राह्मणाने भारतीय विमानशास्त्रातील संकल्पनांच्या आधारे विमानाचे प्रारुप तयार करुन गिरगाव चौपाटीवर उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केला होता. त्याला लोकमान्य टिळकही उपस्थित होते. (राईट बंधू विमान ऊडवत होते त्या काळात भारतीय काय करत होते, याचे मला मिळालेले उत्तर) आणखी एक ब्राह्मण चित्रपट या तेव्हाच्या नव्या माध्यमतंत्रात पारंगत होऊन आला आणि त्याने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला. समुद्र उल्लंघन केल्याचे प्रायश्चित्त एकीकडे घेतानाच गणितातील कूटप्रमेये लीलला सोडवणारे रामानुजम ब्राह्मणच होते आणि भारतातील आद्य अभियंता म्हणून ओळखले जाणारे सर विश्वेश्वरय्या हेही ब्राह्मणच होते. विलायतेत हालअपेष्टा सहन करुन पहिली डॉक्टर होणार्‍या आनंदीबाई जोशी या ब्राह्मण होत्या आणि संततिनियमनाचा पुरस्कार करत हयात घालवलेले डॉ. र. धों. कर्वेही ब्राह्मणच होते. भारतात सहकारी चळवळीचा पाया घालणारे डॉ. धनंजयराव गाडगीळ ब्राह्मणच. प्रसूतिकाळात मरणार्‍या जगभरच्या महिलांना जीवनदान ठरणारा गर्भाशयातील टाका शोधून काढणारे डॉ. बी. एन. पुरंदरे हेही ब्राह्मण. भिक्षुकी आणि शिक्षकी यापलिकडेही ब्राह्मण समाज आहे आणि इतिहास असो, राजकारण असो, की विज्ञान असो काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी योगदान दिले आहे. (मी ही माहिती जातीच्या अभिनिवेशापोटी दिली नाही कारण बुद्धिमत्ता हा काही एकाच जातीचा मक्ता नसतो. इतर समाजातील असंख्य कर्तबगार लोकांची उदाहरणेही माझ्याकडे आहेत, पण 'उचल काठी लाग बामणापाठी' असा पवित्रा एकारांत चित्पावनांनी घेतल्यावर मग बोलण्यासारखे काय उरले? आपलेच दात आणि आपलेच ओठ.)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 05:49 नवीन
अहो योगप्रभू साहेब,
पण तेवढ्यासाठी भारतीयांची आणि विशेषतः ब्राह्मणांची अक्कल काढण्याचा प्रमाद आपल्या हातून होऊ नये, असे वाटते
मी स्वत: एक भारतीय आहे आणि एक ब्राम्हण आहे हे आतापर्यंत तुम्हाला माहित झाले असावे.सगळे ब्राम्हण बिनडोक होते असे मला म्हणायचे आहे असे कशावरून दिसते?कुणा प्रतिसाद देणाऱ्यांच्या मातोश्री भिक्षुकी करतात आणि त्या लोकांना लुबाडायचे सल्ले देत नाहीत आणि ज्यांना केवळ मन:शांतीसाठी पूजा करायची आहे त्यांच्याच घरी जाऊन पूजा करतात त्यावर ’अशा भिक्षुकांना विरोध नाही’ असे म्हटलेले वाचले नाहीत का?उगीच कशाला खानखोजे,तळपदे (की ठोमरे? असो वाचन कमी असल्याचा परिणाम),फाळके यांची उदाहरणे देत आहात?माझा मुळात विरोध लोकांना भिती दाखवून खिसे भरणाऱ्या भिक्षुकांना आणि उगीचच धर्माचे अवडंबर माजवून अमके झाले की धर्म बुडाला, तमके झाले की ’कलियुग’ असल्याचे आठवणार, जातीपातींचे अवडंबर माजवणाऱ्या इत्यादी इत्यादी सर्वांनाच (केवळ ब्राम्हणांना नव्हे) विरोध आहे.
भिक्षुकी आणि शिक्षकी यापलिकडेही ब्राह्मण समाज आहे आणि इतिहास असो, राजकारण असो, की विज्ञान असो काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी योगदान दिले आहे.
हो लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, महर्षी कर्वे, र.धो.कर्वे,गोखले, रानडे,गाडगीळ ही विविध क्षेत्रांतील मंडळी ब्राम्हणच होती. पण म्हणून तुमचा नक्की मुद्दा काय? मी अशा towering लोकांची अक्कल काढत आहे असा जावईशोध कुठून लावलात? परत एकदा सांगतो की माझा विरोध कर्मकांडे, धर्माचे अवडंबर, जातीपातींचे अवडंबर, बुध्दीला न पटणाऱ्या पूजा-शांती, वेदकालीन जंगलात भटकणे आणि वर्तमानाकडे पूर्ण दुर्लक्ष, ऐतिहासिक व्यक्तीमत्वांचा मूळ संदेश काय हे लक्षात न घेता नुसते व्यक्तीपुजेचे स्तोम माजवायचे या प्रवृत्तींना आहे. (आंबेडकरांच्या फोटोभोवती झुठ बोले कव्वा काटेवर नाचणाऱ्या लोकांविषयी मी काय लिहिले आहे ते वाचले नाहीत का? बहुदा नाचणाऱ्यांमध्ये कोणी ब्राम्हण नसावे.) अहो लोकांना भिती न दाखवणाऱ्या भिक्षुकांनाही माझा विरोध नाही हे लिहिले असतानाही मी ब्राम्हणांची अक्कल काढत आहे असे म्हणणे म्हणजे फारच extrapolation झाले की. अति वाचनाचा परिणाम का तो? असो. आपण दिलेली सगळी उदाहरणे रास्त आहेत.पण त्यात प्रॅंटलच्या Boundary Layer Theory किंवा १८-१९व्या शतकात calculus चे extension म्हणून अनेक वेगवेगळी समीकरणे शोधून काढली गेली आणि त्यावर शास्त्राच्या विविध disciplines चा डोलारा उभा राहिला असे मूलभूत दुर्दैवाने काही नाही. फार पूर्वी आयुर्वेद किंवा रसायनशास्त्रासाठीचा ’रसरत्नसमुच्चय’ हा ग्रंथ अशा स्वरूपात बरेच pathbreaking काम झाले.पण नंतर आपण फार मोठ्या प्रमाणात मागे पडलो.आणि त्यामागे परकिय आक्रमणे हे कारण आहेच त्याचबरोबर जातीपातींची अवडंबरे,फुकाची कर्मकांडे या गोष्टींचाही वाटा आहे असे मला वाटते.आणि मी या गोष्टींवर जोरदार कोरडे ओढतो आणि ओढणार. आणि असे मूलभूत काम आपल्याकडे व्हावे हे तुमच्याइतकेच मलाही वाटते. कारण मी अमेरिकेत एक PhD विद्यार्थी म्हणून होतो.ते काही कारणाने सोडून मला परत यावे लागले. पण माझ्याच नाही तर इतर अनेक क्षेत्रांत पूर्वीपासूनची प्रगती बघताना त्यात भारतीय नावे कमी दिसतात (जी काही भारतीय नावे होती ती एक तर अमेरिकेतील किंवा इंग्लंडमधील होती) याची मला विलक्षण टोचणी लागली होती.आणि आपल्याकडे तसे होऊ शकलेले नाही याचे कारण आपल्या चुकलेल्या priorities. आपण शास्त्रीय प्रगतीपेक्षा कर्मकांडांना महत्व दिले आणि याच साखळ्या आपल्या पायात यापुढेही राहू नयेत असे तर कळकळीने वाटते. तेव्हा कर्मकांडांना विरोध म्हणजे ब्राम्हणांची अक्कल काढणे किंवा ब्राम्हणांनाच विरोध असा अर्थ घेऊ नये ही विनंती.
पण 'उचल काठी लाग बामणापाठी'
सॉरी.माझा पवित्रा "उचल काठी लाग अनिष्ट प्रथांपाठी" असा आहे मग त्या प्रथा रूजवणारे ब्राम्हण असोत की आणखी कोणी.
अजून लई वाचा. तुमी लय लवकर रागाला येता दादा, आसं प्रतिक्रियांवरुन तरी दिसतंय.
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
य
योगप्रभू Fri, 10/01/2010 - 09:28 नवीन
'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' असा सुधारकी आगरकरी बाणा दाखवून रोखठोक मते व्यक्त केल्याबद्दल तुमचे कौतुक आहेच हो क्लिंटनसाहेब. कधी काळी माझीही मते अशीच होती. पण आज वाटते, 'जाऊ दे. कशाला कुठल्या एका जाती/वर्गावर खापर फोडा. ज्याला सुधारायचे तो सुधारेल. नाही तो मागे पडेल.' आणि त्यातून सर्व समाज एकाएकी उत्क्रांत होत नसतो. त्याला वेळ लागतोच परवा माझ्या मित्राकडून एक सुंदर वाक्य ऐकले. 'ज्यांना भविष्यकाळाची दारे बंद झालेली असतात ते भूतकाळात चाचपडत हिंडत राहातात.' खरं सांगू का. ज्ञानेश्वरांचा छळ कुणी केला, दादोजी-रामदास गुरु होते का नव्हते, भिक्षुकांनी समाजाचे नुकसान केले की नाही, या व अशाच या काथ्याकुटाने काय साधणार हो? चार घटकांची गंमत आणि वादातून वाढणारा द्वेष. त्यापेक्षा आजूबाजूला काय आश्वासक घडतंय त्याच्याकडे बघूया. ते बघा. कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी स्टेम सेलच्या वापराने आधुनिक वैद्यकीय उपचारांचा पाया घातला आहे. यंदाच्या शांतिस्वरुप भटनागर पुरस्कारांत चक्क ३ मराठी शास्त्रज्ञ आहेत. आणखी कुणी न बोलता आपापली कामे करत असतील. चांगले आहे. (माझी पिंपळावर लटकण्याची वेळ झाली. मी आता जातो. सर्वपित्री अमावस्येला पुन्हा आमचा राजा वेताळ याची परवानगी काढून येण्याची इच्छा आहे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 10:39 नवीन
धन्यवाद योगप्रभू.
'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' असा सुधारकी आगरकरी बाणा दाखवून रोखठोक मते व्यक्त केल्याबद्दल तुमचे कौतुक आहेच हो क्लिंटनसाहेब.
बापरे मी अशा मोठ्या माणसाचा बाणा दाखविला असे म्हणू नका हो.कुठे तो देशसेवेसाठी दारिद्र्याचे व्रत घेतलेला महापुरूष आणि कुठे आय.आय.एम मध्ये जाऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी आणि माझे स्वत:चे गाडीबंगले असावेत, जगभर पर्यटनाला कुठेही जाता यावे अशी पूर्णपणे materialistic आशा-आकांक्षा असलेला मी! त्यांच्या बाण्यातील ’बा’ म्हणायची तरी योग्यता आहे का माझ्यासारख्यांची? असो. बाकी माझ्या लेखाचा उद्देश म्हणजे अनिष्ट प्रथांच्या साखळ्यांकडे वाचकांचे लक्ष वेधून घेणे हा होता.कोणताही द्वेषभाव वाढावा असा मुळातच लेखाचा उद्देश नव्हता. लेखात सुरवातीलाच डिस्क्लेमर टाकायला हवे होते. तेव्हा छत्रपतींचे गुरू कोण यासारख्या आताच्या काळाशी संबंध नसलेला हा विषय नाही कारण या प्रथा गेल्या अनेक वर्षांप्रमाणे आजही आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण ते नाकारू शकत नाही.तेव्हा दोन विषयांची तुलना करू नका ही विनंती.
कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी स्टेम सेलच्या वापराने आधुनिक वैद्यकीय उपचारांचा पाया घातला आहे. यंदाच्या शांतिस्वरुप भटनागर पुरस्कारांत चक्क ३ मराठी शास्त्रज्ञ आहेत.
ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि असे विविध क्षेत्रात शेकड्यांनी नव्हे हजारोंच्या संख्येने लोक आपल्याकडे व्हावेत हीच सदिच्छा.
ज्यांना भविष्यकाळाची दारे बंद झालेली असतात ते भूतकाळात चाचपडत हिंडत राहातात.
अरे वा. हे वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद.माझा ’वेदकालीन जंगलात भटकणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ पण तोच. असो. या चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. परत एकदा सांगतो की कोणताही वैरभाव वाढावा यासाठी हा लेख लिहिलेला नव्हता.तर लेखाचा उद्देश केवळ आपल्या पायात शतकानुशतके असलेल्या साखळ्या आहेत याची आठवण करून देणे हाच होता. आणि मला साखरेच्या पाकात घोटलेले गोडगोड लिहिता येत नसल्यामुळे रोखठोक भाषेत लिहिले.असो. क.लो.अ क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
ग
गणेशा Fri, 10/01/2010 - 13:30 नवीन
किंटन साहेब. तुमचे सगळे मुद्दे आणि रिप्लाय वाचले. तुम्ही जबरदस्त पणे सगळे लिहिले आहेच. तुमचा त्यामागचा उद्देश, मनाची तळमळ स्पष्ट जाणवते. लिहित रहा ... एक सुंदर धागा वाचल्याचा आनंद मिळाला --
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Fri, 10/01/2010 - 15:12 नवीन
क्लिंटनसाहेबान्च्या शब्दाशब्दाशी सहमत. हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. हे पुनः एकवार सिध्द झाले. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मूकवाचक Fri, 10/01/2010 - 15:52 नवीन
हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. ... सहमत आहात का? नसल्यास खरा हिन्दू धर्म काय हे समजाउन घेण्याची/ देण्याची तसदी घेणार का? असल्यास बूड असलेले मजबूत गाडगे हुडकून धर्मान्तर करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
न
नरेश धाल Fri, 10/01/2010 - 16:35 नवीन
असल्यास बूड असलेले मजबूत गाडगे हुडकून धर्मान्तर करणार का? मजबूत बूड असा कोणताही धर्म ह्या भूतलावर अस्तित्वात नाही. आज प्रत्येक धर्माची चाळण झालेली आहे. आहे त्यातच राहून सुधारणा व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 16:36 नवीन
हिंदू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे वगैरे मला अजिबात मान्य नाही.जर त्यात भगवद्गीतेसारखी उच्च philosophy असेल आणि त्यातही knowledge मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात ’परिप्रश्नेन’ म्हणजे गुरूला एकामादोमाग एक प्रश्न विचारून knowledge मिळवावे असे म्हटले आहे. म्हणजे मी knowledge analytical approach वर जो भर देत आहे तोच त्यातही सांगितला आहे. माझे म्हणणे एकच की कर्मकांडांना जे आजचे ओंगळ स्वरूप आले आहे ते घालवावे आणि शास्त्रीय दृष्टीकोन अवलंबावा. म्हणजे जमिनीतून सोने काढताना एक ग्रॅम सोने मिळविण्यासाठी अनेक किलो माती काढावी लागते पण आपण सोन्यात इंटरेस्टेड असतो मातीत नाही हे लक्षात घेऊन फक्त माती टाकावी आणि सोने मिळवावे असे मला वाटते. आणि हे सगळे करायचे स्वातंत्र्य हिंदू समाजच देईल. इतर धर्मियांमध्ये असे उघडपणे बोलायची हिंमत कोणी दाखवू शकणार नाही हे पण मला मान्य आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा चांगल्या कामासाठी (सोने मिळविण्यासाठी) वापर करावा असेच मला वाटते. इथे धर्मांतराचा प्रश्न आलाच कुठे? उगीच नसते फाटे फोडू नका ही विनंती. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Fri, 10/01/2010 - 16:46 नवीन
मूळ प्रतिक्रिया भावश्या यान्ची आहे हे आपणही विसरू नका. आणि थोडेफार रोकठोक लिहिले त्याचा इतका रागही मानू नका. उत्तराबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 16:51 नवीन
माझे उत्तर भावश्यांच्या प्रतिसादाला दिले जाणे अपेक्षित होते. ते चुकून तुमच्या प्रतिसादाला दिले. त्याबद्दल दिलगिरी. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मितभाषी Sun, 10/03/2010 - 06:36 नवीन
@मूकवाचक, धर्म म्हणजे आपण धारण करतो तो. खरा धर्म सार्वजनिक आहे. तो कुठल्याही संप्रदायात अडकुच शकत नाही. मग कुणी शिख, इसाइ, मुस्लीम हिन्दू म्हणुन फिरत असतील. पण प्रत्येकाचा धर्म एकच आहे. जसे सबका मालिक एक. त्यामुळे धर्मांतर करण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या हिन्दू धर्माबद्दल मी लिहिले होते. हिन्दू धर्मात घुसदवलेल्या कुप्रथांकडे माझा निर्देश होता. त्याबाबद क्लिंटनसाहेबांनी सविस्तर विवेचन केलेच आहे. एवढे लिहुन माझे दोन शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Mon, 10/04/2010 - 16:55 नवीन
हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. ... यापेक्षा बरेच बरे आहे. हे लिहून मी माझे चार शब्द सम्पवतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
न
नरेश धाल Fri, 10/01/2010 - 16:26 नवीन
क्लिंटन साहेब, आपण जे बोलत आहात ते कटू आहे. आम्हाला कटू ऐकायची सवय नाही. भले विष द्या, पण ते जर का मधात टाकून दिले कि आम्ही ते गपगुमान पिऊ. पण कडू औषधाचा काढा आमच्या नरडी उतरणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 16:39 नवीन
कटू आहे पण सत्य आहे हे तर मान्य आहे का?तसे असेल तरी कधीतरी कडू औषध प्यायची पण सवय होईल आणि ते मधातून द्यावे लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
न
नरेश धाल Fri, 10/01/2010 - 16:44 नवीन
९९ % सत्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
इ
इन्द्र्राज पवार Sun, 10/03/2010 - 07:45 नवीन
शतकी वाटचाल झाल्यानंतर प्रतिसाद देत आहे, याला कारण लेख वाचल्याक्षणापासून जे काही प्रतिसाद येत गेले त्याच्यातील विचार मंथन [अधिक धागाकर्ते श्री.क्लिंटन हे देत असलेले सविस्तर आणि अभ्यासू - ज्यावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाचीही कल्पना येतेच - उत्तरे] वाचताना एक गोष्ट प्रकषाने जाणवत होती की, हा धागा प्रामुख्याने 'ब्राह्मण वर्ग आणि त्यांच्यातील उपशाखा' यांच्यासाठीच आहे व इथे बहुजन समाजातील जे सदस्य आहेत त्यांनी दोन्हीपैकी ['होय रे', 'नाही रे'] कोणत्याही एकाचा खांदा धरला तर दुसरा 'यांना काय माहित आहे आमच्यातील चालिरितीचे महत्व' असा फटका देणार, अशी साधार भीती वाटत असल्याने [जी चुकीची ठरेली तर मला फार आनंद होईल.] एक 'पवार' या नात्याने मी हा धागा ~ निदान या क्षणापर्यंततरी केवळ 'वाचनमात्र' ठेवला होता. तरीही, विशेषतः श्री.योगप्रभु या सदस्याच्या एका प्रतिसादातील त्यांनी दिलेली प्रांजल कबुली भावली; जी दोन्ही प्रवाहातील चांगल्या गोष्टीचे द्योतक मानले जावे. ते म्हणतात : "मी ही माहिती जातीच्या अभिनिवेशापोटी दिली नाही कारण बुद्धिमत्ता हा काही एकाच जातीचा मक्ता नसतो...." श्री.क्लिंटन यांच्या अभ्यासाविषयी वर लिहिले आहेच आणि त्यातूनच त्यांच्या विचाराचा जो एक आरसा तयार झाला आहे त्याच्याशी ते प्रामाणिक राहतील ही गोष्ट फार आश्वासक आहे. "तर लेखाचा उद्देश केवळ आपल्या पायात शतकानुशतके असलेल्या साखळ्या आहेत याची आठवण करून देणे हाच होता. आणि मला साखरेच्या पाकात घोटलेले गोडगोड लिहिता येत नसल्यामुळे रोखठोक भाषेत लिहिले." ~ केवळ गोडगोड लिहिले म्हणजेच लोकांना पटते असे नसून त्यातील भावनेची तीव्रता तितकीच भावणे महत्वाचे असते; ज्यासाठी कित्येक वेळा रोखठोकीचाच मामला उपयोगात येऊ शकतो. एकविसाव्या शतकात संपूर्ण जग (होय अगदी आफ्रिकासारखे मागासलेले समजले जाणारे खंडदेखील...) विज्ञानाची कास धरून मानवी प्रगती चन्द्रापार नेण्याच्या तयारीत असताना [व त्यातही भारतीय संशोधकांचा महत्वाचा तसाच मोठा हिस्सा असताना] आपणास आपल्या गल्लीतून एखादा लगबगीने जाणारा सदगृहस्थ 'मांजर आडवे आले...' म्हणून पुढे जाण्याऐवजी मागून शाळेचा एखादा मुलगा पहिल्यांदा पुढे जातो का याची वाट पाहताना दिसतो, त्यावेळी प्रश्न पडतो, खरंच आपण वैज्ञानिक दृष्टी बाळगून आहोत का? श्री.क्लिंटन यांनी वर अनेक ठिकाणी विज्ञानाचे महत्व आणि इकडे श्रध्दा+परंपरा या नावाने ब्रह्मवृंद जपत असलेली कर्मकांडे (दक्षिणेसाठी असो वा नसो...काही फरक पडत नाही) यावर आपले विश्लेषण वारंवार दिले असल्याने त्यातील उदाहरणाची पुनरुक्ती इथे करत नाही. तरीही त्यांच्या लिखाणाच्या शैलीवरून पं.नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासंदर्भातला हा भाग त्यांना फार भावत असणार असे वाटते. १९५३ सालीच या विषयावर बोलताना पंडितजी म्हणाले होते : "Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man." त्यांच्या मनात विचार होता तो आधुनिक भारताच्या युवकाचा जो देशाला वैज्ञानिक प्रगतीकडे नेण्यास सक्षम आहे. यातील 'इट इज वे ऑफ लाईफ' हे फार काही सांगून जाते. १९५३ साली जन्मलेले बालक आज साठीला आले आहे, यातील किती भद्र पुरूषांनी पंडितजींना अपेक्षित असलेली वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली असे वाटते? आणि २०१० ला जन्मलेल्या बाळाला त्या अनुषंगानेच वाढविण्याची मनोकामना किती पालक करत असतील? हे प्रश्न मनी उदभवतात आणि या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा यथार्थ मार्ग म्हणजे कर्मकांडांना 'अवास्तव' महत्व न देणे. 'अमावस्ये' दिवशी नवीन खरेदी करू नये असे म्हणतात इतपत ठीक आहे, पण त्यादिवशी वाहनांची यथासांग पूजा करून त्याला 'लिबू, बिब्बा, हिरव्या मिरच्या' बांधून तो अवतार दिवसभर लटकावयाचा [हे आमचे फिजिक्सचे "डॉ." पाटी दरवाजावर लावणारे प्रोफेसर करायचे] आणि गाडी मगच रस्त्यावर काढायची....हा अतिप्रकार. ~ बरं याला अडवलं तर करणारा 'होय, मी हे कर्मकांड मानतो, मी बांधणार लिबू-मिरच्या !" असे रोखठोक उत्तर देत नाही, तर 'नाही हो, माझा विश्वास नाही, पण मिसेस जरा....." इ. इ. समजलं ! १ अब्ज आकडा पार केलेल्या या प्रचंड खंडप्राय देशाच्या सर्व धर्मातील चालिरितीचे खरे मूळ आहे त्यांचे त्यांचे आर्थिक प्रश्न. हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या काही प्रथा (किंवा क्लृप्त्या....) इथल्या मातीत रुजत गेल्या त्याला खतपाणी घालण्यासाठी 'देव' नावाच्या झारीच्या उपयोग केला गेला ज्यातून 'नरकाची भीती आणि स्वर्गाची गती...' हे फळ निघाले. स्वर्ग ही कल्पनाचा मूळी मोहक असल्याने जो तो त्या 'फळ' प्राप्तीसाठी सांगेल ते (प्रसंगी यथाशक्तीच्या पलिकडेदेखील जावून) करण्यास तयार होऊ लागला, मग त्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले तरी बेहत्तर. जीवन अर्थमूलक आहे हेच यातून सिध्द होते. आर्थिक प्रश्नच सामाजिक आणि राजकीय प्रश्नाचे रूप धारण करतात. मग सांस्कृतिक आणि धार्मिक या दोन बंधूंनादेखील "अर्थ" नावाच्या सर्पाने वेटोळे घातले तर आश्चर्य वाटू नये. कर्मकांडांचे एकमेव सत्य हे ब्रह्म नसून अर्थ आहे....आणि अर्थ हाच सर्व चेतनेचा आधार आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 10/03/2010 - 09:40 नवीन
धन्यवाद पवारसाहेब. बाकी व्यासंग वगैरे मोठेमोठे शब्द वापरून मला घाबरवू नका ही विनंती. नेहरूंचे वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या राजकारणाविषयी मतेमतांतरे असतील पण त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन कोणी नाकारू नये असे मला वाटते. ते भाक्रा-नांगल धरण, भिलाई स्टील कारखाना यांना आधुनिक भारताची तिर्थक्षेत्रे म्हणाले होते. आजही ते अनेकांना पटले नाही असेच दिसते.पण कधीतरी ते नक्कीच पटेल.असो. धन्यवाद. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
सहज Sun, 10/03/2010 - 10:51 नवीन
मूळ लेख, चर्चा, इंद्राज यांचा प्रतिसाद आवडला. ज्ञानप्रबोधीनी पद्धतीने हे आवश्यक ते अंतीम संस्कार करताना (दहावा), फक्त एकोद्दिष्ट श्राद्ध की काय इतकेच करतात अशी माझी समजुत आहे. मी विचारले असता त्यांनी पंचक इ.चा विचार करत नाहीत असे सांगीतले. तसेच ते हा विधी करताना, त्या मागची भूमीका सर्व उपस्थितांना सांगतात व त्यांना सामील करुन त्यांच्याकडून तशी प्रार्थना म्हणून घेतात व तसेच ठरलेली रक्कम घेतात (उगाच यजमानाची परिस्थीती बघुन व्हेरीएबल रेट नाही) असो असेच सांगावेसे वाटले. ज्ञानप्रबोधीनी पद्धतीची माहीती असलेल्यांनी आधीक खुलासा करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुमीत भातखंडे Sun, 10/03/2010 - 08:41 नवीन
एक ब्राम्हण एकदा पूजेला बसला होता. समोर दूधाचा नैवेद्य. पण जरा सुरुवात करतो न करतो तोच एक मांजर नैवेद्याच्या आसपास घुटमळायला सुरुवात करतं. एकदा हकलल, दोनदा हकलल, आणि शेवटी ब्राम्हणानी मांजराला दरवाज्याबाहेर बांधून ठेवलं आणि एकदाची पूजा संपवली. पुढे-पुढे हा रोजचाच कार्यक्रम झाला. पूजेला बसण्याआधी मांजराला बांधून ठेवायचं, आणि मगच पूजेला सुरुवात करायची. आता ही गोष्ट रोज त्याची मुल, नातवंड बघत होती. कालांतरानी त्या ब्राम्हणाचा म्रुत्यु झाला, आणि घरातल्या देवघराची जबाबदारी त्याच्या मुलावर येऊन पडली. अर्थात तो सुद्धा मांजराचा जाच टाळण्यासाठी ह्याच पद्धतीने पूजा करू लागला. पण जसजसा काळ पुढे सरकला, तसतसं मांजराला बांधून ठेवण यामागचा मूळ उद्देश मागे पडला, आणि उरलं ते फक्त कर्मकांड. आता ह्यात त्या मूळ ब्राम्हणाला दोष देणार का? दोष द्यायचाच झाला तर, पुढच्या पिढीच्या, मूळ कारण जाणून न घेता, तीच कृती चालू ठेवण्याच्या वृत्तीला द्यावा लागेल. सांगण्याचा मुद्दा हा की, सगळीच कर्मकांड ही काही एका ठोस कारणासाठी चालू झालेली असतात अस नाही, त्या-त्या वेळची तात्कालीक कारणही असू शकतात. फॉलो करण्यारांनी थोडासा डोळसपणा दाखवला की झाल. म्हणूनच, ह्या लेखाच्या संदर्भात बोलायच झाल तर, ही सगळी कर्मकांड ब्राम्हणांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी सुरु केल्येत हे म्हणण थोड आततायीपणाच होईल अस मला वाटत. स्वार्थापेक्षाही, मूळ कारण जाणून न घेतल्यामूळे झालेला हा गोंधळ असतो.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 10/03/2010 - 09:35 नवीन
गोष्टीबद्दल धन्यवाद भातखंडे साहेब.या रूढीपरंपरा खिसे भरायला घुसडल्या आहेत की इतर कशासाठी याविषयी मतेमतांतरे असू शकतात. काहीही असले तरी त्या कारणावरून सद्यकालीन वैर वाढायला नको.आणि त्या रूढी आपल्याला अयोग्य वाटत असतील तर त्यातूनही आपण बाहेर पडायला हवे.असो. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे
क
क्लिंटन Sun, 10/03/2010 - 17:21 नवीन
हा प्रतिसाद विनाकारण चिंचोळ्या जागेत दिसू नये म्हणून स्वतंत्र प्रतिसाद लिहित आहे.
गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो ? सध्याच्या परिस्थितीत कोणतीही आकाशातून सोडली तर पृथ्वीकडे जाणार हे तात्विकदृष्ट्या सहजच आहे ना? मग त्याविरुद्ध विमाने पृथ्वीपासून दूर जाऊन आकाशात उडतात मग त्याविरुद्ध तुम्ही ओरडता का?
विमान उडते याचे कारण त्याच्या इंजिनातून पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सला overcome करून विमान वर उचलून नेणारा फोर्स निर्माण होतो आणि त्या फोर्सचे नाव आहे lift. तेव्हा lift हा फोर्स गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सपेक्षा जास्त असतो त्यामुळेच विमान जमिनीपासून वर उचलले जाते. त्याच धर्तीवर समजा ’त्या’ ५/३/२ लोकांना न्यायला यमदूत येणार असतील (ते ५/३/२ लोक कोण हे माहित नाही आणि यमदूत येणार कधी हे ही माहित नाही) तर त्या यमदूतांना थोपवून धरेल आणि माघारी धाडेल असे सामर्थ्य तुमच्या पंचकशांतीत आहे का आणि कसे? तरच तुमची विमानाची उपमा मान्य. अन्यथा नाही.
मला एक सांगा एखाद्याचा नातेवाईक गेला आहे त्याला जाऊन सांगा की अरे तुझा नातेवाईक वारला नाहीये त्याने कपडे बदलावे तसे शरीर बदलले आहे आहे आणि बघा त्याची प्रतिक्रिया काय येते ते...
अगदी बरोबर. केवळ वाईट एवढेच वाटते की अशा प्रसंगी ’तुझा नातेवाईक’ अमुकएका तिथीवर, अमुकएका नक्षत्रावर गेला म्हणून अजून आणखी ५/३/२ लोक जातील आणि त्यासाठी शांत करायला हवी असे सांगितल्यानंतरही त्याची प्रतिक्रिया अगदी तशीच आली नाही याचेच तर आश्चर्य आणि वाईट वाटते.
तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करता तेव्हा भरभक्कम रक्कम तुमच्याकडून पोलिस का घेतो? कारण दंड करण्यासाठी ज्यायोगे तुम्ही परत त्या नियमाचं उल्लंघन करू धजाल तेव्हा या दंडाची आठवण होईल.
नाही परत उपमा चुकली. दंड घेणारा कोण असतो?पोलिस. आणि पोलिसाला सरकारचे त्याविषयीचे मॅंडेट असते. असा दंड पोलिस सोडून दुसऱ्या कोणी वसूल केला तर तो गुन्हा आहे. भिक्षुक मंडळी सरकारमध्ये होती का की त्यांना सरकारचे मॅंडेट प्राप्त झाले होते?आणि मॅंडेट प्राप्त झाले असेल तर इतर गुन्ह्यांचे दंड राजाने वसूल करावेत आणि केवळ मांजर मारल्याबद्दल भिक्षुकांना दंड गोळा करायचे मॅंडेट द्यावे याची तर्कसंगती लागत नाही. त्याचप्रमाणे पोलिस जो दंड वसूल करतो तो सरकारच्या वतीने वसूल करतो म्हणजे ती रक्कम सरकारी खजिन्यात जाते (जाणे अपेक्षित असते) पोलिसाच्या खिशात नव्हे. आणि ती रक्कम पोलिसाच्या खिशात गेली तर तो भ्रष्टाचार ठरतो. तेव्हा भिक्षुक हे सरकारचे दंड गोळा करायला नेमलेले एजंट होते का?तसे असेल तर काही तक्रार नाही.
तुमच्या दाव्यात तुमच्या पूर्वग्रहाशिवाय काहीही राम दिसत नाही.
असो.मलाही तुमच्या दाव्यात ’आपले ते चांगले’ असे म्हणत वेगवेगळी कारणे देऊन अनिष्ट गोष्टींचे समर्थन करायचाच प्रयत्न दिसतो. त्यामुळे आपल्याला एकमेकांची मते पटणे शक्य दिसत नाही. क्लिंटन
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 10/03/2010 - 18:03 नवीन
विमान उडते याचे कारण त्याच्या इंजिनातून पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सला overcome करून विमान वर उचलून नेणारा फोर्स निर्माण होतो आणि त्या फोर्सचे नाव आहे lift. तेव्हा lift हा फोर्स गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सपेक्षा जास्त असतो त्यामुळेच विमान जमिनीपासून वर उचलले जाते. त्याच धर्तीवर समजा ’त्या’ ५/३/२ लोकांना न्यायला यमदूत येणार असतील (ते ५/३/२ लोक कोण हे माहित नाही आणि यमदूत येणार कधी हे ही माहित नाही) तर त्या यमदूतांना थोपवून धरेल आणि माघारी धाडेल असे सामर्थ्य तुमच्या पंचकशांतीत आहे का आणि कसे? तरच तुमची विमानाची उपमा मान्य. अन्यथा नाही. कदाचित त्या वाक्यांचा भाव तुमच्यापर्यंत पोचलेला दिसत नाही. मुख्य मुद्दा असा की जे तत्व तत्वज्ञानात दिसते त्याविरुद्धच्या अनेक गोष्टी सर्वसामंजस्याने व्यवहारात वापरात आणलेल्या दिसतात.जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते. तसेच ज्याकाळात पंचक नियम सिद्ध होणे सहज शक्य असले तर तेव्हा आलेल्या पंचकशांती वगैरे गोष्टी केवळ स्वार्थीपणाने पैसे काढण्यासाठी आलेल्या वाटत नाहीत. जर त्याकाळात अशी शांत करण्याबद्दल त्या ब्राम्हणाने सांगितले नसते व दुर्दैवाने काही झाले असते तर लोकांनीही या ब्राम्हणाने आम्हाला फसवले असे म्हणायलाही कमी केले नसते. अगदी बरोबर. केवळ वाईट एवढेच वाटते की अशा प्रसंगी ’तुझा नातेवाईक’ अमुकएका तिथीवर, अमुकएका नक्षत्रावर गेला म्हणून अजून आणखी ५/३/२ लोक जातील आणि त्यासाठी शांत करायला हवी असे सांगितल्यानंतरही त्याची प्रतिक्रिया अगदी तशीच आली नाही याचेच तर आश्चर्य आणि वाईट वाटते पुन्हा जसे तुम्ही वागता विचार करता तसाच इतर सगळे करतील असे वाटत नाही. बरेच जण इतरांच्या अनुभवातूनही अ‍ॅनॅलॅटिकली शिकत असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या गुरुजींवर विश्वास ठेवला आणि पंचकशांत केली असेल तर त्यात काहीही गैर वाटत नाही. नाही परत उपमा चुकली. दंड घेणारा कोण असतो?पोलिस. आणि पोलिसाला सरकारचे त्याविषयीचे मॅंडेट असते. असा दंड पोलिस सोडून दुसऱ्या कोणी वसूल केला तर तो गुन्हा आहे. भिक्षुक मंडळी सरकारमध्ये होती का की त्यांना सरकारचे मॅंडेट प्राप्त झाले होते?आणि मॅंडेट प्राप्त झाले असेल तर इतर गुन्ह्यांचे दंड राजाने वसूल करावेत आणि केवळ मांजर मारल्याबद्दल भिक्षुकांना दंड गोळा करायचे मॅंडेट द्यावे याची तर्कसंगती लागत नाही. त्याचप्रमाणे पोलिस जो दंड वसूल करतो तो सरकारच्या वतीने वसूल करतो म्हणजे ती रक्कम सरकारी खजिन्यात जाते (जाणे अपेक्षित असते) पोलिसाच्या खिशात नव्हे. आणि ती रक्कम पोलिसाच्या खिशात गेली तर तो भ्रष्टाचार ठरतो. तेव्हा भिक्षुक हे सरकारचे दंड गोळा करायला नेमलेले एजंट होते का?तसे असेल तर काही तक्रार नाही नाही उपमा चुकली नाही.. दंड घेणारा दंड घेणारा अधिकारी असतो. तुमचे सरकार बिरकार आत्ता आले पूर्वापार धर्मसत्ता आणि राजसत्ता या त्यांच्या त्यांच्या पातळीवर स्वायत्त होत्या. दोन्हींची कार्यक्षेत्रे ठरलेली होती आणि त्यातल्या त्या दंडाधिकारी होते. राजसत्तेचा दंड स्वीकारणे हे त्या त्या गावातील राजकीय प्रतिनिधी (नोकर) यांचे काम होते तसे धर्मसत्तेचे प्रतिनिधी जे क्षेत्रोपाध्ये , ग्रामोपाध्ये असत ते तो दंड स्वीकारीत. त्या ब्राम्हणाला ते दान घेण्याचा अधिकार होता. अशा आणि अनेक इतर बाबतीत ग्रामोपाध्ये प्रायश्चित्त देत व दान स्वीकारत आणि तशा धर्माज्ञा धर्मग्रंथांमधे सापडतात त्यात उल्लेख गरीब ब्राम्हणांना दान करावे असाच उल्लेख सापडतात. . तेव्हा भिक्षुक हे दंड गोळा करणारे अधिकृत लोक होते असे तार्किकदृष्ट्या म्हणावयास हरकत नाही. असो.मलाही तुमच्या दाव्यात ’आपले ते चांगले’ असे म्हणत वेगवेगळी कारणे देऊन अनिष्ट गोष्टींचे समर्थन करायचाच प्रयत्न दिसतो. आमच्या संस्कॄतीकडे आम्ही डोळसपणाने पहायला शिकलो त्यामुळे त्यात आलेल्या गोष्टीमागची भूमिका समजाऊन घेता काहीही आरोप करत असेल तर आम्ही त्याला त्यामागचा अर्थ स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्यामुळे आपल्याला एकमेकांची मते पटणे शक्य दिसत नाही तसे असते तर सदर लेख आणि प्रतिसाद प्रपंच झालाच नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
N
Nile Mon, 10/04/2010 - 03:24 नवीन
जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते
ह्या वाक्याला काही अर्थ नाही. एखादी चुकीची गोष्ट फायद्याची (मग कुणाच्या फायद्याची, माझ्या की तुमच्या? वगैरे) असेल तर त्याविरुद्ध बोंबाबोंब करु नये का? हेच उदाहरण द्यायचे असेल तर विमान उडते ते एका अद्भुत शक्तीमुळे असे कुणी उद्या म्हणाले, (विमान उडण्यातील फायदा त्यासोबत आहेच्) तर बोंबाबोंब करु नये का? विमान का उडते ह्याचे कारण १२वी शिकलेल्यालाही कळु शकते म्हणुन कोणी बोंबाबोंब करत नाही. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
क
क्लिंटन Sun, 10/03/2010 - 19:35 नवीन
जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते.
नुसते फायद्याचेच असते असे नाही तर विमान उडते हे निर्विवादपणे सिध्द करता येते (ते समोरच दिसत असते) तसे पंचकशांती केली म्हणून ’त्या’ पाचांना न्यायला आलेले यमदूत मागे फिरले असे निर्विवादपणे सिध्द करता येईल का?आता यावर कोणता टिपीकल प्रश्न मला तुम्ही विचारणार हे मला आधीच माहित आहे म्हणून त्याचे उत्तर आधीच देतो.तुम्ही विचारणार की इलेक्ट्रीसिटी दिसत नाही तरीही त्यावर विश्वास ठेवता ना?याचे कारण ती उर्जा दिसत जरी नसली तरी तिचे परिणाम दिसतात.त्यामुळे इलेक्ट्रीसिटीवर विश्वास ठेवतो.त्याचप्रमाणे जर ’ते’ पाच लोक कोण आणि ते पंचक लागल्यामुळे अमुकएक दिवसात मरणार होते पण पंचकशांती केल्यामुळे त्यांचे मरण पुढे गेले हे सिध्द करून दाखवा. आता ’ते’ पाच लोक कोण हेच मुळात माहित नसेल आणि ते पंचक लागल्यामुळे किती काळात मरणार हे पण माहित नसेल तर कधीही ’पाच जणांना वाचवले’ असे म्हणता येऊ शकते. म्हणजे पंचकशांती करूनही एखादा गेला तर ’अरे तो त्या पाचांमधला नव्हताच’ किंवा अगदी पाच जण जरी महिन्याभरात गेले तरी ’अरे पण पंचकशांती केली नसती तर ते त्याहूनही लवकर गेले असते’ आणि पंचकशांती केली नसेल तर ’पंचकशांती केली नाही म्हणून ते गेले’ यासारख्या पळवाटा काढायला स्कोप राहतो. तेव्हा पंचकशांती केली आणि अमक्याअमक्या पाच जणांचे मृत्यू (जे समजा महिन्याभरात होणार असतील ते) पुढे ढकलले असे दाखवून द्या. कोणत्याही प्रयोगात केवळ दोन गोष्टी एकावेळी घडणे हे दाखवणे पुरेसे नसते तर एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली हे दाखवून द्यायला अ. जेव्हा जेव्हा पहिली गोष्ट होते तेव्हातेव्हा दुसरी गोष्ट होतेच होते ब. आणि जेव्हा जेव्हा पहिली गोष्ट होत नाही तेव्हा तेव्हा दुसरी गोष्ट कधीच होत नाही आणि असे असेल तरच एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली असे म्हणता येते. आणि त्यातही एकाच गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते हे सिध्द करायला अजून काही अटी पूर्ण करायला लागतात पण सध्या ती क्लिष्टता बाजूला ठेऊ. तेव्हा या आधारावर पंचकशांती सिध्द करता येईल का?तशी ती आली तरच मी तुमचा मुद्दा मान्य करेन अन्यथा नाही.
त्या ब्राम्हणाला ते दान घेण्याचा अधिकार होता. अशा आणि अनेक इतर बाबतीत ग्रामोपाध्ये प्रायश्चित्त देत व दान स्वीकारत आणि तशा धर्माज्ञा धर्मग्रंथांमधे सापडतात
अहो हिच तर गोम आहे ना.धर्मग्रंथ लिहिणारे आणि त्यात ज्या लोकांना दान द्यावे असे लिहिले असेल ते लोक एकच असतील तर हा थोडासा nepotism चा प्रकार नाही का? असो. तरी मांजराबद्दलचा मुद्दा तुम्ही म्हणता म्हणून मान्य.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/04/2010 - 08:10 नवीन
तेव्हा या आधारावर पंचकशांती सिध्द करता येईल का?तशी ती आली तरच मी तुमचा मुद्दा मान्य करेन अन्यथा नाही. इथला माझा प्रतिसाद पंचकशांतीची सिद्धता करण्याचा नाही असे माझे वरचे इतर प्रतिसाद वाचले तर सहज लक्षात येईल. मुद्दा त्या गोष्टीवरून माझ्या पूर्वजाना स्वार्थी म्हणून बोल लावण्याचा आहे. म्हणूनच वरच्या इतर प्रतिसादांमधे मी तुम्हाला पंचकशांती वगैरे पटत नाही हे मल मान्य आहे असे म्हटलेच आहे ; आक्षेप आहे ते ब्राम्हणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या गोष्टी जन्माला घातले असे म्हणण्याला. त्यापुढे जाऊन मी असे म्हणलो की त्या गोष्टी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हा पंचकाची अनुभूती येणे सहज शक्य होते. आताही त्याची अनुभूती कोणाला आल्यामुळे त्या व्यक्तीने त्याच्या अनुभवाची माहीती इतरांना करून दिली आणि त्याच्या मताचा प्रचार केला तर त्यात काही गैर नाही कारण तसा प्रचार तुम्हीही तुमच्या मताचा (प्राणायाम, भगवद्गीता) करत असता. मग त्या माणसाने तो तसा केला तर त्याच्यावर भिती दाखवून पैसे उकळल्याचा आरोप कसा. बरं अनेक भिक्षुकांच्या घरी देखील त्यांनी पंचकशांत करताना मी पाहीले आहे. मग ती गोष्ट ते स्वतःही पाळत असतील आणि इतरांना पाळण्याचा उपदेश करत असतील तर त्यात भिती दाखवून पैसे काढण्याचा आरोप कसा? अहो हिच तर गोम आहे ना.धर्मग्रंथ लिहिणारे आणि त्यात ज्या लोकांना दान द्यावे असे लिहिले असेल ते लोक एकच असतील तर हा थोडासा nepotism चा प्रकार नाही का? असो. तरी मांजराबद्दलचा मुद्दा तुम्ही म्हणता म्हणून मान्य. धर्मग्रंथ लिहीणारे जे काही लोक होते ते सगळे रानावनात राहून उपासना करून कंदमुळे खाऊन जगत असत. कोणतेही ऋषि पूर्वीपासून आश्रमात राहणारे, साधना करणारे विरक्त असे होते; त्यांनी सांगितलेल्या गोष्टीत त्यांचा स्वार्थ नव्हता म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांनी प्रश्न न विचारता पाळल्या. पुराणोपपुराणांमधे आलेली ऋषिमुनिंची वर्णने पाहीली तर सर्व विरक्त लोक होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दानांचा वगैरे फायदा त्यांना मुळीच नव्हता. त्यामुळे Nepotism वगैरे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा