आपले जवळजवळ सगळे मुद्दे पटतात .. छान लिहिले आहेत ..
मी देवांच्या बाबतीत खुप गोंधळलेला आहे ( खाली जमेल तसे लिहितो .. कृपया कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतु नाही .. जे देवाला माणतात ते माझ्या घरच्यांसारखेच आहे असे मला वाटते ,. आणि जे या सृष्टीला .निसर्गाला प्राधान्य देतात ते माझ्या मनासारखे आहेत असे मला वाटते .. .. २-३ दिवस झाले काम खुप कमी आहे त्यामुळे कोठे लिहिले नाहियेत म्हनुन माझे विचार मी लिहित आहे, पुन्हा नेक्स्ट विक मध्ये खुप लोड आहे म्हनुन लिहिल्यावर आनंद मिळतो म्हणुन माझ्या मनातील घालमेल लिहित आहे )
------
मी ही बराच विचार केला आहे अश्या गोष्टींवर ..
बर्याचदा विचार येतो ... मी डार्विन चा सिद्धान्त शिकलो , उत्क्रांती शिकलो , एका पेशीपासुन नंतर अनेक प्राणी कशे निर्माण होत गेले हे शिकलो ...
मग मला प्रश्न पडतो .. देवाने माणुस निर्माण केला असे कसे म्हणता येइल? मग देवाला पण आई-वडिल असतातच म्हणजे गणपती कींवा इतर देव .. मग शंकाराचे आई वडिल कोण ? पार्वतीचे आई वडिल कळतात पण विष्णुचे आई वडिल कोण ?
चर्चेत ही मित्रांकडुन बर्याचदा उत्तर येते तु नास्तिक आहे बहुतेक .. काय बोलणार ? (आध्यात्मात मी शुन्य आहे त्यामुळे असे प्रश्न येत असतील ही ..)
पण तसे नाहिये .. मी माझ्या घरच्यांसाठी जरी देव वगैरे सगळे आस्तिकाप्रमाणे करतो .. तरी एक शक्ती आहे ती असे नक्की जाणवले आहे.
म्हणुन मग मी पुन्हा विचार केले .. काही लोकांच्या च्रचेतुन ही मत बनवले की ..
माणसाला बर्याच गोष्टी करताना कोणी आधाराला असले की जास्त बरे वाटते .. काम जोमाने आणि पटकन होते ..
तसेच कोणी आधारासाठी देव या संक्लपेणेचा आधार घेतला असेन नक्की .. देव म्हणजे एक शक्ती , ती शक्ती मनाचीच असते अशी माझी धारणा आहे , त्याला कसलेही रुप दिले भले गणपती .. दत्त .. शंकर तरी ती मनाचीच शक्ती आहे असे मला वाटते ..
वयक्तीक मला गणपती आणि दत्त खुप आवडतात .. कारण नवनाथ कथासार आणि गणपती च्या गोश्टी लहानपणापासुन घरात मी वाचत आलो आहे ऐकत आलो आहे ...
दत्त जयंतीला आणि चतुर्थीला मी ही उपवास धरतो .. मलाच प्रश्न पडतो मग मी नक्की कोण नास्तिक की आस्तिक की आणखि कोणी ?
जसे सूर्य- चंद्र हे देव मआणले गेले तसेच इंद्र, यम , असे वेगवेगळे राजे येथे झाले ही अस्तील खुप पुर्वी आणि त्यांच्या इथल्या पराक्रमावरुन त्यांचे स्थान आपण मआणत आलो असेन .. अआणि हळु हळु ते देवतांसमान मआणले जावु लागले असतील असे वाटते ..
एक ताजे उदा. देतो .. माझ्या आजोळी (लोणी भापकर, बारामती) येथे संपुर्ण वस्तीचा पुर्वज म्हणुन तात्याबाचे मंदिर आहे, यात्रेला त्याला निवेद्य आम्हीही घेवुन जातो , तेथे गेल्यावर.. ते खुप कडक होते म्हणुन सगळे साफ सुत्रेपणा लागतो असे ऐकुन आहे .. हळु हळु आता तेथे दुसरे देव बाजुला आले आहेत आणि त्या बरोबर याण्चीही पुजा होते ..
असेच इंद्र सगळ्यांवर राज्य करीत असेन म्हनुन तो सर्व देवांचा पण नेता असेन .. यम डायरेक्ट मृत्यु देत असेन मह्णुन त्याची तशी निर्मीती केली गेली असेन असे मला वाटत राहते ..
कदाचीत हेच बरोबर ही असेन पण चुकच आहे असे ही कोणी ठाम पणे कसे सांगु शकतील .. ?
पण पुढे तसे विचार केला की मग वाटते ज्ञानेश्वरी .. तुकारामांचे अभंग हे आपल्यापुढे आहे.. ह्या थोर संतांनी पण पांडुरंगाची आराधना केली आहे .. मग नक्की काय बरोबर .. मग मी विचार करणेच थांबवतो ..
मग हळुच साईबाबा, स्वामी समर्थ आठवतात .. तसे हे माणुसच .. अगदी साईबांबाचा फोटो पण अवेलेबल आहे , अलिकडचेच आहेत ते .. मग आपणच त्यांना देव केले नाही का आता.. ते खरेच खुप ग्रेट होते, माणसांचे खुप कष्ठ ते कमी करत होते .. मदत करत होते .. पण ते देव नव्हते हे मला वाटते .. पण आज नंतरच्या तीन पिढ्यांना शिर्डीचे साइबाबा हे देवाचे अवतार्च होते हेच माहित असणारच आहे असे वाटते ..
शेवटी काही माणसांची शक्ती खुप मोठी असते .. त्यामुळे ते आपल्या सामन्य माणसापेक्षा खुप मोठे वाटतात आपल्याला तेंव्हा त्या शक्तीला आपण वंदन करतो आणि तीच शक्ती देवरुप माणतो असे माझे मत ..
म्हणजे देव नाही असे माझे मत नाही पण देवपण म्हणजे काय हे ही कळाले पाहिजे ..
अंद्धश्रद्धा म्हणजे नक्कीच देव नाही .. श्रद्धा म्हणजे पण फक्त रुढी-परंपरा नाही हे ही जाणले पाहिजे असे वाटते ...
धन्यवाद
मिपावर कमीत कमी प्रतिसाद असलेला काथ्याकुट असा एक रॅन्डम सर्च करत होतो आणि हा धागा सापडला ...
प्यारेजी आपाण जिंकला आहात
अध्यात्माच्या धाग्यावर चक्क तब्बल एकच प्रतिसाद ! अहो आश्चर्यम !!
"आमच्या वेळेचं मिपा राहिलं नाही आता "
पण देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?
-दिलीप बिरुटे
देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?
माझ्या मते देव वगैरे काही नसतं , जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !!
बाकी सारे आपल्या मनाच्या आनंदासाठी निर्माण केलेले भ्रमच ! पण भ्रम असल्याने काय फरक पडतो ...आपला संबंध तर फक्त आनंदाशी आहे ! येथोनि आनंदु रे आनंदु !!
>>> माझ्या मते देव वगैरे काही नसतं
कशावरुन ज्याला लोक देव म्हणतात अशी एक सुप्पर पॉवर नाही, असं वाटतं ?
>>>जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !!
सदगुरुला देव म्हणायचं की आणखी कोणी रमेश पांडुरंग गोखले याला देव म्हणायचं हे ठरविण्याअगोदर मला देवाचा शोध घेतला पाहिजे असे वाटते. देवापर्यंत पोहचायला अशी कोणाची कोणाला मदत लागू नये असे वाटते. कृष्णाने आवाज दिला की दिलीप बिरुटे कोण आहे की आपण हात वर केला पाहिजे, आणि आपण मथुरेचा कृष्णदेवराय यादव यांचं हेच घर आहे का तर लोकांनी कृष्णाचं घर दाखवलं पाहिजे, आणि घरातून आपल्या स्वागतासाठी कृष्ण बाहेर आला पाहिजे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
कुणाला एकाला वाटून उपयोग नाही. सुर्य म्हटलं की सर्व लोकांना दाखवता येतो, तो बघा सुर्य.
मला एकट्याला तो सुर्य आहे असे वाटता कामा नये. सर्वांना (देव आहे आणि देव नाही असं म्हणना-यांना) तो सुर्य वाटला पाहिजे आणि दाखवता आला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं असतं तर काय पाहिजे होतं ओ. पण असो. भोंदू नसलेले काही लोक म्हणतात की देव किंवा तत्सदृश काही आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो इतकेच. काहींना ते पटते, काहींना नाही. काहींचा स्वरूपाबद्दल मतभेद असतो तर काहींचा अस्तित्वाबद्दलच. अगदी शंकराचार्य असले म्हणून त्यांच्या काळात नास्तिक लोक नसतीलच असं नाही. फार तर मायनॉरिटीत असतील एवढेच. एखादी गोष्ट सर्व लोकांना पटेलच असे नाही, अन तेवढ्यावरून त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे फार कारण मला दिसत नाही इतकेच.
तस्मात शास्त्रं प्रमाणं ते- एक तर शास्त्रानुसार चला किंवा ते सर्व सोडून चला. भोंदु काय म्हणतो आणि विज्ञान काय म्हणतो ते सोडून द्या. देवाच्या मार्गाने जाणार्यांना जाऊ द्या. आणि 'यावत जीवेत सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : '' असा विचार करणार्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. . आपण कसं कोणाला सांगू शकतो की अमुक अमुक मार्गानेच जा. कोणता तरी एकच मार्ग निवडण्यासाठी सत्य शोधलंच पाहिजे. हे की ते असं करु नये नै का ?
-दिलीप बिरुटे
बिरुटे सरांचा आवलेकाकांना अल्जिरियातून थेट काश्मिरकडे नेण्याचा प्रयत्न!! ;)
एक सोप्पं सांगू का, आहे असे वाटेल तेन्व्हा चिन्ता सोडून आपलं काम करावं, नाही असं वाटेल तेन्व्हा त्यची पर्वा न करता निवांत आपल्या कामाला लागावं. (तसेही आता तुम्ही इथलं काम वाढवून ठेवताय) :P
ऑन अ सिरियस नोटः...अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली.
हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच.
ती भावना नसली आणि भोगवाद बोकाळला की नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली जाते.
अंतिमतः आपलीच हानी होते.
अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली.
हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच.
अगदी मान्य...! पण विविध धार्मिक ग्रंथातून देवांचा आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख येतो
लेखक कोण रचनाकार कोण ते जाऊ द्या, पण खर्रच असं काही असतं का ?
एवढाच माझा प्रश्न आहे.
-दिलीप बिरुटे
>>> खर्रच असं काही असतं का ?
असतं. :)
(ते मिळण्यासाठी/ सापडण्यासाठी तयारी करावी लागते. जनरली आपली ती नसते.)
हा विषय झालाय बर्याचदा. त्यामुळं पुन्हा नको.
अजिबात तसं काही नसतं ! आपल्याला मिळविण्यासाठी ती तयारी करावी लागते ही पळवाट आहे.
हा विषय झाला असेल तरी मी वाचलेलं नाही, प्लीज पुन्हा लिहा.
-दिलीप बिरुटे
देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे???
बर्याचदा होतं काय की मला, माझ्या सोयीनुसार, मला हवं तेव्हा, मला हवं ते, नि मला हवं तसं मिळालं नाही की मी देव नाही ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो.
त्या बरोबरच देव मला, माझ्या सोयीनुसार, मला जेव्हा हवा तेव्हा, मला हवा तशा रुपामध्ये दिसणं हे सुध्हा अपेक्षित असतं. तसं दिसलं नाही की गडबड होते. आपल्या श्रद्धाच तेवढ्या डळमळीत असतात. कारण त्यांना पुरेसा पोषक नि योग्य विचार मिळालेला नसतो.
आपण आपली देवाची व्याख्या सांगा. आणि 'असं काही असतं का अथवा नसतं का ' चा नेमका अर्थ देखील स्पष्ट करा. लिखित अथवा शाब्दिक सुद्धा संभाषणांच्या मर्यादा असतातच.
(उत्तर सवडीनं देईन. इतरांनी लगेच भुई थोपटणं सुरु केल्यास अथवा न केल्यास देखील माझी अजिबात ना नाही)
>>> देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे???
अहो, आम्हाला काय माहिती. पण आम्ही ’क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु’ अशा गुणसमुहाच्या व्रुत्तीला देव म्हटलं पाहिजे, असं आम्ही म्हणतो. अशी आमची व्याख्या.
उत्तर सवडीने अवश्य द्या. एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू. हाय काय अन नाय काय.
काही संदर्भ ग्रंथ...आजचा आधुनिक विचार अशी काही मांडणी केली आणि देव कसा आहे हे सिद्ध केल्यास मला आनंदच वाटेल.
-दिलीप बिरुटे
>>> क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु
थोडं मराठी अर्थ अथवा स्पष्टीकरण केल्यास बरं होईल. इकडं चटकन अर्थ कळून घेण्यास अवघड आहे. शाळेमध्ये संस्कृत कधीच नव्हतं. संस्कृत येत नाही. (काही स्तोत्रांचे अर्थ सोड्ल्यास)
मला वाटतं की प्रत्येकाला आपापली मतं बनवायचा अधिकार आहे. माझं मत तुमच्यापे़क्षा वेगळं असू शकतं. ते तस असलं म्हणून काही बिघडत नाही. त्यावरुन गोंधळ कशाला घालायचा? किंवा तुमच्याशी माझं मत पटत नसलं तर मी चूकच आहे, हा प्रतिवाद तरी कशाला? :)
मला तर हल्ली जे वाचेन ते चुकीचं वाटतं!! स्वतःचा प्रतिसाद्देखिल चुकीचा वाटतो. या सगळ्यापेक्षा वेगळीच कुठलीतरी दहाहज्जार्राव्वी शक्यता खरी असावी आणि मांडल्या जाणार्या सगळ्याच शक्यता खोट्या असाव्यात असंही वाटतं...
तेपण प्रत्येक विषयात! :D
मतं पटू नयेत पटावीत हा भाग वेगळा. व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही. (आपल्याला उद्देशुन नै हं हे) तुम्हाला वाटतं देव आहे तर असू द्या. आम्हाला नै लागला शोध आणि तो कोणाच्या प्रतिसादातून लागणार असेल तर लागू द्या ना. तेव्हा आपलं मत मांडाच. आपल्याला देव कुठे दिसल ते सांगा ? आता तो श्री संत तुकाराम महाराजांमधे दिसला. मोग-याच्या फुलात दिसला. सोनचाफ्यात दिसला. इतकं सांगू नका बा...!
-दिलीप बिरुटे
व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही.
हेच म्हटलं आहे की मी :) तुमचं मत मांडताना, माझं मत पटल नाही/ आवडलं नाही हे म्हणा, पण तुम्हाला पटत नाही म्हणजे माझं मत चुकीचं कसं आहे आणि त्या मताची टिंगल व्हायची गरज नाही, इतकंच.
किमान पंचवीस प्रतिसादातून वाद प्रतिवादातून पटवून देता आलं पाहिजे.
छ्या प्लीज इतक्या लवकर सहमतीला येऊ नका.
बाकी मतांची टिंगल होऊ नये याच्याशीही सहमत.
-दिलीप बिरुटे
बिरुटे सर,
कुठेतरी वाचले आहे. एकदा एक बस घाटातून जात असताना बसचे गतीरोधक (ब्रेक्स) बिघडातात आणि चालकाचा ताबा जाऊन बस दरीच्या दिशेने जाऊ लागते. आता त्या बसला खोल दरीत पडण्यापासून कोणीच वाचवू शकत नसतं, 'सर्वांनी बसच्या बाहेर उडी मारून आपापला जीव वाचवावा' असे ओरडून बसचालक बसच्या बाहेर उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या एका दगडाला चाक अडकून बस थांबते आणि सर्वांचेच जीव वाचतात. त्या कथेत म्हंटले होतो तो 'दगड' म्हणजेच देव.
देव, पाप-पुण्य ह्या संकल्पना (त्या काळातल्या) अज्ञ माणसाला सद्विचारांच्या मार्गावर ठेवण्यासाठी, संकटकाळी सगळीकडून मदत नाकारली गेली असताना 'देव' सर्वांची मदत करतो ह्या दृढ भावनेपोटी मानसिक बळ मिळून स्वतःच संकटावर मात करणं प्रत्येकाला साध्य व्हावं अशा हेतूने निर्मिल्या गेल्या असाव्यात. अज्ञात शक्तीला मानणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. सर्वसामान्यांना मन केंद्रित करण्यासाठी 'मूर्ती' लागते. म्हणून देवांच्या, राक्षसांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. त्यांना चिकटविलेल्या गुणधर्मांनुसार देवांच्या सुंदर आणि राक्षसांच्या क्रूर, विद्रुप प्रतिमा निर्मिल्या गेल्या.
सांगोवांगी (माऊथ पब्लीसिटी) देवांच्या आणि राक्षसांच्या अस्तित्वाच्या कथा पसरत गेल्या तर कांही स्वार्थासाठी पसरविल्या गेल्या. संसारातील कटकटी, आजारपणं, महागाई, बेरोजगारी, मुलींची लग्न, संतती प्राप्ती, सामाजिक असुरक्षितता वगैरे वगैरे अनंत समस्या आणि निरसन करता येऊ न श़कणार्या शंका-कुशंकांनी कर्मकांडांना जन्म दिला आणि अतिशयोक्ती वगळता कर्मकांडं म्हणजेच अध्यात्म ही धारणा पसरली आहे.
विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा आणि कर्मकांडं मागे पडतील असा एक विश्वास होता. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक बदलाला वेग आला आणि व्यावसायिक स्पर्धेतून असुरक्षिततेची भावना बळावली. ह्याची परिणीती सुशिक्षितांच्या वाढत्या कर्मकांडात झाली.
मानसिक बळ प्राप्त होण्यासाठी, कोणीतरी आपला वाली आहे ह्या विश्वासासाठी (जो आवश्यक असतो), देवावर, पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवावा पण कर्मकांडापासून दूर रहावं असं माझं वैयक्तिक मत आहे.
देव मानणार्या लोकांचे मोठे गट वरील कारणांमुळं देव मानतात.
अगदीच स्पेसिफिक बोलायचं तर
१. भीती आणि ठराविक विपरीत प्रसंगी अचानक अनुकूलता निर्माण होऊन त्यातून बाहेर पडणं
२. नीती अनितीच्या कल्पना.
३. आत्यंतिक जिज्ञासेपोटी प्रश्न उत्पन्न होऊन सत्यान्वेषणाचा प्रयत्न.
४. निव्वळ कृतज्ञता नि प्रेम अथवा भक्ती.
ह्या मार्गांनी देवाकडं झुकण्याचा कल तयार होतो. तो टिकवून वाढवणं आपापल्या हातात आहे. असो!
मा. प्रसाद गोडबोले, ज्येष्ठ संपादक्स आणि मित्रजनांनी आमच्या ह्या जुन्या धाग्याला ह्याठिकाणी हे जे पुनरु-अहंहं (घसा घसा)- पुनरुज्जिवित अशा पद्धतीनं केलं किंवा ह्याठिकाणी जो तुत्य (बरोबरे ना?) प्रयत्न जो असा छान केलेला आहे त्याबद्दल त्याठिकाणी मी आपणा सर्वांचा हार्दिक आणि अंतःकरणपूर्वक आभारी आहे.
अशा पद्धतीनं जर सगळ्या दूरलक्षित धाग्यांचा ह्या ठिकाणी विचार झाला तर मिसळपाव हे एक अतिशय लोकप्रिय संस्थळ ठरेल ह्या बाबत मला तिळमात्र शंका नाही. (खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. असो.)
जय हिन्द जय महाराष्ट्र!
कारण माणूस हाच फक्त अशा पद्धतीचा विचार करु शकतो.
नि तसा विचार करताकरता कधीकधी 'मी कर्ता' असा सुप्त विचार निर्माण होतो. त्यामुळं आहे की नाही हे कन्फ्युजन निर्माण होतं.
शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यात आठ माकडे एका पिंप सदृश्य उंच नळकांड्यात ठेवली आणि त्यातले एक जरी माकड वर चढून बाहेर येऊ लागले तरी त्यांच्यावर बर्फाच्या अत्यंत थंड गार पाण्याचा शिडकावा होईल अशी व्यवस्था केली. माकडांची आतमध्ये खाणे पिणे इ उत्तम व्यवस्था होती. काही दिवसांनी ती माकडे हे "शिकली" कि आपल्यापैकी एक जरी माकड वर चढू लागले तरी आपल्याला बर्फाच्या पाण्याचा मारा होतो. त्यामुळे आता ती माकडे त्यांच्या पैकी एक जरी वर चढू लागले तरी किंचाळून आणि चावे घेऊन त्या माकडाला खाली खेचू लागत. असे काही दिवस गेल्यावर त्यांनी तो बर्फाच्या पाण्यचा मारा बंद केला आता एक जरी माकड वर चढू लागले कि इतर ७ माकडे त्याला खाली खेचत असत. काही अवधीनंतर त्यांनी यातील एक माकड बाहेर काढले आणि त्या जागी दुसरे माकड आणले. हे नवीन माकड जेंव्हा वर चढू लागे तेंव्हा इतर सर्व माकडे त्याला चावून आणि किंचाळून खाली खेचत असत. काही दिवसांनी ते माकड पण शिकले कि कोणीही वर जाऊ लागला तर त्याला खाली खेचायचे.
शास्त्रज्ञांनी हळूहळू एक एका करत सर्व मूळ माकडे काढून दुसरी माकडे तेथे रुजू केली. आता तेथे एकही माकडाला बर्फाच्या पाण्याच्या माऱ्याचा अनुभव नव्हता पण एक जरी माकड वर चढू लागले तरी इतर माकडे त्याला चावून किंचाळून खाली खेचत असत.
शेवटी कार्यकारण भाव जरी नाहीसा झाला तरीही श्रद्धा,परंपरा,किंवा कर्मकांड कसे चालू राहते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
( या प्रयोगाची विदा माझ्याकडे नाही पण हा प्रयोग यशस्वी झाला असावा अशी मला खात्री आहे)
याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. केवळ बाबा वाक्यम प्रमाणं म्हणून स्वीकारू नये.
प्रतिक्रिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2