अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ?
http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे.
अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?
मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं.
बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं.
इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.
पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.
का बरं ?
अमेरीका काहिहि करु शकते...
आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ?
लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ?
या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे.
त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !
अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे
चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत
अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्यातही त्याचा cunningness झळकून येतो.
लाख छुपाओ छुप ना सकेगा
राज ये कितना गहरा,
दिल की बात बता देता है,
असली नक़ली चेहरा !!
कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता?
पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय).
(भारतीय) अर्धवटराव
९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो.
दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!
सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से
कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से...कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका)
जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !! ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी
बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई
बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)
बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्यातील नाहीत
येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही.
सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच
असो
ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा
पावतीबद्दल धन्यवाद.
मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.
मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..)
राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून)..
वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिक्रिया