Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घरकाम/बालसंगोपन व जीडीपी

र
राजेश घासकडवी
Sat, 01/08/2011 - 08:39
🗣 82 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
34128 वाचन

💬 प्रतिसाद (82)
अ
अवलिया Sat, 01/08/2011 - 09:01 नवीन
विचार शृंखला चांगली मांडली आहे. स्त्री उपभोग्य वस्तु मानुन येणारी विचारसरणी याला कारणीभुत आहे की नाही माहित नाही. तेवढा माझा अभ्यास नाही, बौद्धिक कुवत नाही.
माझ्या माहितीत अमेरिकेतलं उदाहरण आहे, जिथे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईने वर्षाला सत्तर हजार डॉलरची नोकरी सोडली. तिचं गणित सोपं होतं. मुलांना चाइल्ड केअरमध्ये ठेवायचं तर वर्षाला पंचवीस ते तीस हजार, टॅक्स पंधरा हजाराचा जाणारच, शिवाय गाडी ठेवणं, बाहेर खाणं यात आणखीन खर्च. त्यातून किती हातात राहाणार? एवढी दगदग, जिवाचा आटापिटा करून शेवटी मुलांना आई मिळणार नाहीच. त्यापेक्षा ती घरी राहिली तर जे सुख मिळेल ते हातात पडणाऱ्या दहा पंधरा हजारापेक्षा कितीतरी अधिक असेल.
तुम्ही दिलेले उदाहरण अमेरिकेतले आहे. सध्या पुण्यात पाळणाघरासाठी वेटींगलिस्ट आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7239474.cms किंचित अवांतर - कधी कधी सरळ कामाला फाट्यावर मारुन मी दोन चार दिवस भटकत बसतो. किंवा घरी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवतो. तितक्या प्रमाणात मला उत्पन्न कमी मिळतं, त्यामुळे खर्च कमी होतो. जीडीपी कमी होते. मला वाईट वाटत की मी जीडीपीत भर घालु शकत नाही. पण असे केल्याने मला मिळणारा आनंद तो कसा मोजणार? की असा आनंद मिळवणं या विचारापासुन मानव खूप दूर आला आहे असा मला प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 20:32 नवीन
पण असे केल्याने मला मिळणारा आनंद तो कसा मोजणार? की असा आनंद मिळवणं या विचारापासुन मानव खूप दूर आला आहे असा मला प्रश्न पडतो.
हा चांगला मुद्दा आहे. किंबहुना निव्वळ पैशात मोजता येण्याच्या गोष्टी, निव्वळ पैशात मोजत बसल्यामुळे या न मोजता येण्यासारख्या (इन्टॅंजिबल) गोष्टींना पुरेसं महत्त्व मिळत नाही असं माझं प्रांजळ मत आहे. वस्तुंचं/सेवांचं उत्पादन मोजण्याऐवजी एकंदरीत आनंदाची मोजमाप करता आली तर आपण योग्य गोष्ट ऑप्टिमाइझ करू असं वाटतं. आंतरिक आनंद मोजणं कठीण आहे - पण तरीही पैशांप्रमाणेच तुमच्या वेळेची किंमत आहे. त्यातला किती वेळ तुम्ही कशासाठी द्यायला तयार असता यावरून तत्वतः तुम्ही मोजलेली किंमत काढता येईल. निदान तसा प्रयत्न व्हावा असं वाटतं. मग वस्तुंनी गरीब पण सुसंस्कृत, सुशिक्षित व जीवनात रस घेणाऱ्या व्यक्ती, समाज व वस्तुंनी श्रीमंत पण जीवनात रस घ्यायला वेळच नसलेले यांच्यातली कृत्रिम दरी कमी होईल. निव्वळ जास्तीत जास्त पैसा मिळवावा हे मूल्य बदलून पैसा व आनंद जास्तीत जास्त मिळवावा याकडे कल होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
श्रावण मोडक Sat, 01/08/2011 - 09:02 नवीन
गुर्जी, महत्त्वाच्या मुद्याला हात घातलात की. तो काही तरी एक विनोद आठवला. या जगाची निर्मीती केऑसमधून झाली आणि ते केऑस इकॉनॉमिस्ट्सनीच निर्माण केला असा काही तरी भाग आहे त्यात. हे लिहिताना तुम्ही
'सर्वच गोष्टींचं कमोडिटायझेशन व्हावं' अशा कोत्या अर्थाने घेतील. कमोडिटायझेशन या शब्दाला खरेदी-विक्रीचे संदर्भ आहेत.
असं म्हटलं आहे. इथं मला एक गोष्ट नाही लक्षात आली. "मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत" असं म्हणताना अर्थशास्त्रीय दृष्ट्या त्याचं काही तरी मूल्य ठरावं लागेल. ते ठरवायचं म्हटलं की, त्या-त्या सेवेचं मूल्य खरेदी-विक्री अशा स्वरूपातील विनिमय संदर्भाच्या चौकटीतच होणार. एकदा ते झालं की, वस्तूकरणच झाल्यासारखं होतं. तेव्हा या पेचातून बाहेर कसं पडायचं? कारण शास्त्र म्हटलं की काही नियम आले, संदर्भांच्या चौकटी आल्या. त्यावर तो-तो मुद्दा घासून पुसून लखाखून बाहेर आला पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 09:18 नवीन
स्त्रीच्या जीवनातल्या प्रश्नांपैकी एक म्हणजे सर्वसाधारण स्त्रीची दखलच न घेण्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या यंत्रणांचा कल. अनेक संस्थांमध्ये (धर्मसंस्था, कुटुंबसंस्था वगैरे) हे होतं हे त्या उलगडून दाखवतात. अर्थशास्त्रामध्येदेखील हे होतं.
हे काहीच्या काही overestimation आहे. जीडीपी हा देशाच्या अमुक एका कालावधीतील अर्थव्यवस्थेचा एक इंडिकेटर आहे.तो १००% दोषरहित आहे असे अजिबात नाही.अर्थशास्त्राप्रमाणे जीडीपीची व्याख्या आहे: GDP is the market value of all final foods and services produced within a country in a given period of time. या व्याख्येप्रमाणे घरी दिलेल्या सेवा/बनविलेल्या कोणत्याच वस्तूंची मार्केट व्हॅल्यू होत नसल्यामुळे त्या जीडीपीचा भाग बनत नाहीत. समजा मी गाडीसाठी ड्रायव्हर ठेवला तर त्याला दिलेला पगार हा जीडीपीचा भाग बनतो.पण मी स्वत:च गाडी चालवली तर तो जीडीपीचा भाग बनत नाही.गाडी चालवणारे पुरूष आणि स्त्रिया या दोन्ही असतात.तेव्हा केवळ पुरूषांनी स्वत: गाडी चालवली तर ते जीडीपीमध्ये धरावे आणि स्त्रियांनी स्वत: गाडी चालवली तर ते धरू नये असे होत नाही.पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ हे अनेक वेळा पुरूष असतात.त्यांनी हॉटेलात बनवून विकलेले अन्नपदार्थ जीडीपीचा भाग बनतात पण त्यांनी घरीच काही अन्नपदार्थ समजा बनविले तरी ते जीडीपीचा भाग बनत नाहीत.असे अनंत गोष्टींविषयी लिहिता येईल.इथे स्त्री-पुरूष असल्याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 01/08/2011 - 09:31 नवीन
हे ओव्हर एस्टिमेशन कसे? माझ्या मते हे साधे वास्तव आहे. कारण या गोष्टींचा (म्हणजे स्त्रिया करत असलेलं काम - इथे प्रामुख्याने जिथे टँजिबली तिला त्याबदल्यात काही उत्पन्न मिळत नाही, अशा प्रकारची कामे मी गृहीत धरतो आहे - वगैरे) अर्थकारणात खरेच समावेश झालेला दिसत नाही. साधी गोष्ट आहे. माझे घर चालते. ते चालण्यासाठीच मी नोकरी करून काही कमावतो. इथे मी नोकरी करून जे काही कमावतो, त्या बदल्यात होणाऱ्या उत्पन्नाचा जीडीपीमध्ये समावेश असतो. याच काळात हेच घर चालण्यासाठी माझी पत्नी नोकरी न करता इतर जबाबदाऱ्या निभावण्याचे काम करते. त्याचा जीडीपीत समावेश नसतो. याचे कारणच मुळी घासकडवी म्हणतात तसे, जीडीपीची व्याख्याच अत्यंत संकुचित आहे. जीडीपीपेक्षा मानवी समाधान, आनंद-सुख यासंदर्भात तो मापदंड असला पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद दिसतो (त्यांचा नसला तरी माझा असेल). तुम्ही तुमचा मुद्दा यासंदर्भात समजावून द्या, ही विनंती. सहज आठवलं - हा युक्तिवाद काहीसा आवश्यक कॅलरीजनुसार माणसाचा रोजगार ठरवायचा की नाही अशा अंगाने जातो. मला आत्ता नेमकं आठवत नाही, पण शरद जोशींना आव्हान देण्यासाठी शेतमजुरांचे नेते जोशांच्या आंदोलनांच्या अगदी आरंभीच्या काळात प्रयत्न करणार होते. पण शरद जोशींनीच या नेत्यांना, ते मागतात ते इतके भुक्कड आहे की... अशी काहीशी मांडणी करून चितपट मारले होते. चंद्रकांत वानखेडे यांच्या लेखात (इत्यादीचा दिवाळी अंक) हा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 09:56 नवीन
आपले म्हणणे योग्य आहे.जीडीपी हा १००% दोषरहित इंडिकेटर नक्कीच नाही.त्यात अशा घरी केलेल्या गोष्टींप्रमाणे इतर अनेक गोष्टींचा समावेश नसतो.उदाहरणार्थ ज्या गोष्टींचा/सेवेचा कागदोपत्री काहीही मागमूस नसतो अशांचा समावेश जीडीपीत होणे शक्य नसते.म्हणणे जे शाळा/कॉलेज शिक्षक क्लासमध्ये शिकवून रोख पैसे घेतात त्या व्यवहाराचा जीडीपीत नक्कीच समावेश होऊ शकत नाही.धारावीत लेदरच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात.त्या लेदरच्या वस्तू नक्की कितीला विकल्या जातात याची मोजदाद कशी करणार?अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण म्हणता की मानवी समाधान हा मापदंड असावा हे तत्वत: मान्य.मला वाटते भूतानने तो प्रयोग केलाही आहे.पण कोणत्याही प्रकारचा विदा पूर्णपणे objectively मिळवता आला पाहिजे.माझी आई नोकरी करत नव्हती.तेव्हा घरी आई असल्यामुळे मला नक्की किती समाधान झाले याची मोजदाद कशी करणार?कदाचित माझ्यासाठी असलेला समाधानाचा आकडा आणि माझ्या बहिणीसाठी असलेला समाधानाचा आकडा यात तफावत असेल.तेव्हा ते मोजावे कसे? जीडीपी मोजण्याचा उद्देश म्हणजे ते मोजून पुढे धोरणात्मक निर्णय घ्यावेत हा असतो.धारावीसारख्या अनेक ठिकाणी जाऊन नक्की माल कितीला विकला जातो,विविध क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टर आपल्याकडून किती पैसे रोख घेतात आणि किती आयकर खात्याला दाखवतात,किती शिक्षक रोख पैसे घेऊन क्लास घेतात आणि ते उत्पन्न दाखवत नाहीत हा सगळा विदा मिळवता येईल.पण तसे झाले तर सगळा वेळ आणि शक्ती नुसता विदा मिळविण्यातच जाईल. असे करून नक्की उपयोग काय?समाधानाची मोजदाद करता येणार नाही ही अडचण आहेच.आणि महत्वाचे म्हणजे जीडीपीमधील त्रुटींमुळे खरोखरचे जीडीपी कागदावरील अंदाजापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे जीडीपी हे conservative estimate आहे.तेव्हा कागदावरील आकडे समजा कमी दिसत असले तरीही प्रत्यक्षात त्यामुळे होणारा त्रास थोडासा का होईना कमी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 01/08/2011 - 10:20 नवीन
बरोबर आहे देवा तुमचं. म्हणूनच,
जीडीपीमधील त्रुटींमुळे खरोखरचे जीडीपी कागदावरील अंदाजापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे जीडीपी हे conservative estimate आहे.
हे वास्तव असल्याने सारे काही जीडीपीवर आधारलेले नसावे असे म्हटले जाते. जीडीपीत नसलेल्या, कागदावरही आणि वास्तवातही, अनेक गोष्टींचं मूल्यच ठरत नसल्याने तो जीडीपीचा आकडा गडबडीचा ठरतो आणि त्यातून मग पुढे त्याच आकड्यावर आधारून ठरलेल्या धोरणांत गडबड होत असते. रादर, 'विकासविरोधकां'चा हा एक मुद्दा नेहमी असतोच. जीडीपीवर आधारित धोरणांमुळेच विनाश वाढतो आहे, असे ते म्हणतात ते याच हिशेबात. अर्थात, ही एक बाजू आहे. तुम्ही म्हणता तसे,
तेव्हा कागदावरील आकडे समजा कमी दिसत असले तरीही प्रत्यक्षात त्यामुळे होणारा त्रास थोडासा का होईना कमी असतो.
हीही एक बाजू आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 11:51 नवीन
विकासविरोधकां'चा हा एक मुद्दा नेहमी असतोच. जीडीपीवर आधारित धोरणांमुळेच विनाश वाढतो आहे, असे ते म्हणतात ते याच हिशेबात.
जीडीपी हा पूर्णपणे दोषरहित इंडिकेटर नाही हे मी वर म्हटले आहेच.अशा विकासविरोधकांना माझा उलटा प्रश्न आहे की जीडीपीपेक्षा अधिक दोषरहित (समजा १००% दोषरहित नसला तरी) आणि मोजता येण्याजोगा अजून एखादा इंडिकेटर त्यांनी द्यावा आणि मग विनाश कमी कसा करता येईल हे बघता येईल.
अनेक गोष्टींचं मूल्यच ठरत नसल्याने तो जीडीपीचा आकडा गडबडीचा ठरतो
हो नक्कीच पण एक ट्रेंडतर त्या आकड्यामुळे समजतोच ना?दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणना केली जाते त्यात देशात नक्की किती लोक आहेत हे शेवटच्या माणसापर्यंत मोजता येतच नाही.तरीही जनगणनेमुळे एक ट्रेंडतर समजतोच ना?तसेच काहीसे जीडीपीविषयी.आता या जीडीपीच्या आकड्यावर किती विसंबून राहायचे हा त्या त्या देशातील अर्थमंत्र्यांचा प्रश्न झाला पण निदान त्या आकड्यावरून एक दिशा कळते आणि वर म्हटल्याप्रमाणे ते एक conservative estimate असते.कोणत्याही प्रकारच्या धोरणात्मक निर्णयात conservative estimate असणे हे overestimate असण्यापेक्षा चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 10:42 नवीन
समाधानाची मोजदाद करता येणार नाही ही अडचण आहेच
आंबा खाऊन कोणाला किती समाधान होतं याची तुलना करता येत नाही, तरीही आंब्याचा बाजारभाव ठरतोच की.
असे करून नक्की उपयोग काय?
उपयोग नाही कसा? इकॉनॉमिक एफिशियन्सी वाढवण्यासाठी नक्की काय वाढवायचं हे अचूकपणे मोजता आलं पाहिजे. मी दिलेल्या उदाहरणात १०० रुपयांचं आउटपुट वाढलं तरी ते कागदोपत्री १४५ (किंवा २०० देखील असेल...) रुपयांनी वाढल्याचं दिसलं तर एफिशियन्सीचं मोजमाप चुकणार नाही का? समाज कुठच्या दिशेला जावा हे या आकड्यांवरून ठरतं. अचूक मोजमाप कठीण आहे म्हणून ती वाऱ्यावर सोडून देणं याला मी वैचारिक आळस म्हणतो. भारताला विकसनशील म्हणतात, पण अमेरिका विकसित हा निष्कर्ष व त्याबरोबर येणारं गुण-मूल्यमापन (व्हॅल्यू जजमेंट) ही अशा चुकीच्या आकड्यांतूनच येते. स्त्रीला तिच्या कष्टाचं चीज शून्य असं छातीठोकपणे या चुकीच्या आकड्यांतूनच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं. फायदे बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 12:44 नवीन
आंबा खाऊन कोणाला किती समाधान होतं याची तुलना करता येत नाही, तरीही आंब्याचा बाजारभाव ठरतोच की.
आपले म्हणणे रास्त आहे पण आंब्याच्या (किंवा इतर कोणतीही वस्तू विकायच्या) व्यवहारात आणि आई घरी असल्यामुळे मला मिळालेल्या मानसिक समाधानात नक्की साम्य/फरक काय? आंबा खाऊन आपल्याला मिळेल ते समाधान आणि त्यासाठी पैसे मोजून आपल्याला होणारा त्रास ज्या किंमतीला एकत्र येतील ती आंब्याची बाजारातील किंमत ठरते.समजा ती किंमत २५ रूपये मानू.समजा मला आंबा खाऊन होणारे समाधान २५ रूपयांपेक्षा कमी असेल तर मी आंबा विकत घेणार नाही पण ते २५ रूपयांपेक्षा जास्त असेल तर मी आंबा विकत घेईन.आता वळू या घरकाम करणाऱ्या स्त्रीकडे. कुटुंबाकडे दोन पर्याय आहेत: घरातल्या स्त्रीने काम करावे किंवा बाई ठेवावी.आता बाई ठेवली तर तिचा व्यवस्थितपणा,टापटीप,चव,वेळ या सगळ्या गोष्टी घरच्या स्त्रीपेक्षा कमी असतील असे मानू.त्यामुळे घरकाम करणाऱ्या स्त्रीने काम केल्यास सगळ्या कुटुंबाला ’क्ष’ इतके समाधान मिळत असेल तर त्यापेक्षा कमी समाधान बाईने काम केल्यामुळे मिळेल.(समजा ते ०.५ क्ष आहे असे मानू). तसेच बाई ठेवल्यामुळे घरच्या स्त्रीचे कष्ट आणि वेळ वाचल्यामुळे मिळणारे समाधान समजा ’य’ मानू. तेव्हा एकूण समाधान झाले ०.५ क्ष + य. त्याचबरोबर बाईला पगार द्यावा लागल्यामुळे खिशाला पडलेला त्रास समजा ’अ’ असेल. ’अ’ ही गोष्ट एकूण मिळकत आणि बाई किती पगार मागते यावर अवलंबून असेल. जिथेजिथे ०.५ क्ष + य > अ असेल तिथेतिथे घरची स्त्री घरकाम करण्याऐवजी बाई ठेवेल. यात ०.५, क्ष, य आणि अ हे सगळे आकडे कुटुंबपरत्वे बदलतील.समजा घरची स्त्री पण नोकरी करणारी असेल तर घराच्या मिळकतीत घरच्या स्त्रीचा पगार धरला जाईल आणि त्याप्रमाणे ’अ’ ची किंमत बदलेल.म्हणून ते वेगळे consider करत नाही. घरी बाई ठेवली की तिचा पगार जीडीपीमध्ये येईल आणि आंब्याच्या भावाच्या मेकॅनिझमप्रमाणेच बाईचा पगार ठरेल. पण समजा ०५ क्ष + य < अ असेल तर बाई ठेवली न जाता घरची स्त्री घरचे काम करेल आणि ते जीडीपीमध्ये येणार नाही.याचे कारण ०.५ क्ष + य ची किंमत ’अ’ पेक्षा कमी पण नक्की किती कमी?म्हणजेच मोजमाप करायला अडचण येईल.
समाज कुठच्या दिशेला जावा हे या आकड्यांवरून ठरतं.
प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय घेताना जीडीपीच्या आकड्यांवर किती विसंबून राहतात याची नक्की माहिती तशाप्रकारचे निर्णय घेणारेच लोक देऊ शकतील.म्हणजे जीडीपी वाढीचा आकडा समजा ८% असला तर तोच प्रमाण मानून सगळे निर्णय घ्यायचे की त्यात करेक्शन करायची आणि किती प्रमाणात करेक्शन करायची हे असे निर्णय घेणाऱ्यांनाच माहित असेल.तेव्हा जीडीपीतील त्रुटींमुळे सगळे निर्णय उलटेपालटे होतील असे मला तरी वाटत नाही.त्यातही जीडीपी हे conservative estimate असल्यामुळे त्यावर अवलंबून राहिले तरी प्रत्यक्षातला परिणाम त्यापेक्षा थोडा का होईना चांगला असेल.
अचूक मोजमाप कठीण आहे म्हणून ती वाऱ्यावर सोडून देणं याला मी वैचारिक आळस म्हणतो.
नाही हो.फायनान्स आणि अकाऊंटिंगमध्ये असे चालते.एक उदाहरण म्हणजे एखाद्या उद्योगाने एखादी इमारत १० वर्षांपूर्वी घेतली आहे.आज जागांचे भाव वाढल्यामुळे त्या इमारतीचा भाव नक्कीच जास्त असेल.पण बॅलन्स शीटमध्ये इमारत १० वर्षांपूर्वी घेतलेली किंमत वजा घसारा असेच दाखवतात.कारण त्या इमारतीची मार्केट किंमत ती विकायला गेल्याशिवाय कळणार नाही आणि मार्केट व्हॅल्यू लिहायची झाली तर भरपूर subjectivity येईल.तेव्हा objectivity आणि correct value यात रस्सीखेच आहे.त्यात अकाऊंटिंगप्रमाणे objectivity ला अधिक महत्व देतात.एखाद्या उद्योगाकडे भरपूर जमिन, इमारती असतील तर आपली परिस्थिती बॅलन्स शीटवरून वाटते त्यापेक्षा जास्त चांगली आहे याची कल्पना तो उद्योग सांभाळणाऱ्यांना असतेच.तसेच काहीसे जीडीपीविषयी. दुसरे म्हणजे अचूक मोजमाप करायला गेले तर त्यातून पडणारी माहितीत भर आणि त्यासाठी खर्च करावा लागणारे पैसा, श्रम आणि वेळ याचे प्रमाण अनुकूल नसेल तर अचूक मोजमाप करायला न जाता approximations किंवा काही ठोकताळ्यांवरून corrections करतातच ना?तुम्ही शास्त्रज्ञ आहात त्यामुळे तुम्ही सुध्दा कधीनाकधी हे केले असेलच.आता तो पण वैचारिक आळस झाला का?इथे फरक इतकाच की असे correction मूळ जीडीपीच्या आकड्यात नाही तर त्यावरून घेतलेल्या निर्णयांमध्ये करत असावेत (असे मला वाटते).तसाही नुसता जीडीपीचा आकडा by itself काही महत्वाचा नाही.तो आकडा अनेक धोरणात्मक निर्णयांसाठी इनपुट म्हणून वापरतात तेव्हा ते निर्णय घेताना योग्य ती काळजी घेतली की झाले.
स्त्रीला तिच्या कष्टाचं चीज शून्य असं छातीठोकपणे या चुकीच्या आकड्यांतूनच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं.
तुम्ही केवळ स्त्रीच्या कष्टाला किंमत नाही असे म्हटले जाते असे का म्हणता?घरी स्वत: केलेल्या कोणत्याही गोष्टीचा समावेश जीडीपीत नसतो मग ती स्त्री ने केलेली असो की पुरूषाने. आणि असा समावेश का नाही याचे कारण वर दिलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
श्रावण मोडक Sat, 01/08/2011 - 12:59 नवीन
चांगली चर्चा चालली आहे आणि काही गोष्टी मला समजून घ्याव्याशा वाटत असल्याने इथं काही शंकाही विचारतो.
आंबा खाऊन आपल्याला मिळेल ते समाधान आणि त्यासाठी पैसे मोजून आपल्याला होणारा त्रास ज्या किंमतीला एकत्र येतील ती आंब्याची बाजारातील किंमत ठरते.
बाजारातील किंमत या अर्थाने ही शंका आहे. आंब्याची मागणी आणि पुरवठा यातील दरी वाढते तसा आंब्याचा भाव वाढत जातो. या वाढीला केवळ पुरवठा कमी हेच कारण असते? की, त्या तशा परिस्थितीत आंबा खाऊन मिळणाऱ्या समाधानाचे मूल्यही (जे इथे या मुद्यापुरते क्ष असे असते असे मानूया) वाढलेले असते? आणि असे समाधानाचे मूल्य खरोखरच वाढलेले असते का? की ते टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील त्या दीड-पावणेदोन लाख कोटी रुपयांसारखे मानायचे? इथे आंब्याचा बाजारभाव नेमका त्या दोन फॅक्टरवरच ठरतो हे एक गृहीतक आहे. पण आंब्याबाबत जे घडते ते साऱ्याच शेतमालाबाबत भारतात घडते असे मानता येत नाही, असे मला वाटते. मग अशावेळी जीडीपीचा घोळ होत असावा ना (म्हणजेच जीडीपीचा आकडा चुकत असावा ना)?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 14:02 नवीन
श्रामो धन्यवाद.हे लिहिताना मी अधिक स्पष्ट करून लिहायला हवे होते. मी २५ रूपयाला एक याप्रमाणे किती आंबे विकत घेऊ शकेन हे Marginal Utility आणि Marginal Cost आणि मागणी-पुरवठा यावरून ठरते. आंबा खाल्यामुळे मला एका प्रकारचे समाधान मिळते आणि एका अर्थाने मी आंबे विकत घेताना भरलेले पैसे ही त्या समाधानाची मोजलेली किंमत असते. म्हणजेच मी जर आधी N आंबे घेतले असतील तर N+1 वा आंबा विकत घेऊन मला मिळणारे समाधान म्हणजे माझी Marginal Utility तर N+1 वा आंबा विकत घ्यायला लागलेला खर्च म्हणजे Marginal Cost. मला पहिला आंबा खाऊन बरेच समाधान मिळेल. समजा मी दुसरा आंबा पण खाल्ला तर त्यापासून मिळणारे समाधान पहिल्या आंब्यापासून मिळालेल्या समाधानापेक्षा कमी असेल. उदाहरण अजून स्पष्ट करायला-- समजा मी १२ आंबे आधीच खाल्लेले असतील तर तेरावा आंबा खाऊन मिळणारे समाधान १२व्या आंब्यापासून मिळालेल्या समाधानापेक्षा कमी असेल कारण माणसाची भूक एका प्रमाणाबाहेर वाढू शकणार नाही. या तत्वाला Law of diminishing marginal utility म्हणतात. तसेच आंब्यासाठी पैसे भरून माझ्या खिशाला फटका बसणार आहे त्याचा एका अर्थी त्रास मला होणार आहे. समजा ६ आंबे खाऊन मला मिळणारे समाधान आणि त्यासाठी पैसे भरून मला होणारा त्रास समान असतील तर मी सहा आंबे विकत घेईन. समजा होणाऱ्या त्रासापेक्षा आंब्यांपासून मिळणारे समाधान जास्त असेल तर मी सहाच्या वर सातवा आंबा विकत घेईन पण वर म्हटल्याप्रमाणे सातव्या आंब्यापासून मिळालेले समाधान सहाव्या आंब्यापासून मिळालेल्या समाधानापेक्षा कमी असेल म्हणून मी सातवा आंबा विकत घ्यायला जाणार नाही. बहुसंख्य वेळा (होलसेल वगळता) Marginal Cost ही प्रत्येक आंब्यासाठी सारखीच असते.तेव्हा ज्या संख्येला माझी Marginal Utility आणि Marginal Cost सारखी असतील त्या छेदनबिंदूएवढे आंबे मी त्या किंमतीला विकत घ्यायला तयार होईन.समजा आंब्याची किंमत वाढली (म्हणजेच Marginal Cost वाढली) तर छेदनबिंदू लवकर येईल आणि आंब्याची किंमत कमी झाली तर तो छेदनबिंदू उशीरा येईल. अशा पध्दतीने माझी वैयक्तिक पातळीवर मागणी कोणत्या किंमतीस किती हे ठरेल.माझ्यासारख्या समाजातील सर्वांची मागणी एकत्र केली तर पूर्ण समाजात किती किंमतीला किती आंबे विकले जातील ही Demand Curve ठरेल.त्याचप्रमाणे विक्रेत्यांची वैयक्तिक आणि एकूण Supply curve ठरेल.आणि या दोन curve चा छेदनबिंदू २५ रूपये ही किंमत ठरवेल. आता इथे मला एकच आंबा विकत घ्यायचा असेल आणि मला त्यापासून मिळणारे समाधान २५ रूपयांइतके नसेल तर मी तो विकत घेणार नाही.मी आधी ४ आंबे विकत घेतले आहेत आणि पाचवा आंब्यापासून मिळणारे समाधान २५ रूपयांइतके नसेल तर मी चारच आंबे विकत घेईन पाचवा घेणार नाही.याउलट इतर कोणाच्या बाबतीत हीच वेळ पाचव्याऐवजी आठव्या आंब्याच्या वेळी येईल.त्या माणसाची वैयक्तिक मागणी माझ्यापेक्षा वेगळी असेल. हे सगळे आधीच स्पष्ट करून लिहायला हवे होते.वर लिहिताना थोडा गोंधळच झाला. काय करणार गलतीसे मिश्टेक हो गया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
क्लिंटन Sun, 01/09/2011 - 03:09 नवीन
राजेश, हा वैचारिक आळस नाही या माझ्या मुद्द्यावर आपल्या उत्तराची वाट बघत आहे. थोडे अवांतर: मी सुरवात केली होती एक शास्त्रज्ञ बनण्यासाठी.त्यात मला अपयश आले तरी मी त्या क्षेत्रात काही काळ तरी काम केले आहे.आणि सध्या मी आहे त्या क्षेत्रात आहे.त्यामुळे मी दोन्ही क्षेत्रे बघितली असल्यामुळे याविषयी अधिकाराने लिहू शकतो.अनेकदा कट्टर इंजिनियर आणि शास्त्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा दावा असतो की तेच खरे काम करतात आणि फायनान्स आणि मार्केटिंगवाल्यांच्या कामाला काही अर्थ नाही.मला वाटते योग्य सेल्स/मार्केटिंग नसेल तर इंजिनियरांनी उत्पादन केलेल्या गोष्टींना काय उपयोग आहे?तसेच योग्य फायनान्स नसेल तर कंपनी मुळात financially sustainable नसेल तर सगळ्यांच्याच नोकऱ्या जातील.आपण आपल्या शरीरात हात जास्त महत्वाचा की पाय हा विचार करत नाही.सगळ्याच अवयवांचे त्यांच्या परिने महत्व असते.तसेच इंजिनिअरींग महत्वाचे आहे यात शंकाच नाही पण त्याबरोबरच सेल्स/मार्केटिंग/फायनान्स हे पण महत्वाचेच आहे. राजेश,तुम्ही जीडीपी मोजताना ’वैचारिक आळस’ हा शब्द वापरलात तेव्हा का कोण जाणे मला त्यात वरील गोष्ट आढळली.तेव्हा शास्त्रात करतात ते correction आणि approximation पण अर्थशास्त्रात करतात तो ’वैचारिक आळस’ असे कसे असेल?तेव्हा यावर आपल्या उत्तराची वाट बघत आहे. कृपया वैयक्तिक घेऊ नका ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
र
राजेश घासकडवी Sun, 01/09/2011 - 21:37 नवीन
शास्त्रात करतात ते correction आणि approximation पण अर्थशास्त्रात करतात तो ’वैचारिक आळस’ असे कसे असेल?
यात अर्थशास्त्रशाखेला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता. कोणे एके काळी कदाचित ते ठीकठाक अॅप्रॉक्झिमेशन असेलही . पण हे अॅप्रॉक्झिमेशन आहे, असं कुठे म्हटल्याचं मला दिसलेलं नाही. जर डोळसपणे ते केलेलं असेल तर एव्हाना एखादा संदर्भ आला असता. वैचारिक आळस हा तसा सौम्य शब्द आहे, तेव्हा तो तितका मनाला लावून घेऊ नका. कट्टर स्त्री-मुक्तीवादी याला 'पुरुषप्रधान यंत्रणांचा स्त्रीचं नगण्यीकरण करण्यासाठीचा कट' असंही म्हणतील. मी तसं मानत नाही. :) तुम्ही वर क्ष, य व अ मांडून निर्णयप्रक्रिया अगदी अचूक मांडली आहे. तक्रार अशी आहे की क्ष व य च्या किमती सहजी मोजता येत नसल्यामुळे त्या जवळपास शून्य, नगण्य मानल्या जातात. खरं तर त्या दोन्ही अ च्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या आहेत. किंबहुना त्या स्त्रीचा वेळ मोकळा झाल्याने तिला तो अ पेक्षा अधिक किमतीची नोकरी करण्यासाठी वापरता येतो (य >> अ) हे आताचं सत्य आहे. दोनशे वर्षांपूर्वी ते नव्हतं. त्यामुळे दोनशे वर्षांपूर्वीचीच अॅप्रॉक्झिमेशन वापरू नयेत इतकंच म्हणतो. प्रकाशाच्या वेगाच्या जवळपासच्या वेगाने जाणाऱ्या वस्तुंसाठी सापेक्षतावादाऐवजी कोणी न्यूटनचेच नियम वापरायचे ठरवले तर तो वैचारिक आळसच ठरेल. अॅडम स्मिथ म्हणतो "The value of any commodity … is equal to the quantity of labour which it enables him to purchase or command. Labour, therefore, is the real measure of the exchangeable value of all commodities." घरकामात 'लेबर' शून्य असतं का? जवळपास निम्म्या लेबर फोर्सचे दिवसाला सुमारे ४ ते ५ तास किमान त्यात जात नाहीत का? मग ते नगण्य का म्हणावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 01/10/2011 - 04:05 नवीन
आपले जे correction आणि approximation वर चालू आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खाली कुठल्यातरी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे नुसत्या जीडीपीच्या आकड्याचा फारसा काही उपयोग नसतो.तो आकडा इतर अनेक महत्वाच्या निर्णयप्रकियेत इनपुट म्हणून वापरतात.तेव्हा ते महत्वाचे निर्णय घेताना पाहिजे ती approximations आणि corrections केली की झाले. माझ्याकडे ग्रेग मॅनकिव्ह या हावर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांचे Principles of Macroeconomics हे पुस्तक आहे.त्याच्या चौथ्या भारतीय आवृत्तीत पान क्रमांक २१६ वर पुढील उल्लेख आहे.तो मी इथे जसाच्या तसा देत आहे. The Underground Economy The gross domestic product misses many transactions that take place in the underground economy Searching for the hidden economy By Doug Campbell Here is the brief, unremarkable story of how I recently came to participate in the underground economy: Midafternoon on the iciest day this past winter, a man knocked at my front door. "Shovel your walk?" he asked. "Only $5." Outside, it was a bone-chilling 15 degrees. "Sold," I said.A half hour later I handed over a five-dollar bill and thanked him for saving me the trouble. Officially, this was an unofficial transaction--off the books, with no taxes paid or safety regulations followed. (At least, I assumed this hired hand didn't bother to report that income or register with the proper authorities.)As such, it was technically illegal. And, of course, it's the sort of thing that happens all the time. The size of the official U.S. economy, as measured by Gross Domestic Product (GDP) was almost $12 trillion in 2004.Measurements of the unofficial economy--not including illlegal activities like drug dealing and prostitution-- differ substantially.But it's generally agreed to be significant, somewhere between 6 percent and 20 percent of GDP. At the midpoint,this would be about $1.5 trillion a year. Broadly defined,the underground,gray,informal,or shadow economy involves otherwise legal transactions that go unreported or unrecorded.That's a wide net capturing everything from babysitting fees, to bartering home repairs with a neighbor, to failing to report pay from moonlighting gigs. The "underground" label tends to make it sound muh sinister than it actually is. International Differences in the Underground Economy Country Underground Economy as a Percent of GDP Bolivia 68% Zimbabwe 63 Peru 61 Thailand 54 Mexico 33 Argentina 29 Sweden 18 Australia 13 United Kingdom 12 Japan 11 Switzerland 9 United States 8 Source: Friedrich Schneider. Figures are for 2002. आता हे आकडे कुठल्यातरी sound ठोकताळ्यावरून आले आहेत असे मानायला हरकत नसावी. निदान हावर्डमधला प्राध्यापक तरी कोणी हवेतून आकडे लिहिले तर आपल्या पुस्तकात ते कोट करणार नाही इतपत विश्वासार्हता हावर्डची नक्कीच आहे. (काही महिन्यांपूर्वी हावर्ड की एम.आय.टी मधील कोणा प्राध्यापकाला खोटी पदवी क्लेम केली म्हणून हाकलले पण हा नॉर्म नाही तर अपवाद आहे). वरील आकड्यांमध्ये ६८% फरक म्हणजे जीडीपी मोजताना केलेली मोठी त्रुटी बोलिव्हियात आहे असे म्हणायला हरकत नसावी.त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठी अमेरीका आणि २००२ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची जपानची अर्थव्यवस्थाही मॅनकिव्हने ज्याला ’underground economy' म्हटले आहे त्यापासून मुक्त नाही.तशी ती असूही शकत नाही कारण परत एकदा-- प्रत्येक ठिकाणी जाऊन एखादी वस्तू/सेवा कितीला विकली गेली हे पडताळून बघणे शक्य नसते.तेव्हा या गोष्टीचा जीडीपीवरून घेतले जाणारे निर्णय घेताना अंतर्भाव केला की झाले.
तुम्ही वर क्ष, य व अ मांडून निर्णयप्रक्रिया अगदी अचूक मांडली आहे. तक्रार अशी आहे की क्ष व य च्या किमती सहजी मोजता येत नसल्यामुळे त्या जवळपास शून्य, नगण्य मानल्या जातात. खरं तर त्या दोन्ही अ च्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या आहेत
नोकरीला जाणाऱ्या स्त्रिया घरी कामाला बाई ठेवतात याची किती उदाहरणे दाखवू तुम्हाला?असे निर्णय घेताना क्ष,य,अ च्या किंमती काढायला कोणी जात नसले तरी unknowingly त्याचा कुठेतरी विचार केला जात नाही का? मेकॅनिक्समध्येही मुळातले समीकरण सोडविताना एकदम ideal गृहितके घेऊनच सुरवात करतात ना?म्हणजे घर्षण शून्य वगैरे.तेव्हा घर्षण शून्य हे गृहित धरून त्यावर निर्णय घेतले तर ते चुकणारच.त्यातही गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण अगदी शून्य नसले तरी बरेच कमी असते पण हेच गृहितक खरखरीत पृष्ठभागावर वापरले आणि त्यावरून निर्णय घेतले तर ते चुकणारच की.नेमका हाच प्रकार क्ष,य च्या किंमती शून्य धरून होईल.ही error of judgment झाली त्यामुळे मूळ अर्थशास्त्र खोटे ठरत नाही. तुम्ही अॅडम स्मिथचे उदाहरण दिले हे योग्यच आहे.पण अॅडम स्मिथ झाला जवळपास २५० वर्षांपूर्वीचा.त्यानंतर अर्थशास्त्राच्या विचारांत बरेच बदल झाले आहेत.भौतिकशास्त्रात जो प्रवास गॅलिलिओ ते आईन्स्टाईन झाला तसाच काहीसा अर्थशास्त्रातही झाला. तेव्हा या सगळ्या रामायणाचा उद्देश म्हणजे: जीडीपीमध्ये घरकामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे नक्की किती भर पडते हे घरोघरी जाऊन मोजणे शक्य नसल्यामुळे ते करत नाहीत.तरीही वर दिलेल्या आकड्यांप्रमाणे कोणत्यातरी (मला माहित नसलेल्या) ठोकताळ्याच्या आधारे त्याचा अंदाज घेता येतो आणि त्याचा निर्णयप्रक्रियेतही समावेश करता येऊ शकतो/होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 01/10/2011 - 06:34 नवीन
तुम्ही जी आकडेवारी दिली आहे त्यात कुटुंबाबाहेरून विकत घेतलेल्या सेवांविषयीचा अंदाज आहे. अशी अंडर द टेबल इकॉनॉमी मुख्यत्वे टॅक्स चुकवण्यासाठी असते. तुमचा मुद्दा 'मोजायला कठीण म्हणून घरकामाचा जीडीपीतला हिस्सा मोजत नाहीत' असा वाटतो. ते पटत नाही. घरकामासाठी जीडीपीचा हिस्सा किती आहे हे फारसे कष्ट न करता काढता येतं गृहितक - प्रत्येक कुटुंबातला पुरुष बाहेर जीडीपी वाढवणारं काम करतो व स्त्री घरकाम करते. १०० पुरुष दिवसाला ८ तास काम करतात, त्याची किंमत मोजली जाते १००*८* प(सरासरी ताशी दर) = ८०० प १०० स्त्रिया दिवसाला ५ तास काम करतात, किंमत मोजली जात नाही १००*५* स(सरासरी ताशी दर) = ५०० स म्हणजे खरं ताशी जीडीपी ८०० प + ५०० स असताना ते ८०० प इतकंच मोजलं जातं. म्हणजे (५स/८प)*१०० इतक्या टक्क्यांची त्रुटी आहे! स/प अगदी ०.५ असला तरी सुमारे तीस टक्क्यांची त्रुटी येते. स्त्रीवर्गाचं किमान १/४ ते १/३ योगदान असताना ते न मोजणं अन्याय्य नाही का? मी जे बॅक ऑफ द एन्व्हलोप कॅल्क्युलेशन करू शकतो ते अधिक चांगला विदा मिळवून एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला अजून अचूक करता येणार नाही का? पण ते होत नाही, मग स्त्रीमुक्तीवाद्यांच्या आरोपांत तथ्य आहे असं वाटायला लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 01/10/2011 - 19:15 नवीन
(हा प्रतिसाद राजेश आणि अदिती या दोघांच्याही प्रतिसादांना उत्तर म्हणून आहे) समजा घरच्या स्त्रीने काम करण्याऐवजी बाईला कामाला ठेवले असे गृहित धरू आणि त्या बाईला महिन्याचा पगार १२०० रूपये आहे असे समजू.पण म्हणून घरकाम करणाऱ्या गृहिणीचे जीडीपीमधील योगदान महिना १२०० रूपये धरले तर कामवाल्या बाईबरोबर तुलना केली म्हणून स्त्रीमुक्तीवाल्या अंगावर येतील.जोक्स अपार्ट पण असे का करता येत नाही? इथे मी गृहिणींचे काम कमी दर्जाचे किंवा कमी महत्वाचे आहे असे अजिबात म्हणत नाही याची नोंद घ्यावी. तरीही ते जीडीपीमध्ये धरत का नाहीत याची कारणे काय असावीत? १. तुम्ही एका प्रतिसादात म्हटले आहे की समजा घरकामासाठी बाई ठेवायची असेल तर तिला किती पगार द्यावा लागेल याचा विचार करून तरी ते जीडीपीमध्ये धरावे. Well... असे म्हणून तुम्ही Pandora's box उघडत नाहीत का? उदाहरणार्थ एखादा मनुष्य घरून चालत स्टेशनवर जात असेल असे गृहित धरू.त्याच्यासाठी स्टेशनवर जाणे हे घरचे काम जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे असे समजू (त्याला कदाचित स्टेशनवरून गाडी पकडून कामावर जायचे असेल). आता त्याला चालत जाण्याऐवजी रिक्षा करायची असेल तर रिक्षाभाडे पण जीडीपीमध्ये धरावे का?बरं रिक्षावर का थांबा त्याला टॅक्सी करायची असेल तर?त्याला लिमोझीन करायची असेल तर?त्याला हेलिकॉप्टर करायचे असेल तर?यात मग टॅक्सी,लिमोझीन किंवा हेलिकॉप्टरची भाडीपण जीडीपीमध्ये धरावीत का? माझ्यासाठी दररोज वाचन करणे हे दररोज घरचा केर काढला जाण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.तेव्हा समजा केर काढायला बाई ठेवली तर तिला जितका पगार द्यावा लागेल तितका जीडीपीमध्ये धरला तर समजा मला कोणीतरी पुस्तक वाचून दाखवणारा माणूस ठेवायचा असेल तर त्याचाही पगार जीडीपीमध्ये धरायचा का? समजा मी दुसऱ्या व्यक्तीला एखादी महत्वाची गोष्ट तोंडी सांगितली तर त्यासाठी अर्थातच काही खर्च केला जात नाही.पण मला समजा पत्र पाठवायचे असेल तर पत्रासाठी केला जाणारा खर्चही जीडीपीमध्ये धरायचा का?समजा कुरियर करायचे असेल तर?फॅक्स करायचा असेल तर?निरोप्या पाठवायचा असेल तर?मग पत्र,कुरियर,फॅक्स,निरोप्या यापैकी एकाचा खर्च पण जीडीपीमध्ये धरायचा का? तेव्हा बाई ठेवायला किती खर्च येईल तितकी रक्कम तरी जीडीपीमध्ये धरली तर वर उल्लेख केलेल्या गोष्टींचाही जीडीपीमध्ये समावेश का करू नये याला उत्तर नाही.घरचे काम महत्वाचे आहे हे अगदी १००% मान्य.पण माझ्यासाठी वाचनही तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे म्हणून मला पुस्तक वाचून दाखवणाऱ्या माणसाचा पगारही जीडीपीमध्ये का धरू नये?म्हणजे तुम्ही कुठे थांबणार?मागच्या वर्षी भारताचे जीडीपी सुमारे १.२ ट्रिलियन डॉलर होते.याच न्यायाने ते आपल्याला पाहिजे तितके ५/१०/५० पटीने वाढवता येऊ शकेल आणि त्यात काहीही objectivity राहणार नाही. २. एखाद्या गोष्टीसाठी पगार दिला गेला तर ती गोष्ट नक्की झाली याची खात्री होते निदान त्यासाठी एक स्टॅंडर्ड मिळते.पण जीडीपीमध्ये अधिक भर पडावी म्हणून कोणी ’क्ष’ युनिट काम केले असताना "मी १.५ क्ष काम केले" असे म्हटले तर ते मान्य किंवा अमान्य करायला काहीच आधार नसेल.म्हणून वाटेल तितकी अमाऊंट जीडीपीमध्ये मिळवायची का?म्हणूनच केवळ घरी किंवा स्वत:साठी केलेले काम नाही तर कोणताही मोबदला न घेता केलेले voluntary कामही याच कारणासाठी जीडीपीमधून वगळले जाते.मनुष्यस्वभाव असा आहे की जवळपास प्रत्येक व्यक्ती असे केलेले काम वाढवूनच सांगेल.किंवा न केलेल्या गोष्टीही मीच केल्या म्हणून सांगू शकेल.समजा माझ्या आईने आज केर-लादी केली नसेल अशा परिस्थितीत मीच केर-लादी पुसली असा क्लेम मी केला तर? म्हणजेच मी लादी पुसली आहे तेव्हा माझ्या कष्टाचा मोबदला जीडीपीमधे आला पाहिजे असा माझा दावा असेल तर?भविष्यात मला विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरसाठी मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल आणि अर्थातच त्यासाठी मला एका नया पैशाचीही अपेक्षा नाही.त्यातून कोणाचा फायदा झाला, त्या विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे आयुष्य घडले तर ते काम दररोजच्या घरकामापेक्षा कमी महत्वाचे आहे असे म्हणायला काही आधार नाही.समजा मी ५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असेन आणि माझे कष्ट जीडीपीमध्ये जाणार म्हणून मी १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असे क्लेम केले तर?मी कोणाला मार्गदर्शन करतो या गोष्टीचा पुरावा काहीच नसल्यामुळे मी सांगेन ती पूर्वदिशा असेल तर मी पण माझे योगदान वाढवून सांगेन.शेवटी तो मनुष्यस्वभाव आहे ना! तेव्हा घरी स्वत:साठी आणि मोबदला न घेता केलेले काम किंवा "समजा नोकर ठेऊन तेच काम केले असते तर त्याला किती पगार द्यावा लागला असता" ही रक्कम जीडीपीमध्ये धरत नाहीत त्याची ही कारणे आहेत.स्त्रियांवर अन्याय व्हावा म्हणून असे केले याला काही आधार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 10:02 नवीन
या व्याख्येप्रमाणे घरी दिलेल्या सेवा/बनविलेल्या कोणत्याच वस्तूंची मार्केट व्हॅल्यू होत नसल्यामुळे त्या जीडीपीचा भाग बनत नाहीत.
हे पटत नाही. मला साहचर्य कमोडिटाइज करायचं नाही. करता येईल की नाही, खात्री नाही. पण अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून लग्न हा एक प्रकारचा करार आहे - बार्टरचा. बायको स्वयंपाक करत नाही हे कारण काही समाजांत घटस्फोटासाठी पुरेसं होतं असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का? जर पारंपारिक (नवरा नोकरी करणार, बायको घरचं बघणार) कुटुंबात बायको मेली तर पतीला दुःख होईल वगैरे ठीकच आहे. पण त्याला त्याची पूर्वीची जीवनपद्धती कायम ठेवण्यासाठी किमानपक्षी पैसे मोजून स्वयंपाक बनवून घेण्यासाठी सोय करून घ्यावी लागेलच ना? निदान या खर्चाची तरी मोजदाद व्हावी असं माझं म्हणणं आहे. नोकरी करून पैसे मिळवणाऱ्या नवऱ्याच्या पगाराची जीडीपीमध्ये मोजदाद होते. स्त्रीच्या घरकामाची मोजदाद नाही. ही त्रुटी आहे. व ती सर्वसाधारण स्त्रियांवर अन्याय्य आहे. इतकंच नव्हे तर दोघे नोकरी करून घरकाम आउटसोर्स करणाऱ्या समाजात 'उत्पादन' अधिक आहे असं भासवणारं माप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विजुभाऊ Sat, 01/08/2011 - 11:23 नवीन
अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर पती-पत्नीमध्ये होणारा संभोग. याची किंमत तत्वतः ठरवता येते. थायलंडसारख्या देशात या इंडस्ट्रीचं राष्ट्रीय पातळीवर जीडीपीसाठी अडीच ते दहा टक्के योगदान असतं थायलंड ची परिस्थिती वेगळी आहे. तेथे वेश्याव्यवसायास उद्यम म्हणून मान्यता नसली तरी . अनेक गरीब कुटुंबाना तेथे त्या व्यवसायातून उत्पन्न मिळते. टुरिझम वाढवण्यासाठी थाई एअरवेज ने एकदा तशा अर्थाची एक जहिरात प्रसिद्ध केली होती. बर्‍याच देशानी ती वादग्रस्त ठरवल्यानन्तर त्यानी जहिरात मागे घेतली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 09:37 नवीन
असं म्हणताना अर्थशास्त्रीय दृष्ट्या त्याचं काही तरी मूल्य ठरावं लागेल.
हा कळीचा मुद्दा आहे. कमोडिटायझेशन या शब्दाला खूपच नकारात्मक छटा आहेत. प्रत्येक आंतरिक अनुभवाची खरेदी विक्री करता येणार नाही इतकंच म्हणायचं होतं. पण बाजारात ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या गृहिणीने केल्या तर त्यांची मोजदादच होत नाही हे अन्याय्यही वाटतं. म्हणून मी घरकामाचं उदाहरण घेतलेलं आहे. पैसे देऊन ते करवून घेतलं तर नोंद होणार, जर ते घरच्या घरीच केलं तर नोंद नाही - हा मला वैचारिक आळस वाटतो. एखाद्या गोष्टीचं मूल्य हे तीशिवाय राहाण्यासाठी सर्वसामान्य मनुष्य काय स्वीकारतो यावरून (डिमांड) ठरवता यावं. तसंच तिचा पुरवठा पर्यायी मार्गांनी करण्यासाठी किती खर्च येतो यावरूनही (सप्लाय) ठरवता यावं. मला वाटतं कमोडिटायझेशनचा धोका टाळूनही काही गोष्टींच्या (घरकाम, घरातलं व्यवस्थापन, मुलांचा सांभाळ करण्यासाठीचे किमान कष्ट वगैरे) किमती ठरवता याव्यात. कारण सरासरी गृहिणी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वेतन मिळालं तर या गोष्टी आउटसोर्स करायला तयार होईल, होताना दिसते असं मला वाटतं. हे गणित सोपं नाही. पण जिवाची किंमत सरकार, समाज कॅल्क्युलेट करताना दिसतात. अपघातात हात गेला तर अमुक नुकसानभरपाई याचा अर्थ प्रत्येक जण हात विकायला तयार होतो असं नाही. पण म्हणून हाताची किंमत शून्यच असं म्हटलं तर कसं चालेल? तसंच हेही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 01/08/2011 - 09:48 नवीन
मला वाटतं कमोडिटायझेशनचा धोका टाळूनही काही गोष्टींच्या (घरकाम, घरातलं व्यवस्थापन, मुलांचा सांभाळ करण्यासाठीचे किमान कष्ट वगैरे) किमती ठरवता याव्यात.
सहमत, पण जीडीपीची आत्ता असलेली निरुंद व्याख्या बदलल्याशिवाय ते शक्य नाही. आत्ताची, वर क्लिंटन यांनी मांडलेली व्याख्या GDP is the market value of all final foods and services produced within a country in a given period of time अशी आहे. यात मार्केट व्हॅल्यू हा शब्द आला आहे. एक तर ही व्याख्या बदलून तिला मानवी समाधानाची संदर्भचौकट बहाल करणे किंवा मग जीडीपीच्या आधारे सामर्थ्य किंवा विकास मोजण्याची पद्धत बंद करणे हाच मार्ग राहतो. अवांतर, डोक्यातला एक लोळ - जीडीपी मोठी असूनही एखाद्या समुदायात गरीब-श्रीमंत ही दरी मोठी असेल, विषमता असेल आणि त्यामुळे असमाधान असेल तर त्या समुदायापुढचे प्रश्न जटील आणि धोक्याच्या सीमेवर कोणत्याही क्षणी जाऊन पोचणारे असू शकतात. ते प्रश्न तसे जातात कारण अनेकदा या विषमतेपोटीच तो समुदाय स्थिर असत नाही. तसे असेल त्याचा अर्थ जीडीपी मोठी असूनही सामर्थ्य किंवा विकास नाही असा अर्थ घ्यावा लागेल. पण पंचाईत अशी की सामर्थ्य किंवा विकास या दोन्ही गोष्टी त्या मार्केटच्या स्थैर्यावरच बहुदा आधारलेल्या असाव्यात आणि मार्केटचे स्थैर्य बहुदा केवळ समाज स्थिर असेल तरच मार्केट स्थिर असू शकते अशा काही तरी गृहीतकावर आधारलेले असावे. आणि इथेच कोंबडी आधी की अंडे आधी अशी स्थिती येते. एकूण हा झोल आहे मोठा... पुन्हा सालं भारतासारख्या देशात फुडची फायनल मार्केट व्हॅल्यू कशी काढतात कोण जाणे? कांद्याची आजची मार्केट व्हॅल्यू आणि पाच महिन्यांपूर्वीची मार्केट व्हॅल्यू आणि ती मार्केट व्हॅल्यू जनरेट होण्यासाठी त्या शेतकऱ्याने केलेल्या खर्चाची व्हॅल्यू, त्यात त्याच्या सबसिड्या वगैरे... अवघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 16:34 नवीन
भारतासारख्या देशात फुडची फायनल मार्केट व्हॅल्यू कशी काढतात कोण जाणे?
फायनल मार्केट व्हॅल्यू ही महत्वाची संकल्पना आहे.समजा गव्हाचे पीठ विकणाऱ्या कंपनीने दलालाकरवी शेतकऱ्याकडून गहू विकत घेतले आणि त्याचे पीठ करून विकले.पुढे तेच पीठ एखाद्या हॉटेलने विकत घेतले आणि त्या पीठाच्या रोट्या करून विकल्या असे समजू.इथे एकूण किती उलाढाली झाल्या?एकूण चार.त्या अशा १. शेतकऱ्याने कोणा दलालाला गहू विकले. (समजा १० रूपये किलो) २. दलालाने ते पीठ करणाऱ्या कंपनीला विकले. (समजा ३० रूपये किलो) ३. पीठ कंपनीने गव्हाचे पीठ करून ते हॉटेलला विकले. (समजा ७० रूपये किलो) ४. हॉटेलने त्या पीठाच्या रोट्या करून त्या विकल्या. (समजा १२० रूपये किलो) यातील प्रत्येक पायरीवर मुळातल्या गव्हाची किंमत आहेच.तसेच गव्हाच्या पीठाची किंमत ३ आणि ४ या पायऱ्यांमध्ये आहे. तेव्हा या पायऱ्या वेगवेगळ्या धरल्या तर मुळातील गव्हाची किंमत चार वेळा तर पीठाची किंमत दोन वेळा मोजली जाईल.हे टाळण्यासाठी फायनल व्हॅल्यू बघतात. म्हणजेच जीडीपीमध्ये भर या चार उलाढालींनंतर १२० रूपयांची पडली.हे शेवटच्या end product ची किंमत बघून किंवा प्रत्येक पायरीत किती value addition झाली (पायरी १ मध्ये १०, पायरी २ मध्ये २०, पायरी ३ मध्ये ४० आणि पायरी ४ मध्ये ५०) ते बघून सगळ्याची बेरीज म्हणजे जीडीपीमध्ये पडलेली भर असते. समजा या वर्षी गहू पहिल्या पायरीत १० रूपये आणि पुढच्या वर्षी १२ रूपये असेल आणि प्रत्येक पायरीत २०% ने भाववाढ झाली तर?म्हणजे सगळ्या पायऱ्यांमध्ये किंमत वाढली पण end product एक किलो गव्हाच्या रोट्या यात काही बदल झाला का?तर असा काही बदल झाला नाही.तेव्हा पुढील वर्षीचे जीडीपी १२० गुणिले १.२ = १४४ रूपये असे धरले तर जीडीपी वाढल्याचा खोटा आभास उभा राहतो.ते होऊ नये म्हणून १४४ या किंमतीला वर्ष १ ते वर्ष २ या काळातील महागाईच्या दर अधिक १ ने भागतात.तो दर समजा २०% असेल तर जीडीपी परत १४४ भागिले १.२ = परत १२० रूपये असेल. (यात इतर काही complications आहेत पण ढोबळ मानाने अशाप्रकारे जीडीपी काढतात). आता महागाईचा दर हा ठराविक वस्तूंच्या बास्केटच्या किंमतीत किती वाढ झाली यावर ठरतो.या बास्केटमध्ये अनेक वस्तू असतात.आणि महागाईचा दर हा एकूण बास्केटमधील वस्तूंच्या individual महागाईच्या दराची weighted सरासरी असतो.म्हणजे महागाईचा दर समजा १५% असेल तर प्रत्येक वस्तू १५% ने वाढली असे नक्कीच होत नाही.वरील उदाहरणातील गहू समजा २०% ने वाढले असले तरी महागाईचा दर १५% म्हणून १.१५ ने भागले जाईल आणि अर्थातच जीडीपीत भर १४४ भागिले १.१५ म्हणजे १२० पेक्षा जास्तने पडेल.ही जीडीपीमध्ये असलेली आणखी एक त्रुटी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या अब्जावधी वस्तू आणि सेवा यांचा अंतर्भाव जीडीपीमध्ये होतो.त्यातील प्रत्येक वस्तू/सेवा देशातील ६ लाख खेडी आणि काही शे शहरे यात किती किंमतीला विकली गेली, किती प्रमाणात विकली गेली याचा विदा घेऊन नक्की जीडीपी किती हे काढता येईल.पण त्यासाठी वेळ आणि श्रम वाजवीपेक्षा जास्त जातील म्हणून असे करायच्या भानगडीत कोणी पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नितिन थत्ते Sat, 01/08/2011 - 09:49 नवीन
योग्य मुद्दा आहे. समांतर उदाहरण द्यायचे तर..... बाजारात पुरण पोळी समजा १२ रुपयाला पडते. त्यातल्या जिनसांची किंमत (कणिक + डाळ + गूळ + इतर) १२ रुपयांपेक्षा बरीच कमी दिसते आणि त्यावरून घरी पुरणपोळी बनवणे स्वस्त पडते असा निष्कर्ष निघतो. असेच इतर पदार्थांच्या बाबत घडते. आणि नोकरदार स्त्रिया*सुद्धा पदार्थ घरी बनवायचा आटापिटा करीत राहतात. याचे कारणही तो पदार्थ बनवण्यास लागणार्‍या 'प्रयत्नांची' किंमत शून्य किंवा शून्यवत धरली जाते. *यात स्त्री पुरुष भेद नाही हे खरे असले तरी अजून बहुतांशी पुरणपोळ्या आणि पदार्थ स्त्रियांनाच कराव्या लागतात म्हणून हा प्रामुख्याने स्त्रीचा प्रश्न बनतो.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 01/08/2011 - 10:03 नवीन
लेख आवडला. मला वाटतं, जीडीपी ही संज्ञाच मुळात एका मर्यादित परिप्रेक्ष्यात स्वीकारायला हवी. वजन किंवा बीएमआय हा जसा स्वास्थ्याचा एकमेव निकष होऊ शकत नाही, तसेच जीडीपीचेही असावे. किंचित अवांतर माहिती देण्याचं स्वातंत्र्य देऊन सांगायचं झालं तर या संदर्भात भूतानच्या राजाने जाणीवपूर्वक चोखाळलेली ग्रॉस नॅशनल हॅपिनेस ही संकल्पना आठवली. (याच दुव्यावर जीडीपीच्या अपुरेपणाबद्दल आणि काही गोष्टी आकड्यांत न मोजता येण्याबद्दल चर्चा आहे.) अगदी आजही जगभरातून पर्यटक भूतानमध्ये यायला उत्सुक असतानाही दरवर्षी किती पर्यटक यावेत यावर कडक निर्बंध आहेत. भारतीय नागरिक वगळता, इतर पर्यटकांनी रोज माणशी २५० डॉलर्स खर्च केले पाहिजेत असा दंडक आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/08/2011 - 10:08 नवीन
क्लिंग्टन आणि श्रामो यांच्याशी सहमत. समजा घरकाम करुनझालेले काम अथवा स्वतःसाठे केलेले काम हे जीडीपी मध्ये मिळवून काय साधणार. त्यामुळे त्या कुटुंबाच्या उत्पन्नात किती भर पडणार आहे. जीडीपीचा नुसता फुगवलेला आकडा वाचून ऐकून कोणाचे पोट भरणार असेल तर मग मी मला आंघोळ घालतो त्या श्रमाचा देखील उत्पन्न म्हणून विचार करायला हवा. एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या श्रमाचे मूल्य कोणत्य आर्थशास्त्रीय कसोटीवर मोजणार. दुसरा मुद्दा हा की एखाद्या स्त्रीने स्वयंपाक केला तर त्याची किम्मत किती ठरवणार. त्या स्त्रीच्या श्रमाचे मोल तिच्या कुटुंबाच्या प्राप्तीवर ठरवावे लागेल त्यामुळे ऐश्वर्या रायने केलेल्या चहाची किम्मत तिच्या घरातल्य नोकराने केलेल्या चहाच्या किमतीपेक्षा कितीतरीपट कमी असेल. त्यामुळे चहा करणे यासारखी कामे आउटसोर्स करणेच तिला स्वतःला परवडेल. अवांतरः मी स्वतःसाठी आळस दिला तर त्या ईक्टीव्हीटीचे जीडीपी काय स्थान असेल.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/08/2011 - 17:41 नवीन
चर्चाविषय आवडला. अजूनही लेख आणि सर्व प्रतिसाद नीट वाचून, समजून घेते आहे. पण जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे चर्चा पूर्ण पचनी पडण्याआधीच थोडं लिहीत आहे. क्लिंटनशी गणिती परिभाषेत चर्चा थोडी सवडीने सविस्तर लिहीते.
समजा घरकाम करुनझालेले काम अथवा स्वतःसाठे केलेले काम हे जीडीपी मध्ये मिळवून काय साधणार.
घरकाम स्त्रीने केलंच पाहिजे हा जो काही साधारण दृष्टीकोन दिसतो किंवा "पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्‍यावर दिसणार नाही, उलट माज दिसेल." अशासारखी वाक्य काय दर्शवतात? एवढंच की शेतातून आलेले पदार्थ विकत आणून त्यांची फर्मास पाकृ बनवणे हे स्त्रीचं भूषण आहे. निसर्गाने स्त्रीवर फारतर मुलांना जन्म देणे आणि अर्भकांचं पोषण करणे याच जबाबदार्‍या टाकल्या आहेत. अर्भकं आणि बालकांचं पालन करणे ही जबाबदारीसुद्धा सध्याच्या समाजात बहुतांशी स्त्रीवरच ढकलली जाते. जबाबदारी घरातल्या एका (प्रौढ) व्यक्तीवर टाकण्यात काहीच गैर नाही, पण या व्यक्तीच्या कष्टाची आणि श्रमाची योग्य किंमत न करणे किंवा त्याचा योग्य मोबदला न देणे हे अन्यायकारक आहे. सध्याची जीडीपीच्या व्याख्या अपुरी असेल किंवा नवीन संकल्पना जन्माला आणून त्यात या श्रमांचं, कष्टांचं मोजमाप योग्य रितीने झाल्यास बहुतांश स्त्रियांचं सबलीकरण होण्यास मदत होईल. आदिवासी समाजात (माझा या विषयाचा फार अभ्यास नाही, पण अभ्यासपूर्ण 'ब्र' कादंबरीवरूनदेखील कल्पना येईल की) नवर्‍याकडून पुरेशी 'श्रीमंती' मिळत नसेल, दुसरा पुरूष जास्त खायला घालणार असेल, किंवा इतर काही, तर आदिवासी स्त्रिया काडीमोड घेतात. त्यांच्याकडे तो अधिकार आहे. लेखाच्या सीमेच्या बाहेरचा थोडा विचार जो या पुस्तकातूनच आला आहे: या सर्व जबाबदार्‍या स्त्रीच्याच आहेत असं वर्षानुवर्षे स्त्रीला शिकवलं आहे. आपण थोडं काही वेगळं करू शकतो, या जबाबदार्‍या घरातला पुरूष, मग तो बाप, भाऊ, नवरा कोणीही असेल, घेऊ शकतो हे सुद्धा स्त्रियांना समजतंच असं नाही. आणि मग 'स्त्री हीच स्त्रीची वैरी असते' असली टाळ्याखाऊ वाक्य येतात. स्त्रियांची जबाबदारी घर सांभाळण्याची आहे, आणि पुरूषांची पैसे कमावण्याची असं मान्य केलं तर नोकरी, व्यवसाय करणार्‍या स्त्रिया डबल रोल करत आहेत. सुस्थितीत असलेल्या घरांमधे हा डबल रोल करणं तसं नवीनच आहे, साधारण दोनशे वर्ष, म्हणजे आठ ते नऊ पिढ्या? (आपल्याकडे कदाचित २-३ पिढ्याच!) बदलासाठी कदाचित पुरेसा वेळही मिळालेला नाही. हे पुस्तक अर्ध वाचून झालं आहे आणि त्याबद्दल लिहीण्याचा विचार होता. पण राजेशने आधीच लिहील्याबद्दल त्याचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 17:56 नवीन
सध्याची जीडीपीच्या व्याख्या अपुरी असेल किंवा नवीन संकल्पना जन्माला आणून त्यात या श्रमांचं, कष्टांचं मोजमाप योग्य रितीने झाल्यास बहुतांश स्त्रियांचं सबलीकरण होण्यास मदत होईल
अदिती तुझ्या लेखातील इतर सगळी मते मान्य.पण जीडीपी तसे मोजून स्त्रियांचे सबलीकरण कसे होईल हे कळले नाही. जीडीपीमध्ये फारतर विविध क्षेत्रांचा (शेती, खाणकाम,आय.टी इत्यादी) वाटा किती याची मोजदाद करतात.पण त्यात स्त्रियांचा वाटा किती/पुरूषांचा किती याची मोजदाद कशी करणार?याचे कारण जीडीपीचा बराचसा वाटा हा कॉर्पोरेट्सचा असतो-- त्यांना स्त्री धरणार की पुरूष? स्त्रियांचे सबलीकरण करावे असा तुझा मुद्दा असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे मला तरी काही वाटत नाही.पण जीडीपी असे मोजण्यापेक्षा इतर अनेक चांगले आणि अधिक योग्य मार्ग नक्कीच असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुहास.. Sat, 01/08/2011 - 19:04 नवीन
च्या आयचे नातेवाईक !!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 20:07 नवीन
घटकाभर धरू प्रत्येक कुटुंब ही एक स्वतंत्र कंपनी आहे. त्यातले काही घटक आपले श्रम बाजारात विकतात, काही कंपनीअंतर्गत विकतात. (कंपन्यांमध्ये हे सर्रास चालतं) घरकाम करणाऱ्या व्यक्तीला बाजारभावाप्रमाणे अधिकृतरीत्या पगार दिला पाहिजे असा नियम झाला. म्हणजे मग सगळंच राजरोस जीडीपीच्या मोजणीत येईल. तसं झालं तर स्त्रीला आपल्या हक्काचे पैसे मिळतील. मग सबलीकरण होणार नाही का? दुसरा, काहीसा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे सरकार जेव्हा जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा 'घरगुती कामगारांना' हक्क मिळतील. संप करण्याचा राजरोस हक्क मिळेल. विघटित, हक्क नसलेल्या कामगार वर्गाची गळचेपी होणार नाही तर काय? यावरून पुलंनी केलेलं वर्णन आठवलं. शिक्षकांच्या मोर्चात एक गरीब, हाडाडलेला शिक्षक कळवळून सांगत होता. 'आम्हाला शिक्षक हाच देव वगैरे म्हणू नका. आम्हाला शिक्षणसंस्थेतले मजूर म्हणा. फ्याक्टरी अॅक्ट लावा.' तेच इथे लागू पडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/09/2011 - 00:14 नवीन
क्लिंटन, मला असं वाटतं आहे की जीडीपी या शब्दामुळे थोडी गडबड होत आहे किंवा जीडीपी हा शब्द चुकीचा आहे. मी आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे घरातल्या कष्टांचं मोजमाप करण्यासाठी एकतर जीडीपीची व्याख्या बदलली पाहिजे किंवा नवीन संकल्पना निर्माण केली पाहिजे ज्यात घराबाहेर (किंवा क्वचित घरातून) केलेल्या नोकरी/व्यवसायामुळे मिळणारं उत्पन्न आणि घरात/घराबाहेर घरासाठी केलेली कामं यांचा समावेश असेल. मग घरासाठी केलेल्या कामांमधे दाल-तडक्याचं पाकीट विकत घेणं असू शकतं किंवा व्यवसाय म्हणून डाळ विकत घेऊन त्याचा दाल-तडका बनवणं असू शकतं. सध्या दाल-तडक्याचं पाकीट विकत आणण्याचे जे श्रम आहेत, किंवा घरात डाळ आणून त्याला फोडणी देण्याचे जे श्रम आहेत त्यांचं मोजमाप होत नाही. आणि या श्रमांची तुलना पैसे मिळवणार्‍या नोकरी/व्यवसायाशी अजिबातच होत नाही. जर घरातली कामं स्त्री-पुरूष दोघेही समान वाटप करून करत असतील तर ही तुलना होणं गरजेचं नाही. पण अशी परिस्थिती नाही, नोकरी न करणार्‍या, पण घरात दाल तडका शिजवणार्‍यांपासून कपडे शिवण्यापर्यंत आणि धुणं-भांडी करण्यापासून ते नवर्‍याच्या पाव्हण्यांची सरबराई करणार्‍या स्त्रियांवर अनेकदा 'घरी बसून खाण्याचा' आरोप होतो तो अन्याय्य आहे म्हणून या श्रमांचं मोजमाप गरजेचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sun, 01/09/2011 - 02:59 नवीन
मुळातल्या लेखातील आणि तुझ्या प्रतिसादातील भावनांविषयी मला काहीच आक्षेप नाही.त्यात आक्षेप घेण्यासारखे काही आहे असे वाटतही नाही.नवीन संकल्पना तयार करावी, व्याख्या बदलावी इत्यादी म्हणणे ठिक आहे फक्त प्रश्न आहे की ते करणार कसे?तू काय किंवा राजेश काय शास्त्रज्ञ आहात त्यामुळे objectivity चे महत्व तुम्हाला माहित आहेच.तेव्हा जी काही नवीन संकल्पना तयार होईल त्यात कोणतीही गोष्ट objectively मोजता आली पाहिजे. आपल्या श्रमाला योग्य तो मोबदला (पैशाच्या/मानाच्या स्वरूपात) मिळत नाही असे समाजातील अनेकांना वाटत असते.मला वाटते सगळ्यात जास्त श्रम कोणी करत असेल तर तो अंगमेहनतीची कामे करणारा (दगड फोडणे वगैरे).पण त्याला मोबदला सगळ्यात कमी.त्याचप्रमाणे ’कोर’ कंपनीत कामे करणारे त्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळत नाही पण ’आय.टी वाले’ disproportionately जास्त पैसे कमावतात असे म्हणतात.कट्टर इंजिनियर म्हणतात की ते करतात तेच खरे काम आणि मॅनेजर लोक फारसे काही करत नाहीत तरी त्यांना जास्त पैसा मिळतो.मॅनेजरांमध्ये हीच तक्रार एच.आर च्या मॅनेजरांविषयी करतात.ही यादी कधी न संपणारी आहे.तेव्हा कोणालाही त्याच्या श्रमाचा किंवा त्याने/तीने समाजाला दिलेल्या योगदानाचा योग्य मोबदला मिळायला हवा ही गोष्ट अगदी १००% मान्य.फक्त प्रश्न असा की ती गोष्ट objectively मोजणार कशी?कोणालाही विचारले तर तो मनुष्य आपले योगदान नक्कीच जास्त सांगेल आणि इतरांचे कमी सांगेल.मग कोणाच्या माहितीवर विसंबून राहावे? आणि केवळ याच कारणामुळे जीडीपीमधील सगळे दोष असूनही त्यातील मार्केट व्हॅल्यू, फायनल गुड्स यावरून objectively ते मोजता येते आणि म्हणूनच तेच अजूनही वापरले जाते. तेव्हा मूळ भावनेशी पूर्णपणे सहमत पण जी गोष्ट करायची आहे ती करणार कोण आणि कशी?मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कशी? अवांतरः काही काळ हिलरी नोकरी करत नव्हती तेव्हाही मी कधी ती घरी बसून खाते असे कधीही म्हटले नव्हते आणि यापुढेही म्हणणार नाही.तेव्हा असा आरोप होत असेल तर तो माझ्यासाठी तरी गैरलागू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/09/2011 - 04:08 नवीन
तुला अवांतर लिहीण्याची गरज नव्हती, तसं नसतं तर आश्चर्य वाटलं असतं. पण व्यक्तीगत विचार आणि वागणूक इतपत मर्यादित आपली चर्चा नाही, नसावी. घंटा कोणी बांधायची याचा विचार करून मूळ विचार करणंच थांबवणं चुकीचं वाटतं. मुळात अशी काही संकल्पना असावी का नसावी हा विचार आधी आणि नंतर जीडीपीसारख्या या संकल्पनेची व्याख्येचा विचार असं हे अल्गोरिदम असेल. दुसरं, श्रम हे फक्त शारिरीकच असतात का? बौद्धिक, मानसिक श्रमांची मोजणी करायचीच नाही का? दगड फोडणार्‍याला रस्ता बांधता येणारच नाही पण रस्तेबांधणीचं शिक्षण घेतलेल्या माणसाला दगड फोडता येईल आणि रस्ताही बांधता येईल. ज्याच्याशिवाय गाडं अडतं त्याला जास्त मस्का लावणं, पगार देणं हे सहाजिकच नाही का? साधारणतः आपण करतो तेच काम सगळ्यात बेकार काम आहे असा विचार करणारेच, माझ्या मते, जास्त लोक असतील. पण जेव्हा मोबदल्याची (किंवा त्याचा विचार करण्याची) वेळ येते तेव्हा(च) मात्र आपल्या कामाशिवाय सगळ्यांचंच गाडं अडेल अशी भावना निर्माण होते. राजेशने लेखात आणि इतर प्रतिसादात दिल्याप्रमाणे घरातल्या अनेक कामांचं मूल्य शोधणं कठीण नाही. ठाण्यात, घरी येऊन दोन वेळचं जेवण बनवायचे महिना १२००-१५०० घेत असतील तर ते त्या कामाचं मूल्य नाही का? तान्ह्या बाळाला दूध पाजण्याचे किंवा बाळलीलांनी होणार्‍या करमणूकीचे दर शोधणं एवढं सोपं नाही याची मलाही कल्पना आहे, पण सुरूवात कुठूनतरी करावीच लागणार. काही वर्षांपूर्वी रविवारी आईला/बायकोला सुट्टी अशी काही टूम निघाली होती. आठवडाभर काम करणार्‍यांना आठवड्याच्या शेवटी सुट्टी असाच नेहेमीचा विचार असतो; तो ही घरकामाच्या बाबतीत होता. आता या कामाचं मूल्य काय किंवा बाजारात या कामासाठी किती पैसे मोजावे लागले असते याचा फॉर्म्युला बनवणं ही पुढची पायरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुहास.. Sat, 01/08/2011 - 19:02 नवीन
किंवा "पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्‍यावर दिसणार नाही, उलट माज दिसेल." अशासारखी वाक्य काय दर्शवतात? एवढंच की शेतातून आलेले पदार्थ विकत आणून त्यांची फर्मास पाकृ बनवणे हे स्त्रीचं भूषण आहे. >>. इनो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! म्हणजे ते ही येत नाही का तुला ? असो , वाक्य दोघांकरिता होत आणि तु स्त्रीचं भूषण दाखविलसं !! देव (काका नव्हे ) तुझ भल करो , राजगुरुनगरवाशीनी ! अवांतर : राजगुरुनगराचा उल्लेख का केला आहे हे समजण्याइतपत संपादकांच्या (जो आता माझा प्रतिसाद वैयक्तीक आणि आक्षेपार्ह म्हणुन उडवतील ! ) टिंब टिंब मध्ये दम असावा लागतो. अति-अवांतर : ए यमे ! तुला साधी डाळ करता येत नसेल तर पी.एच्च.ड्डी . काय करणार ग तु ? शेवटच ! आमची वाक्य फुगवुन वापरु नये ही नम्र विनंती ! अन्यथा.......(पुढे सांगायची गरज नाही, मोडक तर भेटतीलच ग दोन एक दिवसात, आन नाय भेटले तर मी आहेच की !) सुष्पट !!: च्या मारी टिंबटिंबमध्ये दम असल ना तर यावं एकदा पुण्यात स्साल परदेशात राहुन शा*उपट सांगीतली कुणी रे वाश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
राजेश घासकडवी Sat, 01/08/2011 - 20:48 नवीन
टिंब टिंब मध्ये दम असावा लागतो.
आता लक्षात आलं तुम्ही तुमच्या आयडीमध्ये टिंब टिंब बाहेर काढून दाखवता ते. (शक्ति)प्रदर्शनाचा भाग असावा. राजेश माझ्या खरडवहीत/लेखांवर अर्वाच्य भाषा वापरून दांडगाई करत येणार्‍यांना सक्त मनाई आहे. अपमान करण्यात येईल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Sun, 01/09/2011 - 05:27 नवीन
ब र !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
श्रावण मोडक Sun, 01/09/2011 - 06:06 नवीन
अन्यथा.......(पुढे सांगायची गरज नाही, मोडक तर भेटतीलच ग दोन एक दिवसात, आन नाय भेटले तर मी आहेच की !)
म्हणजे काय? का उखडताय? आपण जाहीर लिहितो तेव्हा त्यावर टीका-टिप्पणी होणार. टीका-टिप्पणी झेलता येत नसेल तर जाहीर लिहूच नये. तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे मत आहे, असे म्हटले असते, पण इथं "अन्यथा......." आणि पुढे 'भेट' व ती 'न झाली तर' असे उल्लेख असल्याने भलते अर्थ निर्माण होतात म्हणून हे विचारलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Sun, 01/09/2011 - 08:11 नवीन
म्हणजे काय? का उखडताय? आपण जाहीर लिहितो तेव्हा त्यावर टीका-टिप्पणी होणार. टीका-टिप्पणी झेलता येत नसेल तर जाहीर लिहूच नये. तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे मत आहे, असे म्हटले असते, पण इथं "अन्यथा......." आणि पुढे 'भेट' व ती 'न झाली तर' असे उल्लेख असल्याने भलते अर्थ निर्माण होतात म्हणून हे विचारलं आहे. >>> कोण उखडलय ! :) (उलट माझा टोला योग्य ठिकाणी बसला म्हणुन आनंदित आहे .) माझ्या लेखातील (कोणालाही )आक्षेपार्ह न वाटलेले वाक्य दुसर्‍या धाग्यात (काही संदर्भ नसताना) दुसर्‍या ठिकाणी नेउन आक्षेपार्ह बनविण्यात काय हशील आहे ते मला समजावे असे मला वाटले. किमानपक्षी माझ्या लेखात आक्षेपार्ह काहीतरी आहे हे मला कळले तरी. भविष्यात तो ही एक फायदा आहेच की माझ्यासाठी ;) . अरे , पण किमानपक्षी टीका/टिप्पणी/संवाद/वाद मला कळवाल की नाही. (लिंकेची एक खरड ! ) बाकी काही ही म्हणा मुळ चर्चा काय ? ती दुसरीकडे नेतात काय ? लोल. दुसरी बाब म्हणजे गेल्या काही दिवसात आलेल्या धाग्यांवरुन आणि एकदा आपल्याशी फोनवर झालेल्या चर्चेतुन, मला एक गोष्ट चांगलीच कळली आहे की हल्ली प्लॅनिंग करुन धागे लिहीले जातात व नंतर त्यावर प्रतिसांदाच ही गॅट-मॅट चालत. सरळसोट पणे काही आयडीची नावे घेउ शकतो पण तसे करायचे टाळत आहे. (हा धागा, त्याचा विषय आणि त्यावर आलेले प्रतिसाद हे पाहुन मला स्पष्टपणे तशी प्रचिती आली आहेच.)ही गोष्ट सामान्य मिपाकराला देखील कळते. मला त्या विषयी काही ही वाटत नाही . आणि घेणे- देणे ही नाही. नाही म्हणजे कंपु असतो, समविचारी असतात, चर्चा घडाव्यात वगैरै वगैरै लो- लॉजिकल गोष्टी आहेत. असु द्या.पण उगाच एक वाक्य उचलुन दुसर्‍याला डिवचुन देउन टिआरपी गोळा करण्याचे धंदे आहेत असे मला वाटणे स्वाभाविक आहे. (काही बिचार्‍या आयडीज ला टिआरपी साठी काय-काय करावे लागते राव ! ) एखाद्या गोष्टीला सपोर्ट करणे आणि चमचेगिरी करत फिरणे या दोन भिन्न बाबी आहे असे माझे मत आहे. आणि जर विरोध(त्याच प्रकारे त्या आयडीचा विरोधही मान्य !) नाही केला तर माझ्या विषयी ही गैर-समज पसरले जातील . उद्या माझ्यावर फुकट नेट वापरून देश नि राष्ट्र नि संस्कृतीप्रेमाच्या गफ्फा नि गर्जना करतोय असा आरोप झाला तर ? तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे , कदाचित भाषा वापरताना घोळ झाला असावा, मी प्रतिसाद खेळकर पणानेच दिला आहे. शिवाय असे वाक्य वापरु नयेत अशी विनंती ही केली आहे. अर्थात चर्चा केली असती, पण त्या आयडीच्या आडमुठेपणा बद्दल मिपाच काय , पण समस्त आंतरजालाला कल्पना आहे. मग मी का माझे टंकनश्रम वाया घालवु , म्हणुन थोडक्यातच लिहीले. आता कंसातल्या वाक्या बद्दल, आपले आणि त्या आयडी चे संबध चांगले आहेत, (माझे नाहीत हे ही जग जाहीर आहे.) माझे आणि आपले संबध चांगले आहेत हे ही जग-जाहीर आहे. म्हटल तुमच्याशी भेट झाल्यावर , चर्चा करुयात आणि एकदाचा सोक्ष-मोक्ष लावुन टाकुयात असे वाटले होते. पण आपला असा प्रतिसाद वाचुन मनात भेट घ्यावी की नाही अशी शंका यायला लागली आहे. असो . माझा पुर्णविराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sun, 01/09/2011 - 12:25 नवीन
कदाचित भाषा वापरताना घोळ झाला असावा, मी प्रतिसाद खेळकर पणानेच दिला आहे.
ओके. जाड ठसा माझा. तिथे विषय संपला. :) प्रतिसादातील मुद्यांविषयी माझे मतभेद आहेत, ते आपण प्रत्यक्ष बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
प
पंगा Sun, 01/09/2011 - 06:07 नवीन
"पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्‍यावर दिसणार नाही*, उलट माज दिसेल**." अशासारखी वाक्य काय दर्शवतात?
मी सांगू, मी सांगू? काय दर्शवतात ते? अनेक शक्यता डोळ्यांसमोर येतात. - अशी वाक्ये फेकणार्‍याला स्वतः होऊन घरात काहीही करावे लागलेले नाही. (बहुधा सर्व आयते मिळालेले आहे.) - अशी वाक्ये फेकू शकणार्‍याच्या आईने बहुधा आयुष्यात कधीही नोकरी केलेली नसावी (गृहिणी असावी***), आणि म्हणून समस्त स्त्रीजातीकडून त्याच्या तशाच (अवास्तव) अपेक्षा आहेत. - अशी वाक्ये फेकणारा पुराणमतवादी (आणि बहुधा जुन्या पिढीतला****) आहे. - अशी वाक्ये फेकणारा महामूर्ख आहे. *****, ****** ठीक आहे. असतात जगात महामूर्ख. पण त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचे, त्याचा आपल्याच डोक्याला कितपत त्रास करून घ्यायचा, हा प्रश्न आहे. (थोडक्यात, याचा संबंध जीडीपीशी का जोडा?) बाकी चालू द्या. ================================================================== * शंका: यात लाज वाटण्यासारखे नेमके काय असते? ** सौंदर्याप्रमाणेच माज हाही पाहणार्‍याच्या दृष्टीत असावा का? *** म्हणजे गृहिणी असण्यात काही गैर आहे असे म्हणण्याचा उद्देश नाही. पण त्याचे असेही साइडइफेक्ट्स होऊ शकतात कधीकधी. **** जुन्या पिढीतील सर्वच लोकांचे विचार असेच असतात असे म्हणण्याचा मुळीच उद्देश नाही. ***** या वाक्याच्या बाबतीत मात्र सामान्यीकरणाचा गुन्हा सपशेल मान्य आहे. ****** आधीच्या शक्यतांपैकी कोणतीही जमेस धरल्यास, किंवा न धरल्याससुद्धा, ही शक्यता बोनस म्हणून मोफत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शिल्पा ब Sun, 01/09/2011 - 06:46 नवीन
मलातर हा प्रकार काहीच समजला नाही.... कोणत्याही पुरुषाला आणि स्त्रीला किमान डाळ भात आणि वरणाला फोडणी तरी द्यायला येता हवीच...त्यासाठी preservatives घातलेले पाकीट कशाला हवे...कितीक वेळ लागतो वरण भात बनवायला? यावरून इतकी खडाजंगी? आश्चर्य वाटले..स्वतःचेच पोट भरायचा सोपा अन घरगुती उपाय आहे हा...त्यात कसली लाज अन कशाचा माज ? अन असेही ते पाकीट कितीक जणांना पुरे पडते? काहीही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
आ
आजानुकर्ण Sun, 01/09/2011 - 10:34 नवीन
रेडी टू कुक पदार्थ चांगले लागत नाहीत. घरी वरणभात बनवायला फारसे कष्ट पडत नाहीत. साधे वरण, भात, लिंबू, (रेडी टू ईट) तूप असे पदार्थ खाल्यास वरणाला फोडणी द्यायचीही गरज पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
पंगा Sun, 01/09/2011 - 16:45 नवीन
रेडी टू कुक पदार्थ चांगले लागत नाहीत. घरी वरणभात बनवायला फारसे कष्ट पडत नाहीत. साधे वरण, भात, लिंबू, (रेडी टू ईट) तूप असे पदार्थ खाल्यास वरणाला फोडणी द्यायचीही गरज पडणार नाही.
सर्व मुद्द्यांवर व्यक्तिशः सहमत आहे (विशेषतः अधोरेखित मुद्द्याशी, तुलनात्मकदृष्ट्या), पण येथे तो मुद्दा नाही. प्रश्न असा आहे, की एखाद्याला (यात 'एखादी'चाही समावेश व्हावा) कोणत्याही कारणासाठी रेडीटूकूक पदार्थ आणणे आपल्या पथ्यावर पडते असे वाटत असेल (कोणत्याही कारणासाठी - मग ते सोय म्हणून असो किंवा वेळ नाही म्हणून असो किंवा रेडीटूकूक पदार्थांची चव आवडते म्हणून असो), तर अशी व्यक्ती हीन आहे हे (केवळ अशा व्यक्तीची शॉपिंगकार्ट पाहून) इतरांनी काय म्हणून ठरवावे? किंवा त्या व्यक्तीला लाज वाटायला हवी अशी अपेक्षा काय म्हणून करावी? किंवा अशा व्यक्तीला माज आहे हे कशावरून ठरवावे? हा अधिकार इतरांना नेमक्या कोणत्या धर्मवचनाने दिला? 'माइंडिंग वन्स ओन बिझनेस' ही दुर्दैवाने दक्षिण आशियाई खासियत नाही. असो. (बाय द वे, आमच्या घरीही आम्ही क्वचित कधीमधी फ्रोझन, रेडीटूमायक्रोवेव पदार्थ आणतो. तितकेसे चांगले लागत नाहीत हे माहीत असूनही. आता नेमक्या अशा दिवशी आमच्या शॉपिंकार्टेत नाक खुपसून कोणी जर मला - आणि विशेष करून माझ्या पत्नीला - स्वयंपाक येत नाही, त्याची लाज वाटत नाही आणि त्याबद्दल माज आहे असा निष्कर्ष काढला, तर काढो बापडा. तथ्य काय आहे याबद्दल जोपर्यंत मला आणि माझ्या पत्नीला माहीत आहे, तोपर्यंत त्याची फिकीर आम्ही काय म्हणून करावी?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
पंगा Sun, 01/09/2011 - 18:38 नवीन
कोणत्याही पुरुषाला आणि स्त्रीला किमान डाळ भात आणि वरणाला फोडणी तरी द्यायला येता हवीच...
असे नेमक्या कोणत्या धर्मग्रंथात लिहिले आहे बरे? नाही म्हणजे, व्यावहारिकदृष्ट्या किमान डाळभात आणि वरणाला फोडणी देता येणे हे उपयुक्त आहे याबद्दल वाद नाही. आणि म्हणून आल्यास हितकरच. पण म्हणून एखाद्याला/एखादीला येत नसेल, तर त्यात हिणवण्यासारखेही काही आहे असेही वाटत नाही. शेवटी ज्यानेत्याने (यात 'जिनेतिने'चाही समावेश व्हावा) आपापल्या पोटात काय ढकलावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत रेडीटूकूक वापरणारे (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) 'आमचीच पद्धत श्रेष्ठ (तुम्हीही हेच करा, नाहीतर तुम्ही स्वयंपाक - सैपाक नव्हे! - करता म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी)' म्हणून काहीही कारण नसताना आपण होऊन सांगायला येत नाहीत, तोपर्यंत इतरांना यात लाज किंवा माज पाहण्याचेही काही कारण नसावे, नाही का? (हे थोडेसे 'शाकाहारी श्रेष्ठ (आणि मांसाहारी/मत्स्याहारी हीन), की मांसाहारी/मत्स्याहारी श्रेष्ठ (आणि शाकाहारी हीन)'च्या वळणावर जात नाही काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sun, 01/09/2011 - 19:44 नवीन
धर्मग्रंथ कशाला पाहिजे त्याला...हे मराठी संस्थळ आहे आणि मराठी लोक वरण भात खातातच म्हणून हा साधा सोपा घरगुती उपाय आहे ते सांगितलं...मी कोणालाही हिणवले नाही , अजूनतरी...पण अगदीच वरणाच पाकीटसुद्ध लोक घेतात तेव्हा आश्चर्य वाटते असं म्हटलंय ...इतर दुसर्या देशात त्यांचा एखादा साधा सोपा पदार्थ असेल तो त्यांना बनविता यावा त्यात हिणवण्यासारखं अन हिणवुन घेण्यासारखं काय हेच मला समजले नाही...आणि तसंच म्हणायचं तर कोणी काय घालावं, काय खावं वगैरे वैयक्तिक गोष्टीच आहेत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Sun, 01/09/2011 - 20:04 नवीन
पण अगदीच वरणाच पाकीटसुद्ध लोक घेतात तेव्हा आश्चर्य वाटते असं म्हटलंय
वाटत असेल कोणाकोणाला सोयिस्कर. किंवा नसेल वेळ बनवत बसायला. (फार वेळ लागत नाही हे मान्य केले तरीही.) किंवा संध्याकाळी बाहेरून कामावरून वगैरे आल्यावर कुकर लावायचा येत असेल कंटाळा. किंवा इतर काहीही कारण असेल. कोण कसा विचार करेल, कोण कसा जगतो आणि कोणाला काय वाटते याची आपल्याला काय माहिती असते आणि आपण काय म्हणून ठरवणार? आणि आश्चर्य तरी का करावे? त्यांना ठीक वाटते तर करू द्यात की.
मी कोणालाही हिणवले नाही , अजूनतरी.
आपल्यावर असा आरोप केलेला नाही, करण्याचा उद्देशही नाही. पण हिणवणारे दिसतात. इथेही.
त्यात हिणवण्यासारखं अन हिणवुन घेण्यासारखं काय हेच मला समजले नाही...आणि तसंच म्हणायचं तर कोणी काय घालावं, काय खावं वगैरे वैयक्तिक गोष्टीच आहेत नाही का?
हेच म्हणायचे आहे. पण हिणवणार्‍याने जर हिणवले, तर ज्याला हिणवले तोही कधी ना कधी हिणवून घेण्याची शक्यता असतेच, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/10/2011 - 02:18 नवीन
फक्त स्वयंपाकाचा कंटाळाच नव्हे तर कार्यबाहुल्य, आजारपण, त्यातून येणार थकवा, परीक्षा, अचानक आलेले पाहुणे, तासभर प्रवासाच्या अंतरावरही भारतीय रेस्तराँ उपलब्ध नसल्यामुळे रूचिपालट या सगळ्या कारणांसाठी मी रेडी-टू-कुक पाकिटं वापरली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसर्‍या देशात काही वर्षांसाठी जाताना नवीन घरात गेल्या-गेल्याच किती सामानसुमान मिळेल याची कल्पना नसणं. १५ ते २९ तास प्रवास केल्यानंतर, झोपेचा प्रचंड बॅकलॉग असताना पॉपकॉर्न खाऊन झोपण्यापेक्षा एम.टी.आरचा दाल-तडका खाऊन झोपणं मला कधीही आवडेल. अगदी काही आठवड्यांसाठी किंवा दिवसांसाठीही बाहेरच्या गावी आणि/किंवा देशात कॉन्फरन्सेसना जातानाही माझ्या चवीढवीचं आणि शाकाहारी जेवण मिळणार नाही अशी खात्री असली तर मी थोडं रेडी-टू-कुक किंवा रेडी-टू-ईट पाकिटं बाळगली आहेत. अन्यथा एवढं मसालेदार, तेलकट, तिखट जेवण जेवण्याला माझी प्रथम पसंती नसतेच. इतर दक्षिण आशियाईंबद्दल माहित नाही, पण दुसर्‍याच्या सामानात, खरेदीत, घरात, आयुष्यात नाक खुपसण्याची सवय भारत आणि भारतीयांमधे होलसेलमधे आढळून आली आहे हे खरंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
स
सुहास.. Mon, 01/10/2011 - 07:16 नवीन
इतर दक्षिण आशियाईंबद्दल माहित नाही, पण दुसर्‍याच्या सामानात, खरेदीत, घरात, आयुष्यात नाक खुपसण्याची सवय भारत आणि भारतीयांमधे होलसेलमधे आढळून आली आहे हे खरंच! अगदी अगदी , आणि ते करुन झाल की विकीपिडीयात नाक खुपसायच, असले धागे काढायचे, त्यावर दळणं दळायची, मग दुसर्‍याच्या लेखात नाक खुपसायच , टिआरपी करिता ढापा-ढापी करायची , शिवाय चेपु, फार्मव्हिले वर नाक खुपसायच . काय कराव ब्वा या भारतींयाच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
इ
इन्द्र्राज पवार Sat, 01/08/2011 - 18:01 नवीन
धागाकर्ते श्री.घासकडवी, तसेच या विषयावर विस्तृत आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणारे सर्वश्री क्लिंटन, मोडक यांचे विचार आणि उदाहरणे वाचल्यानंतर मनी काही प्रश्न निर्माण होत आहेत. असे दिसत आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर जीडीपीमुळे दूरगामी परिणाम होत असतात. जीडीपीमुळे प्रॉड्क्टची मार्केट व्हॅल्यू ठरत असेल तर मग समाजातील एक विशिष्ट वर्ग अर्थव्यवस्था आपल्या लहरीनुसार कमीजास्त करू शकेल का? 'सर्व्हायवल ऑफ दि फिटेस्ट असे तत्वज्ञान जगभर स्वीकारले जात असेल तर एका खंडप्राय देशाची अर्थव्यवस्था यामुळे अगतिकतेकडे झुकू लागेल (आजचे ताजे 'कांद्याचे' उदाहरण आहेच समोर, कितीही डोळ्यात पाणी आणले तरी समाजातील अगदी शेवटचा घटक कांद्याशिवाय स्वयंपाक करूच शकणार नाही....आणि "नसेल परवडत कांदा तर वापरू नकोस..." असे 'नसेल ब्रेड तर केक खा.." म्हणण्यासारखे होईल.) जीडीपीच्या सावलीत राहायचे झाल्यास समाजातील जो एक २०-२५ टक्के श्रीमंत व अतिश्रीमंत एवढा भाग इतरांपासून मानसिक आणि आर्थिक स्थितीनुसार वेगळा होत जाईल, आणि तोच उरलेल्या ७० टक्क्याला विषमतेच्या गर्तेत लोटेल का? असे असेल तर चित्र २५ टक्क्यांचा "इंडिया" आणि ७५ चा "भारत" अशी भीती यामुळे वाटत राहिल. हे मान्य की, देशाच्या आर्थिक प्रगतीचे एक गमक म्हणजे देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन यावर जीडीपीची बाहुली नृत्य करीत असते. अर्थशास्त्र असेही सांगत असेल की, यामध्ये जितकी वाढ होईल, तितकी देशाची आर्थिक प्रगती झाली असे समजू शकतो. पण मग ज्याच्याकडे क्रयशक्ती अधिक, ते वापरत असलेल्या वस्तू व सेवानाच अधिक मागणी राहिल आणि बाजारात त्याच प्रमेयानुसार पुरवठा वाढता राहिल्याचे दृश्य दिसणार. ही केमिस्ट्री कार, टू व्हीलर्स, मोबाईल, फ्रीझ, टीव्ही, एसी, म्युझिक सिस्टिम्स, ट्रॅव्हलिंग, मॉल्स, मल्टीप्लेक्स याना सहज लागू होत आहे हे उघडच आहे; म्हणजेच जीडीपीचा तक्ता असे सिद्ध करेल की या देशात फक्त श्रीमंतांना लागणार्‍या उत्पादनांचे प्रमाण वाढत राहिल. वाढता शेअरबाजार, ब्रोकरिंग, सट्टेबाजी संबंधित जे व्यवहार आज चढत्या भाजणीचे दिसत आहेत त्यांचे प्रमाण नजिकच्या भविष्यकाळात उत्पादनाशी निगडित असलेल्या व्यवहारांपेक्षा जास्त होतील असा जो समज सर्वसामान्य जनतेत आहे तो साधार आहे का? श्री.क्लिंटन यानी वर गव्हाच्या पिठाचे उदाहरण दिले आहे. त्याचा जीडीपी संस्था पातळीवर काढायचा ठरविल्यास तो विदा मिळूही शकेल पण तसे जर झाले तर "इंडिया" तील २५ टक्के, ज्यांची क्रयशक्ती आता अफाट आहे, ते गव्हाचे पीठ 'भारता"तील ७५ टक्क्यांना विदाच्या आधारे परवडण्यासारख्या दराचे करूच शकणार नाहीत. त्यामुळे अशा विदा गोळा करण्याचे कारणच काय, असेही वाटू लागेल. शिक्षण क्षेत्रातील सुविधांची ही दरी आत्ताच प्रचंड प्रमाणावर वाढू लागली आहे. आज वर्षाला १ लाख रूपये ट्यूशन फी देवून पाल्याला तिसर्‍या वर्षीच खाजगी [सो कॉल्ड रेसिडेन्शिअल/कॅम्पस स्कूल] शाळेत घालणारे पालक मुंबई-पुणे-नागपूर-नाशिकच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली शहरातही झपाट्याने वाढत आहे हे द्योतक जीडीपीचे असेल तर ही इंडियापासून भारत अलग होण्याचीच लक्षणे आहेच. (इथे कोल्हापुरात पन्हाळा किल्ल्यावर असलेल्या अशा एका शाळेत [१.५ लाख रुपये फी] दोन वर्षे अगोदर नंबर लावावा लागतो. त्यामुळे याच गडावर शेजारच्या जि.प.च्या मोडक्या शाळेत गमभन शिकणारा रामा, त्या फोर्ट स्कूलमधील राजेशच्या मागे कित्येक योजने कायमपणे मागेच राहणार...तिथे जीडीपीचा विदा काय उपयोगात येणार?) असो. मला अर्थशास्त्रात गती नाही (अभ्यास तर नाहीच), पण त्यामुळे समाजशास्त्रावर काय दूरगामी परिणाम होऊ शकतात हे काहीसे उमजून चुकले या चर्चेतून. इन्द्रा
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/08/2011 - 19:44 नवीन
धन्यवाद इंद्रा.
जीडीपीमुळे प्रॉड्क्टची मार्केट व्हॅल्यू ठरत असेल तर मग समाजातील एक विशिष्ट वर्ग अर्थव्यवस्था आपल्या लहरीनुसार कमीजास्त करू शकेल का?
जीडीपीमुळे प्रॉडक्टची मार्केट व्हॅल्यू ठरत नाही तर महागाई या घटकाचा विचार केला तर प्रॉडक्ट व्हॅल्यूपेक्षाही पूर्ण अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तू आणि सेवा दिल्या जातात आणि त्या किती प्रमाणावर यावर जीडीपी अवलंबून असते.आपल्याला वरकरणी दिसतो तो आकडा पूर्ण अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवा यांचाच निर्देशक असतो.तेव्हा समाजातील एक विशिष्ट वर्ग अर्थव्यवस्था आपल्या लहरीनुसार कमीजास्त करू शकेल का? यात तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे हे समजले नाही.
तर चित्र २५ टक्क्यांचा "इंडिया" आणि ७५ चा "भारत" अशी भीती यामुळे वाटत राहिल.
समाजात विषमता वाढत आहे हे तर समोरच दिसत आहे.त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही.तरीही गरीब सगळे चांगले आणि श्रीमंत सगळे हलकट हा टिपीकल समाजवादी विचार मला तरी मान्य नाही.
मग ज्याच्याकडे क्रयशक्ती अधिक, ते वापरत असलेल्या वस्तू व सेवानाच अधिक मागणी राहिल आणि बाजारात त्याच प्रमेयानुसार पुरवठा वाढता राहिल्याचे दृश्य दिसणार.
हे मला १००% मान्य नाही.पूर्वी १९७० च्या दशकात लोकांकडे इतका पैसा नसे.तेव्हा घरोघरी नोकर नसत.पण जसा लोकांकडचा पैसा वाढला त्याप्रमाणे घरोघरी नोकर ठेवायचे प्रमाणही वाढले.लोकांकडे गाड्या आल्या तशी गॅरेजची गरजही वाढली.गॅरेजचे मालक श्रीमंत असतात हे मान्य पण तिथे कामाला असलेले लोक तर तेवढे श्रीमंत नसतात ना?गाड्यांचा खप वाढला त्याप्रमाणे वाहन-उद्योगाशी निगडीत सगळ्या (प्रत्यक्ष वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या,स्टील,रबर इत्यादी) क्षेत्रांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांसाठी नोकऱ्याही वाढल्या.गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या त्याबरोबरच वीटभट्ट्या, रंगकाम,सुतारकाम,बांधकाम मजूर,टाईल्स कापणारे अशा नोकऱ्याही वाढल्या.मॉल वाढले त्याप्रमाणे मॉलमध्ये हेल्परच्या नोकऱ्याही वाढल्या.जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढली तितक्या प्रमाणात या नोकऱ्या वाढल्या नाहीत हे १००% मान्य.तसेच महागाईमुळे या वर्गाची मोठी अडचण झाली हे अमान्य करता येणारच नाही.पण केवळ श्रीमंत लोक वापरतात त्याच वस्तू आणि सेवांना मागणी अधिक राहिल हे मत म्हणूनच मला १००% मान्य नाही.
वाढता शेअरबाजार, ब्रोकरिंग, सट्टेबाजी संबंधित जे व्यवहार आज चढत्या भाजणीचे दिसत आहेत त्यांचे प्रमाण नजिकच्या भविष्यकाळात उत्पादनाशी निगडित असलेल्या व्यवहारांपेक्षा जास्त होतील असा जो समज सर्वसामान्य जनतेत आहे तो साधार आहे का?
आहेच.या संदर्भात दोन गोष्टी आहेत. १.शेअर बाजाराच्या नावाने अनेक लोक खडे फोडतात पण शेअर बाजार आहे म्हणून किमान ३५०० कंपन्यांना अधिक विस्तार करायला वाव मिळाला.नुसते बॅंकेचे कर्ज घेऊन वाढण्यावर मर्यादा असतात. एकाच उद्योगाला बॅंक एका मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देऊ शकत नाही.तेव्हा अशा उद्योगांनी शेअरबाजारातून पैसे उभे केले आणि ते पुढे गेले.या ३५०० कंपन्यांमध्ये लहान कंपन्यांपासून लाखांना नोकऱ्या देणाऱ्या इन्फोसिस, रिलायन्स यासारख्या मोठ्या कंपन्याही आहेतच. २. शेअरबाजारात लोक यशस्वी होतात त्याप्रमाणे मारही खातातच.अगदी वर चढणाऱ्या शेअरमार्केटच्या दिवसातही भरपूर नुकसान झालेले लोक दिसतील आणि पडत्या मार्केटमध्येही पैसा कमावणारे मुरब्बी लोकही दिसतील.एकूणच बऱ्याचदा हा ’झिरो सम गेम’ असतो.त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान त्यात होईल असे मला तरी वाटत नाही.याला अपवाद आहेतच. उदाहरणार्थ धान्यांच्या व्यवहाराशी काही संबंध नसलेले लोक त्यावर सट्टा करून पैसा कमावतात आणि धान्यांच्या किंमती वर घालविण्यात त्यांचा वाटा असतो.अशा गोष्टींना जरूर बंदी घालावी पण सरसकट शेअरबाजार वाईट हे मला तरी पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Sun, 01/09/2011 - 09:37 नवीन
श्री.क्लिंटन यांच्या वरील प्रतिसादातील एकदोन मताबद्दल मी इथे खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. पण माझ्या खुलाशाचा आणि मूळ धागा विषयाचा काही संबंध नसल्याने कदाचित थोडेसे अवांतर होईल, तरीही त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज नको म्हणून हा प्रतिसाद : "....तरीही गरीब सगळे चांगले आणि श्रीमंत सगळे हलकट हा टिपीकल समाजवादी विचार मला तरी मान्य नाही....." ~ तुमचे हे मत तर माझेदेखील आहेच आहे, क्लिंटन. मी कुठेही 'गरिबांच्या गरीबी' विषयी कळवळा व्यक्त केलेला नाही (इथेच असे नव्हे तर कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेतही मी 'गरीबोंकी सुनो..." असल्या विषयाविरुद्ध मते मांडली होती). या जगात सर्वांना समान संधी आहेत आणि त्या तुमच्या दारात, अगदी उंबर्‍याजवळ येऊनही त्या स्पर्शू शकला नाहीत तर 'आम्ही गरीबच राहिलो' असा व्यर्थ टाहो फोडणारे तितकेच कर्मदरिद्री आहेत आणि अशांची सांप्रत भारतदेशात कमतरता नाही. त्यामुळे त्यांच्या "उद्याच्या सूर्या" विषयी आपण चिंता करणे म्हणजे त्याना आणखीन पांगळे करण्यासारखे आहे (By giving one, you are creating ten हे सूत्र मान्यच करायला हवे). तुम्हाला मला हेही चांगलेच माहिती आहे की, कुठे काही एखादे चांगले [तसेच खर्चिक] शिल्प वगैरे चारचौघांनी कष्टाच्या पैशातून उभे केले तर टपून बसलेले कळकळीचे कार्यकर्ते लागलीच मिडीयाकडे धाव घेत, 'हा पैसा गोरगरिबांसाठी खर्च केला असता तर?" असा गळा काढतात. बरे, हे गरीब कलियुगातच नव्हे तर राम आणि कृष्णाच्या सत्य्/द्वापार युगातही मौजुद होतेच ना? लाखो एकर जमिन सहज उपलब्ध असताना त्या दरिद्री सुदामरावाला एकदोन एकर शेतीसाठी नाही आणि म्हणून त्याची बायको त्याला कृष्ण मित्राकडे याचनेसाठी पाठविते आणि हजारो गायीगुरे माळावर मोकाट हिंडत असतानाही कौरवपांडवाच्या गुरुदेवाला मुलासाठी पिठाचे पाणी दूध म्हणून द्यावे लागते. यामुळे वाचकाला दु:खाचा उमाळा फुटत असेलही पण दुसरीकडे त्या काळातही सुदाम्याला कसायला जमीन कशी नसेल, वा गुरूच्या दारी एखादी कपिला नसण्याचे कारण काय असेल? याची शहानिशा न करता 'गरीबांसाठी आपण नेहमीत काहीतरी देत राहावे' अशी जी सोयिस्कर शिकवण आमच्या माथ्यावर त्या ग्रंथांतून मारली गेली आहे, हजारो वर्षे, त्याचेच फलित आजही दिसतेच आहे. टाटासारखा एक श्रीमंत लाखांच्या संख्येत रोजगार निर्मिती करू शकतो, हे त्यांच्या श्रीमंतीचेच फळ असल्याने, त्यांच्या बाजूने कुणी मत मांडले तर ते स्वीकृतच आहे. त्यामुळे मी माझ्या प्रतिसादात जीडीपीच्या व्याख्येवर जे मत मांडले आहे त्यात श्रीमंत आणि गरीब यांच्यात त्यायोगे वाढत जाणारे अंतर स्पष्ट होणे आणि सर्वसाधारणपणे चैनीच्या समजल्या जाणार्‍या वस्तूंना आहे मार्केट म्हणून त्या इंड्स्ट्रीज भरभराटीला आल्या म्हणजे भारताची आर्थिक प्रगती कमालीची झाली असे जे चित्र नजरेसमोर येत आहे त्याबाबतच त्या भेदाची मर्यादा दाखविणे इतपतच मर्यादित. यात समाजवादाचे पाते आणण्याची माझा बिलकुल इरादा नव्हता आणि नाही. "...पण सरसकट शेअरबाजार वाईट हे मला तरी पटत नाही...." ~ होय. मान्य. पण "फक्त शेअरबाजारातून तुम्ही श्रीमंत वा अधिक श्रीमंत होऊ शकता" असे जे काही [धूसर का होईना...] लॉबीईंग स्पेशल चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातून हरदिनी हरघडी मारले जात आहे हल्ली, ते चिंतनीय आहे, कारण 'रिस्क फॅक्टर' अंधारात ठेवले जातात, एवढेच मला म्हणायचे होते. पण शेवटी ज्याची सुरी त्याचीच मान असेल तर दुसर्‍याने त्याची काळजी का करावी, हेदेखील आहेच. सबब, माझ्या प्रतिसादात तुम्हाला शेअरबाजाराबद्दल मी काहीतरी डावे लिहिले आहे असे प्रतीत झाले असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहे. धन्यवाद इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा