काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. >>>>
कुठला समाज ? इथे सांगण्यासारखा नसेल तर व्यनी कर !!
!!
मिपाकरांना काय वाटते? >>
मला एका वर्षापुर्वी अश्याच स्वरुपाचा प्रश्न पडला होता की वयात यायचे वय कमी असावे का ?
कारण तुला सांगतो. मी दररोज रात्री जाताना रेडियोवर ' नॉटी नाईट्स' नावाच शो एकत असे. लोकांचे काही नॉटी सिक्रेट्स आणि काही सल्ले आणि काही जुनी गाणी , अश्या स्वरुपाचा कार्यक्रम , त्या कार्यक्रमात फोन आला. आर जे च नाव आठवत नाहीये , झोया असाव बहुतेक !!
" हाय झोया, मैं १५ इयर्स की हुं और मेरा बॉयफ्रेंड १६ का है , हमारा 'झिगी-विगी' हो गया है , और हम लिव्ह-इन करना चाहते है !! "
झोया ने काय केले ते सांगत नाही, पण मला खरच प्रश्न पडला की वयात यायचे वय कमी असावे का ? नाहीतरी शाळेच्या बाहेर, शाळा सुटल्यावर एखाद तरी ' जोडप ' दिसतच की ?
वयात यायच सरकारी वय १८ आणि २१ आहे , ते शास्त्रीय दृष्ट्या ते बरोबर ही असेल . पण त्याला अपवाद नसु शकतात का ?
लग्न ही सेक्स साठी आवश्यक अट नसावी असे विचारवंत म्हणतात ना ! आणि तसेही कुटुंब व्यवस्था छळ या एकमेव पायावर उभी असल्याचे सुद्धा त्यांचे म्हणणे आहे. समाजाला प्रगतीशील बनवायचे तर हे करावेच लागेल असे ते म्हणतात ब्वा !
सहमत आहे. आर्षकाळातील आपल्या पूर्वजांचे राहणीमान सगळ्यात उच्चं होतं असं त्यांना वाटत असावं.
(आर्षकाळ वगैरेच्या अधिक माहीतीसाठी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचावा)
मी तर म्हणतो ए टु झेड पोरा-पोरींना "प्रजापिता ब्रम्हकुमारीचे ॐ शांती " ह्या इश्वरीय कम्युनिटी चे सदस्य बनवावे. म्हणजे सगळेच ब्रम्हकुमार आणि ब्रम्हकुमारी होतील. तिथे गेले की नॉनव्हेज सोडा , कांदा-लसुन पासुन पण मुक्ती घ्यायला लावतात. सगळेच भाई-जी आणि बहन-जी असतात. सगळ्या तामसी गुणांपासुन परावृत्त करुन एका मानसिक शांतीची अनुभुती होते असे समजले जाते.
सगळी मुलं-मुली एकदा ब्रम्हकुमार/कुमारी झाले की ... ना रहेगा बांस .. ना बजेगी बासुरी .. आणि ना रहेगा ताल ना बजेगा तबला.
- (ब्रम्हकुमार) टारझन भाई
तंबु २०१, जमुना चोटी,पाचवे शिखर , माउंट अबु , राजस्थान
लेखात वय आणि वागणे ह्याचा संबंध जोडला आहे का नाही.
आहे.
तुमच्या मूळच्या प्रतिसादात वयाबद्दल काही आहे का?
नाही.
>>>मुक्त वागण्याचे शेवटी फलीत काय होते हे तुम्हाला माहीत नाही का?
भुल गया रबड.. असं काहीसं काही ट्रकच्या मागे लिहिलेले असते ब्वा !
हेच कि प्रजापिता ब्रम्हकुमार कुमारी हे १मेकान्शी लग्न करु शकत्त्तात
ते टेम्परवरी अपत्यप्राप्तीसाठी एकत्र येउ शकत्तात
पन एरवी त्यानी बहिन भाउ प्रमाने वर्तन करावे असा
हेच कि प्रजापिता ब्रम्हकुमार कुमारी हे १मेकान्शी लग्न करु शकत्त्तात
हे ब्रम्हज्ञान तुम्हाला कुठे प्राप्त झाले मुलुखावेगळ्या काकु ?
ब्रम्हकुमारीचा आश्रम आमच्या इथे जवळंच आहे. आणि बहुसंख्य ओमशांतीकर आम्च्या ओळखीचे आहेत. "पुर्ण ब्रम्हचर्याचा" पुरस्कार करणारा हा पंथ आपत्यप्राप्ती साठी टेंपररी एकत्र येतात हा अत्यंत चुकीचा आणि गैरसमज पसरवणारा गंभीर मुद्दा आहे. कृपया संदर्भ द्यावा. कुठुन माहिती मिळाली आपल्याला ही ? ऐकीव असेल तर ...
लोकांना विनाकारण फेकायची सवय असते आणि असल्या गोष्टी तर जास्तंच .. तेंव्हा तुम्ही असल्या गोष्टींवर विषवास ठेवतात , अंमळ रोचक वाटले !
ही माहीती पुर्ण चुकीची आहे.
धन्यवाद.
ब्रम्हकुमारीज मधे कोणत्याही गोष्टींची बंधने "लादत" नाहीत. हे अभिनव कपल एकटं असेल त्याचा अर्थ असा निघत नाही की ब्रम्हकुमारीज ची ती पॉलिसी आहे.
फोन नंबर कशाला ? :) अचरट ;)
ब्रम्हकुमारीज मधे कोणत्याही गोष्टींची बंधने "लादत" नाहीत. हे अभिनव कपल एकटं असेल त्याचा अर्थ असा निघत नाही की ब्रम्हकुमारीज ची ती पॉलिसी आहे.
फोन नंबर कशाला ? Smile अचरट Wink
तेच तर म्ह्नतेय
बन्धन नाहीये
सूट आहे ही
आनि असे केल्याव्र त्या कपलला वाळीत टाकत नाहेत
नम्बर त्यान्चा बरे का माझा नव्हे
लहान वयात लग्न, अपुरे ज्ञान याने प्रश्न सुटणार की वाढणार? लवकर लग्न करा हा काही उपाय नाही. उलट लहान मुलींना घरातच बांधुन ठेवणे, छळणे, पर्यायाने स्त्रीयांवर बंधने आणणे वाढेल.
तर त्यापेक्षा लैंगिक शिक्षण व गर्भनिरोधक साधनांबद्दल चर्चा करा.
तंबाखू विरोधी प्रदर्शनात जसे दुष्परिणाम, उपाय दाखवले असतात. फुफ्फुस, मौखीक कर्करोगाचे भीषण छायाचित्रे असतात. तशी लैंगीक शिक्षणा, प्रदर्शना मार्फत वयात येणार्या मुला-मुलींना (पार घाबरवुन सोडणारी ) माहीती दिली तर आपसूक बहुसंख्य मुले-मुली काळजी घेतील.
बाकी चालू द्या.
गंभीर विषयावर चर्चा गंभीरपणेच चालावी अशी अपेक्षा.
तशी लैंगीक शिक्षणा, प्रदर्शना मार्फत वयात येणार्या मुला-मुलींना (पार घाबरवुन सोडणारी ) माहीती दिली तर आपसूक बहुसंख्य मुले-मुली काळजी घेतील.
अगदी .. दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. माहिती देतांना मुला-मुलींच्या मनात ह्या विषयी घ्रुणा निर्माण करुन दिली पाहिजे. लहान वयात जर एखाद्या गोष्टीची धास्ती बसली तर ती आजन्म रहाण्याचे चान्सेस आहेत. ह्यामुळे ब्रम्हचर्याचे प्रमाण वाढेल आणि भारताच्या लोकसंख्येला आळा देखील बसेल.
प्रफुल्ल शिलेदार यांची कविता -
घाई
वयात येण्याची घाई झालेली एक मुलगी
नाक उडवत सांगते
घुटके घेत बियर पिण्याचे दिवस गेलेत काका
आता कॅलिफोर्निया ड्राप्स हवेत
घाई झालेला विक्रेता भर रस्त्यात पकडतो
गळ्याभोवतीचा फास
सारखा सैल घट्ट करतो
आजचा शेवटचा दिवसाय शेवटचा
घाई झालेला गायक
फ्रीस्टाईल पोहोत निघतो
छोटय़ा ख्यालाचा गज दिसताच
घट्ट धरून ठेवतो
घाई झालेल्या कवीच्या संग्रहाची
घाईघाईनं केलेली समीक्षा घेऊन
घाई झालेला संपादक
लगबगीनं पळत जातो
घाई झालेला गर्भ
वैतागलेल्या आवाजात विचारतो
बाहेर येऊ देणाराय का बाई?
मोठं होऊ देताय की नाही?
प्रेम दु:ख निराशा वासना द्वेष उल्लास
घाईघाईनं प्रवेश करतात जातात
घाईचे र्सवकष दृश्य
पापणी न उचलता पहात असलेली कविता
जवळ जाताच म्हणते
घे की रे जरा दमानं
आजकाल भविष्यात लग्न ही conceptच शिल्लक राहते आहे की नाही हा प्रश्न मनात येतो.
लग्न हे सेक्ससाठीच ऑफिशियल लायसन्स अस मानणारी पिढी हे बालविवाह वगैरे काय सिरियसली घेणार आहे?
apart from sex realated issues...मानसिक परिणामहि खुप विचारात घेण्या सारखे आहेत.
या वयात आपला लाईफ पार्टनर कसा असावा याबद्दल काहि मत तयार झालेली नसतात... किंबहुना ती अक्कलच नसते.
आणि मोठे झाल्यावर जे लादलं गेलेलं नातं आहे त्याबद्द्ल काँप्लेक्स निर्माण होउ शकतो.. सहजीवन घुसमटु शकतं.
पदरी पडेल ते पवित्र असं मानणारी ही पिढी तर नक्कीच नाही.
आपण आजुबाजुला आजही हे पाहतो...कि प्रेमात पडुन्....किंवा पाहुन सवरून लग्न केलेल्या लोकांनाही ही पश्चातबुद्धी होत असते... कि this is not something which i ws looking for.
मग हे अस काहीतरी करुन मानसिक घुसमट का होउन द्यायची
नातं अस बोझ म्हणुन स्विकारायला लागणं या इतकं त्रासदायक काहिहि नसतं.
एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे
नातं अस बोझ म्हणुन स्विकारायला लागणं या इतकं त्रासदायक काहिहि नसतं.
एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे
देवाने दिलेल्या मेंदुचा थोडा जरी वापर मानसाने केला ना, तरि तो हे नाते अगदि सहज प्रेमाने निभावुन नेवु शकतो. पन आजकाल मानव मेंदु वापरन्या ऐवजि अहं (I am the truth) होतो. त्याचाच परिनाम आहे हा सगळा.
प्रतिसाद खचितच आपल्याला उद्देशुन नाही.
यालाच अहं म्हनतात आनी सगळ्या राड्याची सुरुवातच इथुन होते.
आई वडिलांना सांभाळताना त्यांचे ओझे होते का ? मग बायकोशी प्रेमाने वागताना का बरे ओझे व्हावे ?
आई वडीलांनि आपल्याला जन्म दिलेला असतो, बायको स्वतःचा उभा जन्म आपल्या हवाली करते. याची काहीच कींमत नसते का ?
डोक्यावर वाळुचे ओझे/फुलांचे ओझे, अशि काहीतरि एक कथा ऐकिव आहे.... आपन ओझे कशाला समजतो ते यावर अवलंबुन आहे.
प्रतिक्रिया