अरे वा! सुरेख बातमी! सर्वांचे अभिनंदन.
त्यांची सुटका ही जमेची बाजू झाली. पण ती बिनशर्त झाली कीं कांहीं देवाण-घेवाण झाली आणि असल्यास ती काय आणि किती हे लवकरच बाहेर येईलच.
एकंदरीत सज्जनांची दुनिया आहे असे दिसले.....अशा घटनांमुळे या सर्व प्रामणिक अधिकार्यांना नवा जोम येईल व या नव्या nucleation मुळे अशा अधिकार्यांच्या संख्येत वाढ होईल यात शंका नाहीं. ही एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे, नाहीं का?
जय हो!
त्यांची सुटका ही जमेची बाजू झाली. पण ती बिनशर्त झाली कीं कांहीं देवाण-घेवाण झाली?
अधीकृतरीत्या सांगण्यात आले की १४ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
अनधीकृत काय काय होउ शकते हे मी तुम्हाला सांगायची जरूरी नाही.
सकाळच्या बातमीत तर सगळ्या मागण्या मान्य केल्याचे म्हणले आहे.
माओवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य
भुवनेश्वर - ओरिसातील मलकांगिरीचे अपहृत जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा आणि कनिष्ठ अभियंता पवित्र मांझी यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांनी ठेवलेल्या सर्व 14 मागण्या दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. तसेच कारागृहात असलेल्या श्रीरामल्लू श्रीनिवासल्लू यांच्यासह बारा माओवाद्यांची आज सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अपहृत जिल्हाधिकारी व अभियंता यांची माओवाद्यांच्या तावडीतून येत्या 48 तासांत सुटका होण्याची शक्यता आहे.
http://www.esakal.com/esakal/20110223/5576126469976454026.htm
हा विषय इथे संपू नये. आता सुटला आहात तर हे नविन आदेशाप्रमाणे काम करा, म्हणत पुन्हा अधिकार्यांनी व जनतेला फक्त ऑफीसमधे अथवा परवानगी घेउन अधिकृत ठिकाणीच भेटायचे असे आदेश काढले नाही म्हणजे मिळवले.
दोघांच्या सुटकेचा आनंद आहे. तरीही हा विषय इथे संपू नये. वृत्तपत्रांनी हा प्रश्न, अधिकार्यांचा आदिवासी जिल्हातील जनसंपर्क, प्रवास. अपहरण, वाटाघाटी याचे धोरण तसेच यावेळी नेमके काय काय घडले हे सत्य समोर आणावे.
सर्व प्रशासन जर अधिकारी विनिल प्रमाणे वागले व पोलीस मिलीटरी यांच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा बिमोड केला तर उत्तम. किमान पाच वर्षात हा बीमोड व्हावा. अर्थात सर्व नियोजनबद्द व ठोस फलीत निश्चीत करुनच ही देशव्यापी कारवाई व्हावी. प्रशासनाला या कार्यात शुभेच्छा.
काल मला इमेल मधून ही लिंक आली.
http://www.mimarathi.net/node/5330
त्यात श्रामो म्हणतात
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.
(सविस्तर लेख श्रामोंनीच येथे ठेवावा ही विनंती)
हा लेख म्हणा वा पत्र माहिती मला इमेल मधुन मिळाली म्हणून हा निषेध. आता पुर्ण पत्र येथे ठेवा.
नजर चूक झाली. काल दिवसभर रेषेवर (Online) नव्हतो. आणि ईमेल आधी वाचल्याने मला वाटले की येथे तो ठेवला नाही.
माफी असावी.
संपादक मंडळाला विनंती की तो प्रतीसाद काढून टाकावा.
प्रतिक्रिया