ब्रिगेडी वृत्ती
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ? थोर व्यक्तींचे कार्य त्यांना जनमानसातून पुसता येत नसल्याने ब्रिगेडी लेखक आणि कार्यकर्ते जिवाचा आटापिटा करून त्यां थोर व्यक्तींना शिवीगाळ करत आहेत.शिव्या दिल्या म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसातून खाली उतरली अशी भाबडी समजूत करून घेतात ते .ह्यांची ४-५ रुपयावाली पुस्तके जी खपवत असतात त्यात वाक्याची शेवटी पूर्णविराम नसेल पण शिवी तरी असेलच .आणि बऱ्याच चुका आहेत त्यामध्ये आणि ते त्यामध्ये बिनधास्तपणे ठोकेबाजी करतात ह्याबद्दल गम्मत वाटते .त्यांनी स्वामी विवेकानंदांचे चातुर्वण्यावरचे भाष्य जे छापले आहे त्याखाली त्यांनी अजून एक स्वामी विवेकानंदांचे वाक्य छापावे ते म्हणजे "विद्वेषाच्या आधारावर केलेले कोणतेही काम फार काळ टिकत नाही .
प्रतिक्रिया