"सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती."
अगदी खरं...त्यामुळेच ती पिढी सर्वोत्कॄष्ठ...त्या पिढीच्या ह्या गुणांच्या जोरावर आज काल आम्ही इतके वरती आलो. शतशः प्रणाम त्या पिढीला...असेच आमचे आई वडील सुद्धा...आठ्वणीने आज गदगद झालो.
सुंदर लेख...
इतके हृदयस्पर्शी लिखाण.
बोलती बंद झाली, प्रतिक्रिया दिली ती डोळ्यातल्या अश्रूंनी. कदाचित जे तोंडावाटेही परिणामकारकरित्या जे बाहेर यायचे नाही ते डोळ्यातून सहज आले.
पुण्याचे पेशवे
आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
------- शब्द नाहीत---------
तात्या.
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .
सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती.
एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं.
अशी वाक्यं हा तुमच्या लिखाणाचा आत्मा आहे.
आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
हे तर मागच्या पिढीतल्या बायकांचं आयुष्याचं सारंच एका वाक्यात..
दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
क्या बात है! माणसं कशी हळूहळू विरघळत-विरघळत बदलत जातात ना?
आणि रामदास शेवटचं वाक्य तर भेदून गेलं हो! खरं सांगू, माझ्या डोळ्यात पाणी आलंच नाही - मी थिजून गेलो!
आता असंच कधीतरी सवडीने येईल ते पाणी, वाचलेलं सगळं पार आतात पोचेल तेव्हा!
चतुरंग
नेहमीप्रमाणेच सुरेख लिखाण!!
रामदासजी, ही व्यक्तिरेखा काल्पनिक असेल अशी आशा आहे. कारण कुठल्याही आईला इतक्या त्रासातून जायला लागू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!!
-डांबिसकाका
II राजे II (verified= न पडताळणी केलेला)Sat, 06/28/2008 - 07:30नवीन
रामदास जी,
काय लिहू हेच कळेनासे झाले आहे... माझी सफर मध्ये मी फक्त मी मध्ये अडकलो होतो.... पण आज कळाले की माझ्या मी ला काहीच अर्थ नाही... मोठ मोठ्या गोष्टी लिहणे अथवा त्याची सही म्हणून उपयोग करणे वेगळी गोष्ट... पण सत्य हे नहमी वेगळेच असते.. तुमच्या आईच्या अनुभवाने मला माझ्या बालपणीचे १२ वर्ष आठवले तुमच्या व माझ्या जिवनामध्ये एक धागा आहेत जे सर्वस्वी एकच आहेत असे वाटावे इतके माझ्या ही जवळचे आहेत... एक शिलाई मशिन माझ्या ही घरी आहे आज ही.... !
घरी गेल्यावर नेहमी डोळे भरुन पाहत राहवे असे ते मशीन गेली ४५ वर्षे ने मशिन चालूच होते.. .. मागील वर्षापासून बंद करुन ठेवले आहे पण आज ही कधी मधी ते चालू होते...आपल्या नातवासाठी घोंगडी व लंगोटी तयार करण्यासाठी... ! त्या मशीनचे स्वप्न खुप मोठे होते... ! त्या स्वप्नात आम्ही कधीच पुर्ण झालो नाही... पण तुटलो जरुर !!!
धन्यवाद....! त्या माऊली ला माझे ही प्रणाम सांगा !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
सर्व कसे डोळ्यासमोर घडते असे वाटते,
आणि आई ने घरासाठी केलेले परिश्रम वाचुन आईचे मोठेपण अजुन जाणवते.
पण शेवट मात्र खुप खुप मनाला वेदना देतो.
इतके की डोळ्यातुन पाणी येते.
गोष्ट कशी प्रवाहिपणे पुढे पुढे जात रहाते.
...सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होत......
सुरेख उपमा. शेवटच्या परीच्छेदाने चटका लावला.
सुन्न करणारे लिखाण.
असे म्हणतात की एखादा लेख जेव्हा अस्सल उतरतो - मग ती कथा असो की व्यक्तिरेखा - तेव्हा त्यातले काय कल्पनेचे आणि काय घडलेले हा प्रश्न फजूल ठरत जातो. डांबिस यांच्या अब्दुलखानाबद्दल हाच अनुभव आला होता. लिखाण इतके अस्सल होते की, हा माणूस खराच भेटला का ? नक्की "सत्य" काय ? हा प्रश्न फजूल होतो. सत्य ते आणि तेव्हढेच जे लेखकाने मांडले , आपल्या लेखणीतून जे जिवंत केले.
प्रस्तुत लेखाबद्दलही हेच झाले आहे असे मला वाटते. गरीब , कष्टाचे जीवन जगणारी माणसे आपण आजूबाजूला पाहतोच की ! हलाखीचे , दुर्दैवाचे दशावतार असणारी अनेक आयुष्ये आपण आजवरच्या अनुभवांमधे पाहिली आहेत. प्रस्तुत लेखाचे - आणि माझ्या मते कुठल्याही उत्तम प्रतीच्या ललित लिखाणाचे - यश यात असते की त्याद्वारे लेखक त्या त्या काळाचे , व्यक्तीच्या सामाजिक , कालसापेक्ष बदलणार्या पर्यावरणाचे अगदी सूक्ष्म चित्रण करतो ; माणसाच्या वेदनेच्या दुखर्या नशीच्या अगदी नेमके जवळ नेऊन वाचकाला ठेवतो , आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्थलकालाला ओलांडून वाचकाला त्या त्या प्रदेशात नेमके नेऊन सोडतो. या कथेमधे "आई" या पात्राच्या तोंडी कसलेही - अगदी जुजबीसुद्धा - संवाद नाहीत ! तिच्या मूक वेदनेला याहून चांगले शब्दरूप कुणाला देता आले नसते. लेखाकाची अल्पक्षरत्वाची , तुटक वाक्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. तपशीलाच्या पसार्याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते. प्रत्येक वाक्यात तीव्रतेने जाणवलेले एकेक सत्य. आणि अशा एकेक वाक्याने केलेले चिरेबंदी काम.
रामदास , तुमचे लिखाण शैलीच्या बाबतीत पानवलकरांची , वेदनेचा वेध घेण्याच्या बाबतीत जी एंची , तत्कालीन सामाजिक चित्रणाच्या बाबतीत गाडगीळांची आठवण करून देणारे आहे.
तुमची जी नॅरेशन स्टाईल आहे ना, खरंच अप्रतिम आहे...
... मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे अशा कष्टाचे जीवन संगणार्या कथा आपण अनेकदा वाचत असतो पण अशी ताकदवान कथा क्वचित वाचायला मिळते...
तपशीलाच्या पसार्याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते
हेच म्हणतो...
शेवट ग्रेट....आणि शीर्षक उत्तम...
असेच लेख वाचायची अपेक्षा करत राहीन.. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आम्हि, आता या रामदासापुढेहि हात जोडतो.
तुम्हि असले अफ़ाट कसे काय लिहिता बुवा....
लेख अत्युत्तम झालाय.मन:पुर्वक अभिनंदन.
वरील बहुतेकांनी म्हंटल्याप्रमाणे आमच्या डोळ्यातून पाणि काढलेत.
आपले असेच अप्रतिम लेख उत्तरोत्तर वाचायला मिळोत.
=D> =D> =D> =D> =D>
अभिज्ञ
अतिशय कसदार, सहज अनुभवलेखन. बाकी इतरांनी लिहिलेच आहे.
अवांतर :
सुमतीबाई सुकळीकर ह्यांचे घर रामदासपेठेत. तुम्ही रामदासपेठेतच राहता का? बाय द वे, "नर्सा" हा शब्द वाचून फार बरे वाटले. अगदी पुन्हा नागपूरला गेल्यासारखे वाटले.
काय हो लिहिलंत हे!!! कोणत्या शब्दांत प्रतिक्रिया लिहावी कळत नाही.
तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला साष्टांग नमस्कार!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी