'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य ..या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'व्याकरण' हा लेखनविषय सप्रेम भेट. ( 'औषधोपचार' प्रेझेंट देणार होतो पण तुम्ही कंपू घेवून मागे लागलात तर आम्हाला लपून बसण्यास जागा शोधावी लागेल ;-) )असो, पण जे काही आहे ते लई भारी आहेया अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'मौजमजा' हा लेखनविषय सप्रेम भेट आपल्या अभिप्रायाबद्दल मी आणि (धनाजीरावांची) सखू आपले आभारी आहोत. :-Dजे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार?कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. अहो असे लोकच दिसेल तिथे सद्बुध्दी वाटतात. देवाचे काम तेच करतात. "अहं ब्रह्मास्मि" चा त्यांच्या लेखी अर्थ "मीच ब्रह्म आहे, मीच सर्वस्व आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, माझे मत निर्विवादपणे सत्य आहे, माझ्या मताविरूद्धचे मत निखालस चुक आहे.. " कंटाळा आला टंकायचा.. वरचे विडंबन इथे टंकले आहे असे समजा :-D (माझ्या धाग्याचे काश्मीर होईल का अशा प्रश्नात बुडालेला) मोदक