Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

येवढं लांब कशाला जायचं, इथून पर्वतीवरुन बघाय्चं. असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही. ;)

ह्या पुण्याच्या पाण्याचा, हवेचा आणि वातावरणाचा गुण मात्र जोरदार हं.... पुणं तेथे काय उणं ही म्हण काय उगाच नाही पडली. @ सूड.. हलकेच घ्या..

जबरदस्त.. त्यातही उजव्या अर्धभागाचं दृश्य पाहणार्‍यांना डावीकडचं अस्तित्वात नसतं..

श्री. पेठकर काकांच्या कट्ट्याला शुभेच्छा. पण स्पावड्या तू तर परवा ठिकाण न प्रोग्राम कुठले वेगळेच सांगत होतास की रे. हे मुक्तविहारींचे वेगळे आहे का काही? ;)

कट्ट्याला शुभेच्छा. चर्चा/ प्रतिसाद कमी आणि कट्टा संखेनं जबरदस्त होऊ द्या. ;) फोटू, जेवणावळी, कोण कोठून आला ( आणि का आला ?;) सदस्याचं नमोगत. वगैरे. काही खासगी पण कट्ट्यावर झालेल्या जाहीर चर्चा, मिपाकरांची व्यवस्थित ओळख, फोटोखाली व्यवस्थित माहिती आणि सर्वार्थाने टापटीप धागा धागा काढण्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

कोणत्याही तारखेस आणी कुठेही होणाय्रा कट्ट्यास विणम्र शुभेच्छा! :-) तसेच कट्टा होउन वृत्तांत आल्यास हार्दिक हबिनंदण! ;-)

किती उन्हाळा आहे. त्यात हे म्हणजे... उकडुन जीव जाईल बिचार्‍याचा. त्या पेक्षा काहीच नसलेले बरे. म्हणजे मोकळे पणे चापता येईल आमरस.

हा हा हा हा हा हा... ख प लो! (रामदास काका नानाच्या हाताने बुल्गानिन दाढी कोरताना तात्याच्या स्टाईलमध्ये गातात नि दुसर्‍या हाताने जयपाल आरशातली स्वप्रतिमा बघत फोटो काढतात. हुश्श्श... जमलं ब्वा एकदाचं. ;) )

कल्पना अतिशय चांगली आहे. मी डोंबिवलीचाच असल्यामुळे बहुतांशी येईन. जी काही वर्गणी वगैरे असेल ती आल्यावर देईन. मी या ग्रुपवर नवीनच आहे. त्यामुळे कुणालाही ओळखत नाहि. हरकत नाहि. नवीन ओळख होइल. गप्पा होतिल. कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. महेश नामजोशी

रत्नागिरी पेक्षा देवगड बरा असे मत नोंदवतो.... (मूळ देवगड आणि सद्ध्या रत्नागिरी येथे असल्याने दोन्ही मधला फरक (हापूस) उत्तम रित्या माहिती आहे)

हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या हद्दीतला आंबा आहे तोसवर काही हरकत नाही. माझ्या शालेय वयात रत्नागिरी हा एकच जिल्हा होता. त्यामुळे देवगड रत्नागिरीतच होते. सिंधुदुर्ग हा आपला प्रशासकीय सोयीसाठी वेगळा काढलेला भाग आहे झालं. हां.. कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल.

>>कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल>> कोंकणाबाहेरची कोणतीही आंब्याची जात अधिक उत्तम नाहीयनायावर ठाम विश्वास.. बाकी चवी बाबत बोलाल तर आजोळ रत्नागिरी, त्यामुळे दर मे महीना हा रत्नागिरीला ठरलेला.... तरीही रत्नागिरी व देवगड हापूस यामध्ये निवडायचा ठरल्यास नक्कीच देवगड निवडीन. माझ्या ओळखीच्या अख्ख आयुष्य रत्नागिरीमध्ये घालवलेल्या पक्क्या कोकणस्थ आजोबांनी जेव्हा देवगड हापूस खाल्ला, तेव्हा त्यांनी स्वतःहून मान्य केलय हे.

देवगड फळ लहान पण गोड असतं. रत्नागिरीला आकार जरा मोठा पण घमघमाट देवगडइतका नाही. रत्नागिरीमधेही मूळचा जंगलातला (नैसर्गिक) अर्थात एका वर्षाआड फळ येणारा असंकरित आंबा फार म्हणजे फार कमी. गुहागरनजीक आमची जी थोडीफार झाडे शिल्लक आहेत ती या प्रकारातली नैसर्गिक आहेत. अफलातून चव असते, पण ती ८० वर्षांहूनही जुनी असल्याने इतकी उंच गेली आहेत की त्यावर कोणी चढू शकत नाही (चढायला तयार होत नाही) किंवा कितीही बांबू जोडले तरी झोळण्याने उतरवता येत नाहीत. झाडपिके पडतात तेच हल्ली मिळतात.

नाही ओ. गैरसमज असेल कदाचित. पण देवगड फळ १,२,३,४ अश्या चारही प्रतीत मिळते... १ नंबर आंबा २५०-३०० ग्राम पर्यंत असतो. रत्नागिरी फळ पण मोठे असते... परंतु चव देवगड आणि रत्नागिरी वेगळीच... झाडांच्या बाबतीत बोलाल तर रत्नागिरी मधली झाड खूपच मोठ्ठी आणि ऊंचच ऊंच असतात यावर मात्र सहमती.

गोव्याच्या मानकुरादची चव जगात कोणत्याच आंब्याला नाही. हापूसपेक्षा महाग आहेत आतासुद्धा! यावरून काय तो बोध घ्यावा.
लेखक: jaypal वेळ: गुरुवार, 05/09/2013 - 14:20 Permalink

तु गोव्याहुन मानकुराद पाठव. या निमीत्तने तो तरी चाखायला मिळेल. ;-) काय हॅपी ना?

मूळ रत्नांग्रीची आणि वरच्या आळातली असल्याने या विषयावर मौन पाळत आहे.