Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मलाही हेच म्हणायचे आहे. आपल्यातील होणारे बदल स्विकारून त्यावर जी शक्य होईल ती उपाययोजना, स्वतःच किंवा नवर्‍याशी सल्लामसलत करून, स्त्रीने करणे अपेक्षित आहे.

हा सर्वोत्तम उपाय आहे. गाणी व्यवस्थित वाजवता यायला लागली की इतर गोष्टींकडे आपोआप दुर्लक्ष होतं.

उत्तम लेख काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.असो . लेखात असलेली निरिक्षण आपल्या भोवती घडणारी आहेत. हार्मोन्स मधे होणारे बदल हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक असतो.

यावर माझ्यामते उपाय आहे स्त्रियांनी पुरूषांप्रमाणेच स्वायत्त होणे. आर्थिक, मानसिक वगैरे अनेक दृष्टीने. आपली मुले, आपला संसार, आपले घर यातच अडकून पडले की असा त्रास होणारच. पुरूष केवळ यातच अडकलेले नसल्याने त्यांना एकूणच त्रास कमी होतो. आर्थिक दृष्ट्या स्वायत्त स्त्रियांना आपल्या अश्या काळात मुलांचे तथाकथित वैट्ट वागणे, नवर्‍याचे दुर्लक्ष वगैरे ऐवजी इन्व्हेस्टमेन्टची चिंता, चढता उतरता शेअरबाजार, आपल्या गाडिचं जवळ आलेलं सर्विसिंग, मित्र-मैत्रिणींबरच्या पुढिल ट्रिपला नवर्‍यालाही कसे नेता/टाळता येईल याचे विचार करताना बघितलेले आहे.

अगदी असेच. मर्यादित विश्वावर अवलंबून रहाता कामाच नये. पंख पसरले तर मोकळा श्वास घेता येईल. अगदी हेच.

अगदी असेच. मर्यादित विश्वावर अवलंबून रहाता कामाच नये. पंख पसरले तर मोकळा श्वास घेता येईल. अगदी हेच.

+१ ऋशी .. याला म्हणतात विचार करुन दिलेला प्रतिसाद भारी ...

स्त्रियांना रजोनिवृत्ती मुळे आपले स्त्रीत्व संपले असे वाटू लागते. आपण म्हातारे होणार हि भीती बोचू लागते. आता आपण पूर्वी सारख्या तरुण राहिलो नाही याची खंत वाटू लागते. आपल्या नवर्याला आपल्याबद्दल आकर्षण राहणार नाही हि भीती वाटू लागते.इत्यादि इत्यादि
असहमत. आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते. म्हणजे स्वत:पेक्षा कुटुंबाची काळजी. फारच कमी स्त्रिया या वयात तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त स्त्रिया उलट सुटकेचा श्वास टाकतात (पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..
रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो.
पुन्हा असहमत. तारुण्याचे आकर्षण काही फक्त स्त्रियांनाच असते काय ? पुरुष सौंदर्य प्रसाधने किंवा तरुणांसारखे स्टायलीश कपडे वापरत नाहीत काय ? वयस्कर पुरुष स्त्रियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाहीत काय ? दडपण असेल तर सौंदर्य टिकवण्यापेक्षा सर्व अवधाने सांभाळण्याची शक्ती टिकवण्याचे.
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.
कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर ते साजरे न करण्याचे कारण वय लपवणे हे नसून स्वत:ला फार एक्सपोज न करण्याची स्वाभाविक स्त्रीसुलभ वृत्ती हे आहे. तसेच कर्तृत्वाचा दिंडोरा पुरुष जितके उत्साहाने पिटून घेतात, तसा स्त्रियांचा कल नसतो. ....वयामुळे स्त्रियांच्या शरीरात होतात तसे संप्रेरकांचे वगैरे बदल पुरुषांचे होत नसल्यामुळे चाळीशीनंतर पुरुषांना अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागत असेल असे वाटत नाही. बाकी लेखातील इतर निरिक्षणांशी सहमत.

आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.
अगदी बरोबर!!! अनेक वर्षांनी मुलीचं बाळंतपण झेपण्याइतके आपण खमके/खंबीर राहू का असली भीती मधेच डोके वर काढू लागते. :)
कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत.
प्रचंडच सहमत. उलट या नव्या फेझ चे एक अ‍ॅड्वेन्चरस आकर्षण वाटते :)

(पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..
बाप रे! हेच तर कारण आहे संप्रेरकं लवकर मंदावण्याचं आणि मंदावल्यावर निरूत्साही वाटण्याचं.
आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.
वयपरत्वे शारीरिक जोम कमी होणारच याचा अस्विकार असं नैराश्य आणतो. पण आहे ते शरीर योग्य व्यायामाच्या आभावामुळे वेळेपेक्षा लवकर अकार्यक्षम झालं हाच सार्वत्रिक अनुभव आहे, मग तो पुरूष असो की स्त्री. बाकी इतर गोष्टींवर चर्चा मुळ प्रश्न सोडवायला कोणतीहि मदत करत नाही म्हणून व्यर्थ आहे.

कारण चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो. सुंदर दिसणे व रहाणे ही केवळ स्त्रियांचीच इच्छा नव्हे तर पुरुषांचीही असते, फार तर रुबाबदार आणि वगैरे वगैरे काय ते, असे म्हणू. खास पुरुषांसाठी त्वचा, केस, फेशियल इत्यादि ट्रीटमेंट्स देणारीही पार्लर्स निघत आहेत आणि धो धो चालत आहेत, हे कशाचे लक्षण? टीव्हीवर पदोपदी पुरुषांची क्रीम्स, डीओ़ज ह्यांच्या जाहिरातीचा उबग येईपरेंत मारा होत असतो ते काय त्यांचा पुरुषांमध्ये खप असल्याशिवायच? आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही. हे वाढदिवसाबद्द्लचे विधान खरोखर हास्यास्पद वाटते. स्त्रीची इच्छा नसते म्हणून दणक्यात वादि साजरा होत नसतोपेक्षा, घरात किती जणांना त्या स्त्रीचा वादि लक्षात राहतो आणि तिला निदान त्या दिवशी तरी खास ट्रीटमेंट द्यावी वाटते हा अभ्यास केला/ सर्व्हे घेतला, तर लक्षात येईल तिच्या अवतीभवतीचे लोक आपाप्ल्या व्यापात इतके मशगुल असतात, की तिचा वादि साजरा करायचे कितीजणांच्या लक्षात असते, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा, इतके त्या घरातील बाईला गृहित धरले जाते! संप्रेरके मनावर सुद्धा परिणाम करीत असतात त्यामुळे स्त्रियांना उल्हसित वाटत असते जेंव्हा ती संप्रेरके कमी होऊ लागतात तशी मानसिक उभारी कमी होऊ लागते आणि नैराश्य येते. यात भर म्हणजे तिला असे वाटत असते कि कुटुंबात कोणालाही तिची किंमत राहिली नाही. संप्रेरके मनावर परिणाम करतच असतात, आणि त्याचबरोबर कुटुंबात प्रत्येकजण सहसा बायको, आई ह्या नात्याला गृहितच धरत असतो, ते तिला जाणवते आणि त्याचे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पुरुषाला/ नवर्‍याला आवडते का त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले? डॉ. तुमचे काही काही मुद्दे अगदीच पटत नाहीत. शास्तीय माहिती जरुर द्या, पण अशा प्रकारची बायस्ड विधाने डॉ. ह्या नात्याने लिहिताना अपेक्षित नाहीत. धाग्याला स्त्री पुरुष असे वळण लागते आहे अशी भीती कोणीतरी व्यक्त केली आहे, पण अख्खा धागाभर तेच आहे की, आणि हे उल्लेख अप्रिहार्यपणे येणारच, कारण धागाच असा आहे.

यशोधरा ताई आपल्याला काही मुद्दे पटत नाहीत हे मान्य किंवा काही मुद्दे अगदी हास्यास्पद वाटतात हेही मान्य. पण सुंदर दिसणे आणि राहणे यासाठी पुरुष किती वेळ घालवतात किंवा पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांचा खप विरुद्ध स्त्रियांच्या प्रसाधनांचा खप याचे प्रमाण जगभरात पहा म्हणजे मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल. आपण जेंव्हा तुलना करीत आहात ती फक्त मध्य किंवा उच्च मध्यम वर्गीय स्त्रियांची. त्यातही बर्याचशा सुशिक्षित महिलांची. निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच. जर आपण उच्च आणि उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया जितक्या प्रमाणात सौंदर्य वाढवण्यासाठी शल्यक्रिया करून घेतात त्याच्या पाच टक्के सुद्धा पुरुष त्या करीत नाहीत हे मी मुंबईत कॉरपोरेट रुग्णालयात किंवा त्वचारोग तज्ञांच्या आकडेवारीवर ठाम पणे म्हणू शकतो. आज आपल्या चित्रपट व्यवसायात किती नायिका तिशीच्या पुढे आहेत. पण आजही म्हातारे नायक( शाहरुख, आमिर, सैफ अली खान किंवा अक्षय कुमार इ जोरदार का चालतात. पुरुषांच्या डीओ किंवा क्रीम हे वय लपवण्याचे नसून अंगाला वास न येण्या साठी आहेत आणि बायकांना आकर्षित करण्यासाठी आहेत. age miracle किंवा तत्सम उत्पादने यांचे खपाचे प्रमाण पहिले तर आपल्या लक्षात येईल. कोणतीही जाहिरात किंवा धारावाहिक पाहिली तर त्यात लग्नाळू मुलीची आई हि सुद्धा तिशीची असते. संतूर सारख्या ममी च्या जाहिराती हे सहज विशद करतील. आपण टीव्ही वर जाहिरातीपैकी किती जाहिराती पुरुषांच्या तारुण्य टिकविण्याच्या आहेत हे आपण पहा. आपल्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा स्त्रियांची पुरुषांपेक्षा जास्त असते. आपण वाढदिवसासाठी भेट आणली नाही म्हणून रागावणारा (किंवा रुसणारा) पुरुष पाहिला आहे काय? पण नवर्याने आपल्या वाढदिवशी आपल्याला भेट आणली नाही म्हणून रुसणार्या आणि रागावणार्या स्त्रिया सहज सगळीकडे दिसतात. यात वैयक्तिक कल(bias) कुठे आला. आपण कितीही नाकारले तरी वस्तुस्थिती बदलत नाही. संप्रेरके स्त्रियांच्या आयुष्यात जितका गोंधळ घालतात तितका पुरुषांच्या नाही हे दर महिन्याला दिसतेच( पाळीच्या अगोदर आणि पाळीच्या वेळेस). यातून स्त्रीची सुटका नाही. (जोवर शरीराच्या प्रत्येक पेशीत दोन x गुणसूत्रे आहेत तोवर). मग आपण मान्य करा कि करू नका.मग घरचे पूर्ण लक्ष देतात कि दुर्लक्ष करतात.

निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच >> होतोच की. मी कुठे नाकारीत आहे? उलट तो त्रासही सहन करुन त्यांना नेहमीचे कष्ट चुकत नाहीत. कोणी त्यांची कौतुके करायला येत नाही, हे मी म्हणत आहे. >>उच्च आणि उच्च मध्यम वर्गातील स्त्रिया >> निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियां आणि उच्च मध्यमवर्गातल्या स्त्रियांचे प्रमाण समतोल आहे का हो? उच्च मध्यमवर्गीय जीवनशैली किती जणांना परवडते? तुमचा लेख उच्च मध्यमवर्गीयांपुरताच मयादित आहे असा अर्थ घ्यायचा का? इतर मुद्दे, मला तरी पटत नाहीयेत, जाहिरातीतली आई जशी तरुण दिसते तसाच जाहितारीतला बापही रुबाबदारच असतो. बाई एखाद दिवस वादिला भेट आणली नाही म्हणून बापडी रुसत असेल हो, नवर्‍याला ३६५ दिवस सरबराई हवी असते आणि करुन मिळते, रुसायचा प्रश्नच कुठे येतो? >> आजही म्हातारे नायक( शाहरुख, आमिर, सैफ अली खान किंवा अक्षय कुमार इ जोरदार का चालतात. पुरुषांच्या डीओ किंवा क्रीम हे वय लपवण्याचे नसून अंगाला वास न येण्या साठी आहेत आणि बायकांना आकर्षित करण्यासाठी आहेत >> :D, जसे क्रीम वापरल्याने तरूण दिसणे शक्य नाही, तसेच केवळ एखाद्या माठाने डीओमध्ये अंघोळ केली तरी स्त्रीला ढिम्म फरक पडेल असे वाटत नाही! असो.

हार्मोनल बदलांची वस्तुस्थिती कोणीच नाकारीत नाही, पण काही शास्त्रीय माहितीआड निरर्थक विधाने आणि स्वतःचे बायसही घुसडू नये इतकीच अपेक्षा आहे.

एक्झॅक्ट्ली ... आणि स्त्री हि स्त्री असते ... उच्च , मध्य .. कनिष्ठ ... असली वर्गवारी करुन स्वताहाची मतं पटवुन देन्याचे प्रयत्न होउ नयेत ... ठोस कारणं द्यावीत एवढीच माफक अपेक्षा ...

यशोधरा आणि ऋषिकेशचे प्रतिसादही आवडले. वरच्या प्रतिसादात भर घालणारा आणखी एक मुद्दा:
निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोच
इंटरनेट वापरणारा, मिसळपाव वाचणारा वर्ग हा उच्च मध्यमवर्ग आहे. निम्न मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्गाला इंटरनेट वापरणे आणि मिसळपाव वाचण्यएवढा वेळ परवडेल अशी आर्थिक स्थिती दुर्दैवाने अजूनतरी मराठी भाषिक (आणि भारतीयही) समाजाची नाही. इथल्या लेखनाचा टार्गेट ऑडियन्स हा उच्चमध्यमवर्गीयच आहे. पण तरीही यशोधरा यांचा मुद्दा तेवढाच ग्राह्य आहे. आर्थिक वर्ग सुधारलेला असला म्हणून स्त्रियांकडे होणारं दुर्लक्ष, गृहित धरलं जाणं संपलेलं आहे असं अजिबातच दिसत नाही. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया मात्र सबला असल्याचं अनेकदा दिसतं.

मला हेच म्हणायचं होतं कि स्त्रिया आपल्याकडे लक्ष द्या असे का म्हणतात स्त्रियांचे सबलीकरण हे केवळ आर्थिक किंवा सामाजिक नसून मानसिक सबलीकरण झाले पाहिजे. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण बाई म्हटले तर सन्मान झाल्यासारखा वाटतो पण बायको डॉक्टर असलेल्या पण स्वतः डॉक्टर नसलेल्या पुरुषाला डॉक्टर म्हटले तर कसेसेच होते. जोवर हे मानसिक सबलीकरण होत नाही तोवर स्त्रीची खरी मुक्ती होणार नाही आजही ८० टक्के अर्थार्जन करणाऱ्या बायकांचे आर्थिक व्यवहार त्यांचे नवरे सांभाळत असतात. त्यात काही चूक आहे असे नाही परंतु हे पूर्ण आर्थिक व्यवहार तिला माहित असावे अशी अपेक्षा अहे. परन्तु आत्तापर्यंत पाहिलेल्या अकाली मृत्यूमध्ये स्त्रिया आर्थिक व्यवहारात अनभिज्ञ असल्याचे आढळले. हि परिस्थिती आजही उच्च शिक्षित उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांची आहे यास्तव हे वर्गीकरण केले होते तर सगळ्या बायका माझ्यावर पुरुष जातीचा प्रतिनिधी म्हणून तूटून पडल्या. पुरुष सुधारणे याला काही दशके जावी लागतील पण त्या कालावधीत स्त्रियांनी स्वतःला सबळ करावे यासाठी हा प्रपंच होता. क्रीम सौंदर्यप्रसाधने फ़ेशिअल यातून स्त्रिया बाहेर आल्या तर बरे असा माझा विचार होता असो. बाकी "कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया मात्र सबला असल्याचं अनेकदा दिसतं. या बद्दल वेळ मिळेल तेव्हा

चर्चा वाचताना अनेक वेळा पॉज घेतला :) स्त्रियांमधे मानसीक ढवळाढवळ केवळ हार्मोन्स ने नाहि तर एखाद्या ऑनलाईन आर्टीकलने देखील होऊ शकते हाच काय या समग्र उपक्रमाचा निश्कर्श :) अर्धवटाराव

प्रेम स्पर्श आणि आकर्षण हे निरंजन घाट्यांचे पुस्तक स्त्री पुरुष यांच्या वर्तणुकीचा उत्क्रांती वादाच्या दृश्टीने अभ्यासपुर्ण व वाचनीय आहे. बुकगंगावर याचा परिचय आहे. पहा http://www.bookganga.com/eBooks/Book/4975847069030416395.htm?Book=Prem-Sparsh-Ani-Akarshan बाकी स्त्री पुरुष..... चालू द्यात