हि जी चर्चा चालु आहे, प्रॉब्लेम्सचं स्वरुप जसं स्पष्टीकरणासहीत दिल्या जातय... समजेल अशा शब्दात यापुर्वी कधीच असं कुठे वाचलं नाहि.
धन्यवाद हो डॉक्टरदादा.
दिवसेंदीवस मी देवाप्रती अधिकाधीक कृतज्ञ होतोय कि ज्याने मला मनुष्यदेहाने हा जगात पाठवले व विज्ञान समजण्याजोगी बुद्धी दिली :) ... आयला.... काय अफाट पसारा आहे... तरिही किती सुत्रबद्ध... व्वाह.
अर्धवटराव
मराठी विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक जालावर उपलब्ध आहे. हा दुवा
आजानुकर्णाने बहुदा वाचलेलं असेलच; त्याला जे म्हणायचं आहे तेच राजवाडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, पुराव्यानिशी सांगत आहेत. संक्षींना काही सांगायची आवश्यकता नाहीच; त्यांना सगळं ज्ञान आधीच झालेलं आहे.
मला वाटलं हा कोणतरी राजा राजवाडेसारखा नवा लेखकु आहे की काय. बाकी तुमच्यासारख्या थोर लोकांनी सांगितलं म्हंजे ते खरेच असणार असा विचार केला होता. आम्हाला आपलं काय कळतंय! आम्ही विहिरीत उड्या मारणारे.
चाळ्ळं फक्त.
होतं काय ल्हिलंय तसं होतं. मान्य. फुडं????
'मागच्या जन्मीची पापं' म्हणून भारतासारख्या 'मागास' देशात काही लोकांना जन्म मिळतो.
काय करणार? सो सॅडच ना!
महाभारतातनं आम्ही काय टिपतो? तर हे!
भगवद्गीता, भीष्मगीता वगैरे झूठ हो सगळं. अस्लं काही विचारात तरी घ्यायचं का कधी? छे!
कृशिसानविवि.
आम्ही मागासच बरे!
मूळ धागा हा स्त्री च्या रजोनिवृत्ती च्या वेळच्या प्रश्नाबद्दल आहे. त्यात मला जे म्हणायचे होते ते असे कि चांगले असणे आणि दिसणे हे मूळ स्त्रीस्वभावाचा पैलू आहे किंवा स्त्रीची नैसर्गिक प्रेरणा आहे. ( तो पुरुष स्वभावाचा नाही असे माझे म्हणणे नाही) पण आपली मनोवृत्ती आजही साचे बद्ध असल्यामुळे स्त्री ने सुंदर दिसले तर लग्नाच्या बाजारात किंवा त्यानंतरही तिची किंमत जास्त असते.
रजोनिवृत्ती नंतर स्त्रीच्या शरीरात जसे बदल होतात तसेच तिच्या मानसिक स्थितीत बदल होतात हे सम्प्रेरकांचा मेंदूवर होणार्या परिणामामुळे होतो यात स्त्रीने काय करावे कि जे नैसर्गिक प्रेरणेच्या विरुद्ध जाणार नाही हा त्यात विचार होता.
नैसर्गिक प्रेरणा म्हणजे काय ? आपल्या लहान मुलाला तूप किंवा अमूल बटर का आवडते?त्याला काहीही न शिकवता. कारण चरबी युक्त पदार्थ आपल्याला अन्नाच्या दुर्भिक्ष्याच्या काळात तारून नेतील हे त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते. लहान मुल तोंडात बोट किंवा स्तन दिल्यावर चोखु का लागते? हे पण त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.या नैसर्गिक प्रेरणा आहेत.
आपल्याला सध्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ का आवडतात तंदूर मध्ये भाजलेले चिकन किंवा पनीर का जास्त आवडतात कारण भाजलेले पदार्थ हे पचायला हलके असतात आणि विषबाधेपासून मुक्त असतात हे आपल्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.म्हणूनच आपल्याला सातारी कंदी पेढा साध्या पेढ्या पेक्षा जास्त आवडतो कारण त्यात भाजलेल्या दुग्ध प्रथिनाची चव असते.
मानवाची नैसर्गिक प्रेरणा काय आहे तर आपला जीव वाचवणे. म्हणूनच मरण येण्याची शंभर टक्के शक्यता असूनही देश देव किन्वा धर्मासाठी लढाई करून बलिदान दिलेल्या सैनिकाला जगभरच्या इतिहासात फार मोठा मान दिला गेला आणि जातो.
या नैसार्गिक प्रेरणेचा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. नैसर्गिक प्रेरणेचा विचार केल्यास हे लक्षात घेत येते कि ती व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी वागते. त्यामुळे त्यावर इलाज करणे जास्त सोपे होते.
दुर्दैवाने मी थोडक्यात लिहिले होते त्याचा विपर्यास झाला आणि मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला. असो मला त्याचे दुखः नाही.
आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने मार्गावरून भरकटला हे टाळता आले असते असे वाटते .
डॉक्टरसाहेब, काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात. मी त्या वादात आता पडत नाही. सर्वसामान्य वाचकही अशा वादात पडत नाहीत कारण त्यांना धाग्याशी मतलब असतो. पण तरीही कृपया नेहमीप्रमाणे लिहीत रहा ही विनंती. आम्ही सगळे वाचत आहोत!
>>>>काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात.
'तीच त्यांची 'नैसर्गिक प्रेरणा' असते'
असं म्हणावंसं वाटत आहे तरीही म्हणणार नाही कारण मी सर्वसामान्य वाचक आहे. ;)
आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने....
हे माझ्या प्रतिसादांना उद्देशून असेल तर 'नैसर्गिक प्रेरणा' म्हणजे काय अभिप्रेत आहे हे जे धाग्याच्या शेवटास सांगितले आहे तेच धाग्याच्या पहिल्या परिच्छेदात समाविष्ट केले असते तर समजण्यास अधिक सोपे झाले असते.
मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मला जे जाणवले ते मी लिहीले. धागा भरकटवणे हा उद्देश कधीच नव्हता.
मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला.
असे संदिग्ध लेखन करण्यापेक्षा उलगडून स्पष्ट शब्दांची वाक्य रचना केली तर आपला निर्देश कुठे आहे समजेल आणि प्रतिसाद लिहीणे सोपे जाईल.
वाचकाच्या मनांत गोंधळ निर्माण होणार नाही अशा विधानांची गरज आहे.
फार दु:खाने म्हणावे लागते आहे की हा ह्या धाग्यावरील माझा शेवटचा प्रतिसाद समजावा.
धन्यवाद.
पेठकर साहेब
मी माझ्याबद्दल बोलत होतो मला स्त्रीमुक्ती विरोधी किंवा MCP हा शिक्का बसला.
(तसा मी बर्यापैकी गेंड्याच्या कातडीचा आहे त्यामुळे मला फरक पडत नाही )
आपण गैरसमज करून घेऊ नये.
प्रतिक्रिया
खरे खरेच खरं बोलतात.
मराठी विवाहसंस्थेचा इतिहास हे
हे पुस्तकhttp://www
लिंक चालत नाही.
तुला वाचायचे आहे?
केलेस का इमेल?
मराठी विवाहसंस्थेचा इतिहास?
नाह, गडबडीत झालेली टंकनचूक.
ओक्के
चाळलं. आपल्याला नाय ब्वा
उगं
चाळ्ळं फक्त.
धागा बराच भरकटलेला आहे
उत्तम प्रतिसाद
>>>>काही लोक अमूक एक समजूत
उत्तम प्रतिसाद.नैसर्गिक
मी चर्चेतून बाहेर.
मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला.
Pagination