वरील चर्चेत काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील..
एक म्हणजे पाकिस्तानची निर्मीतीचे मूळ हे 'हिन्दू द्वेष' म्हनूणच 'भारताचा कायम द्वेष'.. ह्यावर आधारीत आहे, हे जर लक्षात घेतले व आजवरचा इतिहास व अनुभव पाह्ता, तो कधीतरी आपला एक चान्गला 'शेजारी वा मित्र' होइल असे समजणे म्हणजे आपली अक्कल गहाण पडली आहे असे नक्की समजावे, हे एक कायम स्वप्नच राहिल हे नक्की.
करण तो एक कट्टर धार्मीक देश असल्यानेच आपल्या वयाचा असुनसुद्धा अतिशय मागासलेला, कायम दरीद्री ( सामाजिक, आर्थीक, सान्स्क्रुतिक व राजकीय द्रुष्ट्या ) तसेच तेथे समाजिक प्रगल्भता नसल्याने व सतत लश्कराच्या अमलाखाली असलेली तेथील राजकीय व्यवस्था म्हणजेच तिथली तथाकथीत लोकशाही ( तेथील सैन्यापुढे हतबल ) (??) तो देश आपला 'हितचिन्तक शेजारी' कसाकाय होउ शकेल ?? हे कोणी सान्गेल का ???
' पान्ढरी कबुतरे ' उडवुन, क्रिकेट खेळुन, नाचगाणी करुन आणि 'मिपावर' चर्चा करुन तो जर सुधारणार असेल तर त्याचे स्वागत असो...!!!!
विनोद१८
मिपावर चर्चा करून पाकिस्तानात लोकशाही टिकणार असे कुणीही म्हणत नाहीये.
मी प्रयत्न करतोय तो एका पुर्वग्रहीत दृष्टीकोणाच्या वर येण्याचा.आणि तेच माझे मत इतरांना समजावून देण्याचा.
माझ्या मते पाकिस्तान आज भारताच्या खूप मागे पडलाय. कारणे तुम्ही दिली आहेतच. तर असे असताना त्याला शत्रु म्हणून कुरवाळण्याची गरज काय? आपण त्यापेक्षा खुप पुढे आलोय. आज पाकिस्तानच्या पल्याड सुध्दा आम्ही पाहणार आहोत का नाही?
कुणी अश्या दिवास्वप्नात असेल की उद्या भारत पाकिस्तान मध्ये युध्द होईल आणि पाकिस्तान नामशेष होईल तर त्या सर्वांना विनंती आहे की जागे व्हा ! आजच्या जगात तरी अश्या प्रकारे देश नामशेष होण्याची शक्यता नाही. यापुढे देश नामशेष न होता कमी क्षमतेचे करता येतील मात्र नामशेष करता येणार नाही. कमी क्षमतेचे म्हणजे काय ते बघायचं असेल तर पुर्वीचा सोव्हियत संघ आणि त्याचे अमेरीकेने केलेले रशीया, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. किंवा आधीच्या पाकिस्तानचे आताचे पाकिस्तान व बांग्लादेश हे सुध्दा उदाहरण आहे. १९७१ ला चाललेली युध्दाची पध्दत १९९१लाच काल बाह्य झाली असं म्हणूया. आता मात्र अधीक क्षमतेने आणि मोठ्या आखणीने काम करायला पाहिजे. उद्या पाकिस्तान नष्ट झाल्यावर भारताच्या समस्या संपणार नाहीत.
शेजारच्याचं जळतं घर जर आपण पाडलं तर त्याच्या शेजारचा वणवा लागलीच आपल्या घरापर्यंत पोहोचेल. आता उपाय हा आहे की आपल्यामध्ये जो पर्यंत त्या वणव्याला सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता येत नाही तोपर्यंत शेजार्याचे घर टिकले पाहिजे. याला कधी कधी बफर असा शब्दप्रयोग सुध्दा केला जातो.
पाकिस्तान कायम आपल्याला शत्रु समजतो. त्यांच्या राज्यकर्त्यांच्या तश्याच थाटाच्या वल्गणा असतात. भारताचे तुकडे पाडणार... काश्मिर जिंकून घेणार... वगैरे... असे केल्यावर त्यांना देशाची प्रगती वगैरे करण्याची गरज नाही. त्यांची सत्ता टिकते.... सैन्याचं महत्व टिकते... आयएसआय चे महत्व कायम राहते... लोकांना सुध्दा अन्य काही केल्याशिवाय अतिशय भावनिक मुद्दा चर्चा करायला मिळतो. आणि देशात प्रगतीच्या नावाने उजेड पडत असला तरी सरकार टिकून जाते. त्यामुळे त्यांच्या देशात अश्या वातावरणाची निर्मीती झालेली आहे. त्यांनी मान्य करो अथवा नको ते लोक या मुर्खपणाची किंमत मोजत आहेत. भिक मागून जगण्याची वेळ त्यांच्यावर आहे.
उत्पादनक्षम क्षेत्राची त्यांची प्रगती फार मंदावली आहे. आपले आशियातील भौगोलीकस्थान कॅश करून अमेरीकेपासून पैसा घेऊन ते जगताहेत. किंवा सौदीकडून पैसा घेऊन अधिकाधीक मदरसे बांधल्या जात आहेत. ह्या सर्वांतून पाकिस्तान कुठे जाईल ते माहिती नाही. भारताने आणि किमाण आपण जे लोक विचार करू शकतो त्यांनी तरी पाकिस्तान पेक्षा पुढे जाऊन विचार करायला पाहिजे. त्यासाठी भावनिक होण्याची गरज नाही.
वेळ आल्यास उत्तर देण्यास आपली संरक्षण क्षमता आहे. मात्र राजकीय किंवा कूटनितीत आपण कमी पडतो हे नाकारून चालणार नाही.
आज जेव्हा इस्त्रायल रामल्लात रणगाडे घालतं तेव्हा अमेरीका त्याची बाजू उचलून धरते... भारताला अमेरीका सोडा पण आशियातील किंवा आफ्रिकेतील दोन देश... युरोपातील एखादा देश... किमान शब्द तरी बोलेल का?
१९७१ आपल्या पंतप्रधान इंदीरा गांधीना युध्द करण्याआधी जगभर फिरून सांगावं लागलं की पुर्व पाकिस्तानातील बेदलीमुळे भारतात आलेल्या निर्वासितांमुळे भारताच्या नैसर्गीक व सामाजिक संसाधनांवर ताण येतोय. असं साधारण वर्षभर केल्यावर मग आपण युध्द पुकारले. आज २०१३ मध्ये परिस्थिती खुप काही बदलली आहे असं नाहीये. आपण जगात निर्णायक नाही आहोत. मात्र जगासाठी आश्वासक तरी असू शकतो ना? त्यासाठी प्रयत्न करायचा की जगाच्या राजकारणापेक्षा पाकिस्तान हा मोठा आहे असं म्हणून त्यात अडकायचं ते आपलं आपण ठरवूया.
- नीलकांत
मला हे कळत नाही की पाकिस्तानला नष्ट करायचे किंवा चारी मुंड्या चीत करायचे म्हणजे नक्की काय करायचे? आतापर्यंतच्या सर्व युद्धांत आपण त्यांचा पराभव केलेला आहे; निदान आपण तरी असे मानतो. मग आणखी एका युद्धविजयाद्वारे त्या भूभागात आपले शासन, आपली सत्ता लादायची का? तिथले पंधरा कोटी मुसलमान ही सत्ता सुखासुखी मानतील? त्यांच्याच सरकारविरुद्ध किंवा एका समाजगटाविरुद्ध आज तिथे प्रचंड हिंसाचार चालू आहे. त्यांना नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आपले किती सैन्य तिथे तैनात करावे लागेल? आणि आधीच घरचे झाले थोडे अशी गत असताना हे पंधरा कोटींचे नसते व्याह्याचे घोडे आपण का घरात घ्यावे? आणि सैन्याच्या जोरावर कोणताही प्रदेश दीर्घकाळ ताब्यात ठेवता येत नाही हे अनेक ठिकाणी सिद्ध झालेले आहे. तेव्हा अशी दिवास्वप्ने किती दिवस बघत रहाणार?
कोणताही गाजावाजा न करता आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघाडीवर पडद्याआड केलेल्या हालचाली हाच यावरचा इलाज आहे. आणि आपण तो करीत आहोत. आज पाकिस्तानी लोकांत निर्माण झालेली लोकशाहीबद्दलची आस हे त्याचेच फलित आहे. अर्थात अमेरिकन दट्ट्याचाही भाग आहेच, पण पाकिस्तानी विचारवंतांमध्ये भारताच्या प्रगतीचे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे उघड कौतुक आहे, त्यांचा दबाव सतत असतो.
परराष्ट्रनीतीविषयी म्हणायचे तर फाळणीच्या वेळी आपल्याकडे रशिया किंवा अमेरिका असे दोन पर्याय होते, आपण सोविएत यूनिअन निवडले. मिनू मसानी आणि माजी राजेरजवाडे यांचा एक स्वतंत्र पार्टी या नावाचा उजवा पक्ष होता, स.का. पाटीलांसारखे तुरळक वजनदार लोक अमेरिकेच्या बाजूने होते. अमेरिकेने त्यांना विशेषतः स.का. पाटलांना बळ देऊन ते नेहरूंनंतर पंतप्रधान बनतील असा प्रयत्न करूनही पाहिला पण लोकांमध्ये त्यांना स्थान नव्हते. स.का.पाटलांच्या होमटर्फ वरच त्यांचा संयुक्त महाराष्ट्र समिती आणि आचार्य अत्र्यांची मुलुखमैदान तोफ यांमुळे 'जायंट किलर' जॉर्ज फर्नँडीझकडून दारुण पराभव झाला. उजवी चळवळ जोम धरू शकली नाही. पुढे शिवसेनेद्वारे अमेरिकेने मुंबईत पाय रोवण्याचा प्रयत्न केला त्याला कम्यूनिस्टांना खतम करण्यापुरते नॉमिनल यश मिळाले. (एकेकाळी यूसिस मध्ये काम करणारे लोक मुंबईत शाखाप्रमुख/उपशाखाप्रमुख होते.) असो.
अमेरिकेला भारतीय भूमीवर सैनिक तळ हवे होते, ही आपल्या सार्वभौमत्वाला धक्का पोचवणारी गोष्ट आपण मान्य केली नाही. पाकिस्तानने पेशावर देऊन टाकले आणि शीतयुद्ध आपल्या घरात ओढून घेतले. त्याबदल्यात अमेरिकेने आर्थिक मदतीच्या कुबड्या देऊन पाकिस्तानला परावलंबी करून टाकले. शिवाय बाहुले लष्करशहा आणि अस्थिर राजवटी हे बोनस दिले. भारताने मात्र या सापळ्यात न अडकता 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' स्वीकारून रशियाच्या सहाय्याने पहिल्या पंचवार्षिक योजनेतच भिलाई, रूरकेला अशा अवजड उद्योगांची पायाभरणी केली. जिथे साधी सेफ्टी पिन आणि सुईसुद्धा आयात होई तिथे नौका, रेल इंजिने, विमानांचे भाग बनू लागले. नंतर क्रमाक्रमाने शेती आनि सेवाक्षेत्रांवर भर देत देत भारताने आजची प्रगती साधली आहे.
प्रत्येक देश आपापले सामर्थ्य आणि मर्यादा ओळखून असतो. जपान सारखा प्रगत देशही चीनशी तुटेपर्यंत ताणत नाही. त्याम्चेही भूप्रदेशावरून आपापसात वाद आहेत पण अमेरिकेच्या सहाय्याने ते युद्धखोरीने सोडवण्याचा प्रयत्न जपान करीत नाही कारण अमेरिकेशी कितीही मैत्री असली तरी या युद्धात गुंतून चीनशी शत्रुत्व पत्करण्याचा मूर्खपणा अमेरिका कधीही करणार नाही हे जपानला ठाऊक आहे.
जगात फक्त इंग्लंड, फ्रान्स, स्पेन पोर्तुगाल असे मोजकेच देश आहेत की ज्यांनी आपल्या मूळ भौगोलिक प्रदेशापेक्षा कितीतरी मोठ्या प्रदेशावर साम्राज्ये स्थापली. जर्मनीनेही तशी ईर्ष्या बाळगली. सोविएत यूनिअन हेही त्यातलेच. पण शेवटी ही सारी साम्राज्ये स्वतःच्याच भाराखाली कोसळली. केंद्रापासून दूरवरचा भूभाग कशाही तर्हेने,कोणत्याही महासत्तेच्या सहाय्याने फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे अगदी अलेक्झांडरच्या काळापासूनचे सत्य आहे.
इस्झ्राएलचे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांच्यात जिद्द आहे हे खरेच. पण समजा अमेरिकेचा पाठिंबा काही कारणाने कमी झाला तर ते चिमुकले राष्ट्र तग धरू शकेल काय? अमेरिकेचे हित आहे तोवरच अमेरिका इझ्राएलची किंवा कुणाचीही मित्र आहे. अमेरिकेचे स्वारस्य संपले की पुढे काय? जगात कुणीही आपला स्वार्थ असल्याशिवाय कुणाच्याही मदतीला उगीच धावून जात नाही. बोस्निया-हर्झेगोविना, बैरुत, सूदान येथे कित्येक वर्षे यादवी सुरू होती. शेकडोहजारो माणसे मेली. शेवटी अगदीच गळ्याशी आले तेव्हा इतर राष्ट्रांनी हस्तक्षेप केला. असो.
हुश्श्य! प्रतिसाद बराच लांबला. आता वाचकांचा अधिक अंत न पहाता थांबावे हे बरे.
स का पाटील हे मुंबई केंद्रशासीत ठेवण्याबाबत आग्रही होते हे ठाऊक होते. पण त्यांना अमेरिकेने बळ देऊ केले होते ही माहिती नवी आणि रोचक आहे!
शिवसेना आणि काँग्रेसच्या मधूर संबंधाबाबत कधीच शंका नव्हती! उगाच नाही वसंतराव नाईकांच्या काळात तिला "वसंतसेना" असे संबोधीत! पण तिथेही अमेरिकेचा संबंध ठाऊक नव्हता.
भारताने मात्र या सापळ्यात न अडकता 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' स्वीकारून रशियाच्या सहाय्याने पहिल्या पंचवार्षिक योजनेतच भिलाई, रूरकेला अशा अवजड उद्योगांची पायाभरणी केली. जिथे साधी सेफ्टी पिन आणि सुईसुद्धा आयात होई तिथे नौका, रेल इंजिने, विमानांचे भाग बनू लागले. नंतर क्रमाक्रमाने शेती आनि सेवाक्षेत्रांवर भर देत देत भारताने आजची प्रगती साधली आहे.
सहमत आहे.
स का पाटील आम्रिका लिंक ऐकलेली नाही. पण सिंडिकेटमधले बरेच जण अमेरिकाधार्जिणे होते हे ऐकले आहे. पुढे (नेहरूंच्या कार्यकालातच) जयप्रकाश नारायण वगैरे अनेक समाजवादी म्हणवणारे लोक काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम नावाच्या संस्थेशी जोडलेले होते. साम्यवादी देशातील स्वातंत्र्याच्या अभावाविरोधात ही संस्था प्रचारकार्य करीत होती. तिला अमेरिका आर्थिक पाठबळ पुरवत असावी. (हे कमल पाध्ये यांच्या आत्मचरित्रात वाचले आहे).
>>> त्यासाठी प्रयत्न करायचा की जगाच्या राजकारणापेक्षा पाकिस्तान हा मोठा आहे असं म्हणून त्यात अडकायचं ते आपलं आपण ठरवूया.
जगाच्या रा़जकारणापेक्षा पाकिस्तान मोठा आहे असे समजून त्यातच गुंतुन रहायचं असं कोणीच म्हणत नाहीय्ये. पाकिस्तान हे एक अयशस्वी राष्ट्र आहे किंवा अंतर्गत राजकारणामुळे पाकिस्तानचे लवकरच विभाजन होईल अशा समजुतीत अल्पसंतुष्ट न राहता, पाकिस्तान हा आपला शत्रु आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानशी मैत्री, शांतता चर्चा, कलाकारांची देवाणघेवाण, दोन्ही देशांतील नागरिकांचा सुसंवाद, १४ ऑगस्टच्या मध्यरात्री सीमेवर जाऊन मेणबत्त्या लावणे अशा गोष्टी करण्यापेक्षा पाकिस्तानशी एखाद्या शत्रुप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. हे करण्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. पण पाकिस्तानने आगळीक केल्यास दोन तडाखे हाणले पाहिजेत. दोन्ही देशातले दळणवळण, व्यापार, चर्चा इ. बंद करून, जिथे शक्य असेल तिथे सीमा सीलबंद करून सर्व व्यवहार तोडले पाहिजेत. पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले तर इतर देशांबरोबर व्यवहार करण्यासाठी भारताला जास्त वेळ व संधी मिळेल.
>>> मला हे कळत नाही की पाकिस्तानला नष्ट करायचे किंवा चारी मुंड्या चीत करायचे म्हणजे नक्की काय करायचे? आतापर्यंतच्या सर्व युद्धांत आपण त्यांचा पराभव केलेला आहे; निदान आपण तरी असे मानतो. मग आणखी एका युद्धविजयाद्वारे त्या भूभागात आपले शासन, आपली सत्ता लादायची का? तिथले पंधरा कोटी मुसलमान ही सत्ता सुखासुखी मानतील?
एका वेगळ्या धाग्यात मी याविषयी माझे मत लिहिले होते. पाकिस्तान ताब्यात घेऊन तो भारताचा भूभाग बनविणे किंवा तिथे राज्य करणे अशक्य आहे. तसे करायला गेलो तर एक नवीन डोकेदुखी मागे लागेल.
त्याऐवजी पाकिस्तानची अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रणगाडे वगैरे ताब्यात घेऊन व तिथल्या अणुभट्ट्या नष्ट करून पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या दुर्बल बनविणे, काश्मिरसीमेवरील महत्त्वाची शिखरे ताब्यात घेणे, तिथली अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करणे, जमेल तितक्या अतिरेक्यांना ताब्यात घेणे व नंतर सीमा सीलबंद करून भारतात होणारी घुसखोरी थांबविणे इ. उपाय भारत अधिक सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
निलकांत, राही ह्यांचे प्रतिसाद नेहमीसारखेच उत्तम.. संतुलित आणि माहितीपुर्ण.. पाकिस्तानशी युद्ध करुन त्याला जिंकून, आपल्याशी जोडून 'पैसे देऊन गँगरीन जोडून घेण्यात' (साभार : गवि) काय हशिल आहे? पाकिस्तानशी आर्थिक संबंध स्थापित करुन , त्यांना आर्थिकदृष्ट्या भारतावर. अवलंबित ठेवावे लागेल. चीन आपला शत्रू नाही का? तोही ईशान्य भारतात राष्ट्रविरोधी करायला मदत करतोय. नक्षलवाद्यांना सहाय्य करतोय, आणि भारताच्याच सीमेत 'एकतर घुसखोर, वर शिरजोर' बनतोय.. एवढं असुनही आम्हाला अगदी 'मेड इन चायना' गणपतीपण चालतो, आणि पाकिस्तानशी संबंधच नकोत.. का? चायनावाल्या गोष्टी स्वस्त असल्याने देशप्रेम थोडावेळ बाजुला ठेवल्या जातं ना? मग हेच धोरण भारताने पाकिस्तानसोबत राबवायला लागेल, जर चीनने आपल्याला त्यात आधीच पछाडलं नसेल तर..
वैधानिक मार्गाने होणारी संथ उत्क्रांती कितीही क्लेशकारक असेना का ती रक्तरंजित क्रांती पेक्षा परवडते.
सध्या पाकिस्तान त्याच्या मार्गावर हळूहळू वाटचाल करू लागला आहे , त्यांच्या मार्गात लष्कर ,कट्टरपंथी , ह्यांच्यासारखे खाचखळगे आहेत.
पण पाकिस्तानी तालिबानचा पाकिस्तान ला पडलेला विळखा व त्यांच्या जाळ्यात अडकलेला पाकिस्तानी अशिक्षित ,गरीब वर्ग ह्यांच्या विरुद्ध पाकिस्तान मधील मध्यम व श्रीमंत वर्गाने लोकशाहीला प्राधान्य दिले.
कारण लष्कराचे कट्टरपंथी कनेक्शन त्यांच्या जनतेला चांगलेच माहीत आहेत.
लष्कराचे पाकिस्तानी समाजात झालेले अवमूल्यन हे ह्या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य आहे.
कयानी ह्यांना अनेकदा संधी असून सुद्धा त्यांनी सत्ता हातात घेतली नाही.
ह्यांचे प्रमुख कारण हक व मुशरफ ह्यांना अमेरिकेकडून जसा निधी व मदत मिळत गेली ज्याद्वारे पाकिस्तानी प्रस्थापित वर्गाला अर्थकारण सुलभ होत गेले तशी मदत मिळणे शक्य नव्हते. म्हणजे ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्व पथावर आणण्याचे अजून कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता.
अमेरिकेला द्रोण हल्ले बंद करा हे सांगण्याची कुवत लष्कराकडे नाही. त्यात लादेन प्रकरणाने तर त्याची अजून नाचक्की झाली आहे. ह्यामुळे सत्तेवर आल्यावर अमेरिकेच्या दांडगाई ला उत्तर देणे शक्य नसल्याने कट्टर पंथीय व सामान्य जनतेचा रोष ओढवून घेणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यातच पाकिस्तानी लष्कर आपली बहुतांशी शस्त्र खरेदी ही अमेरिकेच्या ऐवजी चीन कडून करते त्याचवेळी भारत अमेरिकेकडून शस्त्र विकत घ्यायला सुरवात करत आहे. ह्यामुळे अमेरिकेचा मुक्त वरदहस्त पाकिस्तानवर पूर्वी सारखा असणार नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या शस्त्र खरेदीत अनेक अधिकारी , सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी गुंतले असतात त्यामुळे त्यांचे चीन शी मिंधे होणे व त्यांच्या इशाऱ्यावर नाचणे क्रमप्राप्त आहे.
ह्यामुळे त्याचसोबत अमेरिकेचे भारताशी सर्व स्तरावर मैत्री व सहकार वाढत असल्याने त्याला उत्तर म्हणून चीन व पाकिस्तान ह्यांची नैसर्गिक मैत्री जशी अमेरिका व भारताची आहे होणे साहजिकच आहे.
कयानी ह्यांना हक सारखे पैगंबरवासी किंवा मुशरफ सारखे हतबल ,निष्क्रिय होण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त होणे व निवृत्त होऊन सन्मानाने पाकिस्तानात राहणे जास्त पसंद होते. ह्यामुळे ह्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने सरकार निवडून येणे अपरिहार्य होते.
पाकिस्तानी जनतेपुढे उत्तर प्रदेश सारखे दोन समर्थ पर्याय होते.
त्यांनी कसे मायावती मग अखिलेश असे आलटून पालटून दोन्ही खाऊ पक्षांना समान खाऊ खाण्याची संधी देतात तसे येथे येथील जनता पी पी पी व मुस्लिम लीग ला समान संधी देत असतात.
ह्या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे पठाणांचा मसीहा म्हणून इम्रान चा उदय व कराची मध्ये मुजाहीर पक्षाची हुकमत असलेल्या एम एक्यू एम ला समर्थ पर्याय म्हणून निवडून येणे व छोट्या का होईना प्रांतात आपले सरकार बनवणे शक्य झाले हे आहे.
इम्रान चा खर्या अर्थाने ह्या निवडणुकीतून पाकिस्तानी राजकारणात बस्तान बसू लागले आहे.
पाकिस्तान मध्ये लोकशाही म्हणजे भारताच्या दृष्टीने काय हे पुढील वेळी जमेल तसे लिहीन
प्रतिक्रिया
पण
पाकिस्तानची लोकशाही.....!!!!!
मिपावर चर्चा
जाऊ द्या हो.
अंशतः सहमत
राहि तै.. उत्तम प्रतिसाद.
प्रतिसाद उत्तमच, पण ते
इंटरेस्टिंग
+१
>>> त्यासाठी प्रयत्न करायचा
>>> मला हे कळत नाही की
नावातच सर्वकाही आले
You Said It !!
नीलकांत, प्रतिसाद अतिशय आवडले
निलकांत , राही ह्यांचे प्रतिसाद..
१०० % सहमत
सहमत आहे...
FATA ह्या भागाला फाट्यावर
क्षमस्व
FATA = Federally Administered Tribal Areas
वैधानिक मार्गाने होणारी संथ
वा !!
Pagination