Welcome to misalpav.com
लेखक: मी_देव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जबरी. खूप दिवसांनी काही कसदार वाचायला मिळालं. कोकणात जाउन आलो असं वाटलं. Flawless writing! नेहमीचे रटाळ लेख बघून बघून थोडा शिणलो होतो पण आता एकदम मरगळ गेली. तुमच्या इतर कथा ही वाचल्या, एक गोष्ट जाणवली की तुमच्या कथांना भन्नाट वेग असतो. म्हणजे कथा वाचायला गेली की सोडवत नाही, पुढे काय ही उत्सुकता वाक्यावाक्याला जाणवते. भारी कसब आहे. अजून शब्द नाहीत माझ्याकडे. खूप धन्यवाद. अजून लिहा..

झकास कथा! माझी कॉन्स्पिरसी थिअरी: जमदाडेंनी तिसरं पत्र लिहिलं. ते पोलिस पाटील आहेत, त्यामुळे त्यांना सरपंचाची अंडीपिल्ली माहीत असावीत. पोष्टमनबुवांचा डाव दोन पत्रांत त्यांच्या ध्यानांत आला. सरपंचाला पूर्णपणे लटकवण्यासाठी तिसरं पत्र जमदाडेंनीच पोस्टमनच्या बंगीत सरकवलं. जमदाडे हुषार - आपला डाव पोस्टमनच्या लक्षात आला तरी तो कुठे बोलणार नाही, कारण दोन पत्रांची भानगड त्याच्या पदरी आहेच. समजा त्याच्या लक्षात नाही आलं, तर त्याला तो भुताटकी समजेल. :)

उत्तम भयकथा! शेवटचं वळण छान होतं. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

कथा छान आहे. पण............. प्याटर्न सरळसरळ शाहरुखचा "ओम शांती ओम", ऋषीकपूर सुभाष घईंचा "कर्ज" आणि दिलिपकुमार्-प्राण- वैजयंतीमाला ह्यांचा "मधुमती" जशास तसा आहे. पण कुठल्याच प्रतिसादात कल्पनेच्या नाविन्याच्या अभावाचा उल्लेख नसल्याचे पाहून महत् आश्चर्य वाटले. अर्थात मानवी मनास एकच कल्पना दोन वेगळ्या वेळेस, स्वतंत्रपणे सुचू शकतात, हे ही मान्य आहेच. त्यामुळे कॉपी म्हणवत नाही.स्वतंत्रपणे सुचली असल्यास चांगली जमली आहे कथा.

कल्पनेच्या नाविन्याच्या award goes to मन/मन१/मनोबा :D आपण कर्ज बघताना पण अशी टीका केली होती का की प्याटर्न सरळसरळ दिलिपकुमार्-प्राण- वैजयंतीमाला ह्यांचा "मधुमती" जशास तसा आहे...?? "सरळसरळ" हा शब्द खटकला. लेखकासाठी बोचरा आहे हा शब्द. जरा हळु घ्या. आणि इतरांचा उद्धार करून आपली हुशारी सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन! :)

शांत व्हा चंबूजी .. कथेवरून वातावरण खूप तापलंय आधीच.. :) मला काही बोचलं नाही. सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतात इतकाच म्हणेन. धन्यवाद आपले :)

मुळातच मन यांच्या म्हणन्यात अतिशय तथ्य आहेच. चित्रपट सोडाच अगदि हिचकॉकच्या अशा धाटणिच्या अनेक कथाही आहेत ज्याची सुरुवात सुपरनॅचरल असते/नसते पण शेवट काहिसा मति कूंठित करणारा असतो. अनेक गुढकथा दिवाळी विषेशांकात या प्रकारच्या वाचल्याचे स्मरते. कुट कथा सदरा मोडणार्‍या अनेक कथा नेमक्या अशाच थिमवर उपलब्ध असतात. पण हा प्रकार मिपावर कमि हाताळला गेला आहेच तसे आपल्या लेखनाची सुरेख शैली यांनीच वाचकांचे मन जिंकल आहे ,म्हणूनच आपले लेखन व मन यांची प्रतिक्रिया अस्थानी वाटत नाही हे नक्कि.

खरं सांगायच तर मी ह्यातील एकाही सिनेमा नाही पाहिला.. (माझा कंसेप्ट ओरिजिनल आही हे दाखवायचा प्रयत्न अजिबात नाही) पण ही कथा ब्लॉगवर पोस्ट करायच्या आधी बायकोला वाचायला दिली, तेंव्हा तिने हे हायलाईट केलं की "ओम शांती ओम" मध्ये असंच काही आहे. मी साशंक होतो कथा पोस्ट करू का नको. मग ती पण तेच म्हटली जे तुम्ही म्हणताय - "मानवी मनास एकच कल्पना दोन वेगळ्या वेळेस, स्वतंत्रपणे सुचू शकतात" सो पोस्ट केली. आपल्याला आवडली, धन्यवाद! :)

झकास रंगवली आहे आणि धरून ठेवणारी वर्णनशैली आहे. शेवट जबरा अनपेक्षित होता - दोन वळणे आणि अगदी एका वाक्यात परत कोलांटी.. भारीच.. अवांतरः राहवत नाही म्हणून पण फर्लांगाचा हिशोब पटला नाही. गुगलबाबा म्हणतो १ फर्लांग म्हणजे साधारण २०० मीटर आणि ८ फर्लांग म्हणजे १ मैल. भांबेडपासून चार फर्लांग म्हणजे ८०० मीटर. पोस्टमनच्या गतीने चालत दहा मिनिटाचे अंतर .. मला वाटतंय की तुम्हाला फर्लांग नाही तर मैल म्हणायचं असावं.. छिद्रान्वेषीपणाबद्दल मनापासून क्षमस्व.. पण इतक्या चांगल्या कथेत उगाच दाताखाली खडा आल्यासारखं वाटलं..

अगदी अगदी.. माझ्या हे लक्षातच नाही आलं. कुठेतरी फर्लांग आणि मैल ह्यात गोंधळ झाला. Thanks for pointing out! :) धन्यवाद! पण आता खडा नाही काढता येणार :(

फक्त आणखी एक सुधारणा आहे. म्हणजे भांबेड आणि प्रभानवल्ली ही दोन्ही गावे लांजा तालुक्यात आहेत. त्यात साधारण ६/७ मैल (१०/१२ किमि) एवढे अंतर आहे.

तुम्ही अजून एक चूक काढू शकता... मोठ्ठी.. नेरवणे गाव सातारा जिल्ह्यात आहे.. :) असो. सिरिअस होऊ नका.. काल्पनिक कथेला नकाशाचा आधार लागतो हे मला माहीत नव्हतं.. नेक्स्ट टाईम काळजी टेकींग :D

जर तुम्हाला संपूर्ण काल्पनिक कथा लिहायची होती तर झुमरीतलैय्या सारखी नावं घ्यायची होती. एकीकडे राजापूर, भांबेड आणि प्रभानवल्लीसारखी नावे घ्यायची आणि मग लोकांनी चुका दाखवल्या की त्यांची चेष्टा करायची हेच करायचे असेल तर कथेतली चूक दिसूनही सुरुवातीला तुमचं कौतुक केलं ते माझंच चुकलं हे सपशेल मान्य करते. खरे तर इथे फक्त आपल्या कथा टाकण्यापुरते येणार्‍यांना खास मिपा स्टाईल अहेर देता आला असता पण देत नाहीये. तुमचं चालू द्या.

छानच आहे. सॉल्लीड आवडली. पण हा बंड्या कोण? कारण लेखक जर स्वःता त्याच्या आईजवळ थांबला तर बंडु म्हणजे त्याचा भाऊ गेला का?

बर्‍याच दिवसांनी मस्त कथा वाचली. शेवटची कलाटणीतर जबरदस्तच..!! तुमची लेखनशैली पण आवडली. पुलेशु..!!