Welcome to misalpav.com
लेखक: मी_देव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगदी झोपताना मोबाईलवरुन गोष्ट वाचायला घेतली घाबरत घाबरत वाचली नि सुखांतामुळे शांत वाटलं. असली भुतं बरी असतात. उर्वरीत काम आटपून सुटतात उगाच त्रास देत बसत नाहीत. छान कथा!

अप्रतिम शैली. सुंदर लिखाण. इथे कोणी हिलरी स्वॅंक चा P.S.I Love you चित्रपट बघितला आहे का? एकमेकावर जिवापाड प्रेम करणार्‍या दांपत्य मधला नवरा अपघातात जातो. त्याआच्या एकाकी दुखी बायको ला त्या नवर्‍याची पत्र यायला लागतात. रहस्य काय असत ते चित्रपत्ातच पाहा. असाच मस्त शेवट आहे. : )

दणका! मस्त हो देव...भुतकथा छान रंगली आहे. प्रतिसाद सुद्धा आवडले.

कथा चांगली आहे. पण छोट्या गावातल्या लोकांना एखाद्या घरातल्या सुनेचा भाऊ माहिती नसतो - हे जरा जास्तच 'शहरी' झालं. गावात लोकं शंभर चौकशा करत सगळी कुंडली तपासून घेत असतात - अगदी चुलतभाऊ, मावसभाऊ सुद्धा माहिती असतात - भावकीची माहिती असते. जमदाडेंना तरी नक्कीच असणार ती.

मलाही क्षणभर असं वाटलं होतं पण असं अजिबात जरुरी नाही. मी कोकणातील गावातील आहे. हे सर्व लग्न कुठे, कधी, कोणत्या परिस्थीतीत, कोणत्या जातीत झालय(कुंडली साठी) यावर अवलंबून असतं. कथेचा स्कोप पहाता, हा पाॅईंट वॅलीड नाही वाटंत. मुख्य म्हणजे पोस्टमनला ही कल्पना सुचली.. सहाजिकच त्याने विचार केला असेल अस आपण मानायला हरकत नाही. पण सरसकट नियम आपण नाही लावू शकत की गावात असच होतं!

सर्व मिपाकर सदस्यांना , नुसत्याच वाचकांना , लॉग इन केलेल्या आय डी न्ना, लॉग ऑफ केलेल्या आय डी न्ना, डू आयडींना , हाकललेल्या आयडींना , इतर संस्थळावरील आयडींना , सार्या जगाला धन्यवाद -- मी _स्पादेव

मस्त जमलीय गोष्ट. आवडली.
प्रभानवल्ली. भांबेडपासुन ४ मैलांवर. मुचकुंदि नदीच्या काठी वसलेलं, सहा सात वाड्यांचं एक छोटंसं गाव.
त्या सहा, सात वाड्यांपैकी एक वाडा म्हणजे माझ्या आजीचे माहेर. पंधरा एक वर्षांपुर्वी गेलो होतो लांज्याहुन प्रभानवलीला. घराचा फक्त चौथरा शिल्लक होता. आजी इकडे चुल होती, इकडे देवघर होतं वगैरे सांगत होती डोळ्यात पाणी आणुन. एकदम खिन्न वाटत होतं ऐकताना.

कथा चांगली जमली आहे,पण, अख्खा जन्म मुम्बैत गेल्यामुळे असेल कदाचित, असे काही होऊ शकते हे पटतच नाही.असो.बाकी, पु. ले. शु.

माझ्या ह्या धाग्यातील आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सारख्या कल्पना स्वतंत्रपणे सुचू शकतात. त्याची मिपावरील काही उदाहरणे देत आहे. गवि ह्यांनी लिहिलेली "एअरपोर्ट" (http://www.misalpav.com/node/16319) आणि मराठे ह्यांनी लिहिलेली "वास्तव" (http://www.misalpav.com/node/17880) आणि चाफा ह्यांनी लिहिलेली "तहान" (http://www.misalpav.com/node/19825) . ह्या अगदि एकाच टायपातल्या आहेत. ह्याबद्दल गवि वगैरेंनी मला व्यनि वगैरे पण केलेला होता. नेमका आता सापडत नाहिये. ह्यातल्या लेखकांचं इतर लिखाण मला प्रचंड आवडलेलं आहे. आणि इतकं छान ते लिहितात की त्यांना कल्पना सुचलेल्या आहेत, त्या स्वतंत्रपणेच सुचलेल्या आहेत ह्याची मला खात्री वाटते. तस्मात मी तसे म्हटलो ते दांभिक विनयाने म्हटलेलो नसून तसे खरोखर घदू शकते हे मिपावरच काही दिवसापूर्वीच पाहिलेले असल्याने म्हणतो आहे. बाकी इतर कुणाला माझ्या भाषेबद्दल वगैरे तक्रार असेल त्यांना उपप्रतिसाद वगैरे मी देत बसणार नाही. ही कथाही रंजक वाटली इतकेच म्हणेन.

ह्याबद्दल गवि वगैरेंनी मला व्यनि वगैरे पण केलेला होता. नेमका आता सापडत नाहिये.
तुझ्याकडे खरचं इतके व्यनि आहेत :ऑ ?

कथानक उत्तम आहे. लिहीण्याची हातोटी अगदी वाखाणण्याजोगी. उत्सुकता आणि रहस्य, कथेबरोबरच वाचकाला धावते ठेवते. अजून अशा कथा वाचायला आवडतील. गावांच्या नांवाचे संदर्भ काहीही असले तरी कथानक गुंगवून ठेवणारे आहे. तरीपण, अतिवास ह्यांच्या
छोट्या गावातल्या लोकांना एखाद्या घरातल्या सुनेचा भाऊ माहिती नसतो - हे जरा जास्तच 'शहरी' झालं.
ह्या वाक्याशी सहमत. छोट्यागावातील चौकस शेजारीपाजारीही पोस्ट्मनला ओळखत नाहीत ही विसंगती कथा वाचतानाच जाणवली होती आणि ती पचायला जरा जडच आहे. तरीपण असो. त्याने विशेष रसभंग होत नाही. नोकरी व्यवसायाच्या धबडक्यात (रजा न मिळाल्याने) एखादा भाऊ सख्या बहिणीच्या लग्नालाही जाऊ शकत नाही. असं होऊ शकतं. (लाखात एखादी केस असली तरी...) असो. लिहीत राहा. स्वतःच्या चेहर्‍याभोवती आरतीचे तबक फिरविण्यार्‍या फेकंफाक धाग्यांपेक्षा अशा कथा वाचायला 'मनापासून' आवडतात.