नाही हो.
उलट त्या युद्धात अभिमन्यू कडून दुर्योधनपुत्र लक्ष्मण याचा वध झाला तर अभिमन्यूचा वध अंतिमत: दौ:शासनी (दु: शासन पुत्र) याच्या हातून गदाप्रहाराद्वारे होतो.
महाभारतकालीन राजकीयपट व ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या तात्कालीक संबंधावर आधारित हिन्दी भाषेतील वरिष्ठ उपन्यासकार म्हणून सुप्रसिद्ध श्री. नरेन्द्र कोहली यांच्या महासंग्राम नामक कादंबरीचेसात खंडीय वाचन जरूर करा.अनेक कारणांचे संदर्भ व अंतर्गत मनोविश्लषणातून बरेच काही उलगडे होतील.
@ शशिकांत ओकः नरेन्द्र कोहली यांच्या पुस्तकांबद्दल तुमच्याकडूनच ऐकून पुस्तकांच्या दुकानात शोध घेतला होता, तेंव्हा तिथे रामायणावरील पुस्तके होती. महाभारतावरही 'महासंग्राम' आहे, हे ठाऊक नव्हते. हे कळवल्याबद्दल अनेक आभार.
आता दिल्लीला गेल्यावर बघतोच.
Narendra Kohali
कादंबरीचे शीर्षक महासंग्राम नसून महासमर आहे. सकाळी प्रवासात होतो. जे नाव आठवले ते लिहिले होते.
वरील लिंकवरून त्यांच्या कार्याची माहिती मिळेल.
विकीवरील लिंक
कृष्णाचा पणतू वज्र याचा वंश विस्तारला. हा वज्र म्हणजे अनिरुद्ध आणि बाणासुरकन्या उषा यांचा पुत्र. म्हणजे अर्धा असुर. शेवटी द्वारकेतला यादववंश निर्भेळ राहिला नाहीच.
एक तर्कसुसंगत मनोज्ञ कहाणी जुन्या पिढीतल्या बायकांकडून ऐकली आहे. कृष्णाच्या सोळा सहस्र नारी या सर्व जरासंधवधानंतर त्याच्या अंतःपुरातून कृष्णाने सोडवून द्वारकेत आणलेल्या स्त्रिया होत्या. त्यांना कृष्णाने आपले मानले, त्यांची जन्मलेली आणि गर्भावस्थेतली मुले आपली म्हणून स्वीकारली. कृष्णाच्या निर्वाणानंतर हीच यादवरूपी राक्षसबीजे आपापसात लढून मरण पावली. या कथेला अर्थातच महाभारतात 'कृष्णाने त्यांची सुटका केली' इतक्यापुरताच आधार आहे. पण कृष्ण हा योगेश्वर आणि पुरुषोत्तम कसा, यावर या कथेतून प्रकाश पडतो.
... जरासंध नाही नरकासुर....
बरोबर. जरासंधाने बंदी बनवलेले राजे (किती? कोणकोणते??) त्याने सोडवले. (या राजांना जरासंध 'नरमेध यज्ञ' करून बळी देणार होता, त्यामुळे त्याला अमर्याद सत्ता लाभेल, असे फळ शास्त्रांतरी सांगितले गेलेले होते).
नरकासुराबद्दल अधिक तपशीलवार कथा काय आहे?
यदुवंश पूर्वीपासूनच अनार्य होता. म्हणून तर कृष्णाने इंद्राची पूजा बंद केली होती.
आजच्या आर्यांनी कृष्णाला आर्य अवतार करुन ठेवले.
--- असुर फॅन उद्दामासूर
मी थोडासा कनफ्युज्ड आहे.. आसामात "तेजपुर/ शोनीतपुर" नावाचे एक शहर आहे, जिल्ह्याचे ठीकाण असलेले. हे शोनीतपुर म्हणजे बाणासुराचे राजधानीचे शहर. उषेशी लग्न करायला आलेल्या अनिरुद्धाला बाणासुराने पकडले आणि कैदेत ठेवले. त्यातून त्याला सोडवायला आलेल्या कृष्णाच्या आणि बाणासुराच्या सैन्यात जे युद्ध झाले, त्या युद्धात वाहलेल्या रक्ताच्या पाटांमुळे "तेजपुर/ शोनितपुर" हे नाव पडले. ह्या पौराणिक घटनेचे चित्रण दर्शवणारा एक "थीम-पार्क"पण आहे इथे..
ह्याच उषेची मैत्रिण चित्रलेखा.. शोनितपुरमध्ये अनेक पुरातन्कालीन शिल्पे आढळतात. आसामच्या दमट वातावरणात गोष्टी जास्त टिकत नाहीत म्हणून ह्या शिल्पांचे आणि अवशेषांचे महत्त्व अधीक.. १९९५-९६च्या दरम्यान तिथे जिल्हाधिकारी असलेल्या श्री. भानू ह्यांनी लोकांनी नेलेल्या, नाल्या-गटारांत पडलेल्या, धुण्याचा दगड म्हणून वापरात असलेल्या अनेक शिल्पांना इतर लोकांच्या मदतीने, अगोदर "डंपींग ग्राऊंड" असलेल्या जागेत "चित्रलेखा उद्यान" उभारले.. बहूतेक शिल्पे ही गुप्तकाळातील असावीत, असे आठवते..
प्रतिक्रिया
महाभारत युद्धा मागील राजकारण
नाही हो.
चित्रं छान आहेत
महासंग्राम - श्री. नरेन्द्र कोहली...
महासंग्राम
नरेंद्र कोहली - महासमर
यादववंश
जरासंध नाही नरकासुर.
ऊप्स
जरासंध आणि नरकासुर.
यदुवंश पूर्वीपासूनच अनार्य
कोण आर्य, कोण अनार्य
नातू की पणतू?
ऊप्स
जबरदस्त माहितीपूर्ण प्रतिसाद आणि चर्चा
Pagination