आता तीन रूपयाचा हिशेब समजला ना?
खी खी खी... मला तर वाटलं चीन आपल्या देशाची जागा हळुहळु संपदीत करत चालला आहे,त्यामुळे हिंदी-चीनी भाईचारा वाढवण्यासाठी या नविन राईस प्लेटचा समावेश योजनेत करण्यात आला असेल...
फ्रॉग फ्राईड राइस ! ;)
दिग्विजय सिंग यांना फुकटच जेवायला मिळत असावे कारण या विषयावर अजुन तरी ते बरळले नाहीत.
बाकी हॉटेल अदितीच्या जेवणाच्या बिला मुळे कॉग्रेंसवाल्यांचे रक्त उसळले होते म्हणे... ते बिल खाली देत आहे. त्या बिलाच्या शेवटच्या ओळी वाचनिय आहेत.
अहो सोप्प आहे ५ रु मध्ये जेवण मिळवणे....
१ कागद घ्यायचा आणि ५ रु चा पेन घ्यायचा आणि जे काही पदार्थ खावे वाटतात ते सगळे त्या कागदावर लिहून काढायचे आणि तो कागद खायचा... झाले जेवण
कधी चुकून काँग्रेसवर टीका सुरु झाली की काही काँग्रेसी मिंधे येऊन त्या वर्तनाचे समर्थन करत असतात. पण आता पंचाईत होणार आहे. कारण १२ रु. भरपूर जेवण, ५ रु. भरपूर जेवण ह्या अचाट, आचरट, अतर्क्य , बिनबुडाच्या विधानांबद्दल काँग्रेसनेच काखा वर केल्या आहेत. ती ती विधाने त्या त्या संबंधित इसमांची वैयक्तिक मते असून काँग्रेस पक्ष त्यांच्याशी सहमत नाही असे म्हटले आहे.
इथले काँग्रेसी चमचे आपल्याच पक्षाच्या धोरणांबद्दल इतके अनभिज्ञ असावेत ह्याचे नवल वाटते कधी कधी!
अर्थात टीव्ही वरील चर्चेत यापेक्षा वेगळे दिसत नाही.
https://www.youtube.com/watch?v=vdZ_iUOeaIY
बाकी ह्या विधानांमुळे टीव्ही चॅनेलवर पाच रुपयात काय काय मिळू शकते ह्याची कल्पक उदाहरणे पहायला मिळाली.
पोळीचा एक बारीकसा तुकडा, चमचाभर भाजी आणि वरण,
ब्रेडचे ३ स्लाईस, सफरचंदाची एक बारीकशी फोड, दोन केळी, अर्धा कप चहा वगैरे वगैरे.
दुर्दैवाने ही मूर्ख विधाने काही आठवड्यांनी लोक विसरतील आणि पुढच्या चमचमीत बातमीकडे वळतील हेही खरेच.
या नेत्यांना हे ही माहित नसावे की ५ रुपयाची नोट छापणे सुद्धा परवडणारे नसल्याने ( नोटेचा आकार , आयुष्य आणि छापण्याचा खर्च) २००५ पासुन ती चलनात बंद करण्यात आलेली आहे.
अन्न-धान्याचे भाव वाढत आहेत आणि ते वाढतच राहणार आहेत हे सांगायला भविष्यवेत्त्यांची गरज नाही. त्यात आपल्या अर्थव्यवस्थांचे स्वरूप पाहता श्रीमंतांचे कंझम्प्शन कमी झाले आणि गरीबांचे वाढले असे होत नाही. गरिबांचे कंझम्प्शन वाढण्यासाठी श्रीमंतांचे कंझम्प्शन आधी मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे म्हणजे गरिबांना 'ट्रिकल डाऊन' इफेक्टने फायदा होतो अशी व्यवस्था आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये झालेल्या अर्थवाढीमुळे गरिबी थोड्या प्रमाणात कमी झालीही असेल पण ते पुरेसेही नाही आणि कायमस्वरुपीही नाही.
येत्या ४० वर्षात लोकसंख्या २०-३०% ने वाढेल आणि त्या प्रमाणात अन्न-धान्याचे उत्पादन वाढण्यात व ते सगळ्यांना उपलब्ध होण्यात अनेक अडथळे आहेत. वर्तमानात सगळ्यांना पुरेल इतके अन्न निर्माण होऊनही गरिबी नष्ट होत नाही तर भविष्यात काय होणार?
इच्छुकांनी ज्युलिअन क्रिब यांचे The Coming Famine हे पुस्तक वाचावे.
या व्हिडिओत त्याचा सारांश आहे.
आत्ताच मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची गरज असताना सगळे नेते आकड्यांचे खेळ करण्यात मग्न आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की जगातल्या कोणत्याही नेत्यात आता इतके मोठे बदल घडवून आणायची क्षमता नाहीय. "कोणीतरी" चमत्कारी शोध लावून आपल्याला वाचवेल अशी सगळ्यांना खात्री असली तरी कोणीतरी म्हणजे कोण हे कोणालाच माहित नाही. जेव्हा भविष्यात गंभीर अडचणी येतील तेव्हा हेच नेते सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणून लष्करी बळाचा वापर करून आपल्याला गोठ्यातल्या जनावरांसारखं वागवतील.
प्रतिक्रिया
मिड डे मिल
तीन रूपयाचा हिशेब
आता तीन रूपयाचा हिशेब समजला
दिग्विजय सिंग यांना फुकटच
अहो सोप्प आहे ५ रु मध्ये जेवण
काँग्रेसी मिंधे
या नेत्यांना हे ही माहित
काळाची पावले
अमुल गर्ल ऑन बब्बर...
मॅक-बब्बर - पॉट्भर खा..
इस से मेरा क्या होगा?
Pagination