रघुराम राजन यांना मुदतवाढ ने देण्यामागे किंवा त्यांनी मुदतवाढ न घेण्यामागे काहीही कारणे असली तरी हा मुद्दा केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळला असे मला वाटते. त्यांचे काम उत्तम होते परंतु ते सरकारला नकोसे झाले होते व स्वामींनी त्यांच्याविरूद्ध गरळ ओकल्यामुळे त्यांना जावे लागले अशी सार्वत्रिक समजूत पसरलेली आहे.
यापूर्वी याच सरकारने एफटीआयआयमधील टग्यांचे आंदोलन, जेएनयू मधील देशद्रोह्यांच्या घोषणा, रोहीत वेमुला इ. प्रकरणे अत्यंत संयमाने व प्रगल्भतेने हाताळली होती. सुरवातीला या प्रकरणात केंद्राचा दोष आहे असे चित्र निर्माण झाले होते. परंतु केंद्र सरकारने आततायीपणा न करता संयम दाखविल्यामुळे हळूहळू ते चित्र बदलत गेले व या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचीच काळी बाजू बाहेर आली. परंतु राजन प्रकरणात केंद्राची नाचक्की होत आहे.
जे या प्रकरणात सरकारविरोधी बोलताहेत ते सरकारचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. म्हणजे राजन राहिले असते तरी ते सरकारविरोधातच बोलले असते. आणि जे सरकारच्या बाजूने बोलताहेत ते सरकारच्या किंवा भाजपच्या बाजूनेच बोलतात. त्यामुळे परिस्थिती जशी आहे तशीच आहे. उलट राजन यांच्या निर्णयांच्या ब-या-वाईट परिणामांची चर्चा माध्यमांमध्ये होतच नाहीये. सर्वजण हेच म्हणताहेत की कसं त्यांनी २००५ मध्ये २००८ च्या आर्थिक अरिष्टाबद्दल भाकित केलं होतं. ज्यांना ते हवे आहेत त्यांना ते नक्की का हवे आहेत तेच सांगता येत नाहीये. Business as usual. नाचक्की वगैरे काहीही नाही.
राजन पद सोडणार या बातमीवरून खूप गदारोळ होत आहे. मोदींचे आणि सरकारचे विरोधक या बातमीचे भांडवल करून तीचा उपयोग सरकारवर टीका करण्यासाठी करत आहेत. राजन यांना आणखी तीन वर्षांसाठी पदावर रहाण्याची इछा होती पण सरकारने त्यांना प्रोत्साहन दिले नाही असा सोयीस्कर गैरसमज त्यांनी त्यासाठी करून घेतला आहे. पण राजन यांनी स्वतः ते या पदावर आणखी तीन वर्षे राहण्यासाठी उत्सुक आहेत असे कुठेही दर्शविलेले नाही. त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या सारख्याच शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि दोन्ही मुले अमेरिकेतच वाढलेली आणि शिकलेली आहेत. भारतात सरकारशी सम्बन्ध चांगले असले तरीही तुलनेने नोकरीतील कमी पगार ,लाल फीत,मुंबईतले हवामान ,रस्त्यावरील रहदारी या गोष्टी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एव्हाना जाणवल्या असतील.
म्हणून सर्वकाळ परदेशी रहात असलेल्या या कुटुंबाने परत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यावर एवढा खल आणि उहापोह करण्याचे प्रयोजन काय ?
आर. बी. आय. खुर्ची ची पॉवर, आव्हानं, निर्णयांची परिणामकारकता प्रचंड असते. राजन साहेब सहज शेती करायला म्हणुन भारतात आले असते तर त्यांच्या परतिची हि कारणं एक वेळ गृहीत धरता आलि असती.
राजन यांनी आणखी तीन वर्ष पदावर रहाण्याची इछा व्यक्त केली होती पण सरकारने त्याला नकार दिला असे सिद्ध करणारा काही पुरावा असेल तर तो मांडा. कारण हे गृहीत धरूनच सरकार वर टीका चालली होती. तसे शाबीत झाल्यावर पुढील तीन वर्षात राजन कोणते पीक घेणार होते त्यावर आपण चर्चा करू.
पण राजन साहेबांचा कार्यकाळ कंटिन्यु करावा कि नाहि याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु असताना व राजनसाहेबांवर स्वामी वगैरे मंडळींची टिका होत असताना जेटली साहेबांनी 'हि प्रशासनीक बाब आहे व त्यावर योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल' असले उत्तर दिले...'राजन साहेबांचा कार्यकाळ वाढवण्याबद्द्ल सकारात्मक चर्चा सुरु आहे' वगैरे स्टेटमेण्ट कधि आले नाहि. जनरली संवेदनशील मुद्द्यांवर अशाच भाषेत हिंट दिली जाते.
असो.
ही ५ वर्षांची असते. राजन हे त्या पदावर नियुक्त झालेले सर्वात तरुण governor होते. तरीही आता त्यांची भलावण करणाऱ्या पी.चिदंबरम यांनी त्यांना ३ वर्षांच्याच मुदतीवर आणलं. जर त्यांना तेव्हाच ५ वर्षांसाठी आणलं असतं तर सप्टेंबर २०१८ मध्ये म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या ७-८ महिने आधी राजन यांचा कार्यकाल संपला असता. पण चिदंबरम यांनी तसं केलं नाही आणि स्वतः एकेकाळी RBI Governor असलेल्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यात काही वावगं वाटलं नाही. त्यामुळे राजन यांना नीट न वागवल्याचा जो आरोप सरकारवर होतोय तो करणाऱ्या विरोधकांनी राजन यांना काही रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे.
२३ सप्टेंबर २०१३ रोजी सुरवात झाल्यानंतर शतक गाठायला या धाग्याने ३३ महिने घेतले. मिपावर असा प्रकार त्यामानाने फार बघायला मिळत नाही.
असो. माझ्या माजी आय.डी वरून सुरू केलेल्या धाग्यावर माझ्या दुसर्या आय.डी वरून काही प्रतिसाद देऊन अर्थशास्त्रावरील चर्चांसाठीच्या या आय.डी वरून त्यावर शंभरावा प्रतिसाद द्यायचा मानही माझाच.
या चर्चेत इतर काही मुद्दे आले आहेत. त्यांविषयी उद्या लिहितो.
चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
राजन हे स्वतःहूनच मुदतवाढ घेणार नाहीत. आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही असे त्यांना खात्रीशीर समजले असावे. त्यामाग नक्की काय कारणे होती हे अजूनतरी बाहेर आलेले नाही. त्यामुळे त्याविषयी गॉसिप करण्यात अर्थ नाही. परंतु त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षांना व माध्यमांना एक नवीन मुद्दा मिळाला आहे व केंद्र सरकारकडून त्या मुद्द्याचा प्रतिवाद कोणीही करत नाहीय्ये. केंद्र सरकारने असा बचावात्मक पवित्रा का घेतला आहे ते समजत नाही. एकंदरीत या प्रकारात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसतो. टीका सहन करावी लागली तरी हरकत नाही, परंतु टीकेला कोणतेही उत्तर न देता आम्ही मौन पाळणार असा सरकारचा पवित्रा दिसतो. त्यामुळे टीकेचा भडीमार अजूनच वाढत आहे.
यातील दोन मुद्दे असे आहेत.
१) राजन यांची कामगिरी उत्कृष्ट होती का? व ती तशी असल्यास त्यांच्या जाण्याने तोटा होईल का?
माझ्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.
२) राजन यांच्या जाण्यामागे नक्की कोणती कारणे आहेत?
याविषयी सर्वांनीच मौन पाळले आहे. जे काही सुरू आहे ते सर्व गॉसिप आहे व त्यामुळे केंद्र सरकारवर दोष येत आहे. केंद्र सरकारने यावर पारदर्शकता दाखवून खुलासा करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रतिमाहानी होत राहील.
दीपक घैसासांच्या शब्दात राजन प्रकरणाची एक वेगळी बाजू
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/rbi-governer-rajan-criticism/articleshow/52887655.cms
अनुप ढेरे,
मूळ स्रोत सांगितल्याबद्दल धन्यवाद. वरवर चाळायला घेतला तर मध्येच सोडून दिला. आधी मटात वाचलाय म्हणून ! इंएमधला लेख इथे आहे : http://indianexpress.com/article/opinion/columns/raghuram-rajan-rbi-rexit-nda-govt-arun-jaitley-narendra-modi-2865294/
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
+१
यापेक्शा कैच्याकै फॉरवर्ड्स
रघुराम राजन यांना मुदतवाढ ने
गुरुजी
उगाच उहापोह
मालक...
अहो राव
असा काहि पुरावा माझ्याकडे तरी नाहि
RBI Governor ची मुदत
गुरूमूर्तींच्या लेखाबद्दल धन्यवाद !
शंभरावा प्रतिसाद
शतका बद्दल श्री.क्लिंटन आणी
राजन हे स्वतःहूनच मुदतवाढ
दीपक घैसासांच्या शब्दात राजन
हा लेख बहुधा इंडिअन
सहमत आहे
Pagination