Welcome to misalpav.com
लेखक: मितान | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भयाण आहे सारं. परंतू वाचून धक्का नाही बसला. अशी खुप मुलं आपल्या आजूबाजूला असतात. कळत नकळत आई-वडीलांकडून किंवा पालकांकडून भावनिक शोषण (इमोशनल अ‍ॅब्युज), शारिरिक शोषण (फिजिकल अ‍ॅब्युज) आणि शाब्दिक शोषण (व्हर्बल अ‍ॅब्युज) होत असते. नात्यातील कुणीतरी, शाळेत कॉलेजात किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अगदी पालकांकडुनही लैंगिक शोषण होत असते. अशा वेळी मुलांची अवस्था "मुकी बिचारी कुणीही हाकावी" अशी असते. अशा शोषित मुलांच्या पालकांपैकी खुप कमी पालकांना जाणवत असतं की आपल्या मुलांना काही समस्या आहे किंवा आपण चुकीच्या पद्धतीने मुलांना वाढवतोय. खुप कमी मुलं समुपदेशकाकडे (कौन्सेलरकडे), मानसशास्त्रज्ञाकडे (सायकॉलॉजीस्टकडे) किंवा मानसोपचारतज्ञाकडे (सायकीयाट्रीस्ट्रकडे) नेली जातात. मुलांना धपाटे दिल्याशिवाय त्यांना वळण लावताच येत नाही हा आपला गोड गैरसमज असतो. ज्यांनी लहानपणी असे धपाटे खाल्लेले असतात त्यांना त्याचं केव्हढं कौतुक असतं. ते ही परंपरा पुढे चालू ठेवतात. मुलांवर ओरडणे ही तर एक क्षुल्लक बाब असते पालकांच्या दृष्टीने. मात्र या क्षुल्लक बाबींचा मुलांवर काय परीणाम होत असेल याचा विचारच होत नाही. डोक्यावर छप्पर, घालायला कपडे, खायला अन्न आणी शिकायला पुस्तकं दिली म्हणजे आपण जगातले सर्वोत्कृष्ट पालक झालो असं खुप सार्‍या पालकांना वाटतं. मुलांना ह सारं दयायलाच हवं. तो त्यांचा हक्क असतो. पण त्याचबरोबर मुलांना समजून घेणंही गरजेचं असतं. "आम्ही तुझ्यासोबत आहोत" अशी विश्वासाची भावना मुलांच्या मनात निर्माण करणं गरजेचं असतं. सात आठ वर्ष वयापर्यंत मुलांना मोठयांना खुप काही सांगायचं असतं, खुप सार्‍या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात. त्यांच्या प्रत्येक हाकेला पालकांनी ओ दयावी अशी त्यांची ईच्छा असते. दुर्दैवाने खुपच पालक हे सारं करतात. खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर.

"खरं तर लहान मुल वाढवणं ही एक आनंदयात्रा असते. अर्थात ते आपल्याला कळलं तर." एका "च" ची सुधारणा करावीशी वाटली,ती केली... बाकी आपण मुद्दाम गहन विचार करत नसल्याने तुमचे लेख आणि प्रतिसाद वाचनीय असतात..

त्यांचे पालक(?) त्यांना असे करायला भाग पाडतात. मुले काही आकाशातून सगळे घेवू न येत नाहीत,(एक अंकूरचे उदाहरण सोडले तर ... अर्थात तिथेही पालकांचा प्रश्र्न आहेच.....अरे तुम्ही एका मुलाला जन्म देत आहात तर त्याची काळजी कुणी करायची?) असो...

विमनस्क करुन गेले लिखाण. असं काही वाचलं कि आजकाल फार त्रास होतो. पण या साठी कुणीतरी कुठेतरी काहीतरी करत असतीलचं ना? तिथे काही मदत करता येइल कां आम्हाला? हि परिस्थिती भयंकर आहे, पण यावर उपायही असतीलचं की.

मि का यावर नक्कीच उपाय आहेत. पालक, समुपदेशक, शिक्षक आणि मूल अशी टीम यातून एकत्रितपणे यावर काम करू शकते. सर्वांचा सहभाग मोलाचा.

आनंदयात्रा संगोपनाची नावाचं डॉ. लता काटदरेंचं एक छान पुस्तक आहे. मुलं वाढवणार्‍या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.

अवस्थ! - कॉलेजमध्ये असताना स्वतःसाठी आयपीएच ला भेट दिलेला प्यारे.

खरं आहे गं अगदी! काय बोलावं सुचत नाही. पण आपल्यासारख्या साध्या घरातून आलेल्या मुलांना या विचित्र परिस्थितीतील मुलांचा त्रासच होतो. माझ्या मुलाच्या स्कूलबस्टॉपवरील एका मुलीच्या आईवडीलांचा डिव्होर्स होऊन २ महिने झालेत. ती बराचवेळ बरी असते पण कधीकधी एकदम सगळ्यांना मारत सुटते. तिला परिस्थिती स्विकारायला थोडा वेळ द्यायला हवा पण आईला वेळ नाही आणि कोर्टाने व्यसनी वडीलांवर निर्बंध घातलेत. बरं आता ही आमची टीनएजर मुले आणखीनच अवघडली आहेत. मग त्यावर सध्यापुरता एक उपाय काढलाय आणि तो बर्‍यापेकी वर्क होतोय. परवाच मुलाचा मित्र बस स्टॉपवर कोणाशीही बोलत नव्हता आणि एकदम झाडामागे जाऊन रडायला लागला. आम्ही सगळेच बघायला लागलो. तो कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. नंतर समजले की त्याचे आईवडीलही वेगळे होणारेत.

.लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.
हे जरी खर असल तरी समाजाचे चित्र अशा अनेक खाजगीपणाच्या आवरणाखाली नीट समजू शकत नाही. समाजात घडणार्‍या अनेक बाबी दबून राहिल्या. समाजाचे प्रश्न समजण्यासाठी अशा बाबींचा उलगडा होणे अपरिहार्य ठरते. साहित्य अशा वेळी चांगले काम करते.

माझ्या मुलगा आता ८ वर्षांचा आहे . एक दिवस फारच अपसेट होउन घरी आला , नेहेमी असा येत नाहि . थोडासा जरी फरक जाणवला तरी आजकाल घाबरायला होतं . हे जरी खरं असलं तरी संवाद साधणं महत्वाचच . मी आल्या आल्या काहि लगेच विचारलं नाहि ..... संध्याकाळी जेवणं झाल्यावर सगळेच थोडावेळ एकमेकांच्या संपूर्ण दिवसाचा आढावा घेतो , ती फक्त आवर्जुन कम्पल्सरी केलेली एकमेकांशी संवाद साधायची वेळ . त्यावेळी त्याच्या बाबाला मी आधीच सांगितलेला त्याच्या अपसेट होण्याचा विषय काढला तेव्हा तो अक्षरशा डोळ्यात पाणि आणुन म्हणाला " बाबा ठ्येयलर चे मॉम डॅड सेपरेट होतायत , तो फार रडतो , टिफिन सुद्धा देत नाहि कि स्नॅकहि मिळत नाहि घरुन असे का वागतात त्याच्याशी ? त्याची काय चुक आहे ? खरच काय बोलावं तेच समजलं नाहि :(

अवघड आहे. ही मुलं-मुली निदान तुमच्यापर्यंत पोचली तरी, ज्यांना ती संधी नाही, त्यांच काय असेल या विचारांनी अजून अस्वस्थता वाढली. पण थोडा विचार करता असंही वाटलं की निदान हा प्रश्न समोर येतोय - म्हणजे तो आहे हे मान्य केलं जातंय पालकांकडून हीही एक मोठ्ठी पायरी गाठली आहे आपण समाज म्हणून. "प्रश्न नाहीच" असं मानून जगण्यापेक्षा हे कैक पटींनी उत्तम; कारण त्या प्रश्नातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते प्रश्न स्वीकारण्यातून!

आपल्या आसपास अशा खूप कहाण्या खरे तर दिसतात. पण आपण कशाला मधे पडा या विचाराने आपण गप्प रहातो. खरं सांगायचं तर तुझ्याकडे ही मुलं आणली गेली असतील तर त्यांचं नशीब म्हणायला पाहिजे. माझ्या मुलीच्या वर्गातला एक मुलगा फारच हायपर वागतो, त्याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे न्या म्हणून आईला सांगितलं तर "तो अपुर्‍या दिवसाचा आहे त्यामुळे त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि तो असा करतो" हे उत्तर मिळालं. काय बोलणार?

सायकॉलॉजी हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. (त्या नागरीक शास्त्रापेक्षा हे कितीतरी बरे.....हे वाक्य किंचीत विचार करून लिहीले असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी ह्या उपप्रतिसादावर आपल्या मताची पिंक टाकू नये.)

मुक्त विहारी, सुदैवाने अशी संधी मला मिळतेय. सध्या मी एका शाळेत ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांना भावना आणि विचार शिकवतेय. मला खूप आनंद मिळतोय यातून.

मुलांपेक्षा त्यांच्या जन्मदात्यांना त्याची जास्त गरज आहे. (जन्मदाता ते पालक ते सूजाण पालक असा प्रवास करु इच्छिणारा) मुवि..

'आपण कशाला मधे पडा', हाच अडथळा होतो आणि जीव हळहळतो. अगदी जवळच्या नात्यातल्या मुलांचे पण काही बिघडताना दिसलं तरी काही करता येत नाही.

असेच बरेचसे पालक आमच्याकडे मुलांची तक्रार घेऊन येतात कि तुम्ही मुलांना काही तरी सांगा. त्यांच्याशी बोलले तर हे लक्षात येते कि आईबापांची फार मोठी चूक होत आहे. पण ती चूक जर लक्षात आणून दिली तर ते स्वीकार करण्याची तयारी नसते किंवा कळते पण वळत नाही. अशा अनुभवातून आम्ही( मी आणी माझी पत्नी) शहाणे झालो आहोत. लोक फुकट सल्ल्यासाठी येतात त सुद्धा आम्ही त्यांच्या मुलांचे समुपदेशन करावे यासाठी. त्यांना त्यांची चूक दाखवून दिलेली आवडत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता मानसशास्त्रज्ञांकडे समुपदेशनासाठी जा असा सल्ला देतो. ज्यांना तितकी तळमळ असते ते जातात. ज्यांना नसते ते आपला प्रश्न बासनात गुंडाळून बसतात. याचा माझ्या पत्नीस फार त्रास होत असे पण तुम्ही जग सुधारू शकत नाही हे माझे बाकी तिला आता आता पटायला लागले आहे. आपण लोकांना सल्ला द्यावा पण त्यांनी तो ऐकल अन्ही तर आपण जीवाला त्रास करून घेऊ नये हे आता तिला पटायला लागले आहे. नेकी कर दरिया मी डाल. चार पावले चालल्यावर धाप लागत असलेला माणूस इ सी जी मध्ये हृदयविकार बळावल्याची लक्षणे असताना मी दिवाळीनंतर रुग्णालयात गेलो तर चालेले का असे विचारतो. मग या माणसाना त्या गोष्टीचे गांभीर्य कसे पटावे . यावर मी एक लेख लिहिला होता (तेरी आंख के आंसू पी जाऊ) http://www.misalpav.com/node/25642 . केवळ जास्त प्रशिक्षित समुपदेशकांची गरज आहे असे नव्हे तर समाजप्रबोधनाची जास्त गरज आहे.

सुबोध खरे, सहमत ! +१ आमच्याकडे आलेले पालकही बहुतांश वेळेला त्यांच्या वागण्यात बदल सुचवले की परत येत नाहीत. मग हाताशी असणार्‍या मुलासोबत जेवढे काम करणे शक्य आहे तेवढे करते. पालकांना ' चॉइस आणि प्राइस" ची थिअरी मात्र आवर्जून सांगते. माझ्या कामाच्या मर्यादा मी कधीच मान्य केल्यात म्हणून शांत झोपू शकते :)

किती दिवसांनी लिहिलंस गं मितान, भिडलं अगदी.. पुन्हा लिहित जा नं.. कोमल सारखेच म्हणते, स्वाती

स्काइपवर भेटत असालच ना? मग आता अस करा. वेळ ठरवुन घ्या. मुलींना अस लिहील्याने दोन असाव्यात अशी माझी समजुत. तर एक तास फक्त एकटीने तुमच्याशी कानगोष्टी करायच्या. त्यावेळी अगदी आईला सुद्धा जरा वेळ दे ग तिला एकटीला अस सांगा. मग पुढच्या आठवड्यात दुसरीला. अन रात्री कधीतरी किंवा मुलींना सांगुन एकट्या आईला असा वन टु वन वेळ द्या. तुम्ही लांब असल्याने आता फटकन ओरडु नाही शकणार हे चुकल, ते चुकल म्हणुन,आणि मुलींनापण आपलही कोणी ऐकतय ही भावना निर्माण होइल. इतका दुरवर असलेला बाबा असा एकदम जवळचा होउन जाइल की त्याच्याशी कान गोष्टी कराव्या. टिनएजर असतील तर मात्र हे सगळ विसरा.

स्काइप वर बोलतो, कधी कधी छान संवाद होतो. कधी कधी लहान मुलगी (तिसरीत आहे) गप्प बसून माझ्याकडे एकटक बघत राहते. बोल म्हणता बोलत नाही. आणि मग एकदम रडू लागते. नंतर आई जवळ म्हणते कि बाबा बरोबर फिरायला जायचे आहे. मन सुन्न होते.

जिथे असाल तिथून तुम्ही तिच्यासाठी फोटो काढून पाठवा. तिला चित्रं काढायला लावून रोज स्काईपवरुन दाखवायला सांगा. तुम्ही रोज कायकाय केलंत हे तिला सांगत रहा. तिच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करा.तिने कायकाय खाल्लं हे विचारत रहा अधूनमधून एखादं खेळण्याचं पार्सल तिच्या नावाने पाठवा, फार महागाचं काही लागतं असं नाही, माझ्या नावाने काहीतरी आलंय हेच त्यांना अप्रूप असतं! तुम्ही लांब का आहात हे तिला सांगा. मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा भरपूर समज असते. हळूहळू ती निश्चितपणे बोलायला लागेल. मुख्य म्हणजे तुम्ही तिच्यासमोर उदास होऊ नका नाहीतर मुलं लगेच गळपटतात. आपल्याला लांब राहण्याचा ताण असतोच परंतु आता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तो ताण कमी कसा करता येईल हे बघा. शुभेच्छा! -(बाप्)रंगा

अपर्णा ताई आणि तुमचे खूप खूप आभार. मी हे करून बघेन. आता तर मी दिवाळी साठी भारतात जात आहे. येताना दोघींना महिन्याभरासाठी घेवून येत आहे

वरचं वाचून खूप मोठ्ठा प्रतिसाद लिहावासा वाटत होतं पण झाकली मूठ सवा लाखाची !! आपण मुलांना हवं ते खायला दिलं, म्हणतील ते कपडे दिले की झालं असं वाटतं काही पालकांना. मुलांच्या मनात काय चाललंय, त्यांना खरंच काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नसते. मी म्हणेन ते आणि तसंच केलं पाह्यजे मुलांनी (रादर सगळ्यांनीच हे सांगतील ते ऐकावं असं वाटत असतं, जो ऐकणार नाही तो वाईट) अशी अपेक्षा असते. दुसर्‍यांना उपदेशाचे डोस देणारे हे मात्र स्वत:च्या बाबतीत त्याच गोष्ट लागू करताना डळमळतात. अशात मुलांनी एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध केली की अहंकाराला प्रचंड धक्का बसतो आणि मग उभं राहतं चार भिंतीतलं रणांगण!!

खूप अस्वस्थ करत आहे हे सारं. पण पालक खरंच या सगळ्याला तॉड द्यायला पुरे पडतील का ? आपण फार तर हे करू शकतो...