Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

>>> लालू हे मनसेचे कार्यकते नसून मनापासून लोकसेवा करणारे कार्यकर्ते आहेत. *crazy* *CRAZY* :crazy: तुमच्या लेखापेक्षाही तुमचे प्रतिसाद जास्त विनोदी आहेत.

लोकसेवा करणारे कार्यकर्ते आहेत. असेल कदाचित तसेही असेल. पण आजकाल लोकांना अशी लोकसेवा बघवत नाही.लालू बिचारे, लोकांची सेवा तर करत होतेच.लोकांना चोरांचा त्रास होवू नये म्हणून त्यांनी किती कष्ट घेतले हे लालू स्वतः काहीच सांगत नाहीत.खरे तर त्यांना मुख्यमंत्रीपद पण नको होते.केवळ लोकांचा आग्रह म्हणूनच त्यांनी ते स्वीकारले. केवळ लोकांच्या आग्रहासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीण केले.घराणेशाहीला लालूंचा किती विरोध आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. शिवाय लालू जनावरांची पण सेवा करत होते.त्या जनावरांसाठी त्यांनी चारा पण आणला.पण मराठी जनता दुष्ट आहे.त्यांना हे काही बघवले नाही आणि म्हणूनच मराठी लोकांनी लालू विरुद्ध केस टाकली.पण आता लालू सुटले आहेत.त्यामुळेच आता कोण तरी माणूस बिहारला जावून लालूंचा भाट व्हायला प्रयत्न करत आहे, असे ऐकिवात आहे.

तुमच्या नम्रतेची आणि सहनशक्ती ची तारीफ करावी थोडीच … नाहीतर आम्हाला आमच्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका जरी काढल्या तरी वाईट वाटते…. इथे तर तुमच्या प्रत्येक वाक्याचे पोस्ट मार्टेम होतेय… आणि तुम्ही आपले विनोदी लेखन तेवढ्याच उत्साहाने लिहिताय… येऊ द्या आणखी

कशाला कशाला, बरं असुदे असुदे,(जास्त मिठाई खाणे हे तब्येतिला वाईट हो लोक तो बेचव चारा कसा खात अस्तिल बरे)

लोक तो बेचव चारा कसा खात अस्तिल बरे चार्‍यामधे फायबर कंटेट खूप असते. त्यामुळे येकदम पौष्ठीक!

>>> धर्मांधाना सत्तेपासून रोखणार लालूंची सिंहगर्जना.. म्हणजे काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रीय जनता दल, बसप, राष्ट्रवादी इ. धर्मांध पक्षांना सत्तेपासून रोखणार. लालू तुम आगे बढो, हम कपडे संभालते है ! लालू तुम चारा खाओ, हम तुम्हे बचाते है!!

लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही.

पलटी मारण्याचा प्रश्नच येत नाही देशाच्या हितासाठी सत्ता कॉंग्रेसचीच यावी असे मला वाटते देशाचा विकास कॉंग्रेसच करू शकते ह्यात वाद नाही. पण जर दुर्दैवाने कॉंग्रेस ची सत्ता आली नाही तर मात्र तिसर्या आघाडीची सत्ता यायला हवी.देशाचा अजून विकास व्हायचा असेल तर कॉंग्रेस व तिसरी आघाडी ह्या शिवाय पर्याय नाही.

अहो सचिनशेट, दुदैवाने का म्हणता दुष्कर्माने म्हणा ना राव ! दैववाद आणून तुम्ही आपल्या पुरोगामीपणाला का दुखवताय मालक ?

ट्रोलू प्रसाद यादव........... >>>>>लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही. उठा ले रे भगवान उठा ले.....मेरे को नही रे.....ये ट्रोलू को उठा ले.... :D

इतक्या गांभीर धाग्यावर टोळभैरवांनी असल्या टवाळ प्रतिक्रिया बघुन आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. श्री. सचीन यांनी इतक्या पोटतिडकीने लिहिले आहे आणि अजाण मिपाकर त्याची टिंगल टवाळी करताहेत हे बघुन दु:ख झाले. लालुप्रसाद यादवांची चाराखाऊ म्हणुन चेष्टा करणारर्‍या समाजकंटकांनी एकदा स्वतः चारा खाउन बघावा म्हणजे ते किती कष्टप्रद काम असते ते कळेल. अर्रे गुरेढॉरे खातात तो चारा त्या गोप्रतिपालक समाजधुरिणाने स्वतः खाउन बघितला त्याच्या मागचे कारण इतकेच की जनावरांना योग्य खुराक मिळतो आहे की नाही ते बघणे. अर्रे इतका कोमल ह्रिदयाचा माणूस तो त्याचे पाय पुसण्याची तरी लाय्की आहे का तुमची? कुठे फेडाल ही पापे. ई ळोवे योउ ललु

लालूंचे किती गुणगान करावे? ते तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे. कुठे ते इंग्रजांच्या जमान्यातील स्वातंत्र्यसैनिकांना त्रास देणारे जेलर आणि कुठे हे लोकनेत्यांच्या साठी झटणारे जेलर. मला तरी हे वाचून एक भारतीय म्हणून बरेच काही तरी वाटले.

तुरुंगात गेले असतांना. जेलरने त्यांना तंबाखू मळून दिली असे वाचलेले आहे>>>>>>>>>>>>>>> छान..कोठल्या वृत्तपत्रात वाचले ते आम्हालाही सांगा म्हणजे आम्हीही वाचू

हे बरे आहे राव.... तुम्ही माहिती न वाचता टंकायचे आणि मग आम्ही ती पुरवायची. असो... आता तुम्ही बिहारमध्ये न जाता पण लालू विषयी लिहू शकता तर , अशा बातम्या तुम्ही कशा काय वाचणार?

बरोबर....९५० करोड चा चारा खाणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी सिंघम सारखी जिगर आणी बकासुरासारखी फिगर लागते....

जेलरच्या पत्नीने त्यांच्या विपुल कर्णकेशसंभाराच्या वेण्या घालून त्यात एकेक गजराही माळला होता म्हणतात. खरे खोटे तो पशुपतीच जाणे!

आप जेल मे थे तो नितिश ने बिहार का बिल्कुल महाराष्ट्र बना दिया! http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5272400163989472408&SectionId=2&SectionName=संपादकीय&NewsDate=20131218&Provider=-&NewsTitle=छूट%20गईले%20ललवा%20हमार!%20(ढिंग%20टांग)

बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले तर काल सोनिया गांधी 'लालुंच्या सुटकेने आनंद झाला' असे म्हणाल्या. हे बघुन लालुंना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठींबा द्यायला राजी करण्यासाठी दोन महीने तुरुंगात ठेवले असे वाटले ;)

बाहेर आल्या आल्याच लालुंनी 'राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य' असे वक्तव्य केले>>>>>> जे लालुना कळते ते तुम्हाला कळू नये ह्याचे आश्चर्य वाटते

पोलिसांनि आदरणीय लोकनेत्याचे चरण कमल धुतले....हि तर चाटुगीरी ची सिमा आहे. जय हो. http://www.ndtv.com/article/india/probe-ordered-into-police-officer-washing-lalu-prasad-s-feet-460406?pfrom=home-otherstories

लालू जेलबाहेर, मोदींना आव्हान "आता मोदींचे काही खर नाही" हे म्हणायचे विसरलात का सचिन ? चला तुमचे आणखी एक विनोदी वाक्य आता मी गेस करतो "झुंजार आणि सामान्य माणसांची जाण असणारा तसेच बिहार चा कायापालट करणारा ढाण्या वाघ आता मोदी नावाच्या बकऱ्या वर तुटून पडणार"

हा पराकोटीचा भ्रष्ट, असंस्कृत, गलिच्छ मनुष्य इतका कोडगा आणि निर्ढावलेला कसा आहे हे बघायला मिळते आहे. जामिनावर सुटला तर जणू निर्दोषच सुटला असा आव आणतो आहे. ह्या नालायक माणसाचे भाषण ऐकून लोक आपले मत बदलतील अशा दिवास्वप्नात रहाणार्‍यांची कीव येते. एक विनोदी प्रोग्राम ऐकायला जाऊ असे म्हणत ह्या आचरटाचे तोडलेले तारे ऐकायला लोक येतील. एखादा डोंबार्‍याचा खेळ, तोंडे वेडीवाक्डी करणारा विदुषक इतकीच ह्या माणसाची लायकी. बघू या काय दिवे लावतात हे कडबाकिंग!

ह्याचे उत्तर ओळखायचे असेल तर तो काय प्रकारची पोपटपंची करतो आहे ते पहा. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-on-Modi/articleshow/28110820.cms युवराज राहुलजींपुढे केजरीवाल वा मोदी हे कःपदार्थ आहेत असे ह्या इसमाचे म्हणणे आहे. जामिनावर सोडताना काय अटी घालून सोडले आहे ते ओळखणे अवघड नसावे! सुमार केतकर, दिग्गी, फार काय महाराणी सोनियांनाही अतीरंजित वाटेल अशा प्रकारची राहुलस्तुतीचे आवर्तन ह्या पशुने चालवले आहे. लालूसारख्या भ्रष्ट बरबटलेल्या हीन जनावराचे क्यारेक्टर सर्टिफिकिट कितपत फायद्याचे ठरेल ते काळच सांगेल.

राहुल गांधींमध्ये पंतप्रधानपदाचे सर्व गुण- लालू http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5476200950418013643&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20140116&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82

लालूनं तारे तोडून लै दीस झाले. लोकं खो खो हस्ली आनि इसारली बी. आता तर राऊलच्या मायेनी बी त्येला सांगीतलं की बाबा ह्ये तुला जमनार न्हाय. उगं त्वोंडावर पडून फाय्दा न्हाय. लालू काय आप्ले पलवे चाटायला एका पायावर हुबा है, त्येला काय जेल चुकवाय्चिय. आनि लालूचे तल्वे चाटाय्ला पन काय्बाय लोकं अस्तात, त्यानाबी काय्तरि चारा लालू ताकत आसल नायतर तो चारा टाकल या आशेनं ति लोकं झुरत अस्त्याल. पन हा फुटकळ धागा परत पर्त वर आनायचा क्शीन प्रय्त्न बघून तुम्ची लैच कीव वाट्ली