Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

म
महेश_कुलकर्णी यांनी
गुरुवार, 02/20/2014 - 07:53  ·  लेख
लेख
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली. गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.) आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो. खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत. उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता. वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो. टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया द्या
67319 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

आ
आत्मशून्य Fri, 02/21/2014 - 17:00 नवीन
गांधीजी अचानक आक्रमक वगैरे झाले असते तर्च्या या गोष्टी म्हणा.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ह
हुप्प्या Sat, 02/22/2014 - 00:14 नवीन
मागे वळून बघताना असेच वाटते की नथुराम गोडसेने गांधींना मारून चूक केले. गांधी संपला पण गांधीवाद कायमचा बोकांडी बसला. भारतात दुसरा कुठला सत्पुरुष होऊन गेला की नाही अशी शंका येण्याइतपत ह्या माणसाचा उदोउदो सुरू झाला. प्रत्येक नोटेवर गांधी छापण्याचा खुळचटपणा हे एक उदाहरण. अर्थात १९४८ साली नंतर काय घडेल हे कळण्याचा मार्ग नव्हता हे ही खरे. पण गांधी जगले असते तर गांधीवाद लवकरच हास्यास्पद झाला असता असा माझा ठाम विश्वास आहे. फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते. फाळणी होताना आणि झाल्यावर गांधींना केवळ मुस्लिम निर्वासितांचीच चिंता होती. हिंदूबद्दल काहीही सहानुभूती नव्हती असेच दिसते. तमाम महाराष्ट्रातील ब्राह्मण जातीवर त्या हत्येनंतर जे अत्याचार झाले ते सर्वथा निंदनीय होते. त्यामुळे ब्राह्मणांचे आणि समाजाचे नुकसान झाले. जरी ब्राह्मण त्याल पुरून उरले असले तरी काही क्षेत्रातून ब्राह्मण कायमचे हद्दपार झालेले आहेत. जसे राजकारण. मोजके अपवाद वगळले तर बहुतेक राजकारणी हे मराठा वा अन्य तथाकथित मागास जातींभोवतीच फिरते. चूक की बरोबर ते वेगळे पण पिढ्यानपिढ्या बुद्धीवादी म्हणून वागवलेला एक वर्ग राजकारणात शिरला असता तर कदाचित समाजाचा फायदा झाला असता. टिळक, सावरकर, आगरकर, गोखले, कर्वे अशी उदाहरणे आहेतच. पण नंतर हे प्रमाण कमी झाले. दंगलींनंतर बहुधा ब्राह्मण समाज हा बहुतांश आत्मकेंद्रित बनला असावा. अर्थात ह्यामुळे वेगळ्या क्षेत्रात लोकांनी आपली चमक दाखवायला सुरवात केली हेही खरे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 02/22/2014 - 10:09 नवीन
अन्यथा नथुरामचा अतातायिपणा आणी समाजपरिणाम असे शिर्षक, लिखाण हवे. गांधिंपुर्वी विवीध जातीधर्माचे अनेक थोर क्रांतिकारी होउन गेले (नाइलाजानेच हे वाक्य लिहताना एक भारतिय म्हणून मला अतिशय लाज वाटली आहे. सुज्ञांनी मला यासाठी क्षमा करावी) परंतु अख्या भारताचा एकसमान शत्रु इंग्रज असुनही भारत हा एक संलग्न देश आहे आणि या देशाने एकजुटिने इंग्राजाविरुध लढा उभारायचा आहे ही जाणिव फक्त महात्मागांधिच्या लढ्यातुनच जनसमुदायात निर्माण झाली पसरत गेली. थोडक्यात भारत एकसंध राष्ट्र बनायची निर्मीतीप्रक्रिया केवळ गांधिजींमुळे निसंशय सुरु केली/झाली. ज्याला पुर्णत्व अर्थातच सरदार पटेलांनी दिले. अन्यथा एंग्रज एकाचा शत्रु अन दुसर्‍याचा मित्र किंव्हा त्याचा लढा तो देइल माझा लढा मी असा प्रकार असे. राजकिय ह्त्या पौराणीक काळापासुन पृथ्विवर सर्व देशात होत आल्याच आहेत (अगदी उसगावही अपवाद नाही). म्हणून हत्येमागील उद्देश साध्य करता आला नसेल तर हत्या जस्टीफाय करणे कधिच शक्य होत नाही, कारण सर्व काही बोलाचीच कढि अन बोलाचाच भात उरते. यातुन प्रत्यक्ष हत्येचे समर्थन तर होत नाहीच पण त्याचे जे कॉन्सिक्वेंन्सेस असतात त्याचीही किंमत मोठी असते अन या दोन्हीच्या परिणामात हत्येच्या निर्णयाबाबत खरी चर्चा नक्कि कशाबद्दल करायची यात बहुतांश गोंधळुन जातात.
फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते.
ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आत्मशून्य Sat, 02/22/2014 - 10:20 नवीन
आज ६० वर्षांनंतरही त्याचे सर्व पक्षांकडुन निव्वळ राजकारण केले जाते ज्यात सर्वसामान्यजनहितांचा वेळोवेळी बळी जातोय ही एकमेव गोष्ट जरी टाळता आली तर भारताच्या कोणत्याही स्वातंत्र्यसैनीकाचे बलिदान खर्‍या अर्थाने व्यर्थ गेले नाही असे मानता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ह
हुप्प्या Tue, 02/25/2014 - 06:54 नवीन
>>ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...! मुद्द्याला उत्तर देता येत नसल्यामुळे विनोदाची झालर वगैरे पुस्ती जोडताय का? भारत एकसंध बनायचे श्रेय फाळणीच्या जन्मदात्याला देणे हा खरा विनोद आहे. टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे तुच्छतेने म्हटले जात असे. पण त्याच्यामागचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वातंत्र्यलढा सामान्य लोकांपर्यंत नेला. तेव्हा निव्वळ गांधीजींना त्याचे श्रेय देणे हे ढोंगीपणाचे आहे. गांधीजींचे योगदान कुणी नाकारत नाही पण त्यांचा अतिरेकी मुस्लिम अनुनय अक्षम्य आणि नुकसानकारकच होता. त्याची घातक फळे आजही भोगत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आनन्दा Tue, 02/25/2014 - 09:03 नवीन
ह्म्म... त्याचे श्रेय इंडिअन नॅशनल कोन्ग्रेसला (तेव्हाच्या) देणे योग्य ठरेल. गांधींच्या व्यक्तीगत करिश्म्याला कोंग्रेस ची साथ मिळाली नसती तर हे होणे तसे कठीण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
श
श्रीगुरुजी Tue, 02/25/2014 - 09:34 नवीन
भारतातला पहिला अतिरेकी हैद्राबादमधील अब्दुल रशीद हा होता. त्याने स्वामी श्रध्दानंदांचा खून केला होता. याच अब्दुल रशीदला नंतर गांधींनी भाई असे म्हटले होते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा