गुजरात विकासाचे मृगजळ..
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
प्रतिक्रिया
अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!
अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे
* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स. भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.
माईफिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.