Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आता माझी सटकली रे.........!

आ
आयुर्हित यांनी
Tue, 03/18/2014 - 17:10  ·  लेख
लेख
नंदन निलकेणी एक सुशिक्षीत मान्यवर, चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव, Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव, देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी, Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक, एक कॉंग्रेस नेता, पद्मभूषण पुरस्कार विजेते, आधारपत्र अध्यक्ष कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर), निवडणूक तोंडावर आली असतांना सांगतात "आरक्षण खाजगी संस्थेतही हवे" याला काय म्हणावे? आरक्षणाचे गाजर दलितांच्या मतावर डोळा लोकांच्या भावनांशी खेळ जातीयवादाची विष पेरणी फोडा आणि राज्य करा नीती एक घाणेरडे राजकारण खाजगी संस्थेच्या प्रगतीची वाट लावणे देशाची अधोगतीकडे वाटचाल Brain drain ला खुले आम प्रोत्साहन cheap publicity stunt इतर चांगल्या मुद्द्यांचा अभाव हलवायाच्या घरावर तुळशीपत्र Productivity गेली चुलीत नैपुण्याची ऐशी तैशी शिक्षणाचा आईचा घो राजकारणी लोकांचा एक समज भारतीय समाज: एक मेंढरांचा कळप

प्रतिक्रिया द्या
31519 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/19/2014 - 09:12 नवीन
(कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या चालीवर) कुणी जैनांना द्या,कुणी मुस्लिमांना द्या कुणी मराठ्यांना तर कुणी गुजराथ्यांना द्या.. तसेही सरकारी नोकर्या,शिक्षकी पेशा आणि इतर अनेक ठिकाणी आरक्षणाने काय वाट लागली आहे माहीतच आहे. पण म्हणुन कुठलाही उद्योजक दर्जाशी तडजोड करुन आरक्षित उमेदवाराला पात्रतेचे किमान निकष न लावता केवळ जागा भरण्यासाठी कामावर ठेवेल असे वाटत नाही. कारण त्या माणसाचा पगार शेवटी त्याने केलेल्या कामातुन निघणार नसेल तर उद्योग बुडायला वेळ लागणार नाही. त्यापेक्षा कोणीही धंदा बंद करुन स्वस्थ बसणे पसंत करेल.
  • Log in or register to post comments
प
पोटे Wed, 03/19/2014 - 10:17 नवीन
हजारो वर्षे १०० % आरक्षण खाल्लेले लोक ५० % आरक्षणाला विरोध करतात, हे पाहून हसू आले. :)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/19/2014 - 16:43 नवीन
अहो ५०% कशाला,मी म्हणतो ८०-९० % आरक्षण ठेवा की, आम्ही त्या नोकर्यांचा नाद कधीच सोडलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
म
मृगजळाचे बांधकाम Wed, 03/19/2014 - 14:16 नवीन
अहो या असल्या तथाकथित IDOLS चे अंतिम लक्ष्य राजकारण च असते.हे फक्त समाजसेवेची कातडी पांघरून काही वर्षे सेवा करण्याचा आव आणतात,आणि नंतर त्या प्रतिमेचा फायदा घेउन राजकारणात येतात.सध्याचा सर्वात HOT SHORTCUT आहे हा.
  • Log in or register to post comments
म
मृगजळाचे बांधकाम Wed, 03/19/2014 - 14:19 नवीन
जैन समाजाला आरक्षण देणे यासारखा दुसरा विनोद नाही.जैन समाज हा प्रचंड श्रीमंत समाज म्हणून ओळखला जातो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/19/2014 - 17:23 नवीन
अल्पसंख्याक हा निकष लावला तर पारशी, जैन, लिंगायत, इ. सकट ब्राह्मणांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम
र
रमेश आठवले गुरुवार, 03/20/2014 - 18:28 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजाला minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो. सरकारी नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी नाही. शीख आणि मुस्लिम संप्रदाय यांनाही अशीच मंजुरी मिळाली आहे. आंध्रच्या सेकुलर सरकारने मुस्लिमाना नोकरीसाठी काही टक्के आरक्षण मंजूर केले होते, पण तेथील न्यायालयाने ते घटनाबाह्य असल्याचा निकाल देऊन रद्द केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम
आ
आयुर्हित Sat, 03/22/2014 - 19:58 नवीन
minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो:- धर्माच्या संस्था यामध्ये नवीन स्कूल/कॉलेज असाही होतो. बंगळूरू मध्ये जैन विद्यापीठ (आधीचे सर भगवान महावीर जैन महाविद्यालय) व पुण्याचे बोलायचे झाल्यास आझम कॅम्पस अशी काही उदाहरणे आहेत. याचा अर्थ या आधारे यांचे नवीन स्कूल/कॉलेज उघडले जातील.व आपली मुले पुढील उच्च शिक्षणासाठी minority community च्या स्कूल/कॉलेज मध्येहि जातील/जाऊ शकतील व यांना सर्व आर्थिक फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
म
मदनबाण Wed, 03/19/2014 - 17:31 नवीन
आता माझी सटकली रे.........! देशातल्या लोकांची टाळकी अजुन कशी सटकत नाहीत ? याचेच खरं तर रोज रोज नव्याने नवल वाटते मला. हे भाडखाउ भोसमारीचे राजकारणी अजुन किती लोकांचे रक्त पिणार आहेत तेच कळत नाही ! गोचीड सुद्धा पोट भरल्यावर गप्प होते, पण ह्या हरामखोरांची तहान काही केल्या भागत नाही ! देश भिकेला लागला आहे, तरुण वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे, महागाईने जीव कंठाशी आला आहे,बलात्कारांवर बलात्कार...कधी चिमुरडीवर तर कधी वॄद्धेवर नराधमांची ही पैदावर मुक्त आहे आपल्या देशात कारण कुणाची भिती /धाक उरलेलीच नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या आकड्यांनी तर पार कळस गाठला आहे तरी हे भिकारडे राजकारणी त्यांची निर्लज्य थोबाडे घेउन मतांची भिक मागाला आता आपल्या दारात येतील... मतांची भिक मागतील आणि मग आपल्याच छाताडावर बसुन थैमान घालतील ! गेल्या १० वर्षातली देशाची अवस्था पहाता आता अजुन या देशाचे किती वाटोळे करायचे बाकी ठेवले आहे ? लोकसभेत मिर्ची स्प्रे वापरला गेला, राज्यसभेत स्पीकरची अंगावर धावणे,उत्तर प्रदेश विधान सभेत विधायकांचे कपडे काढण्याचा प्रकार तर जम्मु-काश्मिर विधान सभेत विधायकांनी कर्मचार्‍यांना केलेली मारहाण ! हे सर्व राजकारणी आहेत ? हे देशाच काय भलं करणार ? पण या लोकांनाच आपणच मतदान करतो ना ? परत एकदा तोच व्हिडीयो इथे देतोय... निदान यावेळी तरी लोकांनी मतदान करताना आपल्या देशाचा आणि पुढे येणार्‍या आपल्याच पिढीचा विचार करावा !
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/20/2014 - 17:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अर्धवटराव Fri, 03/21/2014 - 04:10 नवीन
मिपा फार काहि बदललं नाहि म्हणायचं...बरं झालं... जुनिच दारु जुन्याच बाटलीत जुन्याच चवीत चाखायला मिळते आहे :) आता थोडं कामाचं बोलुयात. उच्चनिचतेच्या (सं)कल्पना, त्याच्या अनुषंगाने श्रमविभागणी व जबाबदार्‍या, विशिष्ट वर्गाला मिळणारे फायदे व फायद्या करता वर्गाची परिभाषा असं व्हिशिअस लूप, या सगळ्याचा परिणाम म्हणजे सामाजीक विषमता, व त्या विषमतेला छेदण्याकरता म्हणुन आरक्षणाचं औषध... असं साधारण या प्रॉब्लेमचं स्वरूप आहे (बहुतेक). २०व्या शतकाच्या मध्यात या समस्येचं स्वरूप एक अनार और सौ बिमार असं झालं व जो बहुत काळपासुन बिमार आहे व ज्याच्य वाटेला अनार यायचे चान्सेस कमि आहेत त्याला अनारचा एक विशिष्ट पोर्शन देण्यात यावा असं ठरलं. राजकारणामुळे या सर्व प्रकरणाचं काय गुळ-खोबरं व्हायचं ते झालच. आणि या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे. निलंकणी सारख्या व्यावसायीकाने या दृष्टीकोनातुन विचार मांडण्यापेक्षा त्यांनी समस्या आणखी चिघळायची भाषा केली... ते ही स्वाभावीक आहे... वाण नाहि पण गुण लागलाच.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 03/21/2014 - 05:22 नवीन
"या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" १००% पटले. खरे आहे आपले, आता फक्त कामाचं बोलुयात! या साठी आपण सारे मिपाकर एक होऊन काय काय करू शकतो, याचे कोणी मार्गदर्शन करेल काय? सर्वांना विनंती, यावर नवीन धागा येऊ द्या, आणि फक्त विषयाला धरूनच लिहावे, फाटे फोडू नयेत.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 03/21/2014 - 09:40 नवीन
चारित्र्य संप्न्न व्यक्तिच सुदृढ समाज निर्मू शकतात. त्यामुळे सुधारणांची सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी. व्यक्तिगत पातळीवर खालील गोष्टी करता येतील असे वाटते : १.जर मी सक्षम असेन तर कधीही कसलीही सब्सिडी घेणार नाही. २. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार नाही ( उदा. वडिलांच्याकडून घरभाड्याची पावती घेणे )चुकीची /खोटी मेडीकल बिले + ट्राव्ल बिले देणार नाही. वॉवचर पेंमेंट घेऊन कर वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही. ३. रहदारीचे नियम पाळिन . गाडीतून जाताना खिडकितून बाहेर खाद्यपदार्थांचे आवरण टाकणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही, स्वच्छता गृहाचा वापर करेन. ४. मला परवडत असले तरीही वीजेचा आणि पाण्याचा कटाक्षाने संयमित वापर करीन. अन्न वाया घालवणार नाही. ५. मी जात्-पात पाळ्णार नाही. घरातील मोलकरीण ही देखील माझ्याघरी सन्मानाने हळ्दीकुंकु घेईल. वॉचमन, गाडी धुणारा माझ्याकडे दिवाळीला फराळाला येतील्.दिवाणखान्यात फराळ करतील. ६. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वार्षिक सहलीइतका खर्च मी एखाद्या स्वंयसेवी संस्थेला देईन. वर्षातील काही दिवस ठरवून मी अश्या संस्थासाठी त्यांना आवश्यक असणारे काम करीन. ७. जुने कपडे , मागील वर्षाची वह्या-पुस्तके बिग -बाजारला न देता अथवा रद्दीत न घालता, स्वप्रयत्नाने गरजू लोकांना पोचवीन. आणखी काही सुचेल तसे लिहीन !आपण ही भर घालू शकता !
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 03/21/2014 - 16:21 नवीन
सहावा व सातवा मुद्दा सोडून देता बाकीचे सध्या ही होतेच आहे. बाकी काँग्रेसच्या कृपेने मी दिवसेंदिवस गरीबी रेषेखालीच जाण्याची जास्त शक्यता असल्याने हे मुद्दे पाळता येणार नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रसाद१९७१ Wed, 03/26/2014 - 12:57 नवीन
. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार
हे का? मी कष्टानी कमवलेल्या पैश्याचा टॅक्स भरायचा आणि तो ९०% भ्रष्टाचाराच्या पोटात जाणार किंवा ह्या फुकटच्या स्कॉलरशीप वर वाया जाणार. जिथे जमेल तिथे कर चुकवायलाच पाहिजे. आधीच नोकरी करणार्‍या माणसाला कर चुकवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
अ
अर्धवटराव Fri, 03/21/2014 - 16:41 नवीन
मोदि पंतप्रधान आणि केजरीसाहेब विरोधीपक्ष नेते =))
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 03/21/2014 - 17:08 नवीन
कर्तुत्ववान लोकांना निवडून आणण्याबद्दल आमची ना नाही. परंतु ...ला पाय लावून पळणारे "गुडघ्याला बाशिंग" ला विरोधीपक्ष नेते बनायची पण लायकी नाही. आणि जरी तुम्ही म्हणाल तसे केले तरी त्यांना लगेच वाटेल कि भारताचे विरोधीपक्ष नेते बनण्यापेक्षा आपण जर SAARC/ UNO किंवा अमेरिकेच्या निवडणुकीत भाग घेतला पाहिजे, म्हणून त्याचाही ४९ किंवा कमी दिवसात राजीनामा देतील.
  • Log in or register to post comments
आ
आबा Sat, 03/22/2014 - 03:17 नवीन
तुमच्या एकूणच आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येतोय तुमच्या प्रतिसादांमधून... ब्रेन-ड्रेन वगैरेची चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 03/22/2014 - 19:37 नवीन
आजवर सर्व भारतीय असेच चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...म्हणत आले आहेत. त्यामुळेच हे असे दिवस आपल्या सर्वांच्या वाट्याला आले आहेत. अपेक्षीत चर्चा या वरचा खरा मुद्दा "या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" यावर आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत, ज्यावरून आपल्या आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येईल.
  • Log in or register to post comments
आ
आबा Sat, 03/22/2014 - 23:38 नवीन
त्याचं काय आहे की आरक्षण म्हणजे गरीब श्रीमंतांतली दरी दूर करण्याचं साधण असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. आणि आरक्षणासारख्या धोरणांचे स्टॅटॅस्टीकल फायदे बघायचे असतात, एक एक उदाहरण देण्यातून काही सिद्ध होत नाही त्यातून "आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो" या दर्जाचं तुमचं आकलण आहे... काय युक्तीवाद करायचा?! असो खालील गोष्टी डोळ्याखालून घातल्या तर बरं होईल, म्हणजे नाही घातल्या तरी चालतीलच १) http://hdr.undp.org/sites/default/files/hdr2004_dl_sheth.pdf २) http://hdr.undp.org/sites/default/files/hdrp_2010_44.pdf ३) http://datastories.in/blog/2013/12/02/social-groups-and-class-divides/ (इथे तुमच्या लाडक्या गुजरात मधली परिस्थीती ही पाहता येईल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sun, 03/23/2014 - 13:11 नवीन
तुमच्या लाडक्या गुजरात मधली आजची परिस्थीती पहा: Gujarat tops the list of states in terms of economic freedom, improving its position from fifth place in 2005. Refer: The report on Economic Freedom of the States of India (EFSI) by Cato Institute
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 03/26/2014 - 13:00 नवीन
हा चोर माणुस आहे. स्वताची कंपनी आहे, तिथे का नाही आरक्षण चालू करत आधी. तसे ही मुर्तींकडे फक्त ५ टक्के शेयर्स असुन ( ५०% असते तर बरोबर होते ) स्वताच्या मुलाला आरक्षण देउन कंपनीत आणले च की.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा