Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

D
drsunilahirrao यांनी
Sun, 04/27/2014 - 09:12  ·  लेख
लेख
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे. देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे. कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या
25446 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

ज
जेपी Sun, 04/27/2014 - 09:20 नवीन
मी प य ला .
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 04/27/2014 - 09:39 नवीन
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम समाजाचाही पाठींबा आहेच..की.. त्यांनी सद्भावना रॅलीत टोपीचा स्वीकार न करुनच दाखवुन दिले...आणि तरीही कोणी फार ठ्ळक आरोप करु शकले नाही... पण बहुसंख्याक परंतु युपीए राजवटीत दुर्लक्षित असलेल्यांची मने जिंकली...
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sun, 04/27/2014 - 10:13 नवीन
सद्भावना रॅलीपर्यँत मुस्लीमांचा पाठीँबा असेलही. पण टोपीच्या प्रसंगामुळे नंतर मुस्लीम समुदाय मोदींपासून दुरावला आणि हिंदू समाज अधिक जवळ आला असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Sun, 04/27/2014 - 10:47 नवीन
सहमत आहे. बरेच जणांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी हवे आहेत. अवांतर - मला वाटते यावेळी अल्पसंख्यांक ज्यांना मोदी नको आहेत, वा जे मोदी येण्याची भिती बाळगून आहेत असे देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले असतील. अर्थात त्यांनी आपला कैवारी समजून मते कोणाला दिली असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 04/27/2014 - 10:49 नवीन
हवेत बंगला बांधणे म्हणजे काय असते, हे आज कळले!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 04/27/2014 - 11:01 नवीन
४८ साली संघ का वाढला, ७७-७८ साली आणखी का वाढला, ९५ ला शिवसेना भाजप महाराष्ट्रात का सत्तेवर आलं, ८४ ला ४ असणारे ८९ ला ९० का झाले... घरातल्या सर्वार्थानं 'बर्‍या' मुलाला सातत्यानं त्याच्याच बेजबाबदार नि वांड भावासाठी (महात्म्याचे शब्द ना?) तडजोड करावी लागत असेल तर बर्‍या मुलाला कधीतरी काड्या कराव्या असं वाटल्यास काय चूक???? - पॉपकॉर्न विकायला कोणी आहे का याची वाट बघत बसलेला!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 04/27/2014 - 15:37 नवीन
हां बर मग?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 04/27/2014 - 20:09 नवीन
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
नाही. दंगली हिदुंचे शिरकाण झाल्यामुळे घडल्या, त्यानुशंगाने उलट हिंदुसमाज मोदींवर जास्त नाराज नको काय ? पण वस्तुस्थिती तशी नाही कारण विकास. खरे तर बेसिक गोश्टीच पुरवल्या पण त्याही पुरवायला काँग्रेसने दाखवलेली इछ्चाशक्तीची दिवाळ्खोरी हे एकमेव कारण आहे की आज काँग्रेसविरोध म्हणून मोदींची लाट कार्यक्षमता विषेश उठुन दिसते आहे. हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारुन घेतलेला धोंडा आहे. केजरीवाल तो अभी नया हय.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 04/28/2014 - 08:11 नवीन
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही
गेल्या १२ वर्षात गुजरातमध्ये तसे काही घडले असते ती ही शंका घ्यायला वाव होता.पण उलट घडते आहे.'तणावपूर्ण परिस्थिती,दुकाने बंद्/जाळपोळ,संशयितांना अटक' असल्या बातम्या कुठून् जास्त येतात? 'सेक्युलर' महाराष्ट्र,आंध्र... की गुजरात?
  • Log in or register to post comments
ब
बाळकराम Mon, 04/28/2014 - 20:34 नवीन
जे हिटलरच्या वा मुस्सोलिनीच्या लोकप्रियतेचे होते तेच!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 03:26 नवीन
मिळालाच नाही हे भारताचे दुर्दैव आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
च
चौकटराजा Tue, 04/29/2014 - 03:57 नवीन
भारतात सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर सुप्रशासनाची. पण मोदी याबाबतीत बदल घडवून आणतील असे मला वाटत नाही. न्यायालये, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, लाचलुचपत प्रतिबंध यात कमालीच्या सुधारणा आणणे गरजेचे आहे. जो आमदार घरबांधणीचा कायदा करतो तोच बेकायदेशीर बांधकामे नियमित करा म्हणून उपोषण करतो. अशा आमदाराला मोदी तुरूंगाचा रस्ता दाखवतील काय? मग आता मोदी लोकप्रिय आहेत याचे कारण काय? खरे तर ते भारतभर लोकप्रिय नाहीतच. बाजपेयीही नव्हते. भारतभर लोकप्रियता फक्त नेहरू, इंदिरा,लालबहादूर शास्त्रीजी व राजीव गांधी या चारच जणाना मिळाली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मात्र नरेंद्र मोदी ये लोकप्रिय आहेत यात शंका नाही. तरूणाना भाषणातून स्फूर्ति मिळते. त्यात सोनिया ,मनमोहन कुचकामी आहेत.मोदी यात आघाडी घेऊन आहेत.केजरीवाल देखील भाषणात तेच ते मुद्दे उपस्थित करतात. त्या मानाने मोदी बरेच " तयारीचे" नेते आहेत. हे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील मान्य करावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Tue, 04/29/2014 - 08:52 नवीन
क्रुपया हे पहा- http://economictimes.indiatimes.com/opinion/interviews/narendra-modi-interview-ready-to-work-with-congress-on-fdi-policy-continuity-top-priority/articleshow/34066873.cms
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 04/29/2014 - 14:52 नवीन
भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार PATNA: A Muslim woman in Jharkhand has alleged she was gang-raped by more than a dozen men because of her working for BJP in ongoing Lok Sabha elections, police said on Tuesday.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 04/29/2014 - 16:51 नवीन
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रात काही फरक पडेल असे वाटत नाही. गेली पंचवीसतीस वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजपकडे आहे. मुंबईत शासनव्यवस्थेचे किती अवमूल्यन झाले आहे हे वेगळे सांगायला नको.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 17:16 नवीन
अबकी बार मोदी सरकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
संचित Wed, 04/30/2014 - 19:05 नवीन
गेल्या ५ वर्षात दररोज नवीन घोटाळे देणाऱ्या कॉंग्रेस मुळे कंटाळलेल्या जनतेला सध्या तरी एकाच पर्याय दिसत आहे. यावेळी देऊन पाहू मत, मोदी करतो तरी काय.
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 05/01/2014 - 08:20 नवीन
बहुतेक लोकांना दंगली / हिंदू मुस्लिम वादाबद्दल फारसा इंटरेस्ट नाही.. पाच वर्षांपूर्वी विश्वासाने सत्ता दिल्यावर काँग्रेस आणि युपीए ने जे घोटाळे केले आणि त्यानंतर ज्या बेमुर्वतखोर पद्धतीने वर्तन केले त्याला लोक चिडले आहेत. त्यात महागाई, इन्फ्लेशन, सुरक्षितता आणि सर्वत्र उघड असलेला संधिसाधू पणा. जर २००९ ते २०१३ मध्ये २००४-०९ सारखे चांगले वातावरण राहिले असते तर आज मोदींची इतकी हवा झाली नसती. मोदींनी या anti incumbency चा नीट आणि आक्रमक प्लॅन करून फायदा करून घेतला आहे.. केजरीवाल हा एकच त्यांना समर्थ विरोधक ठरू शकला असता.. पण दिल्लीच्या गोंधळामुळे त्याचा लोकाश्रय कमी झाला. आणि राहुल गांधी हे समर्थ प्रतिस्पर्धी होऊ शकलेच नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेचे कारण - काँग्रेसविरोधी वातावरण, उत्तम प्लॅनिंग, आक्रमक प्रचार, चांगले मुद्दे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित
व
विजुभाऊ गुरुवार, 05/01/2014 - 11:39 नवीन
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण : ते लोकप्रीय आहेत हे सदोदीत "गोबेल्स " टाइप प्रचाराने लोकांवर बिंबवत रहाणे. काही ना काही कारण काढत चर्चेत रहाणे ( प्रचारात मुद्दे यापेक्षा गुद्दे आणणे , जाणून बुजून वादग्रस्त वर्तन करणे उदा: मतदानासाठी जाताना मुद्दाम पक्षाचे चिन्ह जाणीवपूर्वक प्रदर्शीत करणे ) प्रसंगी मिडीया मॅनेज मरून चर्चेत रहाणे. त्या अर्थाने त्यांची तुलना राखी सावंतां बरोबर करता येईल.
  • Log in or register to post comments
स
संचित गुरुवार, 05/01/2014 - 16:39 नवीन
मोदींच वर्तन थोड जास्त आक्रमक असत. पण हल्ली ते जुन्या आणि विवादित मुद्द्याबद्दल बोलताना ते शक्य तेवढा वाद टाळताना दिसतात. जुने मुद्दे परत परत उकरून काढले जात असताना सध्या मोदी आधीच्या तुलनेत असे मुद्दे बरेच शांतपणे हाताळताना दिसत आहे. हे सुद्धा एक कारण आहे, कि अधिक जनता आता त्यांना स्वीकारताना दिसते आहे. आणि मला तरी वाटते प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांना कॉंग्रेस ने बाजूला करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. राहुल गांधी यांचा साधेपणाच फुगा फुटला आणि लोकांना त्यांचे आकर्षण जवळ पास संपले. आता प्रियांका वड्रा हीच काय ती कॉंग्रेस जवळ अशा दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/01/2014 - 17:26 नवीन
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे कारण काही कारणे ... - निर्णयक्षमता असलेला स्वतःचे नेतृत्वगूण सिद्ध केलेला एक अत्यंत खंबीर नेता - अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त राजकीय व वैयक्तिक कारकीर्द - अहंकारी स्वभाव असला तरी तो अहंकार कर्तृत्वातून आलेला आहे - प्रभावी वक्तृत्व - समोरच्याला न घाबरता शिंगावर घेऊन थेट आव्हान देण्याचा सडेतोड स्वभाव - १२ वर्षांहून अधिक काळ पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधक, तपास संस्था, प्रसारमाध्यमे, तथाकथित उच्चभ्रू व्यक्तिमत्वे इ. शी खंबीरपणे झुंझणारा नेता अजूनही अनेक कारणे असतील.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 05/02/2014 - 09:45 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय क्षीरसागर Fri, 05/02/2014 - 09:56 नवीन
Image removed. हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/02/2014 - 11:36 नवीन
हे आयोगवाले उगाचच काहीतरी काढत बसताहेत झाल. पूर्वी इंदिराही मतदान केल्यावर आपला उजवा हात उंच करून दाखवे. (मोदी पंतप्रधान अशी अपेक्षा करणारी) माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 16:56 नवीन
>>> हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. :yahoo: >>> जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल :dance: >>> आणि उमेदवारीही रद्द होईल... :clapping: >>> मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल. *HI*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सचिन Fri, 05/02/2014 - 17:50 नवीन
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? हे काँग्रेसवाले त्यांना अटक करा म्हणतात, पण आझमखानाबद्दल मूग गिळून गप्प का? मुलायम म्हणतो " लडकोंसे गलती होती है" .. त्यावर काही बोलत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 05/02/2014 - 20:42 नवीन
निवडणूक आयोगानंच FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि दोन FIR दाखल झालेत. आपण मतदान केलं असं दर्शवणं वेगळं आणि मतदान केल्याची खूण असलेल्या तर्जनीसमोर निवडणूक चिन्ह धरुन फोटो काढणं वेगळं; हे समजण्या इतके शहाणे तर ते नक्कीच असावेत. पण सत्तालोभापायी आलेला उतावीळपणा नडतोयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
स
संजय क्षीरसागर Fri, 05/02/2014 - 21:32 नवीन
The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 05/03/2014 - 06:21 नवीन
The EC, however, isn't convinced and has justified the decision on the ground that Modi's address to the media right after he cast his vote in Vadodra on Wednesday did not seem spontaneous for a number of reasons. "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 11:14 नवीन
>>> "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. "A spontaneous byte to the media" किती वेळ चालला पाहिजे (म्हणजे जास्तीत जास्त किती सेकंद किंवा किती मिनिटे) याची काही व्याख्या आहे का निवडणुक आयोगाकडे? यावर काही कायदेशीर वेळमर्यादा आहे का? असा काही कायदा किंवा नियम आहे का ज्यानुसार "A spontaneous byte to the media" ठराविक सेकंदांपेक्षा किंवा मिनिटांपेक्षा लांबला तर तो गुन्हा आहे व त्यापेक्षा कमी असला तर चालेल? >>> Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. टेबल-खुर्च्या भाजपने किंवा मोदींनीच पूर्वयोजनेनुसार आणल्या होत्या असा काही पुरावा आहे का? पत्रकार परिषद करायची असेल तर तसे अधिकृत निमंत्रण वृत्तसंस्थांना व माध्यमांना पत्रकार परिषदेच्या आधी काळ पाठवावे लागते. असे अधिकृत निमंत्रण मोदींनी किंवा भाजपने पाठविले होते का? >>> "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added. brief किंवा long interaction ची व्याख्या किंवा नियमावली आहे का निवडणुक आयोगाकडे? किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे long interaction किंवा किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे brief याची व्याख्या किंवा नियमावली आहे का? एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने १ सेकंदापेक्षा कमी म्हणजे brief असेल तर दुसर्‍याला वाटेल की २ तासांपेक्षा कमी म्हणजे brief. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न दृष्टीकोन असू शकतो. त्यामुळे brief म्हणजे नक्की किती काळ किंवा long interaction म्हणजे नक्की किती काळ याची सुस्पष्ट व निसंदिग्ध मार्गदर्शक तत्वे किंवा नियम असल्याशिवाय असल्या आरोपांना अर्थ नाही. आता राहिला पक्षचिन्हाचा मुद्दा. मतदानकेंद्रापासून १०० (की २०० ?) मीटर अंतराच्या आत पक्षचिन्ह लावता येत नाही. पण त्या परीघाबाहेर उमेदवारांचे बूथ, भित्तिपत्रके असतातच. जर मोदींनी ही अंतराची मर्यादा पाळली असेल तर पक्षचिन्ह दाखविल्याने कोणताच गुन्हा होत नाही. पूर्वी यापेक्षाही गंभीर गुन्हे नेत्यांनी केलेले आहेत. पण आयोगाने आजवर त्यांच्यावर कधीही कारवाई केलेली नाही. २००४ (किंवा २००६ मध्ये) च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या एका कम्युनिस्ट मंत्र्याने स्वतःच्या मतपत्रिकेवर स्वतःच्या उमेदवाराच्या पुढे शिक्का मारून ती मतपत्रिका माध्यमांना संपूर्ण दाखवून नंतर घडी करून मतपेटीत टाकली होती. गुप्त मतदान कायद्याचा हा उघडउघड भंग होता. त्यांच्यावर आयोगाने आजतगायत कारवाई केलेली नाही. मोदींवर एफआयआर दाखल करण्यामागे काँग्रेसचा दबाव आहे. काहीतरी करून मोदींना निवडणुकीतून बाद करण्यासाठी काँग्रेस उरलेल्या १०-११ दिवसात जीवाचे रान करीत आहे. त्यातूनच हे फुसके प्रकरण विनाकारण तापविले जात आहे. आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. भाजप लगेच न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणेल व त्यामुळे निवडणुक आयोगाचे व पर्यायाने काँग्रेसचे पुन्हा एकदा हसे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 05/03/2014 - 16:25 नवीन
प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 17:18 नवीन
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. कधी सिद्ध झाला? >>> इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. सवलतीचा प्रश्नच नाही. चूक केलीच नाही तर सवलत कशाला? >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे. तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. वाचला असल्यास तुम्हाला तो समजलेला नाही. न्याय हा ठोस निष्कर्षांवर दिला जातो. भाषण प्रदीर्घ होते की संक्षिप्त याचा निर्णय प्रदीर्घ व संक्षिप्त या दोन्हींची सुस्पष्ट व निसंदिग्ध व्याख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही. २० मिनिटांचा पत्रकारांशी संवाद हा संक्षिप्त होता की प्रदीर्घ हे याच कारणामुळे न्यायालय ठरवू शकणार नाही. आणि जर पत्रकारांशी संवाद कायदेशीर परीघाच्या बाहेर असेल तर परीघाच्या बाहेर पक्षचिन्ह दाखविणे किंवा पत्रकारांशी संवाद करणे हा गुन्हा होऊच शकत नाही. वकील असीम सरोदेंच्या माहितीनुसार, जर समजा मोदींनी कायद्याचे उल्लंघन केले असे सिद्ध झाले तरी त्यासाठी जास्तीत जास्त रू. २५० दंड होऊ शकतो. फक्त एकच अपवाद. जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 18:00 नवीन
अर्जुन युद्धास अपात्र ? http://vivekpatait.blogspot.in/2014/05/blog-post_3.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय क्षीरसागर Sat, 05/03/2014 - 18:34 नवीन
तो किती वेळ केला यावर गुन्हा अवलंबून नाही. निवडणूक चिन्ह हद्दीबाहेर दाखवलं (किंवा पत्रकारांसमोर भाषण बूथपासून लांब अंतरावर केलं ) अशी मखलाशी केली तरी `टेलिकास्ट' हा नव्या प्रकारचा गुन्हा आहे; त्याला अंतराचं बंधन नाही. मोदी दोषी आहेत किंवा कसं ते यावरनं ठरेल : "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election. 6[126. Prohibition of public meetings during period of forty—eight hours ending with hour fixed for conclusion of poll.— (1) No person shall— (a)convene, hold or attend, join or address any public meeting or procession in connection with an election; or (b) display to the public any election matter by means of cinematograph, television or other similar apparatus; or (c) propagate any election matter to the public by holding, or by arranging the holding of, any musical concert or any theatrical performance or any other entertainment or amusement with a view to attracting the members of the public thereto, in any polling area during the period of forty-eight hours ending with the fixed for the conclusion of the poll for any election in the polling area. (2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall be punishable with imprisonment for a term which may extend to two years, or with fine, or with both. (3) In this section, the expression "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.].
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 09:38 नवीन
मोदींचे कृत्य वरीलपैकी (१) अ, ब किंवा क, या तीनपैकी एकाही क्लॉजमध्ये येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 05/05/2014 - 16:11 नवीन
हे त्या दिव्य असीम सरोदेंचं (२५० रुपये दंडवाल्या) मत आहे का तुमचं? खरं तर निवडणूक आयोगनं FIR दाखल करण्यापूर्वी तुमचा (किंवा सरोदेंचा) सल्ला घ्यायला हवा होता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 19:03 नवीन
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची भाषा व त्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वतःचंच खरं वाटतं. वरील ३ पैकी कोणतेही क्लॉज वाचले तरी कोणाच्याही सहज लक्षात येईल की मोदींनी कोणत्याही क्लॉजचे उल्लंघन केलेले नाही. तुमच्या लक्षात आले नसेल तर एखाद्या अ‍ॅ किंवा बॅ ला विचारा. तो/ती नीट समजावून सांगेल. मागच्याही प्रतिसादात तुम्ही "मोदींवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे" निवडणुक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे अत्यंत हास्यास्पद वाक्य लिहिले होते. मी "गुन्हा कधी सिद्ध झाला?" असे विचारल्यावर तुम्ही केजरीवालांच्या गंगाघाटावरील व राजघाटावरील मौनाप्रमाणे मौनात गेलात. आता तरी उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मंदार दिलीप जोशी Tue, 05/06/2014 - 07:03 नवीन
गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै समजणार. त्यासाठी प्रगल्भ राजकीय बुद्ध्यांक असावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 05/05/2014 - 19:05 नवीन
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. >>> कधी सिद्ध झाला? या उत्तराची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय क्षीरसागर Tue, 05/06/2014 - 06:25 नवीन
सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते.
हे तुम्हीच म्हटलंय आणि (नशीबानं) बरोबर आहे, त्यावर आयोगानं म्हटलंय :
The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 08:49 नवीन
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. बरोबर आहे. >>> गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. असं काही नाही. निवडणुक आयोगाने यापूर्वी अनेकांवर अनेक वेळा एफआयआर दाखल केलेला होता व नंतर न्यायालयाने तो एफआयआर रद्द केल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. २००९ मध्ये वरूण गांधींच्या विरूद्ध दाखल केलेला एफआयआर). निवडणुक आयोगाच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा अनेक जणांवर एफआयआर दाखल करून सुद्धा काहीही कारवाई ने केल्याची तसेच काहीही कारवाई न करता आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. निवडणुक आयोगाने दाखल केलेले एफआयआर अनेक वेळा राजकीय दडपणामुळे दाखल केलेले असतात. त्यात काहीही दम नसतो. मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे. निव्वळ एफआयआर दाखल केला म्हणून तुमच्या सारख्या अज्ञानांना आनंदाचे भरते आले आहे. काही दिवसातच तुमचा हिरमोड होणार आहे. >>> सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. निवडणुक आयोगाने दाखल केलेले अनेक एफआयआर न्यायालयाने पूर्वी रद्द केले आहेत. परंतु ते कधीही आयोगाच्या अंगलट आलेलं नाही. >>> कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे नामांकित वकील आहेत. दुर्दैवाने ते तुमच्या आकलनापलिकडचं आहे. त्यात तुमचा दोष नाही. >>> The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting." एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा tone and tenor कसा आहे हे सब्जेक्टिव्ह मत आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार टोन चे विश्लेषण बदलते. (उदा. केजरीवालांचा टोन त्यांच्या आंधळ्या भक्तांना प्रामाणिकपणाचा वाटतो. पण तटस्थ नागरिकांना तोच टोन ढोंगीपणाचा वाटतो.) त्यामुळे आयोगाच्या या मताला काडीमात्र किंमत नाही. त्यांनी राजकीय भाषण केले होते हे निखालस असत्य आहे. कारण पत्रकारांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. भाषण करणे व न बोलविता स्वतःहून आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या आयोगाच्या आरोपाला टँजिबल पुरावे असल्याशिवाय काडीमात्र महत्त्व नाही. >>> पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं : सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही. निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुक आयोग काम करतो हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मोदींनी आव्हान दिले आहे. >>> पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. स्वतःची सेल्फी काढणे हा जगातल्या कोणत्याही न्यायालयात गुन्हा समजला जात नाही. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो माध्यमांनी घेऊन माध्यमांनी प्रदर्शित केला होता. मोदींनी स्वतःचा फोटो प्रदर्शित केलेला नाही. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. टीव्ही प्रक्षेपण मोदींनी केलेले नाही. ते माध्यमांनी केलेले आहे. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. मोदी फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ती पत्रकार परीषद नव्हती. मोदींनी पत्रकार परिषद बोलाविलेली किंवा घेतलीच नव्हती. पत्रकार स्वत:हून त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारून त्याचे प्रक्षेपण दाखविले गेले. जर यात कोणाचा दोष असेल तर तो माध्यमांचा व निवडणुक केंद्राजवळ माध्यमांना उपस्थित रहायला परवानगी देणार्‍या निवडणुक आयोगाचा आहे. मोदींचा यात दोष नाही. दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. असो. मोदींवर कारवाई होऊन शिक्षा होईल या अज्ञानाच्या आनंदात अजून काही काळ रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गब्रिएल Tue, 05/06/2014 - 15:04 नवीन
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 17:56 नवीन
मोदी मूर्ख नाहीत १०० गजा पेक्षा दूर होते. बाकी निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांची रिपोर्ट पाहोल्या विना अत्यंत दबाव खालील FIR दर्ज करण्याच्या आदेश बहुतेक दिला गेला असावा. असाच दबाव प्रसार भारती वर पडला होता त्यांच्या अधिकार्याने कबूल नामा ही दिला. इच्छा नसताना ही आता मोदींचा ती मुलाकात आता कित्येक वाहिनीन वर कितीदा तरी पहावी लागेल. करायला गेलो आणि झाले एक अशीच परिस्थिती सूचना मंत्रींच्या उतावळे पण मुळे झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मंदार दिलीप जोशी Tue, 05/06/2014 - 06:59 नवीन
पोलीसांनी निर्वाळा दिला आहे की मतदान केंद्रापासून २०० मीटर पलिकडच्या भागात हा प्रकार घडल्याने तो गुन्हा ठरत नाही. बसा बोंबलत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/06/2014 - 07:14 नवीन
कलम १२६ (अ) आणि (ब) ला अंतराची मर्यादा नाही. प्रचार झाला की नाही हा मुद्दा आहे. आधी नीट वाचता यायला हवं तर पुढे अर्थ कळण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
प
प्रसाद१९७१ Wed, 05/07/2014 - 12:12 नवीन
दिलगीरी व्यक्त केली की निवडणुक आयोग मोठ्या मनानी सर्वांना माफ करतो. ह्या पेक्षा दोनदा मतदान करा हा सल्ला कितीतरी घातक होता. पण काही कारवाई झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
र
रमेश आठवले Fri, 05/02/2014 - 10:49 नवीन
असा मुलभूत प्रश्न मला सुनील अहिरराव यांना विचारावासा वाटतो. भारताचे निवडणूक पंच मन्डळ निपक्ष असल्याचे सिद्ध झालेले आहे . त्यांच्या देखरेखेखाली झालेल्या सर्व लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी विजय मिळवला आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांनी या जनमत कौलाचा आदर करावयास हवा. हिटलर अथवा मुसोलिनी असे मोदींना म्हणणार्या लोकांनी हे दोघे डिक्टेटर वारंवार निवडणुकीच्या अग्निदिव्यातून गेले नाहीत हे लक्षात घ्यावे. गेली दहा वर्षे केंद्र सरकार मोदींच्या मागे हात धुवून लागले आहे. एका मुख्यमंत्र्याची, खास संशोधक पथकाच्या (SIT ) अधिकार्यांनी, ११ तास उलट तपासणी केल्याचे दुसरे कुठले उदाहरण नाही. या तपासा नंतर सर्वोच्च न्यायालाने त्याना निर्दोष ठरवले. इतका तावून सुलाखुन निघालेला नेता दुसरा नाही. हा माणूस स्व्च्छ राजवट करणारा आणि निर्लिप्त आहे. असा कर्तृत्ववान माणूस या देशाला पन्तप्रधान म्हणून मिळाला तर देशाचे कल्याणच होईल. काही पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळी त्यांच्यावर टीका करत राहतील. पण हा ही एका निकोप लोकशाहीचाच भाग आहे.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Fri, 05/02/2014 - 11:04 नवीन
जाऊद्या हो, नाही समजायचे त्या 'तथाकथीत काही बधीरबुद्धी, पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळीना तत्सम विचारजंताना'. त्यांच्या बुद्धिपलीकडले आहे ते. राज्यकरत्यानी फेकलेल्या उष्टया-खरकट्या तुकड्यांवर जगणार्‍यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्शा कशी करता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
व
विनोद१८ Fri, 05/02/2014 - 10:50 नवीन
हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
दिवास्वप्ने फार पाहु नयेत माणसाने...कारण ती कधीही प्रत्यक्षात उतरत नाहीत. हा, जर केवळ स्वताचे आत्मसमाधानच करायचे असेल तर ती जरुर पहावीत.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 05/03/2014 - 06:42 नवीन
व्हाला भाइ अने बेन, पोतानु आ विचार थये शे के मोदी उप्पर, कोरटमा पोलीस केस नाखवी जोईये. आ भाइ "चायवाला चायवाला" कहिने म्हारी अने बीजी म्हारे दस-अग्यार साथिदारोंनी चायनी लॉरी बंद करवी नाखी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा