Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

D
drsunilahirrao यांनी
Sun, 04/27/2014 - 09:12  ·  लेख
लेख
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे. देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे. कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या
25446 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sat, 05/03/2014 - 08:36 नवीन
मोदींची लोकप्रियता... ;)
  • Log in or register to post comments
ब
बाळकराम Fri, 05/09/2014 - 01:14 नवीन
याचा विचार करतोय बराच वेळ! कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? असो, आपण आपले मनोरंजन करुन घ्यायचे मात्र! मदणबाण, व्हिडो भारी बरंका? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 09:05 नवीन
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? हॅहॅहॅ... काय आहे ना बाळ्या १० वर्ष राज्य करुन सुद्धा कॉग्रेसला देशाचा विकास साधता आला नाही ! इतके वर्ष राज्य करुन सुद्धा गरिबीच्या नावावर मते मागतात तर कधी गरिबीची रेखा शोधुन काढतात्. शिवाय यांच्या आणि यांच्या मित्र पक्षांच्या मंडळींनी भ्रष्टाराचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.आपल्या देशाच्या प्रंतप्रधानपदी इतकी दुबळी व्यक्ती इतके वर्ष आहे की त्यांची सार्‍या जगानेच टिंगल केली. आता मोदी शिवाय इतर सशक्त पर्यात दिसत नसल्याने निदान आफ्रिकन लोकांच्या मुखातुन आलेला संदेश तरी आपल्या देशातील लोकांच्या डोक्यात शिरेल असा कोणा हिंदूस्थानी माणसाच्या डोक्यात विचार आला असेल... तसेही साउथ आफ्रिका आणि आपल्या देशाचे गांधींजींमुळे विशेष नाते आहेच ना ? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष बाळ्या तुमची आवड कळली बरं का... *LOL* जाता जाता :- मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे, अबकी बार मोदी सरकारचा प्रचार जरीही मोठ्या प्रमाणात झाला असला तरी सुद्धा मोंदींसाठी हा रस्ता सोपा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
प
प्यारे१ Mon, 05/12/2014 - 10:22 नवीन
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे तुमच्याकडं 'निकाल' आधीच लागले काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 10:26 नवीन
हा.हा.हा... तसे नाही आपल्या देशात पोटशूळ हा विकार जरा जास्तच पसरलेला आढळतो ना... म्हणुन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बाळकराम गुरुवार, 05/15/2014 - 22:40 नवीन
"बाळ्या" का? वा वा चान, चान! शनिवारवाड्यासमोरच्या पुलावर कानकोरणी घेऊन बसतोस वाटतं तू, मदनबाण? नाही, म्हणजे संस्कार, अदब इ. चा वारापण तुला लागलेला दिसत नाही, म्हणून म्हटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विजुभाऊ Sat, 05/03/2014 - 16:37 नवीन
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 05/05/2014 - 21:08 नवीन
"इंदीराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा" हे आठवले... ठाण्याला तर कांती कोळी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यावर नंतर पेपरात दुसर्‍या दिवशी या अर्थाचे वाचल्याचे आठवले: वरती स्वर्गीय इंदीराजींचे पोस्टर आणि ही घोषणा होती आणि खाली अक्षरशः देशी दारूचा पिंप होता ज्यातून बुंद बुंद गळत होते... *drinks*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मदनबाण Wed, 05/07/2014 - 08:09 नवीन
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची? काय इजुभाउ ? एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन गेल्या १० वर्षात भाजपा दिसला ? नाही ना ? मग नमो नमो माळ ओढण्या पलिकडे त्यांच्या हातात काय उरले ? अजुन समजवुन घ्यायचे असेल किंवा वेगळ्या भाषेत उत्तर हवे असेल तर अरनब गोस्वामीनी जी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ती पहा... राज ठाकरेंनी या प्रश्नावर "व्यवस्थित" उत्तर दिलय बघा. बाकी मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाही, जो देशाची आणि देशातल्या लोकांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल त्याला माझे समर्थन नेहमीच असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तसही प्रतंप्रधानपदी बुजगावण असण्यापे़क्षा मोदी बरे असा इचार वरच्या क्लीप बनवणार्‍याच्या डोक्यात तर नसावा ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विवेकपटाईत Sat, 05/03/2014 - 17:49 नवीन
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर लिहिताना लेखकाने वास्तविकता काय होती ते जाणले पाहिजे. केवळ खोट्या प्रचाराला बळी पडून लेख लिहिला नाही पाहिजे. १. गुजरात दंगा ISI आणि स्थानीय त्यांच्या स्थानीय हितचिंतकांनी घडवून आणला होता. प्रतिक्रिया स्वरूप जवळपास ८५० मुस्लीम आणि २५० हिंदू ही मारल्या गेले होते. २. मोदी भारताचे एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगेखोरांवर सक्तीने कार्यवाही केली. ११६ च्या वर दंगेखोर मारल्या गेले त्यात ९०% हिंदू होते. निश्चित हे दंगेखोर भा ज प वाले नसतील अन्यथा मोदी पुढची निवडणूक जिंकले नसते. ३. मोदींच्या सक्ती मुळे गुजरात मध्ये शांतता पसरली आणि त्या मुळे विकास ही झाला. खर म्हणाल तर सेकुलर म्हणविणारे पक्ष अल्प्संख्कांचे खरे शत्रू आहेत म्हंटले तर ४. दिल्लीत ३५०० वर शीख मारल्या गेले पण एक ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही. ५. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर भागातल्या दंगलीत ही पोलिसांनी एक ही दंगेखोराला मारले नाही. ६.महाराष्ट्रात ही १९९०-२००० काळात दंगे भडकले होते. पोलिसांनी किती दंगेखोरांना कंठस्नान घातले. (माहित काढा, सत्य कळेलच) ७. अल्पसंख्यकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांचे वोट घेणे म्हणजे सेकुलर वाद. त्या साठी त्यांना मागास ठेवणे ही रणनीती.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 05/06/2014 - 11:58 नवीन
मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे.
हे गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
`निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे'
तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 05/06/2014 - 15:25 नवीन
हे गुजराथ नाही. अगदी अगदी! ये तो दिल्ली है! निवडणू़क आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणजे काही साधे प्रकरण नाही! ते २००९ पर्यंत (म्हणजे कोल गेट च्या सुमारास) उर्जा मंत्रालयाचे प्रमुख सचीव होते. नंतर ते निवडणूक आयुक्त आणि मग मुख्य आयुक्त झाले. जेंव्हा कोल गेट प्रकरण बाहेर आले तेंव्हा सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. पण आता ते मुख्यायुक्त असल्याने घटनासिद्ध पदी आहेत म्हणून त्यांची चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्यारे१ Tue, 05/06/2014 - 15:53 नवीन
>>> सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. 'इंटर्नल' ऑडिट काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 17:02 नवीन
>>> गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. तुमची निराधार वाचाळता निव्वळ मोदीद्वेषापोटी आहे. न्याय हा व्यक्तिसापेक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सेप्शन वर दिला जात नसून वस्तुनिष्ठ पुराव्यांवर दिला जातो. मोदींनी दंगल भडकावली असे कितीही जणांचे पर्सेप्शन असले तरी प्रत्यक्षात न्यायालयात या आरोपाच्या समर्थनार्थ आजतगायत तसूभरही पुरावा मिळालेला नाही. युपीए सरकार, अनेक स्वयंघोषित एनजीओ व नामवंत निधर्मांध गेली १२ वर्षे मोदींविरूध्द बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. पण न्यायालयात त्यांचे आरोप केव्हाच खोटे ठरले आहेत. निवडणुक प्रचारामध्ये मोदींवर केलेल्या आरोपांचे अगदी तसेच होणार आहे. दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत. असो. >>> असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर : `निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे' तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच. अज्ञानात सुखी रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/06/2014 - 18:36 नवीन
तुम्ही म्हणता ते खरंय :
दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत.
करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Tue, 05/06/2014 - 19:42 नवीन
आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच शिल्लक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 08:11 नवीन
>>> करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात दुर्दैवाने तुमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना त्याचा अर्थ समजतच नाही. ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते. मोदी मुद्दाम ठरवून त्या मुलाखतीतून का निघून गेले याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. जरा गुगलून बघा. >>> याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. तुम्हाला काहीच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत. मोदींनी आजतगायत स्वतःला कधीही अपराधी मानलेलं नाही, कारण ते दोषी नव्हतेच. अलिकडच्या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी हेच सांगितलं की मी माफी वगैरे मागण्याचे नाटक करणार नाही. माझी चौकशी करा व मी दोषी असल्यास फाशी द्या. "याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो." ही वाक्ये वाचूनच हसायला आलं आणि तुमच्या अज्ञानाची पुन्हा एकदा कीव आली. >>> इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. मग प्रेसवाल्यांना काय मोदींनी आमंत्रण दिलं होतं का? तुम्हाला काहीच कसं समजत नाही हो? >>> म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) प्रेसवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराची बलात्काराशी तुलना करणे म्हणजे जरा अतिच होत नाही का? म्हणजे "मी गरीब आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे नाहीत. माझ्या खिशात फक्त ५०० रूपये आहेत." असं मानभावीपणे सांगून दुसर्‍याच दिवशी अर्ज भरताना २.५ कोटींची मालमत्ता जाहीर केल्यासारखं आहे. >>>> फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. भारतात प्रभू श्रीरामांचे चित्र लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? आणि मशिदीत जाऊन जातीय दंगलीत सहभाग असलेल्या मुल्लामौलवींचे पाय धरणे, प्रचार करताना दर्ग्यावर चादर चढविणे, टोपीवर उर्दूवर काहीतरी लिहिणे, नमाजाची बांग ऐकू आल्यावर राष्ट्रगीतासारखी मानवंदना देणे हा काय सेक्युलर प्रचार आहे का? >>> मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. काय चुकीचं आहे यात? मोदी काय स्वतःच्या सभेचं स्टेज स्वतः खपून तयार करतात का? >>> धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. धन्य ते तुमचे अज्ञान! >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. काँग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? (जमल्यास) लवकर बरे व्हा आणि (जमल्यास) मोठे पण व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/07/2014 - 09:16 नवीन
इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय क्षीरसागर Wed, 05/07/2014 - 11:12 नवीन
ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते.
शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 17:07 नवीन
>>>> शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. धन्य आहे तुमच्या अज्ञानाची! >>> ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन! मोदी आणि पवार हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत नाही. दुर्दैवाने तुम्हाला हे समजतच नाही. यात तुमचा दोष नाही. (जमल्यास) लवकर मोठे व्हा आणि (जमल्यास) लवकर बरे व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अनुप ढेरे Wed, 05/07/2014 - 11:37 नवीन
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता
रामाचा आणि जातीचा काय संबंध? की रामाचे भक्ती एकाच जातीतले लोक करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 16:59 नवीन
>>> इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. उत्तर नाही म्हणताना मोठा पण निरर्थक प्रतिसाद लिहून गेलात. >>> ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. कोणाला विश्लेषक लागतो? मोदींना? काहीतरीच काय? उलट मोदींच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण विचारवंत (!) भिंग लावून करत असतात. मराठी किंवा हिंदी बातम्यांच्या वाहिन्या बघा म्हणजे समजेल. >>> फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! जो माणूस संपूर्ण निर्दोष असतो तोच हे आव्हान देऊ शकतो. ज्या व्यक्तीविरूद्ध सर्व यंत्रणा व माध्यमे १२ वर्षॅ वापरून सुद्धा कणभरही दोष सापडला नाही तीच व्यक्ती असे आव्हान देऊ शकते. >>> त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. अहो, खरंच आहे ते. प्रेसवाले तिथे मोदींच्या मागोमाग स्वतःहून गेले होते. केजरीवाल नदीवर टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाताना, सर्वांच्या देखत आपल्या थोबाडीत मारायला सांगितलेल्या स्वतःच्याच पक्षाच्या व्यक्तीला भेटायला जाताना प्रेसवाले बरोबर घेऊन जातात. मोदींना असली नौटंकी करण्याची कधीही गरज भासलेली नाही. >>> रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? रामाचा फोटो लावणे ही जातीनिर्देशकता? धन्य आहे तुमची! >>> मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. छबि स्टेजवर लावणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. रामनाम घेणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. नाही. आप व काँग्रेस एकाचे माळेचे मणी आहेत. म्हणून तर त्यांचं साटंलोटं आहे. भाजप पूर्ण वेगळा आहे. >>> प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते. तुम्हाला बुद्धीच नसल्याने वापरायचा किंवा न वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/07/2014 - 17:25 नवीन
तस्मात, थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 17:30 नवीन
पडलो तरी नाक वर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/07/2014 - 17:39 नवीन
केवळ तुम्हीच उतरु शकता. त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. तेव्हा रहा भ्रमात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 13:39 नवीन
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला केवळ तुम्हीच उतरु शकता.
आँ????????? रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. उदाहरणादाखलः- http://www.misalpav.com/comment/502272#comment-502272 ह्यात तर तुम्ही फार त्या माणसाच्या कामाला "निम्न्स्तरावरील काम" वगैरे म्हणुन मो़कळे झालात..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 14:27 नवीन
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच ग्रे म्याटर असतं तर मिपावर जिलब्या पाडणं सोडून अन्य कामंही करता आली असती, पण काये ना, वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच. सबब काय ते समजा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 14:32 नवीन
वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 15:12 नवीन
जाऊ दे गं.... त्या प्रतिसादांसाठी कशाला परत रुणुझुणू ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 16:52 नवीन
>>> रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. यांचं म्हणजे "मी नाही बाई त्यातली, ..." असं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/08/2014 - 16:50 नवीन
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता. तुमचा नम्र स्वभाव आवडला. >>> त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. मग कशाला इतका वेळ कालापव्यय केलात? >>> तेव्हा रहा भ्रमात. भ्रमात तुम्ही आहात. मी नव्हे. वेगवेगळ्या धाग्यांवर तुमच्या भ्रमाचा भोपळा अनेकांनी फोडलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी कायमच भ्रमात असतात. बादवे, याच्या आधीच्या प्रतिसादात "तस्मात थांबतो" असे लिहिले होते. पण न थांबता पुन्हा एकदा लिहिण्याची सुरसुरी आलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बाळकराम Fri, 05/09/2014 - 01:00 नवीन
- पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो- पवारांच्या वाक्यांत ज्या लोकांना सूचक आणि गूढ अर्थ सापडतो, अशा लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला पहिल्यापासूनच अपार आदर वाटत आला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 05/11/2014 - 17:31 नवीन
>>> >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. >>> ग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? निवडणुक आयोग हा तटस्थ असतो असे म्हटले जाते. निवडणुक आयोग हा कदाचित तटस्थ असू शकेल, पण निवडणुक आयुक्त मात्र तटस्थ असतीलच असे नाही. विशेषतः जेव्हा सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने व सोयीच्या व्यक्ती त्या पदावर बसवितो, तेव्हा तटस्थपणाची अपेक्षाच करता येत नाही. गेल्या काही दिवसातील घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोदींनी बडोद्यातील मतदानानंतर स्वतःची सेल्फी काढताना माध्यमांनी त्यांचा फोटो टिपला व नंतर स्वतःहून आलेल्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आयोगाने अक्षरशः काही तासातच त्यांच्याविरूद्ध थेट एफआयआर दाखल केला. पण पप्पू अमेठीत मतदानाच्या दिवशी एक मतदार मतदान करत असताना थेट मतदान यंत्राशेजारी उभा असल्याचे ३ वेगवेगळे फोटो माध्यमांनी टिपलेले असताना पप्पूला मात्र हाच आयोग क्लीन चिट देउन मोकळा झाला. ३ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणशीतील बेनियाबाग भागात सभेला व रोड शो करायला आयोगाने बंदी घातली. पण त्याच भागात दुसर्‍याच दिवशी पप्पू आणि अखिलेश यादवला रोड शो ला परवानगी दिली. आज निवडणुक आयोगाने भाजपच्या वाराणशीतील कार्यालयावर विनाकारण धाड घालून प्रचाराचे बिल्ले, टोप्या इ. जप्त केले. भाजप म्हणे या गोष्टी मतदारांना वाटणार होता. कालच प्रचार संपल्याने हे उरलेले साहित्य आहे असे भाजपने सांगून सुद्धा आयोगाने आपला हट्ट सोडला नाही. धाड टाकून साहित्य जप्त केल्यावर काही तासातच आयोगाने सर्व साहित्य परत दिले व भाजप प्रचारासाठी हे साहित्य वापरणार नसल्याची कबुली दिली. काँग्रेस, आप, सप, बसप इ. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर धाड टाकली असती तरी त्यात त्या पक्षाच्या प्रचाराचे उरलेले साहित्य मिळालेच असते. मग इतर पक्ष सोडून फक्त भाजपच्याच कार्यालयावर का धाड टाकली? मुद्दाम भाजपला बदनाम करणे व भीति दाखविणे हे दोनच उद्देश यामागे दिसतात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे निवडणुक आयोग कदाचित तटस्थ असेल, पण निवडणुक आयुक्त तसे असतील अशी खात्री नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे Sun, 05/11/2014 - 19:53 नवीन
या बाबतीत सहमत . EC हा काँग्रेसधार्जिणा असावा, महाराष्ट्रात मतदार संघ पुर्नरचनेत जाणत्या राजाची मतं घेऊन काम झाल्याची चर्चा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Tue, 05/06/2014 - 21:19 नवीन
Gujarat Land Acquisition Model is the Best: Commerce Ministry Report काँग्रेसच्या आनंद शर्मा या मंत्र्यांच्या अख्त्यारीतील क्रेंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज गुजरात मधील भूसंपादन पद्धतीला आदर्श पद्धत म्हणल्याचे आले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 05/06/2014 - 21:46 नवीन
हे आले मोदि भक्त :D ...अहो, बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. मोदिभक्तांना&%$#&*%&$# जातीयवाद%&$&-%$# आकलन &$&##मानसीकता*&#@&$& (आपापल्या वकुबाप्रमाणे ब्लाब्लाब्ला चा अर्थ लावावा हि विनंती :P )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 05/06/2014 - 22:04 नवीन
डिसक्लेमरः आम्ही मोदी भक्त नसून अ आणि ब काँग्रेस भक्तांचे विचार मोदीत सॉरी मोडीत निघालेत हे सिद्ध करणारे विचारकृमीकिटक आहोत. :) बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. ते ही खरेच म्हणा. आदर्श मधे चव्हाण साहेब आहेत. मोदी थोडेच! ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
य
यशोधरा Fri, 05/09/2014 - 03:39 नवीन
विचारकृमीकिटक - भारी शब्द! लईच आवाडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2014 - 17:12 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/ishrat-jahan-encounter-no-prosecutable-evidence-against-shah-says-cbi-497881/ भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे सरचिटणीस आणि गुजरातमधील माजी मंत्री अमित शाह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी इशरत जहॉं चकमकप्रकरणी क्लिन चीट दिली. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. शाह यांच्याबरोबरच गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही आरोपींविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीच्या मोसमात शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयच्या भूमिकाचा फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इशरत जहॉं चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सीबीआयने आपली बाजू मांडली. या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिकाऱयांचा समावेश आहे. सत्यमेव जयते!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/07/2014 - 17:16 नवीन
ते तुम्ही काही म्हणा... पण अरविंद केजरीवालच एकमेकाव्दितीय... कोणिही मारो त्यांना थप्पड बेदम फिर भी इस बंदे मे ही है दम. *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास गुरुवार, 05/08/2014 - 01:48 नवीन
आज टाईम्स ऑफ इंडीया मधे आलेल्या बातमीनुसार मोदी सरकारला युपिए सरकारकडून विविध प्रकारची २८५ बक्षिसे/प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यातला काही ठळक भाग खालील प्रमाणे:
Modi's case for his governance is perhaps spurred by the awards that the Gujarat government has received since 2004, which amount to more than 285. Among these are seven Prime Minister's awards, 82 conferred by various central government departments, and 172 by well-known national and international agencies for performances in various development areas. Over the past few years, under the Congress-led UPA rule, the Gujarat government got the Prime Minister's award for best water and sanitation management in rural areas, housing development for poor urban people, and for best practices in controlling maternal and infant mortality. In 2010-11, the Government of India's department of administrative reforms and public grievances and the department of information technology awarded Modi's office (the Chief Minister's Office) best practices award for people-oriented services. The Gujarat Urban Development Department has bagged several central government awards for the BRTS, implementation of reforms norms, and for the seven-point charter of JnNURM. Other awards the state won include those for transportation, solid waste management, and water supply projects.
आता यावरून मोदींना केवळ business friendly असे लेबल लावायचे का? यात प्रश्न परत मोदीसमर्थनाचा नाही तर आपल्याला न आवडणार्‍या व्यक्तीस काय वाट्टेल ते करून बदनाम करणे हे योग्य आहे का, हा आहे. सध्या आंधळ्या मोदीभक्तीपेक्षा आंधळा मोदीद्वेषच उतू जाऊ लागला आहे असे वातावरण आहे. असो.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ गुरुवार, 05/08/2014 - 14:13 नवीन
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१ जागा बाकी असताना सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात अचानक सूडाचं राजकारण करण्याचं कारण जाणण्यासाठी नरेंद्र मोदींचं अमेठीतलं भाषण यु-ट्युबवर पहायला हवं. अमेठी आणि रायबरेलीत विरोधी पक्षांनी ताकदवान उमेदवार उभा न करण्याचा, महत्त्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार न करण्याचा आणि गांधी घराण्यातील उमेदवारांवर थेट टीका न करण्याचा एक संकेत होता जो अटल बिहारी वाजपयी आणि लाल कृष्ण आडवाणींनीही पाळला होता. पण नरेंद्र मोदींनी तो साफ धुडकावून लावला. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-and-varansi बोस्टन विमानतळावर पप्पू ला पकडले होते. १ लाख डॉलर कॅश बाळगली होती म्हणून. तेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते. त्यांनी पप्पूला सोडवले. हे वरच्या लेवलचे नेते सगळे मैत्री बाळगून असतात आपसात. खाबुगिरी करण्यात पण. मोदी नक्कीच वेगळे आहेत. सहिष्णू राजकारण खूप झाले. पवार साहेब नेहमी महाराष्ट्रच्य सहिष्णू राजकारणाचे गोडवे गात असतात. आता मोदी सारखा असहिष्णू नेताच पाहिजे आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/08/2014 - 23:26 नवीन
भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन होऊ शकतो पण त्यावर पक्ष चालवता येत नाहीत. तुम्ही विधान सभेची निवडणूक दिल्लीत लढवली दिल्लीच्या वीज ,पाणी ह्या मुलभूत प्रश्नाला हात घातला म्हणून तुम्हाला आता यश मिळाले. आता लोक सभेसाठी सार्या देशभर निवडणुका लढवणार तेव्हा लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या पक्षाची आर्थिक , परराष्ट्र , सांस्कृतिक , सामाजिक ,धार्मिक धोरणे प्रभावी पणे जनतेच्या समोर अजून आप ने मांडली नाही. केजू फक्त व्यक्तिगत हल्ले करत होता. एका मुलाखतीत खाजगीकरणाला त्याचा विरोध आहे हा मुद्दा त्याने वगळायला सांगितला कारण ह्या विरोधाचे कारण तांत्रिक असून ते आता सांगण्याचा वेळ नसल्याने उगाच मध्यमवर्गीयांचा रोष नको अशी चालबाजी करत होता. अरे बाबा तुझे तांत्रिक मुद्दे जनतेला कधी सांगणार का तुझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन तू तांत्रिक मुद्दे आहेत असे करणार तुझे विचार जनतेपुढे मांडणाताना संधार्भासाहित स्पष्टीकरण देणे द्याला गरजेचे वाटत नाही. ह्याउलट मोदी गेल्या दीड वर्षापासून त्यांचे पर्यटन ते इतर आर्थिक , शैक्षणिक धोरणे काय आहेत हे विविध ठिकाणी भाषणातून नुसते सांगितले नाही तर गुजरात मध्ये त्या संबंधी काय केले ह्याचे उदाहरण दिले. आज केजू सरकार बनवणार नाही बनवणार दोघेच राहुल किंवा मोदी आता शेवटी शेवटी ह्या दोघांची पंगा घेऊन प्रसार मध्यांना चालणार नाही त्यामुळे कधी केजू , कधी राज असे तत्कालीन गल्ला भरायला प्रसार माध्यमांना चालतात. मात्र दीर्घ काळासाठी बिग शॉट वर लक्ष द्यावे लागते. आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही मोदी मे हे दम मोदी हे सिंघम लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 05/09/2014 - 00:18 नवीन
आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही
लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही
नेम्कं काय म्हन्नं हाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ब
बाळकराम Fri, 05/09/2014 - 00:49 नवीन
आता पुन्हा मोदीभक्तीची गटारे वाहू लागली वाटतं! असो चालू द्या
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/09/2014 - 01:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बाळकराम Fri, 05/09/2014 - 08:35 नवीन
दिसतोय विकासराव?!! ;) पण गटारामुळे येणार्‍या घाणीला ईनो काय करणार? तिथे रुमाल पाहिजे जो मी नाकाला लावून बसलोय आधीच, त्यामुळे सल्ल्याबद्दल थँक्स बट नो थँक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अभिजित - १ Fri, 05/16/2014 - 17:48 नवीन
गुजरात मध्ये करून दाखवलं . आणि खरेच करून दाखवलं . शिवसेने सारखे नाही , नुसते होर्डिंग पुरते. अटल किवा अडवाणी सारखे सर्वसमावेशकतेचे ( थोडक्यात सेटिंग बाजी ) राजकारण करणार नाहीत हि खात्री. खूप सोसले आहे देशाने. आता कोण तरी कट्टर कडवा माणूस पाहिजे सर्व स्तरावरची लढाई लढायला. मग तो लढा भ्रष्टाचार , पाकिस्तान , काश्मीर प्रश्न नाहीतर अजून काहीही असू दे. आणि झटपट निकाल लावायची क्षमता. जी नमो मध्ये आहे. हेच खरे महत्वाचे प्लस point आहेत नमोचे. विधान सभे मध्ये चित्र नक्कीच वेगळे असणार आहे,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा