Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

ग
गुल-फिशानी
Sun, 05/11/2014 - 05:57
🗣 150 प्रतिसाद
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय. त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं. मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत १-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला? २-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ? ३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ? ४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ? मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय. तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार? तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

प्रतिक्रिया द्या
39755 वाचन

💬 प्रतिसाद (150)
न
नगरीनिरंजन Mon, 05/12/2014 - 06:43 नवीन
ज्जे बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्पंदना Mon, 05/12/2014 - 06:46 नवीन
केव्हढ स्पष्ट अन व्यवस्थीत लिहीलं सर! __/\__!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यशोधरा Mon, 05/12/2014 - 07:05 नवीन
सुरेख प्रतिसाद. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आत्मशून्य Mon, 05/12/2014 - 07:51 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 07:54 नवीन
सुरेख प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/12/2014 - 09:35 नवीन
जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.
बिरुटे सर , हे इतकं सोप्पं आहे ? माझ्या माहीतीत तर फक्त एक विषिष्ठ समाजच शोषक आहे आणि त्यांच्या थोबाडावर मारलेला आहे तो दगड असे आजवर ऐकत होतो , रादर सर , तुम्ही येथे सातारा कराड कोल्हापुरात येवुन पहा जब्याच्या आडुन कोण कोण दगड मारत होते ते ही तुमच्या लक्षात येईल , पण ह्या घटने मुळे जब्याच्या आडुन दगड मारणारेच जब्याच्या जिवावर उठलेत हे स्पष्ट झालय म्हणुन म्हणलं की एकदा परत चिंतन करायची गरज आहे :) आता जरा स्पष्टच : ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादातल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या असमानते बद्दलचा सारा रोष रीतसर पणे ब्राह्मण समाजाकडे वळवला ... पण आता हळु हळु लोकांच्या लक्षात येतय की जब्याला मारणारे कोणत्या गटातील आहेत ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्यारे१ Mon, 05/12/2014 - 11:15 नवीन
समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं असतं त्याच्याकडं समाजाच्या वाटचालीच्या चाव्या असतात. १९४८ पर्यंत तरी ब्राह्मण समाज सगळ्या समाजाच्या शीर्षस्थानी होता हा इतिहास आहे. बुद्धीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर नि धूर्तपणा, लवचिकपणा, स्वतःमध्ये कालानुरुप बदल करण्याची क्षमता (पुन्हा बुद्धीच) ह्या गुणांच्या आधारे सगळ्यांवर वरचष्मा ठेवणं शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील डोकं शांत ठेवून नि अनुकूल परिस्थितीमध्ये उतमात कमी करुन त्यांनी हे शक्य केलं होतं. ह्याच्या विरुद्ध खालचा समाज अशिक्षित, वर येण्याचा विचार न करणारा, अंधश्रद्ध असा तर 'वरचा' समाज देखील पैशानं बरा पण परिस्थिती अनुकूल असली की उधळपट्टी नि प्रतिकूल झाली की 'गावातल्या ब्राह्मण+/सावकाराकडं' जमीन्/दागिने गहाण ठेवून उधळपटटीच असं करणारा झाला. ४८ च्या गांधीहत्येनंतर बर्‍याच जणांनी 'स्कोअर सेटल' केले नि ब्राह्मणांचं वर्चस्व बर्‍यापैकी कमी झालं. आजही जुनी पुस्तकं वाचून नि जुन्या आठवणी/जखमा भळभळत्या ठेवून लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रकाश घाटपांडे Mon, 05/12/2014 - 11:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अवतार Mon, 05/12/2014 - 18:12 नवीन
झकास प्रतिसाद! कोणावरही दगड भिरकावून व्यवस्था बदलत नसते तर समतावादी विचारांची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजवूनच व्यवस्था बदलता येते हे सत्य बाबासाहेबांना उमजले होते. म्हणूनच त्यांनी दगड मारण्याच्या फंदात न पडता व्यवस्था बदलणाऱ्या विचारांची मुळे समाजात रुजवली. त्या मुळांचा आज वृक्षविस्तार होऊन त्यांना पालवी फुटत आहे. हे सत्य स्वीकारण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनाच कोणत्यातरी "एका समाजावर" दुसऱ्या समाजाने दगड मारला हे आठवून वांझोटा मानसिक आनंद मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/12/2014 - 20:49 नवीन
अवतारबाबा आणि बिरुटे सर>>> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
र
राजेश घासकडवी Mon, 05/12/2014 - 06:08 नवीन
बिरुटेंचा प्रतिसाद आवडला. मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पांथस्थ Mon, 05/12/2014 - 08:12 नवीन
प्रा. बिरुटे, प्रगल्भ प्रतिसाद १+ राजेश १+ मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे या आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा -
" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr."
लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्‍या लोकांची निष्क्रियता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2014 - 21:29 नवीन
>>>>१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? कुठल्या वयापासून मुलगा आणि मुलगी ह्यांना परस्परांबद्दल 'शारीरिक' औत्सुक्य आणि आकर्षण निर्माण होतं. त्या वयापासून 'प्रेम' ह्या विषयी मनांत विचारमंथन आणि धारणा बनण्यास सुरुवात होते. कोणासाठी हे वय १२ असेल तर कोणासाठी १७. पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे. मग ते २५-३० काहीही असू शकेल. असो. मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. जे कांही नव्या पिढीचे व्हायचे असेल ते होऊ द्यावे. ज्याचे त्याचे पालक पाहून घेतील. आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे. नव्हे, मिपाकरांनीच आणून सोडले आहे. मिपाकरांना दोन्ही बाजूंनी बोलताना पाहिलं आहे. शहाण्याने, योग्य असली तरी, कुठली बाजू घेऊ नये. असो.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 05/11/2014 - 21:35 नवीन
'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' ?????????????? इथपर्यंत मजल गेली का? वा वा ...चान चान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2014 - 21:39 नवीन
होय मंदार. तेंव्हा जी जखम मनाला झाली ती कधीच भरून येणार नाही. मी आजतागायत माझ्या कट्टर शत्रूचेही मरण इच्छिलेले नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
श
शुचि Mon, 05/12/2014 - 02:19 नवीन
पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण वेगवेगळ्या मुशीतून बनलेला असतो. प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.आपल्या भावना समजू शकते. पण असे शेरे अजिबात मनाला लावून घ्यायचे नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 05/12/2014 - 09:36 नवीन
>>>>प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही. खरं आहे शुचि. ज्या सदस्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्या सदस्याबद्दल मला आदर होता. तो इतका अस्थानी ठरेल असे वटले नव्ह्ते. मिपावर मी, 'संस्थळावर कसे वागावे/लिहावे आणि किती संवेदनशील असावे' हे नाईलाजाने शिकलो आहेच. मिपा किंवा इतर कुठलेही संस्थळ हे फक्त मनोरंजनाचे/टवाळकीचे/आपल्या वैफल्याला दूसर्‍यावर शाब्दिक आसूड ओढून नकारात्मक वाट करुन देणारे नसावे. तिथे चांगल्या विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे असे वाटते. थोड्याफार टवाळक्या ह्या होणारच पण त्या जेवणातील मीठाइतक्याच असाव्यात. असो. धाग्याच्या विषयाला सोडून बरेच अवांतर झाले. क्षमा असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रकाश घाटपांडे Mon, 05/12/2014 - 10:11 नवीन
हे अवांतर नसून समांतर आहे. अशा प्रवृत्ती समाजात असणारच. कधी कधी उन्मादाच्या भरात इतर वेळी सुज्ञ वाटणारे लोक देखील असे खरडतात.आताही खरडणारे हा धागा वाचत असतील तर बोध घेतील अशी आशा करु या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/12/2014 - 13:46 नवीन
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आनन्दा Tue, 05/13/2014 - 13:21 नवीन
आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.
बाप्रे.. पहिल्या वाक्याचा अर्थ बराच वेळ लागलाच नाही. सावरकरांच्या वर्ताण झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/12/2014 - 13:47 नवीन
"आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे" ही कुप्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
स्पंदना Mon, 05/12/2014 - 00:20 नवीन
जर एखादा धागा चर्चा या सदरात असेल तर त्यावर साधक बाधक अश्या दोन्ही बाजुंनी चर्चा होणार पेठकर काका. पण जेंव्हा लोक मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात तेंव्हा त्यांची अक्क्ल आपण समजुन घ्यायची असते. अन जोवर स्वत्;ला झळ लागत नाही तोवर नुसती चर्चा करुन मनोरंजन एव्हढाच उद्देश असतो. मग तेथे पोटतिडीकेने सांगणारे चेष्टेचा विषय बनतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
राजेश घासकडवी Mon, 05/12/2014 - 04:35 नवीन
पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे.
नाही हो पेठकर काका. आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? सतराव्या वर्षी नाही प्रेमात पडायचं तर कधी? निसर्ग कसा बदलणार आपण? शिक्षण पुरं होईपर्यंत, जबाबदारी उचलण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत मुलं होऊ देऊ नये म्हणणं निश्चितच पटत. पण त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत हो आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2014 - 08:40 नवीन
राजेश घासकडवी साहेब, >>>>आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? प्रेम करणं राहू दे बाजूला पूर्वीच्याकाळी आई-वडीलच मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेत. ते सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी सक्षम असत, सुनेची आर्थिक जबाबदारी उचलण्याची ताकद त्यांच्याकडे असायची. मुलाने-सुनेने केंव्हा 'एकत्र' यायचे हेही तेच ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलाची-सुनेची राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था घरचेच पाहायचे. आता विभक्त कुटुंब पध्दतीत निर्णयक्षमतेपासून अमलबजावणीपर्यंत आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत प्रत्यक्ष मुला-मुलीलाच सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आजच्या काळात ठराविक काळापर्यंत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक ठरते. आचारविचारांचे स्वातंत्र्य आधुनिक काळानुसार पाहिजे पण जबाबदार्‍या जुन्या काळाप्रमाणे घरच्यांनी उचलाव्यात ह्या विचारसरणीत विसंगती आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. आपल्याला त्या स्विकारल्याच पाहिजेत. आणि कायदा हातात घेऊन एखाद्याला मृत्यूदंड देणं केंव्हाही समर्थनिय नाही. जे चुक ते चुकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मदनबाण गुरुवार, 05/15/2014 - 07:16 नवीन
व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. सहमत ! मागच्याच महिन्यात एक धक्कादायक बातमी वाचली होती :- Girl, 12, becomes Britain's youngest mother
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/12/2014 - 05:22 नवीन
आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे.
मी तर म्हणतो की आपण आपल्या मुलांवरही चांगलेबिंगले संस्कार करण्याच्या भानग्डीत पडु नये ... खलिल गिब्रान काय म्हणाला की तुम्ही पोरान्ना फक्त जन्म देवु शकता ...तुमचे विचार नाही ! थोड्या टेक्निकल भाषेत बोलायचे तर संस्कार करणे हे सुपरवाईझड लर्निंग झाले पण अनसुपरवाईझड लर्निंग हे मानवी मेन्दुचे ( आणि काहीच्यामते बर्‍याच विकसित प्राण्यांच्या मेन्दुचे ) डिफायनिंग फीचर आहे !! आपण पोरांपुढे फक्त आपले अनुभव ठेवुयात वाटल्यास चांगले साहित्य ठेवुयात बस्स ...बाकी त्यापुढे काय चांगले काय वाईट , कार करावे काय करु नये हे त्यांचे त्यांनाच ठरवुदेत !! उगाच संस्काराम्च्या मोल्डिंग मधुन काढलेल्या पोरापेक्षा स्वतःचे संस्कार स्वतःच्याच बुध्दीने विचाराने केलेली पोरं मला जास्त आवडतील !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/12/2014 - 06:08 नवीन
मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. काय पेठकर साहेब, काही लोकांना मुळात कोणाचा तरी अपमान करायचा असतो. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची असते. मान-अपमान करायचा असतो, तेव्हा इतका काय विचार करायचा अशा लोकांचा. त्रास होतो थोडासा हे मान्य. मी अनेकदा अनेकदा म्हटलंय. आपण खूप जीवाला लावून घ्यायचं नाही. जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. आपल्याला काय वाटतं ते लिहून मोकळ व्हायचं. आपल्याला उपप्रतिसाद आला तर त्याला उपप्रतिसाद लिहित नाय बसायचा त्याला फाट्यावर मारायचं. दुर्लक्ष करण्यासारखं मोठं अस्त्र नाही, जालावर. आता तुम्ही काय नवीन नाही संकेतस्थळावर खूप दिवसांपासून वावरता, तेव्हा तुम्ही तरी असं लिहायचा नाद नाय सोडायचा. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 11:40 नवीन
सहमत... @ पेठकर काका... मिठाई बरोबर पुठ्ठ्याचा खोका येतो.तो खोका फेकून द्या, आणि मस्त इथल्या लेखांची चव चाखा,जमल्यास आम्हाला पण एखाद्या लेखाची मेजवानी द्या. अहो, समाज म्हटले की, गहनविचारी माणसे येणारच. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2014 - 08:52 नवीन
बिरुटेसर, >>>जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. तेच होऊ द्यायचं नाहिये मला. मी आहे तो ठिक आहे. कातडी अगदी गेंड्याची करायची वेळ आली तर मी संस्थळावर वावरणेच सोडून देईन. आहे काय आणि नाही काय. कितितरी वेळ वाचेल. असो. बिरुटेसर, मला पोलीसात उपनिरिक्षकाच्या जागेसाठी वर्णी लावण्यासाठी एका ओळखितल्या निरिक्षकाने मंत्र्यापर्यंत ओळख लावण्याची तयारी दाखविली होती. पण, 'पोलीसात लाच खावीच लागते. सुरुवातीला त्रास होतो पण पुढे पुढे मन मरतं.' अशा त्याच्या वक्तव्यामुळेच पोलीसखात्याच्या नोकरीकडे मी पाठ फिरविली. पोलीसखात्याच्या नोकरीसाठी 'लाच न खाण्याचं' तत्व मी सोडू इच्छित नव्हतो. असो. असतात कांही माणसं आडमुठी. जाउद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुबोध खरे Wed, 05/14/2014 - 15:26 नवीन
people laugh at me because I am different. I laugh at people because they are all the same. आपण का बदलायचे? शेवटी रात्री आपल्याला थंड झोप लागत असेल तर काय वाईट आहे. माझ्या मावशीचे यजमान ३६ वर्षे आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी करून फक्त निवृत्तीवेतनासहित निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विचारले साहेब तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांची पार्ले अंधेरीला तीन चार घरे/ सदनिका झाली तुम्ही असे राहून काय फायदा झाला? त्यांनी शांतपणे सांगितले ते लोक पैसे खाऊन थंड झोपू शकत असत. मी त्यातला नाही. पण माझ्या ३६ वर्षाच्या झोपेची किंमत काय कराल? (त्यांची मुले उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत गुणी निघाली आणि मुलांनी प्रचंड पैसा कमावला.) बापाचे काय नुकसान झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 06:54 नवीन
मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. काकाश्री असल्या वायझेड लोकांची मते कशाला मनाला लावुन घेता ? उलट त्यांचा उद्देशच अशाने सफल होतो. बरळणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया शक्योतो वाचायच्या टाळाच, आणि वाचल्याच तर हा वायझेड आहे समजुन दुर्लक्ष करुन टाका. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. बिरुडे सरांशी बाडिस... ज्याला योग्य प्रकारे लिहायचे असेल तर तो तसे लिहतोच आणि ज्याला वायझेडपणा करायचा आहे तो तसा करतोच ! आपण आपल्याला इथे आपले विचार मुक्त आणि स्वतंत्रपणे मांडायची मोकळीक आहे ती कोणा सोम्या-गोम्या मुळे का घालवायची ? मी तर कोण आला कोण गेला याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याला लिहायची आणि मिपावर वावरायची इच्छा आहे त्याचे नेहमीच इथल्या सर्व लोकांकडुन स्वागत केले जाते... मग तो जुना असो वा नवा. उगाच फालतु माज करणार्‍यांना दुर्ल़क्षीत करणेच योग्य. जाता जाता :- असल्या लोकांना फाट्यावरच मारा. भले देउ कासेची लंगोटी|, नाठाळांच्या माथी हाणु काठी || हे तुकोबांचे वाक्य प्रमाण असावे. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 05/12/2014 - 07:00 नवीन
जाता जातां - ते वाक्य समर्थांचे नसून तुकोबांचे आहे असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्पंदना Mon, 05/12/2014 - 07:04 नवीन
कुठे चाललात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 07:04 नवीन
हो. माझा संदर्भ चुकला आहे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी असे आहे ते, संपादकांना विनंती जमल्यास बदल केल्यास आभारी राहेन. :) धन्स पुपे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मारवा Mon, 05/12/2014 - 07:42 नवीन
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी या वरील अभंगात संत तुकाराम यांनी वापरलेला मुळ शब्द "कासेची" हा नव्हता. विख्यात कादंबरीकार व लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच्.डी. केलेले ( इथे पी.एच्.डी. चा विषय महत्वाचा आहे) यांनी आपल्या एका लेखात तुकारामांनी वापरलेला मुळ शब्द दिला आहे. आता मुळ शब्दा एवजी हा कासेची शब्द का वापरण्यात आला बदलण्यात आला यामागे काही महत्वपुर्ण अशी समाजशास्त्रीय कारणे आहेत. मी ही तो शब्द का देत नाहीये या मागे ही नेणीवे वरील तो दबाव कार्यरत आहे. भालचंद्र नेमाडेंच्या समीक्षा व तुकारामावरील त्यांनी लिहीलेले साहीत्य वाचलेले असल्यास मी काय म्हणत आहे याची कल्पना येइल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/12/2014 - 07:47 नवीन
हो... माहित आहे. गां** असा आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आत्मशून्य Mon, 05/12/2014 - 07:44 नवीन
ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा
कोण हो तो सदस्य ? नक्कि काय घडले होते की अशी प्रतिक्रीया दिली त्याने ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 05/12/2014 - 07:46 नवीन
भालचंद्र नेमाडे हा उल्लेख टंकायचा चुकन राहीला मी भालचंद्र नेमांडे विषयी बोलत होतो त्यांच्या लेखात याचा उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/12/2014 - 08:57 नवीन
जाता जाता -- एखाद्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याला मृत्युदंड देणे हे महाराष्ट्र पाचव्या शतकात असावा याचा पुरावा आहे. मुलाने किंवा मुलीने प्रेम करणे आणि त्यांनी लग्न करणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. अव्यक्त प्रेम हे साधारण ८० ते ९० टक्के( कदाचित १००%) लोक करतात.यातील एक दशांश लोकांचे प्रेम उघड होते किंवा व्यक्त केले जाते. यातील पाच टक्के लोकांचे लग्न होते. प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. एक नम्र सूचना -- मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. (मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते)
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 05/12/2014 - 09:26 नवीन
वरील एका प्रतिसादात पांथस्थ यांनी मार्टीन ल्युथर किंग चे हे सुभाषित दिलेले आहे. " History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr." या किंग यांच्या प्रतिसादा चे उत्तम रीअल लाइफ उदाहरण म्हणजे या प्रतिसादातील हे सुबोध खरे यांच्या प्रतिसादातील खालील वाक्य -- पुरोगामी लोक= गुड पिपल ( आणि यांच अपालिंग सायलेन्स ते बाळगा हा आग्रह) मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Mon, 05/12/2014 - 09:38 नवीन
मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. काय कमाल आहे इतक्या जटील कॉम्प्लेक्स समस्ये च इतक सोप उत्तर होत कोणाच्याच कस लक्षात आल नाही आजतागायत ? मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देउन टाका म्हणजे या हत्या आणि वाद टळतील ? म्हणजे अशा हत्या या मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याच्या रागातुन झालेल्या आहेत ? यात वर्णव्यवस्था काम करत नाही का ? आऱक्षण झाले असते तर या संबधांना विवाहाला आनंदाने मान्यता मिळाली असती का ? खरे साहेब वर्णव्यवस्था जी खोलवर रुजलेली आहे ती इथे काम करत आहे आणि मराठा आरक्षणाचा आग्रह हा त्याने मिळणारया आर्थिक हीता च्या आकांक्षेतुन आहे तो मिळाल्यावर सर्वांना समान वागणुक देणे वा आपल्यापेक्षा खालच्या जातीत विवाह करणे इ. ला प्रोत्साहन मिळण्याचा काहीही संबध नाही. वर्ण व्यवस्था आपली उतरंड सांभाळण्याचे काम आरक्षणाचा लाभ मिळाला अथवा नाही मिळाला तरी थांबविणार नाही मुळ समस्या वर्णव्यवस्थेची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/12/2014 - 10:12 नवीन
प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. डॉक्टर साहेब, प्रेम होऊच नये म्हणुन काही गोळ्या काही इंजेक्शन, काही जडीबुटी, साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या काही काढा देता येतील का येत्या पिढीला. म्हणजे, वय वर्ष तिशी-चाळीशीला पुन्हा अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शिक्षण, नोकरी इतर जवाबदा-याही पार पडलेल्या असतील. मेंदुत असं एखादा बदल करायचा की बैलाला झापड लावल्यासारखं पोरं-पोरी एका सरळ एका रेषेत चालली पाहिजेत. पोरांकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही.पोरं मोकाट सुटणार नाहीत. मुलगी अजून घरी का आली नाही अशी चिंता पालकांना राहणार नाही. सारांश प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ? :) दार उघड चिऊताई चिऊताई दार उघड ! अस म्हणुन वाट पाहणा-या प्रियकराला चिऊताई म्हणते अरे बाबा ! आज लय काम आहेत, अरे बाबा आत्ताशी कुठं घर बांधतेय. अरे बाबा, आत्ताशी कुठं मुल मुलांची लग्न झालीत. आत्ताशी कुठं नवरा सासरा यांचं करते आहे, अरे नातु पणतु होऊ दे बाबा. चिमणा बिचारा वाट पाहुन 'उडुन जातो.' चिऊताय दार उघडते. मला वाट पाहणा-या त्या कावळ्याची खुप दया येते. डॉक्तर साहेब कसं थांबवता येईल हो हे ? पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं. तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं . चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही . तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं . बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल ? (मंगेश पाडगावकर) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 05/14/2014 - 15:48 नवीन
अहो असं करता आला असतं तर प्रश्नच मिटला असता. आता बघा दिग्गीराजा साहेबाना या वयात ( फक्त ६७) सुद्धा प्रेम झालं. ttps://www.google.co.in/search?q=digvijay+singh+affair&rlz=1C2CHNY_en-ININ376&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=pnNzU-vVM9GxrAfHw4GwBQ&ved=0CC4QsAQ&biw=1280&bih=605 मग १७ व्या वर्षी एखाद्या तरुण/ तरुणीला कसं काय थांबवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Mon, 05/12/2014 - 09:16 नवीन
धाग्याचा मुख्य विषय आहे त्या संबंधाने वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ होताना दिसतीए. मला पडलेले काही प्रश्न पडले ते असे एक. हे प्रकरण वाचताना कनीष्ठ महाविद्यालयही शाळेला जोडलेली असण्यापेक्षा वरीष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असण अधीक श्रेयस्कर असत का हा विचार मनात तरळून गेला. वरीष्ठ महाविद्यालयांच्या सोबत एकतर अधीक चांगल्या दर्ज्याच्या शैक्षणिक वातावरणाची साथ मिळते ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अधिक चांगली वाचनालय सुविधा लॅब्स वगैरे उपलब्ध असण्याची शक्यता वाढते. आणि आयुष्याच पुढच ध्येयही खुणावत असतं. दुसर्‍या बाजूला पौगंडावस्थेतून संक्रमणशील अवस्थेतील मुलांची भावनिक अवस्था समजून सुयोग्य पाठबळ आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या अवस्थेतून पुढे गेलेला अनुभवी वरीष्ठ अनुभवी विद्यार्थी वर्ग तसेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघांची प्रगल्भ समज वरीष्ठ महाविद्यालयीन वातावरणात अधीक बरी असण्याची शक्यता असू शकते का? दोन. या विशीष्ट प्रकरणात मुलगा आणि मुलगी दोघेही कायद्याच्या दृष्टीने नाबालीग आहेत म्हणजे कंसेंटची पुर्ण अधिकार नाही याचा अर्थ या वयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही असे नाही. इन एनी केस इथे जबाबदारी शालेय प्रशासन आणि पालकांची दोहोंची आहे. त्या संक्रमणावस्थेतील वयातील भावनांचा आदर ठेऊन आकर्षण आणि प्रेम यातील सुक्ष्म भेद समजावून देणे तसेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सुयोग्य समुपदेशन उपलब्ध करणे हि जबाबदारी जशी शालेय व्यवस्थापनाची आहे तशी पालकांची आहे पण हे करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता शहरांमध्येही पुरेशी नाही ग्रामीण क्षेत्रात आहे का ? इथे ग्रामीण भागातही मुलांच शिक्षणाच आणि लग्नाच वय सावकाश का होईना वाढत आहे, बालविवाहांच प्रमाण कमी होत आहे आणि हि सामाजिक बदलांनी समोर उभी टाकणारी आव्हान पालकांना आणि शालेयव्यवस्थापनांना सांभाळायची आहेत याबाबत सजगतेची गरज असू शकते का ? तीन. यात सामाजिक दुराव्यांचा संबंध नाही असाही एक दावा पुढे येतो आहे, त्यात प्रथम दर्शनीतरी तथ्य जाणवत जे कुटुंबच बाहेर गावातून येऊन राहील आहे त्याच्या आडनावावरून जात समजली असेल आणि असली तरी ती अबकड आहे का हळक्षज्ञ या पेक्षा आपल्या बहिणीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे दोन मुद्दे अधिक प्रभावी असू शकतात तरी हे मुद्दे सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी शालेय व्यवस्थापन पालक आणि सुरक्षा व्यवस्थांच सहकार्य याच्याशी संबंधीत आहेत. अर्थात इथे नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेताना आपण हे विशीष्ट प्रकरण जरा बाजूला ठेऊन विचार केला की; मुलगा आणि मुलगी दोघेही अबकड सामाजिक गटाचे अथवा दोघेही हळक्षज्ञ सामाजिक गटाचे आहेत अशा स्थितीत प्रकरणे या टोकाला जाण्याच प्रमाण सहसा कमी असेल किंवा कमी ऐकण्यात असेल. समजा (अशा कोणत्याही प्रकरणातील) मुलगा हा मुलीच्या भावाचा मीत्रांपैकी/नातेवाईकांपैकी समजा मामेभाऊ असता तरीही प्रकरण अशाच पद्धतीने हाताळल गेल असत का ? सहसा मीत्रवर्ग एकाच समाजाचा असतो का ? मग एकाच सामाजिक गटाची प्रकरणे टोकाच्या मार्गाने तडिस न नेणे आणि सामाजिक गटात फरक झाला की प्रकरण हाताळणी टोकाच्या मार्गाने होणे असे काही होते आहे का ? समाजशास्त्रातील तज्ञानी हा सामाजिक अभ्यास करण्याची गरज आहे का ? चार. या विशीष्ट प्रकरणात सामाजिक दुरावा हे कारण नाही हे क्षणभर मान्य जरी केल, तरीही सामाजिक दुराव्यांच्या बाबतीत सर्वच आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? समजा हि मुले कायदेशीर दृष्ट्या (लिगली) कंसेंटीग अ‍ॅडल्ट असती तर त्यांना स्वतंत्र पणे त्यांचे निर्णय घेऊ देण्या इतपत भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाने प्रगती साधली आहे म्हणण्याची परिस्थिती निश्चीत आहे का ? ऐतिहासिक सांस्कृतीक सामाजिक पुरोगामीत्वाच मापच लावायच झाल तर तामीळनाडू महाराष्ट्राला उजवा ठरावयास हवा पण विवाह आणि सामाजिक दुरावा आणि बंधने आणि तामीळनाडूतील काही विभागातील हिंसा हि चिंतनीय बाब आहे. महाराष्ट्रात सामाजिक दुराव्याचे प्रश्न अस्तीत्वातच राहीलेले नाहीत हि भूमीका वास्तव आहे का ? नगरजिल्ह्याचेच (दुसर्‍या खेड्यातील) उदाहरण घ्यावयाचे झाल्यास स्मशानभूमीत अबकड समाजाचे लोक हळक्षज्ञ समाजाची प्रेते आमच्या समाजाच्या स्मशानभूमीत आणू नका म्हणतात म्हणजे मेलेल्या माणसांच्या बातीतही जर आम्ही सामाजिक दुरावा सांधू शकलो नसू तर जिवंत माणसांच्या बाबतीत सामाजिक सर्व दुरावे सांधले गेले आहेत हे दावे आत्मपरिक्षणाने तपासण्याची कोणत्यातरी अंशातून जागा शिल्लक आहे का ? पाच. अधिक व्यापक स्तरावर विचार केला असता. खरेतर एका यरलव दिवशी प्रेम व्यक्तकेले जाणे हे एक सामाजिक आव्हान म्हणून भारतीय समाजापुढे आल तेव्हा यरलव दिवस 'भारतीय संस्कृतीचा भाग नाही', एवढी भूमिका घेऊन सामाजिक स्थित्यंतराने पुढे येत आसलेल्या काळानुरुप पुढे येणार्‍या मुख्य सामाजिक प्रश्नांची अधिक व्यवस्थित चिकित्सा करून व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या सर्व परिघांचा समतोल साधण्याच्या प्रयास करण्या एवजी, डिनायलीझम वापरून भारतीय समाजाने बगल देण्याचा प्रयत्न केला आहे का ? कि ज्या मुळे बदलत्या काळास आवश्यक व्यक्ती आणि सामाजास आवश्यक संवाद कौशल्य आणि सुरक्षा विषयक आवश्यकतांकडे दुर्लक्षतर झालेले नाही ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/12/2014 - 11:45 नवीन
नगर बद्दल इतके पण..... मुझफ्फर नगर बद्दल कुणीच बोलत नाही. असो.... कालाय तस्मै नमः
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/13/2014 - 12:08 नवीन
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला? बाकी हे प्रकार कोणत्याही जाती-धर्मात चालूच असतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघून हे प्रकार मराठ्यांमध्ये जास्त'च' असतात हे सांगू शकतो. एका मित्राच्या भावाला दुसर्‍या मुलीशी लग्न करायला बळंच तयार केलेलं अगदी जवळून पाह्यलंय. असं का विचारल्यावर, 'अरे, त्याचं जिच्याशी अफेअर आहे ती मुलगी जयभीमवाली आहे' असं सांगितलेलं पाह्यलंय. आणि दलितही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. एकाने मराठ्याची लेक आणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांचं अख्खं घर हे सर्वांना कौतुकाने सांगत होतं. मराठ्यांच्या, ब्राह्मणांच्या लेकींना पळवून नेऊन लग्न करणं म्हणजे फार काहीतरी शौर्य केल्या सारखं मानतात आजही हे लोक. तेवढंच कशाला एका देशस्थाच्या प्रेमविवाहात मुलीचं आडनाव जरा हटके, म्हणजे ब्राह्मणांपै़की वाटणार नाही असं होतं. तो मात्र ती मुलगी कोब्रा असल्याचं सांगत होता. ग्रूपमधल्याच सर्व मुलांच्या आया मग ही देवरुख्यांची असेल का, कर्‍हाड्यांची असेल का? अशा चर्चा करत होत्या. एकीने तर, 'अगं कुणब्याची असेल' अशी कमेंट पास केली होती. मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे. आता मी स्वतः जिथे याबाबतीत आग्रही आहे तिथे दुसर्‍यांनी तसं वागू नये हे सांगण्याचा अधिकार मला नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/13/2014 - 12:42 नवीन
टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?
हे अतिशय जबरदस्त. मान गये सूडराव!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/13/2014 - 13:35 नवीन
मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
भावाला काय वाट्टेल तो उपदेश कराल राव ... स्वतःच काय ते सांगा *biggrin* हलके घ्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 05/13/2014 - 13:37 नवीन
स्वतः पण 'येथे पाहिजे जातीचे' वर ठाम आहोत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड Tue, 05/13/2014 - 13:42 नवीन
*Conditions Apply राह्यलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा