मोदींच्या विजयाचे परीक्षण
२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे -
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
२. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही.
३. बहुतांश मतदार सर्वसामान्यपणे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूने मतदान करतो. सर्व विचारवंत नेहमी भाजपाविरुद्धच बोलत असतात. त्यामुळे वातावरण नेहमी धर्मनिरपेक्ष आघाडीच्या बाजूनेच असते.
४. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जेथे जवळ जवळ १५ वर्ष कॉम्ग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे.
या सगळ्याचा विचार करता, केवळ आमच्यासारखे राजकारणाचे सामान्य अभ्यासकच नव्हे, तर भले भले राजकीय पक्ष देखील दि़ग्मूढ झाले आहेत. म्हणून त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आता माझा अभ्यास मांडतो -
१. सर्वप्रथम या सार्याबद्दल मोदींचे कौतुक केलेच पाहिजे. गेली ३-४ वर्षे त्यांनी ज्याप्रकारे कॅम्पेन चालवली, ते पाहता त्यांच्याइतका दूरदृष्टीचा नेता भारतीय राजकारणात सध्या तरी नाही असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात उपलब्ध असलेली गॅप हेरणे, त्याबद्दल नियोजन करून यंत्रणा चालवणे, आणि दूरदृष्टीने पावले टाकून देशातील सर्वोच्च सत्तस्थान काबीज करणे हे तेव्हढे सोपे नाही. तेदेखील बहुतांश गोष्टी प्रतिकूल असताना.
२. काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. आपल्या जातीच्या समीकरणांवर विसंबून राहून मोठीच चूक त्यांनी केली असे वाटते.
३. अॅण्टी इन्कंबसी या वेळेस जोरात होती, त्याची धार कमी करण्यात ते कमी पडले. केजरीवालांना त्यांनी याच हिशोबाने मैदानात उतरवले, पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार? केजरीवालांनी भाजपाचा विजय सोपा केला, इतका, की आता केजरीवाल ही भाजपाचीच बी टीम होती की काय असा संशय यावा.
४. सत्तेबरोबर आलेला माज ही आणखीन महत्वाची गोष्ट - ज्याप्रकारे कपिल सिब्बल नी रामदेवबाबांचे आंदोलन हाताळले, त्यामध्ये आंदोलन हाताळण्यापेक्षा मी कसा वरचढ राजकारणी आहे हे दाखवण्यचाच भाग जास्त होता. अधिक अजित पवार (मुतू का :) ) त्यामुळे बरीच जनता त्यांच्या विरोधात गेली.
५. मोदींनी विकलेले गुजरातचे स्वप्न. गुजरातच्या शेजारी असलेल्या राज्यांनी उदा - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान. या राज्यांमध्ये भाजपाने क्लीन स्वीप दिला आहे. लेव्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही.
६. नवमतदारांवर पडलेली मोदींची मोहिनी- मी इथेच एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे, वाढलेली १०% मते किमान १०० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी होती. हे १०% नसते, तर रालोआ २३० - २५० मध्येच रोखली गेली असती.
मोदींकडून असलेल्या माझ्या अपेक्षा, आणि मोदींची ५ वर्षांची स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दलच्या माझ्या अंदाजाचा धागा लवकरच.
प्रतिक्रिया
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना.गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)