राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-Vadra-Airport-Security.gif
भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्या राष्ट्राने दिला होता.
तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही.
जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा!
http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-being-frisked-at-airports/475302-37-64.html
प्रतिक्रिया