महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण
तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच.
आपणास काय वाटते?
ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Engineer-murder/articleshow/36161829.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-many-in-Pune-to-shun-skull-caps-Pathani-suits/articleshow/36243080.cms
प्रतिक्रिया