Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली. 'ये क्या है? 'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली. 'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश. 'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?' 'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली. त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई? 'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले. "सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो. कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस केल्याप्रमाणे लिहिते. काळाबरोबर बदलणे म्हणजे सतत इव्हाल्व व्हायचा प्रयत्न करणे. कणखर बनणे. शारीरीक दृष्ट्याही आणि मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्याही. जगासोबत चालताना दमछाक न होण्यासाठी ते आवश्यक आहे, तसंच जगासोबत, क्वचित प्रसंगी प्रवाहाविरुद्ध उभं राहण्यासाठीही ते आवश्यक. खुद को कर बुलंद इतना.. ह्या वाक्यावर माझा नितांत विश्वास आहे. उदाहरणार्थ, बदलता काळ आम्हांला शिकण्याच्या, व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी देत असेल त्या त्या स्वीकारायला हव्यात, त्यासाठी कष्ट करुन आम्हांला स्वतःला सिद्ध करायला हवे, तसे सिद्ध करताना क्वचित प्रसंगी काहींजणाकडून वाट्याला येणारे अभिरुचीहीन, खालच्या दर्जाचे बोलणे, वागणे परतवून लावायची धमकही अंगी बाणवायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास बाणवायला हवा, स्वतःवरचा विश्वास ढळू देता उपयोगाचा नाही. मग काही अवघड नाही, नसते. हे सारे असे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि डोळसपणे जगताना त्यातून हेही शिकायचे की हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते. इतकं वीक बनायचं नाही. आपला आनंद इतरांत वाटायचा, एखादं काही चूक असेल तर केवळ हुल्लडबाजीला घाबरुन चूकीला चूक म्हणायला घाबरायचं नाही. आपल्या मर्यादा ज्या आपण आखल्या असतील त्यांवर इतरांना पाय टाकायला, त्या पायदळी तुडवायला द्यायचं नाही, आणि कोणी तुडवू पाहत असेल तर ते घाबरुन बघत बसायचं नाही, सहन करायचं नाही. एकला चालो रे.. असं असलं तरी विरोध करायचा. इतरांच स्वातंत्र्य मान्य करायचं आणि आपलंही त्याच प्राणपणाने जपायचं. सगळ्यात महत्वाचं, चार लोक एकत्र येऊदादादागिरी करत चुकीचंच बरोबर म्हणत असले तर केवभागर्दीचा भाग बनून सुरक्षित रहायला मिळतं म्हणून ते मान्य करायचं नाही वा त्यात आपलाही सूर मिसळायचा नाही. चार लोक उद्या जमून खून करतील. माझ्या घरुन मला काळासोबत असंच जायला शिकवलं आहे. कळप बनून जायला नव्हे. :) असो. बाकी चालूदेत. आणि अनूप, माझ्या अतिशय जवळच्या मित्र परिवारात/ कुटुंबात आम्हीही सगळ्या विषयांवर बोलतो, त्याचं मला वावडं नाहीये, पण जवळच्या मित्रपरिवारात हे महत्वाचं. असो.

हे असे दुसर्‍यांना तुच्छ समजून जगणार्‍या लोकांसारखे आपण कधीच वागायचे नाही. त्यातून अहंकाराशिवाय हाती काहीच लागत नाही आणि तो एक पोकळ बुडबुडा आहे हे बाकी कोणाला माहित नसले तरी स्वतःच्या मनाला चांगले ठाऊक असते, आणि मग त्यातूनच सतत इतरांची टिंगल ट्वाळी करायची गरज पैदा होते.
आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते. त्यांच्या दृष्टीने अहंकारी मनाला जे सत्य वाटते तेच वास्तव असते. अशांना कुणी वास्तवाची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला तर तो पालथ्या घडयावर पाणी ओतण्यासारखे असते. जरा बारकाईने निरिक्षण केले तर आपल्या आजूबाजूलाही असे लोक दिसतात. प्रतिसाद आवडला. पटला.

आपला अहंकार हा पोकळ बुडबुडा आहे याची काहींना जाणिवच नसते.
आपला अहंकार बुडबुडा आहे की टणटणीत खच्च भरलेला स्टील स्टॉन्ग गोळा आहे हे कसे ओळखावे ? ह्याची काही टेस्ट आहे का ?

असते ना. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटतं तेच लोक आपल्या अनुपस्थितीतही बोलले तर स्टील गोळा. नाहीतर...

एखाद्या गोष्टीबद्दल विनोद करणं वा मोकळेपणानं चर्चा करण यातून त्या गोष्टीबद्दलचा टॅबू कमी होतो. विशेषतः जेव्हा अशी गोष्ट नैसर्गिक असते तेव्हा. सो मला आक्षेपार्ह नाही वाटलं. जेव्ह्ढ्या जास्तं गोष्टी, संवाद असो की अजून काही, लिंगनिरपेक्ष करता येतील तेव्ह्ढं चांगलं असं मला वाटत. तुमची व्याख्याही पटली थोडी.

अरेच्या, एकाला विचारले तर दुसरा उत्तर देतोय, हा काय मजेशीर प्रकार? :) मी अनूपना विचारले, त्यापुढे तो विषय संपलाही होता. त्यात तुमचा उल्लेखही नाहीये. थोडा वेळ थांबलात तर टवाळभाऊंना प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल. हे जुन्याच पोस्टींवर कशाला खोदकाम करायचे ते? :)

प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये, म्हणजे त्या पोस्टीची चिरफाड + टिंगल करता येईल
इथे घाउक कौतिक करुन मिळेल अशीसुध्धा पाटी लावावी काय??? :)

अरेच्या !! ज्याला प्रश्ण विचारलाय त्यानेच उत्तर द्यावे असा धोरणीय बदल झाला काय ?? जल्ला मना कोन काय सांगत नाय हल्ली.

अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.

हा विषय विनोदाचा असु शकत नाही.मिपावर बर्‍याच वेळा अशा लेखांच्या प्रतिक्रियांआडुन लोक आपसातले हिशोब सेटल करायला बघतात असे वाटते.म्हणजे सहसा सभ्यतेचा बुरखा पांघरायचा...पण मग अशा एखाद्या लेखाच्या निमित्ताने पुरुष वि. स्त्रिया असे गरळ ओकायला सुरुवात...आणि शिवाय अनाहीतामध्ये डोकावता येत नाही याचा राग वगैरे वगैरे...चालुद्या

बाकी ठीक एकवेळ, पण
अनाहीतामध्ये डोकावता येत नाही याचा राग
अनाहिता म्हणजे काय एफबीआय आहे की रॉ ऑर फॉर द्याट म्याटर सेन्सॉरबोर्ड की जिथे प्रवेश मिळत नसल्याचा राग यावा?

नैच आहे मुळी अनाहिता म्हंजे एफ बीआय. तरी पण्ण प्रत्येक ठिकाणी, जम्मेल तिथे कोण बै सत्तत अनाहिताचा उल्लेख केल्याशिवाय राहूच शकत नै?

टका आणि बॅमॅ, अनाहिता हे संपूर्ण वेगळे प्रकरण आहे. ते इथे उकरून काढणे औचित्याचे वाटत नाही. याप्रकरणी यशोधरांशी सहमत.

इतक्या प्रामाणिक उत्तराबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद पण तुम्ही " just pile on" करणार्‍यापैंकी होऊ नये/ असू नये ही मनापासूनची इच्छा. :)